श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Submitted by webmaster on 26 January, 2009 - 22:30

श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दलचे हितगुज

यापूर्वीचे हितगुज इथे पहा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

||श्रीराम जय राम जय जय राम||
माझे आजी-आजोबा रात्री झोपण्यापूर्वी एका डायरीमध्ये 'श्रीराम जय राम जय जय राम' लिहीत असत त्याची आठवण झाली.

ॠजुता विनोद,

श्री महाराजांविषयीचे संकेतस्थळ फारच सुंदर आहे. अशा सुंदर संकेतस्थळाची निर्मिती केल्याबद्दल धन्यवाद!

के वि बेलसरे यानी लिहिलेले श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाण्ग्मय हे पुस्तक छान आहे.

मला माहिती असलेली संकेतस्थळे:
* महाराजांची प्रवचने आणि फोटोंचा खजिना: http://sriramasamartha.blogspot.com/
* श्री. बेलसरे यांचे प्रवचन: http://www.youtube.com/user/RamNamsadhana
* गोंदवलेकर महाराज यांच्या बेंगलोर येथील मठाबद्दलची माहिती: http://annaparabrahma.blogspot.com/search/label/Shree%20Maharaj

||श्रीराम जय राम जय जय राम||

गुरूपौर्णिमा - शुक्रवार १५ जुलै २०११ - या दिवशी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील लिकते श्रीराम मंदिरात पहाटे ५:३० ते ७:०० या वेळात श्री महाराजांच्या भक्तांच्या भजनी मंडळाचा काकड आरतीचा कार्यक्रम साजरा होणार आहे. हा कार्यक्रम बरोबर ५:३० वाजता सुरू होऊन बरोबर ७:०० वाजता संपतो. यात काही काकड आरत्या व भजने म्हटली जातात. मध्ये काही काळ नामस्मरण केले जाते. या कार्यक्रमात अंदाजे १०० हून अधिक भक्त सहभागी होतात. यात सहभागी होण्यासाठी ५:२५ पर्यंत मन्दिरात यावे.

लिकते श्रीराम मंदिर लक्ष्मी रस्त्यावर शगुनच्या चौकामध्ये बँक ऑफ इंडिया तसेच डागा ब्रदर्स या दुकानाच्या बरोबर समोर आहे (लकडी पुलाकडून आल्यावर शगुन चौक ओलांडल्यावर अंदाजे १०० मी अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे).

हे मंडळ गेल्या ५५ वर्षांहून अधिक काळ दर रविवारी सकाळी ५:३० ते ७:०० पर्यंत हा कार्यक्रम करते. दरवेळी वेगवेगळ्या भक्तांच्या घरी हा कार्यक्रम होतो. विशेष प्रसंगी म्हणजे श्री महाराजांच्या समाधीच्या दिवशी, गुरूपौर्णिमा इ. दिवशी हा कार्यक्रम लिकते श्रीराम मंदिरात होतो.

हा कार्यक्रम हा एक अतिशय सुंदर अनुभव आहे!

'श्री राम जय राम जय जय राम. '
गुरुपौर्णिमेला गोंदवल्याला जायला मिळाल. आणि फार प्रसन्न वाटल. गुरुवार आणि शुक्रवार दोन्ही दिवस
भक्त दर्शनाला येत होते. शुक्रवारी पहाटेच दर्शनाला रांग लागली होती. आमच्यासारख्या मुक्कामाला असणार्‍या बर्‍याच भक्तानी, रात्री १२ वाजता उठून सर्व आवरून दर्शन घेतले. नंतर पहाटेपासून दर्शनाला लागलेली रांग रात्री उशीरापर्यंत चालू होती. कुठेही गडबड, गोंधळ, ढकला-ढकली, भांडणे-मारामारी, काहीही नव्हते. सर्व कसे शिस्तीत जाऊन दर्शन घेत होते.
गुरुवारी अंदाजे २०,००० भक्तानी दुपारी आणि अंदाजे ३००० भक्तानी रात्री महाप्रसाद घेतला.
शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली ती दुपारी ४ / ४.३० वाजता थंबवण्यात आली. रात्री ७.३० पासून १०/१०.३० वाजेपर्यंत महाप्रसादाला रांग होती. दुपारी अंदाजे ३०-३२ हजार भक्तानी महाप्रसाद घेतला. व रात्री अंदाजे ६००० भक्तानी प्रसाद घेतला.
जे भक्त फक्त दर्शन घेऊन गेले ते तेही बरेच होते. पण एवढे भक्त येऊनही सर्वत्र शांतता, स्वच्छता, शिस्त, व आपुलकी होती.
खूपच प्रसन्न वाटल.
'जय जय रघुवीर समर्थ.'

