अनिरुद्धबापू, त्यांच्यापासून समाजाला असलेले धोके व आपण घ्यायची काळजी

Submitted by Rajesh Kulkarni on 16 December, 2015 - 00:04

अनिरुद्धबापू, त्यांच्यापासून समाजाला असलेले धोके व आपण घ्यायची काळजी
.
अनिरुद्धबापू म्हणवून घेणारे एक प्रस्थ अनेक वर्ष महाराष्ट्र राज्यात आहे. हे बापू शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत. कदाचित वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अध्यात्मातल्या गुरूगिरीचा बाजार मोठा असल्याचे त्यांनी वेळीच ओळखल्यामुळे ते इकडे वळले असावेत.

ते स्वत: शिर्डीचे साईबाबा, राम व विष्णु यांचे अवतार आहेत असे सांगितले जाते. ते शाळेत असल्यापासूनच ते शिर्डीचे साईबाबा असल्याचे त्यांना वाटे म्हणे. म्हणजे शिर्डीच्या साईबाबांना कुठल्या तरी विद्यापीठाने डॉक्टरकीची पदवी दिली असे समजुयात. त्यांना राम म्हणावे, तर त्यांची पत्नी सीता व त्यांचा एक भाऊ किंवा जवळचा मित्र हनुमान. त्यांना विष्णु म्हणावे तर त्यांची पत्नी लक्ष्मी व तो मित्र किंवा भाऊ शेषनाग असा मौजेचा मामला आहे.

मध्यंतरी या मित्राचे किंवा भावाचे त्यांच्याशी मतभेद झाले व त्याला बदलून दुसरा त्या जागी आला. काही भक्तांनी सांगितले की तो आधीचा लक्ष्मण किंवा शेषनाग फ्रॉड होता, आताचा हा खरा आहे असे बापूंनी सांगितले. इतक्या लोकांचे अवतार असलेल्या बापूंना तो फ्रॉड आहे हे आधीच कसे कळले नाही असे प्रश्न यात विचारायचे नाहीत.

बापू हेलिकॉप्टरने जेथे जेथे जातात तेथे त्यांना हार घालण्याची इच्छा असलेल्यांना २५,००० रू. वगैरे मोजावे लागतात असे अनेक उल्लेख माहितीजालावर दिसतात.

त्यांचा भक्तपरिवार अफाट आहे. याचाच अर्थ आपले डोके त्यांच्याकडे गहाण टाकलेल्यांची संख्या बरीच आहे. अर्थात आपल्याकडे अशा लोकांची कमतरता नाही. यातले अनेकजण सुशिक्षित आहेत बरे का! त्यांना सावध करायला जा तर त्यांचा फणकारा पहायला मिळतो इतक्या घातक प्रमाणावर त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले आहे. आसाराम व त्याचा दिवटा नारायण यांचे धंदे माहित होऊनदेखील ते नराधम तसे करणारच नाहीत याची खात्री असलेले लोक अजुनही त्यांच्या सुटकेची वाट पहात आहेत, तसेच.

कोणाला वाटेल लोक बापूंच्या निमित्ताने देवधर्माच्या मागे लागले आहेत तर त्यात वाईट काय आहे?

काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण झाले, त्यानंतर काही दिवसात या महाभागाने एक प्रवचन झोडले. त्यात बलात्काराच्या संदर्भात त्याने जे तारे तोडले, ते ऐकताना एक सुशिक्षित म्हणायला अक्षरश: लाज वाटते. त्यांनी तोडलेले तारे पहा. त्यांनी पाच कलमे सांगितली.
१. स्त्री किंवा पुरुष यांच्यापैकी कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल.
२. जी व्यक्ती रोज पाच वेळा गुरूक्षेत्र मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही. अगदी १०० लोक जरी बलात्कार करायला गेले तरी त्यांना ते शक्य होणार नाही.
३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने मातृवात्सल्य उपनिषदातले दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
४. ज्यांना लिहिता वाचता येत नसेल किंवा अगदी मुक्या व्यक्तींनी मनातल्या मनात जरी अनिरुद्ध अनिरुद्ध असे म्हटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु म्हणजे बापू स्वत: करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल.
५. अहिल्या संघाच्या माध्यमातून ते असे काही तंत्र शिकवणार आहेत की ती स्त्री बलात्का-याला जागच्या जागी छक्का (त्यांच्याच भाषेत) करून टाकू शकेल.

मात्र हे सारे काही टर्म्स व कंडिशन्सवरच अवलंबून आहे बरे का! जसे जाहिरातींमध्ये fine print असते तसे. कारण बापू सांगतात की तुमची बापूंवर भक्ती, प्रेम व श्रद्धा असेल तरच हे शक्य होईल. आता कळले की निर्भया प्रकरणानंतरही देशातच काय सा-या जगात बलात्कार चालूच का आहेत? कारण त्यांची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही. आता बलात्कारावरचा एकच उपाय, तो म्हणजे सा-या जगाला बापूंच्या चरणी घालायचे. तरीही तसे काही प्रकरण झालेच, तर खुशाल समजायचे की त्या बलात्कारित स्त्रीची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही किंवा नव्हती. इतका साधा मामला आहे. अर्थात श्रद्धा आहे की नाही हे तपासायला बॅटरीचा चार्ज किती आहे ते तपासू शकेल असे लाल-पिवळा-हिरवा असे रंग दाखवणारे यंत्र काही बापू देत नाहीत बरे का! म्हणजे तुमची त्यांच्यावर पुरेशी श्रद्धा अाहे की नाही हे बापूच ठरवणार. आहे की नाही गंमत.

