प्रसंग पहिला, स्थळ, नवीन पनवेल, सुखापुर.
काल सकाळी व्हॉटस अॅप वर बायकोला तिच्या मैत्रिणीचे मेसेजेस आले त्यात तिने आम्हाला उद्देशुन सतर्क राहायला सांगितल, विषय होता तिच्या घरी झालेल्या घरफोडी बद्दल. तब्बल सतरा तोळं सोनं आणि काही रक्क्म घर फोडुन चोरांनी पळ काढला होता.
त्यानंतर तिला केलेल्या कॉल मधुन सविस्तर कळालेला व्रुत्त्तांत असा. "घरात ते तिघेच रहातात. ति, तिचा नवरा आणि त्यांची लेक. त्या मैत्रीणीचा वाढदिवस असल्यामुळे ते सहकुटुंब लोणावळ्याला फिरायला गेले असताना हा प्रकार घडला.
खबर ऐकताच मी सर्वप्रथम बायकोला हा प्रश्न विचारला "कि एवढ सोन कोणी घरात ठेवत का?" त्यावर तिने सांगितल की "मी पण हाच प्रश्न सर्वप्रथम तिला विचारला होता." त्यावर अस कळालं की याच आठवड्यात तिच्या दिराच लग्न असल्यामुळे त्यांनी ते दागिने बॅंकेतुन घरी आणले होते. सोसायटीच्या वॉचमनला विचारल असता त्याने झोप लागली होती अस सांगितल. वर "त्यांनी माझ्या जिवाच काही बर वाईट केल तर?" असा प्रतिप्रश्न सोसायटी मेंबर्स आणि पोलिसांना केला. पोलिस पंचनामा करुन गेल्यानंतर त्यांच्या शेजारच्या बाईने तिला सांगितल की "काल रात्री दोन ते अडीच च्या सुमारास तुमच्या घरातुन तोडफोडीचे आवाज येत होते पण घाबरुन आम्ही गप्प बसलो." वर तुम्ही पोलिसां समोर का नाही बोललात यावर तिने आम्हाला फार भिती वाटत होती अस सांगितल.
सविस्तर पोलीस कंप्लेंट वैगरे देऊन सुद्धा दोनच दिवसांनी त्यांच्याच बाजुच्या बिल्डिंग मध्ये सेम प्रकार घडला.
प्रसंग दुसरा, स्थळ, बोरीवली,
कालचा घडलेला प्रसंग ताजा असतानाच ऑफिस मधल्या मित्राच्या बिल्डिंग मध्ये एकाच रात्रीत तिन घरफोड्या झाल्या. सर्वात विषेश वरील सर्व प्रसंगात घरातील सर्व व्यक्ती काही ना काही कारणास्तव घराबाहेर गेल्या होत्या.
आता काही विचार करण्यासारखे मुद्दे.
१) मी सतर्कता म्हणुन आमच्या सोसायटीत काही लोकांना फोन करुन हा प्रकार कळवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अशी होती. "तशी आपली बिल्डिंग रोड साईडला असल्यामुळे आपल्याला एवढी भिती नाहीये."
२) सर्व सोसायटीत वॉचमन असुन सद्धा सर्रास असे प्रकार घडतायत.
३) गेले काही दिवस चड्डी बनियान गॅंग सक्रिय झाल्याच टी.व्ही. वर पाहिलय.
४) हे लोक टोळीने अथवा हत्यारबंद अवस्थेत असल्यामळे स्वताच्या जीवाला घाबरुन लोक घरात राहणे पसंद करतात.
५) आपला मेहनतीचा पैसा कोणीतरी असा अचानक लुबाडुन नेऊन सुद्धा आपण फिर्यादी पलीकडे काहीच करु शकत नाही.
६) असे प्रकार घडत असतानाही रात्रीचे गस्त घालणारे पोलीस कुठे असतात? अथवा १०० नंबर वर फोन केल्यास तात्काळ मदत येते का?
७) सोसायटी अधिनियमात कंपलसरी सी.सी. टीव्ही बसवण्या बाबत काही तरतुद आहे का?
८) एखाद्या आमदार, खासदार, सरपंच अथवा स्थानिक नेत्याच्या घरावर कधी दरोडा पडल्याच कधी ऐकल नाहीये.
९) दागिन्याचा अथवा मौल्यवान चीजवस्तु अथवा कागदपत्रांचा विमा उतरवल्यास कितपत परतावा मिळु शकतो.
१०) अशा वातावरणात घर बंद ठेऊन बाहेरगावी, फिरायला जायचं असल्यास काय खबरदारी घ्यावी?
एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. कित्येक लोकांना अशा प्रसंगी कसं वागल पाहीजे अथवा काय उपाय योजना केल्या पाहिजेत हेच मुळात माहित नसतं काही लोक माझ्या घरावर तर प्रसंग नाही आलाय ना म्हणुन गप्प बसतात.
एक मायबोलीकर म्हणुन माझी सर्वांना विनंती आहे. "आपण यावर काय उपाय योजना करु शकतो अथवा प्रसंगावधान राखुन अशा प्रकारांना कसा आळा घालु शकतो याबाबत शक्य ते मार्गदर्शन करावे."
कारण सर्व सुरक्षा मंत्र्या-संत्र्यांच्या मागे असताना तुमच्या आणि माझ्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो. कारण उद्या कदाचित ही वेळ आपल्या वरही येऊ शकते.
पण तिथे गेला तरीही तो कायमच
पण तिथे गेला तरीही तो कायमच "पुणेकरच" अस्तो>>>>
थम्स अप.
Pages