अनुसंधान वेबसाइट आवडली... नित्यनेमाने वाचायला हवी अशी झालेली आहे....आपल्याला मुक्ते मिळावी ही इच्छा धरुन असावे असे मला वातत होते. पण महाराजानी ती इच्छाही नको म्हनून सांगितले आहे. .>>

साधकाने अभ्यास कसा करावा?
-----------------------------------
- अभ्यास विवेक व वैराग्ययुक्त असावा.
विवेक (आत्म [जे जे नित्य-आनंदरूप-अविनाशी आहे ते], अनात्म[जे जे अनित्य विनाशी-सुखदुःखकारक आहे ते] विवेक [या दोन्हीतील फरक समजणे])
जे जे आत्मविषयक आहे त्याचा स्वीकार करणे
जे जे अनात्मविषयक (नाशीवंत) आहे ते ते मनाने सोडणे
अधिक वाचनासाठी - ब्रह्मजिज्ञासा - आत्माराम
----------------------------------------
वैराग्य (हवे/नको हा हव्यास जाणे, जे जे परमात्मप्राप्तीच्या आड येते त्याचा मनाने त्याग करणे)
वैराग्याची लक्षणे
१) प्रथम इंद्रिये आवरावी
२) इंद्रियांवाचून समाधान मिळणे
३) इंद्रियांकडे मन न गेल्यामुळे चित्ताला सुख वाटणे
------------------------------------
नित्यनेम - नित्याचा नेम करावा. नित्य म्हणजे भगवंत/परमात्मा. तो कसा मिळेल या दिशेने रोज प्रयत्न करणे
------------------------------------
मनोजय
मनोजयालाच समाधियोग म्हणतात
-----------------------------------
वासनाक्षय
४ प्रकारच्या वासना - ज्यांचे जीवाला बंधन होते (हवे/नको यामुळे)
१) देहवासना (देहाला सुख मिळेल अशा वस्तूंची इच्छा होणे)
२) लोकवासना (प्रतिष्ठा/प्रसिध्दी/पत/सन्मान/मान मिळावा ही इच्छा होणे)
३) शास्त्रवासना (शास्त्रे वाचावीत, त्यातील अर्थ समजून घ्यावा, त्यावर मनन करावे इ इच्छा होणे)
४) मुक्तवासना (आपल्याला मुक्ती मिळावी ही इच्छा होणे)

वासनाक्षय म्हणजे वर दिलेल्या चारी वासना नष्ट होणे

सुशोलभा,

तुम्हाला गुरूपौर्णिमेला गोंदवल्याला दर्शनाला जायचा चांगला योग आला. मला केव्हातरी गुरूपौर्णिमेला किंवा समाधीउत्सवाला जायची इच्छा आहे.

मंगळवार २० डिसेंबर २०११ रोजी श्रीमहाराजांच्या महासमाधीला ९८ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील लक्ष्मी रस्त्यावरील लिकते राम मंदीरात श्रीमहाराजांचा महासमाधीउत्सव पहाटे ४:३० ते ७ या वेळेत साजरा केला जाईल. यावेळात काकडआरती व नामस्मरण केले जाते. ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर सहभागी व्हावे.

Pages