हे सारे प्रवचन युट्युबवर आहे बरे! बापूंना काही दिव्य शक्ती असल्या तरी त्यांना हे प्रवचन देताना मधूनमधून खोकला मात्र येतो बरे! मुळात डॉक्टर असल्यामुळे मध्येच अर्धे-एक वाक्य इंग्रजीतही बोलतात.

बलात्कार झालेल्या स्त्रीला आयुष्यभर त्याचे ओझे वहावे लागते अशा अर्थाचे तारे पण तोडलेले आहेत. कोठेही हे सांगणे नाही, की जे झाले त्यात त्या स्त्रीची काहीही चूक नाही, जे झाले ते विसरून पुढे पाहिले पाहिजे, आयुष्य फार सुंदर आहे, वगैरे.

बापूंचे हे असे बरळणे चालू असताना त्यातला फोलपणा समोरच्या प्रेक्षकांपैकी, माफ करा, भक्तांपैकी एकाही मुर्खाच्या लक्षात आला नाही. म्हणजे डोके वा मेंदू गहाण ठेवणे हे कुठल्या थराला जाऊ शकते ते पाहून अंगावर काटा येतो. तो जादुटोणा कायदा इतका अर्थहीन केला गेला की यांच्यासारखे लोक त्यात अडकू शकणारच नाहीत.

हे एक प्रवचन झाले. आणखीही आहेत. पहा, ऐका व धन्य व्हा.

आता सांगा अशा धार्मिक गुरूंची जागा तुरूंगात हवी की मनोरुग्णालयात? आणि त्यांच्यासमोर बसून हा मूर्खपणा शांतपणे ऐकून घेणा-यांचे काय करावे? आपण अशा ठिकाणी नसतो ना, हे पाहण्याची जबाबदारी शेवटी आपलीच की.

या धन्य प्रवचनाची आठवण येण्याचे कारण म्हणजे काही शाळांमध्ये प्रवचने नियमितपणे आयोजित केली जातात यासंबंधीची बातमी. तर अशा शाळांमधील मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल ते वेगळेच.

मागे मी चेन्नईतल्या कल्कीमहाराजाच्या नादी लागलेल्या महाराष्ट्रातल्या सुशिक्षित कुटुंबाबद्दलही लिहिले होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्याटुन्या अगदी अगदी
मी नेहमी म्हणते पुर्वजांनी ज्या प्रथा अतिशय डोकं लावून चालवलेल्या त्यांची मधल्या २ पिढ्यांनी वाट लावलीये

श्रद्धा नेहमीच आंधळी असते हे माझे मत. स्मित >>> नाही हो ती अंध श्रध्दा Happy

साधू वाणी मने खबर छे. खरा देव (सगु.निगु.) असे म्हणत नाही माणसाने बन्वलेली - मार्केटिंग केलेली स्टोरी हाय ती. Happy

श्रद्धा नेहमीच आंधळी असते हे माझे मत.
<<
नाही ओ.
आमच्या माहितीतल्या दोन्ही श्रद्धांना चष्मे आहेत. पण आंधळ्या नक्कीच नाहीत. आंधळ्याचे सोंग आणणे वेगळी बाब.

त्या एकमेकींना अधूनमधून तू आंधळी आहेस असे म्हणत असतात ते सोडा. Wink

कमीत कमी माबोकर अ.बा. भक्तांचे जरी डोळे उघडले तर ह्या धाग्यचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. Happy

मला १८ जाने ०७ नंतरचीच पाने दिसत आहेत. कोणीतरी पेस्टाना ते इथे प्लीज. +१

अजुन एक म्हणजे मलाही त्या जुन्या माबोवरच्या धाग्यात विनोदी काही सापडलेच नाही.
उलट माबोवर येऊन इंग्रजीत लिहिणार्‍यांची चीड येते. तिथे त्या पोत्याने होत्या. असल्या इंग्रजी कमेंट्स स्किप करुन वाचले तर सगळे देवनागरीत लिहिणारे सिरियसलीच खंडन करत होते मुद्द्यांचे.

ते बाबाभक्त मात्र ते इंग्रजी कुठुन चोप्य पस्ते करत होते कोणास ठाऊक. वाचलेच नाही मी ते.
मृ ची कमेंट सुद्धा दिसली नाही. मलाही १८ जाने ०७ नंतरचीच पाने दिसत आहेत.

१८ जाने'०७ रोजीच तिथे चर्चा सुरु झाली होती. Happy
vaishali30 यांनी मायबोलीवर कोणि बापुभक्त असल्यास बोलायला आवडेल अशी पोस्ट टाकली. मग महेश यांनी कोण बापु वगैरे प्रश्नावली टाकली आणि मग............

