रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आपले घर तर दोन पावलावरच होते मग सापडत का नाही >> जमीनी हडप करून वकीलान आतां घर गडप केलां कीं काय ? Wink

नेने वकील लय पोचलेला दिसतोय. घर, शेती, कलमं, बाकीची जागा सगळं स्वतःच्या नावावर करुन घेऊ शकतो आणि नाईक लोक काहीच करु शकणार नाहीत म्हणे. या सगळ्याचे कागदपत्र आहेत त्यांच्याकडे. Uhoh

घरात प्राॅपर्टीसंबंधी काहीच कागदपत्र नाहीत, वकीलाकडेही नाहीत, अण्णांनी ठेवल्यानी तरी खय? की वकील खोटं बोलतोय?
( ग्रामपंचायतीत जाऊन ७/१२ तरी काढुन आणायचा. एकतरी कागद हातात असात. )

अगो निधी, त्यो दत्ता एकला म्हणून काय काय बघता? त्यातुन माधव हा असा ठोकळा. दत्ता काल भडकला तेव्हा माधवने त्येका गप केला, पण नन्तर माधव अन दत्ता गुरुवाक भेटले त्या नन्तर दोघाक चकवा लागलो. खय गेले काय माईत? आज शिमग्याचा उल्लास असा.

त्यो दत्ता एकला म्हणून काय काय बघता?>> +१

त्या अभिरामाचा सारखा एकच तुणतुणा. खयचों पण विषय असुदे गाडी त्याच्या लग्नाकडेच वळणार. काल तर छायाच्या काळजीनं अण्णी बोलत असता नि याची गाडी लग्नाच्या वळणावर आलेली बघून एक थोबाडीत भडकवावीशी वाटली. Angry
अरे बाबा स्वतःच्या भविष्याचो विचार कर. परीक्षा दे, चांगल्या मार्कांनी पास हो, चांगली नोकरी मिळव.. मग लग्न कर. बापूस होतो तोपर्यंत ठीक होता, आता वेगळा र्‍हायचा म्हणताय तर बाकीचो ईचार करुक नको. ह्यो गुडघ्याक बाशिंग बांधून तयार.

<<त्या नन्तर दोघाक चकवा लागलो. >>

घराकडे येताना काल तुमकांय त्या दत्ता - माधवसारखोच चकवो झालो ?
खवणेकराच्या माडीवर रातीक पत्त्याचो डाव बसलेलो, तां सांगा !
shimagaa.JPG

<< त्या अभिरामाचा सारखा एकच तुणतुणा. खयचों पण विषय असुदे गाडी त्याच्या लग्नाकडेच वळणार. >> काय करतलो बिचारो ! ' इष्काची इंगळी डसली .....' !!! Wink

अरे कोणीतरी यांना समजवा रे.. प्रत्येक एपिसोड मधे एकच त्यातल्या त्यात ड्यांजरफूल सीन असतो आणि तो देखील हे लोक प्रोमो मधे आधीच दाखवून मोकळे होतात !

शिरेलमधल्या ठोकळा-ठोकळीला अ‍ॅक्टींग येवो न येवो, पण शिरेल संपेपर्यंत आंम्ही माल्वणी मात्र नक्की शिकू! Wink

चिन्गः- काय गो माय, माका का अडवुन धरल्यात नायकानी? माका जाऊचा असा आत, काल मिया भेळ अन पाणीपुडी जोरदार हाणल्यानी. माका जावचाच ना, जावचाच!

चॉन्गः अगो माझी बाय, आत खय जातला? थय लाईन लागलेली असा माय सकाळपासुन. गप् रव, तुझा घोव येतलो अन तोच कायतरी सोय बगील. इतक्या मोठय घरात दुसरी सोय असेलच ना मा! आता चाय बी पिऊ नको, चाय पिल्याने पोट साफ होतलो. गप रव!
>>>> रश्मी तै !!! Rofl विकेट्च काढलीस गो चिंग चॉन्ग ची!!!!!

शिरेल संपेपर्यंत आंम्ही माल्वणी मात्र नक्की शिकू! >>>>+१

<< पण शिरेल संपेपर्यंत आंम्ही माल्वणी मात्र नक्की शिकू! >> शिरेल संपल्यार परिक्षा घेवन ठोकळीच्या हस्ते ' मालवणी पास' असो दाखलो देवचो प्रस्ताव आसा. ! Wink

काल दत्तीने किती लाडीकपणे ठोकळीला खरवस खाऊ घातला आणि हळूच जमीन आमच्या नावावर करा म्हणून सांगितले कित्ती गोग्गोड बोलत होती दत्ती (माई पण म्हणाली चक्क सूर्य पश्चिमेला उगवलाय म्हणून Rofl ) आणि जेव्हा ठोकळी तिला म्हणाली मी ह्यात पडणार नाही तू दत्ताला सांग माधवाशी बोलायला काय जळफळाट झाला तिचा. (लगेच टोन चेन्ज झाली दत्तीची :हहगलो:)

काय वेड्यासारखे हसलो आम्ही Rofl

दत्ती अण्णीशी लाडेलाडे बोलत होती तेव्हाच डौट आलेला मला. Happy

आणि ठोठो काय शेती करणार आहेत का, द्यायची वरच्या आळीतली ५ एकर जमीन दत्ताला. पिकवेल तो तिथे काहीतरी.
आणि त्याबदल्यात मांगरावरची ६ एकर जमीन स्वतः घ्यायची. Wink हाय काय नाय काय.

