सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात हसण्यासारखे काय आहे? चिंकारा प्रकरणी तो निर्दोष आहे.ते प्रकरण् याधाग्यावर उकरुन चर्चेला भलतेच् वळण देऊ नये.

ते योग्य असावे. >>>>> अरे येकपे रहेना, या गोडा बोलो या चतूर बोलो.

चला रे चला, इथे काय की बोर्ड बडवताय? चला, चला पार्टीला चला

सखुबाई, गन्गुबाई पार्टीला चला, रामराव, श्यामराव पार्टीला चला
हसन भाई, हुसैन भाई पार्टीला चला
पिटर भाय, अ‍ॅन्थनी भाय पार्टीला चला
सन्ता सिन्ग, बन्ता सिन्ग पार्टीला चला...

चर्चेला भलतेच् वळण देऊ नये.>> चर्चा अनेक वळणं घेऊन वळून वळुन इथपर्यंत पोहोचली आहे अजुन एका वळणाने काय फरक पडणार आहे.

रश्मी. Rofl

ते योग्य असावे. >>>>> अरे येकपे रहेना, या गोडा बोलो या चतूर बोलो.>>> अग्ग्गाअई गं टू गूड .

अप्पा , ते माहित आहे , पण ते फक्त दोन दिवसासाठी होत ना ?

रश्मे Lol

भलतंच वळण Proud मुद्द्याला बगल द्यावी तरी कीती.. Proud
पडलं तरी नाक वर आसतंय लोकांचं...

अप्पा , ते माहित आहे , पण ते फक्त दोन दिवसासाठी होत ना ?>>

अपीलाचा निकाल लागेपर्यंत जो बेल आवश्यक असतो तो पर्यंतचा बेल खालच्या कोर्टाने (इंटेरिम बेल) दिला. आता अपीलाचा निकाल लागेपर्यंत हो बेल मिळतो तो मिळाला आहे.
जाणकारांनी प्रकाश टाकावा.

पोलिसांना तपास काम करताना उत्तम वकिलांचे मार्गदर्शन मिळत नाही, हे दुर्दैव ! हे मुद्दे जर त्याचवेळी लक्षात आले असते तर !!!

आताच लंच रूम मध्ये टीव्ही बघून आले .
फटाके , मिठाया , गुलाल , नाचगाणी सगळं सगळं चालू आहे .
न्यूज रिडर साण्गतेय , ये सलमान के फॅन्स है . जो उसकी एक भी फिल्म मिस नही करते.
लोग खुश है , क्योन्की उनकी दुआ रंग लायी ..
मला केंजळे साहेब आठवले Happy

आलेच का इथेही मोदी एकदाचे?

मोदी २०१४ साली निवडून येऊ शकतील असे वाटल्यामुळे काळवीट निराश होऊन बंदुकीच्या गोळीत घुसले म्हणे!

निषेध त्या मोदींचा!

अरे देवा! हा धागा तर एक्सप्रेसहुन जलद धावतोय.
तीन दिवसात मस्त करमणुक चाललेय माझी इथे :फिदीफिदी:

या घटनेनंतर लोकांनी दारू पिणे सोडले किंवा त्या व्यसनाच्या पुरते आहारी गेल्याने नसेलच जमत तर किमान दारू पिऊन गाडी चालवणे सोडले तरी जे घडलेय ते सार्थकी लागेल !

बाकी चर्चा चालूच राहणार !

चिंकाराबद्दल वृत्त -
त्या रात्री सलमान व अ,ब,क,ड (जे त्याचे साथीदार असतील ते, आपल्याला फक्त सलमानशी घेणेदेणे) शिकारीला जंगलात गेले होते. एखाद्या सशाची शिकार करुन आपल्याला नेमबाजीचा सराव आहे की नाही हे पाहण्यासाठी सलमान तिथे गेला होता. काही वेळाने सलमानला झुडपात बसलेला ससा दिसला आणि त्याने (सलमानने) सशावर नेम धरला.
त्याचवेळी तिथे बाजुला एक काळवीट हे दृश्य बघत होता. तो ससा आणि हा काळवीट जिगरी दोस्त असल्याकारणाने जेव्हा सलमानने सशावर गोळी झाडली तेव्हा त्या काळवीटाने मधे येऊन सशाचे प्राण वाचवुन स्वत:च्या प्राणाची आहुती दिली.
तर अशाप्रकारे काळवीट प्रकरणात सलमान दोषी नसुन काळवीट स्वतःच त्याच्या मृत्युस जबाबदार आहे.