मी देखील 'अनिरुध्द बापुंची' भक्त आहे. गेल्या तेरा वर्षांपासून अनुग्रह घेतलाय. त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखे भरपूर आहे. पण आज त्यांच्या दुपारच्या भोजनाची जबाबदारी मी शिरी घेतल्यामुळे लिहिण्यास वेळ नाही. तेव्हा पुन्हा कधीतरी..

ही मृण्मयी यांची कमेंट पहिल्याच पानावर आहे. ह्याबद्दल सगळे म्हणतायेत का?

झाडे नष्ट करायचे काम सगळीकडेच जोराने सुरु आहे आणि त्याचा हवनाशी संबंध नाही. इतकि झाडे तोडण्यासारखे मोठे हवन कुठेही चालू नाही.

प्रचंड प्रमाणावर झाडतोडीचे कारस्थान वेगळे आहे.

ती २०१२ ला जगबुडी/ प्रलय वाला बीबी महान आहे. वेमांनी बंद करायला नको होता.
आज २०१५ संपत असतांना मला तिथे माचुपिचुंचे आभार मानायचे होते.

तिथे झक्कींनी लिहिलंय तो शाप खरा असावा बहुतेक. Sad

- जुन्या माबोवर नसलेली पियू

>> माणसाने बन्वलेली - मार्केटिंग केलेली स्टोरी हाय ती
मग माणसाने न बनवलेली ष्टोरी सांगा कुठली ती?

रामदेवबाबाच्या योगाच्या प्रचार, प्रसार आणि सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते.>>>>>>>>> +१.
जे लोक योगशिबीर वा क्लासला जाउ शकत नव्हते,त्यांची रामदेवबाबांच्या,आस्था चॅनेलद्वारे दाखवण्यात येणार्‍या
कार्यक्रमानुळे सोय झाली.

>>जे लोक योगशिबीर वा क्लासला जाउ शकत नव्हते,त्यांची रामदेवबाबांच्या,आस्था चॅनेलद्वारे दाखवण्यात येणार्‍या कार्यक्रमानुळे सोय झाली.
येस, बरोब्बर. जेव्हा आजुबाजुचे इतर लोक अगदी श्वास घेण्यावरसुद्धा पेटन्ट घेत होते, तेव्हा रामदेवबाबाने योगाचे ज्ञान खुलेपणाने द्यायला सुरूवात केलेली.

आमच्या माहितीतल्या दोन्ही श्रद्धांना चष्मे आहेत. पण आंधळ्या नक्कीच नाहीत. >>>>>>>> Lol

ती २०१२ ला जगबुडी/ प्रलय वाला बीबी महान आहे. वेमांनी बंद करायला नको होता.>>>>>>>>>> तिथे सिंड्रेलाने जी माचु पिचुच्या देवाची आरती लिहिलीये ती महान आहे. ऑफिसात घुसमटत घुसमटत हसुन डोळ्यात पाणी आलं माझ्या.

<<ती २०१२ ला जगबुडी/ प्रलय वाला बीबी महान आहे. >>
----- २०१२ ला जगबुडी होणारच होती... अनिरुद्धबापू यान्च्या प्रयत्नाने टळली... जय जय स्वामी...

तेव्हा रामदेवबाबाने योगाचे ज्ञान खुलेपणाने द्यायला सुरूवात केलेली. > अगदी अगदी
त्याचे फळ म्हणून त्यांना भारत सरकार एक बेट योगा शिकवण्यासाठी देत आहे. अस्सा खुलेपणा सर्वाना द्यावा

मग माणसाने न बनवलेली ष्टोरी सांगा कुठली ती? >>>> ती मा.ने ब.स्टो. तर बाकीच्या स्वयंभू आहेत अस म्या कवा म्हनल? काहीबी टगेपणा करू नगा.. Happy

ते कोहम्कोहम सोहम्सोह्म प्रकरण जाम इरिटेटिंग असतं. दर रविवारी पहाटे माझ्या घरासमोरच्या हॉलमधे मोठे स्पीकर लावून चालवलेल्या हायपरव्हेंटिलेशन बोंबा मी बंद पाडल्या आहेत. आता ते लोक तिथे फिरकतही नाहीत.>>>
दिमा, काय उपाय केलात ते सांगा ना? मलाबी उपयोग होइल..

मी देखील 'अनिरुध्द बापुंची' भक्त आहे. गेल्या तेरा वर्षांपासून अनुग्रह घेतलाय. त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखे भरपूर आहे. पण आज त्यांच्या दुपारच्या भोजनाची जबाबदारी मी शिरी घेतल्यामुळे लिहिण्यास वेळ नाही. तेव्हा पुन्हा कधीतरी.. >> तीच ती. मि. मृण्मयी अनिरुद्ध आहेत. Happy

>> तीच ती. मि. मृण्मयी अनिरुद्ध आहेत.
अच्छा तर असं आहे ते..
धन्स कांपो, मला पण सुरुवातिला झेपली नव्हती ही कामेंट..

Pages