रश्मी भारी हा Rofl मीया आत्ता वाचलय ता. Happy

आधीच्या धाग्यांच्या परंपरेला अनुसरूनच रात्रीस खेळ
चाले १ अस नाव दिल

बाकी 'रात्रीस खेळ चाले - ठेवा नांवं !' हेही भारी आहे Happy

जानुबैचा रेकॉर्ड ठोकळी नक्कीच मोडेल. ठोकळी इतक्या लवकर जानुबै डोक्यात नव्हती गेली .आणि जानुबैच्या
बाळापेक्षा यातल भूत जास्त वाट बघायला लावणार >>>+१

या निमित्ताने कोकण दर्शन जे घडत आहे त्यामुळे डोळे आणि मन प्रसन्न होऊन जात आहेत >>>+१

चिंग चौंग , पोचकाड >>>:-) फोटो छान आहे

बाकी छायाकडे तशी साडी असेल तर कधीना कधी दिसलीच असती ना , धुताना किंवा वाळत घातल्यावर तरी.

ती छाया नाsssssssssssय, शेवन्ता हाय + १

द्यायची वरच्या आळीतली ५ एकर जमीन दत्ताला. पिकवेल तो तिथे काहीतरी.
आणि त्याबदल्यात मांगरावरची ६ एकर जमीन स्वतः घ्यायची. हाय काय नाय काय. >>>> हो ना. असेही त्यांना फक्त भविष्यात कोकणांत आपली जमीन असावी हाच हेतु आहे ना. दत्ताला बिचार्‍याला शेतीतुन जे पिकेल त्यावरच संसार करायचा आहे वरुन यांना त्यातील उत्पन्न द्यायचे आहे ते वेगळेच. ठोकळी इतर ठिकाणी लगेच पचकते पण इथे मात्र माधवशी बोलायला सांगते :रागः

पहले मुझे बिलकुल भी मालवणी नहीं आती थी..
मैं बहुत परेशान रहता था..
सब मुझपे हसते थे.. मेरा मजाक उडाते थे..
पर जब से झी मराठी पे 'रात्रीस खेळ चाले' शुरु हुवा.. मेरी खुशी का तो ठिकाना ही नहीं रहा..
अब मैं सोमवार से शनिवार रोज रात १०:३० बजे ये सिरीयल देखता हूं.. और खुब मालवणी सिखता हूं..
मेरी दुनिया ही मानो बदल गयी !
.. झी मराठीक आनि 'रात्रीस खेळ चाले' सगळ्ळो टीम मेंबराक माझो धन्यवाद..

मित Happy

अरे, इथली 'चायपे गपशप' मालिकावाल्यांनी वाचली की क्कॉय? काल चक्क वकिलसाहेब 'उन्हाळ्यात लोक चहा सोडतात पण आम्हा कोकणातल्या लोकांना सवय असते' असं माधवला सांगत होते. चांगला टळटळीत उजेड असताना तिथे गेलेले दत्ता आणि माधव निघेस्तोवर रात्र झाली? 'रात्रीस खेळ चाले' हे नाव सार्थक करताहेत. माझी आजी एक म्हण वापरायची त्याची आठवण झाली 'दिवस गेला रेटारेटी आणि चांदण्याने केर लोटी' म्हणजे दिवसा काही करायचं नाही आणि रात्र झाली की सुरुवात करायची.

काल दत्ताने वळून बघितल्यावर वाटलं की ह्यांना पण छायाच दिसली का काय - आधी आर्चिस, मग अभिराम आणि मग हे, इजा बिजा तिजा. पण त्याला गुरव दिसला. नक्की गुरवच होता ना तो? कारण चकवा लागल्यावर दत्ताने 'त्याने इथे आणलं' असं काहीतरी म्हटलं. कोणाबद्दल म्हणत होता काय माहित. अभिराम पण बावळटच आहे. छाया दिसल्यावर आर्चिसला घरी फोन करुन ती तिथे आहे का विचारायचं ना लगेच. घरी येईपर्यंत थांबला.

निलिमाच्या नशिबात काही सुखाने खरवस खाणं लिहिलेलं नाही. सरिताने मात्र जमिनीचा विषय तिच्याकडे काढण्यात घाई केली. निदान तो खरवस पचेपर्यंत तरी थांबायचं. निलिमाने 'मी जास्त गोड खात नाही' म्हटल्यावर सरिता तिला 'चल झूटी' म्हणून थापट मारते की काय असं वाटलं क्षणभर. माई दोघींना 'आता जावा-जावा बहिणीसारख्या रहा' म्हणतात. ह्यांना स्वतःला जाऊ नव्हती काय?

लग्नानंतर अभिराम आणि देविका कुठे वेगळे रहाणार आहेत कोणी सांगता का जरा? Uhoh ह्या बाबाला कोणीतरी परिस्थितीची जाणीव करून द्या रे. बहुतेक त्याने 'कयामत से कयामत तक' पाहिलाय आणि आपण आणि देविका आमिर आणि जुहीसारखे 'एकटो आसा पण दु:खी नसा. मनात आणलंय तर काय पण करतलो. बस एक तुजी साथ हवी माका' असं म्हणत मांगराच्या जमिनीतून फिरणार असं वाटतंय त्याला.

Pages