जर शिकारी गेला असताना , झाडीत लपलेल्या एखाद्या वाघाने सलमानवर हल्ला करून त्याला जखमी केले असते तर वाघावर खटला चालवला असता का , जंगल राज्मध्ये ?
मग सलमानच का ??

सलमान एकटा नव्हताच, त्याच्या बरोबर सैफ अली, सोनाली बेन्द्रे, तब्बु ( बहुतेक ) आणी नीलम हे होते.>>>

त्यांनाच तर अ,ब,क,ड (जे त्याचे साथीदार असतील ते, आपल्याला फक्त सलमानशी घेणेदेणे) म्हंटलय.

निल्सन, हे शोभतं का तुम्हाला?
सलमान इतका सुहृदयी का काय म्हणतात ते आहे.
तो सश्याची तरी शिकार कशी करेल?

सलमानला वाटलं की ही खेळण्यातली बंदूक आहे
तो चालवून पहात होता फक्त.

पण मी म्हणते यात काळविटाचीच चुक आहे.
शूटिंगच्या ठिकाणी यावंच कशाला त्यांनी?

हो तेच मुद्दे.. तपासणीचे काम आणि पोलिस रिपोर्ट तयार करायचे काम, हे निष्णात वकिलांच्या मार्गदर्शनाखालीच व्हायला हवे. त्याबाबतीत पोलिसांना पुरेसे प्रशिक्षण मिळत नाही. अनुभव असेलच असेही सांगता येत नाही.

वकिलांच्या कायद्याचा अभ्यास असतो. याच प्रकारच्या गुन्ह्यात कुठले मुद्दे, आरोपींच्या वकिलांनी उचलून धरले आणि कोर्टा समोर मांडले हे त्यांना माहित असते. त्याच मुद्द्यावर परत परत चूका होऊ नयेत पोलिसांकडून.

समोर आलेले पुरावे, साक्षीदारांची जबानी ( ती पुढे कोर्टात कुचकामी ठरते ) हे सगळे तपासून, ही केस कोर्टात जाऊ द्यावी कि नाही, यावर सरकारी वकिलांनी मत दिले पाहिजे. त्यांचा सहभाग केस कोर्टात दाखल झाल्यानंतरच होतो, आणि एकदा पोलिस रिपोर्ट दाखल झाल्यानंतर त्यात भर घालता येत नाही. आरोपीला मात्र अगदी शेवटच्या सुनावणीपर्यंत संधी मिळते.

रीया, चुकी झाली माफी असावी Proud

सलमानची माझा आवडता हिरो आहे, जेव्हा जेव्हा तो चांगले काम करतो तेव्हा माणुस म्हणुन त्याचा आदरच वाटतो पण हे जरी खर असलं तरी त्याला त्याच्या गुन्हाची शिक्षा व्हायलाव हवी या मताची मी आहे. चुकीला माफी असते पण गुन्ह्याला नाही.
त्याची शिक्षा कमी व्हावी म्हणुन मी कधीच प्रार्थना करणार नाही पण त्याने त्याच्या सर्व गुन्हयांची शिक्षा भोगल्यावर त्याने त्यातुन समज घेऊन एक चांगला माणुस आणि एक चांगला कलाकार बनावे हि प्रार्थना मात्र नक्कीच करेन.

>>यात निर्लज्जपणाचा काय संबंध ?आपल्या मुलाची सुटका झाली याचा वडीलांना आनंद होनारच, नॅचरल आहे ते.>>

अहो सलमान काही पराक्रम गाजवुन घरी आला नाहिये.....१ नव्हे २ लोकांच्या खुनाला जबाबदार आहे...असे असताना पार्ट्या करणं कीती चीपपणाची गोष्ट आहे....मग निर्लज्ज नाही तर काय म्हणणार....

>>बादवे ते त्यांच्या फार्महाऊसवर काय करतात हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे,ते तुमच्या पैश्याने तर् पार्टी करत नाहीत ना! त्यांचा कष्टाचा पैसा आहे ते काहीही करतील ,त्यांना निर्लज्ज म्हणायचा कुनालाही अधिकार नाही >>

माझ्याच पैशाने पार्टी करतायत असं म्हणते....कारण मी पण एकेकाळी त्याचे पिक्चर थेटरला पाहिलेत म्हणजे मी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांनी पैसे मोजलेत त्यावरच हे सगळं चालु आहे...

बाकी आता तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही.....
हा माझ्याकडुन शेवटचा प्रतिसाद....

Pages