जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेदेची आई आणी आदेचे बाबा जाम दिनवाणा चेहेरा करुन बसले होते.>> आणखी किती दिनवाणा करणार???

त्यापेक्षा लोक्स आठ नंतर कबड्डीच्या मॅचेस लागतात त्या जास्त मस्त असतात. Happy

हीरा चं म्हणणं पटलं तरी... मुळात ती पेटी त्या झाशीच्या राणीने सासरी का आणली हा संशोधनाचा विषय आहे.>> हे अगदी अगदी Happy

मेदेची आई आधीच दिनवाणी, बापुडवाणी आहे.
सुमोला म्हणावं दुसर्‍यांच्या घरात काहीही घडलं की कशी "न्यानामृत" पाजायला जाते. आता स्वतःवर वेळ आली की कसं तोंड गप्प!

>>>>>>>>>>>>>>का.का.वि... तुम्ही जरा अती करताय
.....
अरे हो
उमेश कामत आणि आदित्य देसाई ला काही बोलायचे नाही
विसरलोच

काल एलतिगो बघताना या मालिकेचा उद्याचा थोडा भाग बघितला ..
बाबाजी प्रश्न विचारतायत की अर्चु अश्या मुलाच्या प्रेमात पडली असती तर काय केलं असतं Uhoh

आणी सुमो विचारतीय की तुम्हाला मुलगा असता आणी त्याच्या बाबतीत असे घडले असते तर तुम्ही काय केले असते?

कथालेखक झोक्यावरुन पडला असेल लहानपणी.

बाबाजी प्रश्न विचारतायत की अर्चु अश्या मुलाच्या प्रेमात पडली असती तर काय केलं असतं <<<

कोणी काय केलं असतं?

१. अर्चूने - ती तरीही माहेरीच फतकल मारून बसली असती

२. त्या मुलाने - एखादा विबासं करून पाहिला असता

३. सुमोने - काकूबाईपणाचा कहर केला असता

४. आदेने - मेघनाला उचलून जेजुरीऐवजी वैष्णोदेवीचा डोंगर चढला असता

कथालेखक झोक्यावरुन पडला असेल लहानपणी.<<<

छे छे! ह्या कथेचे कंत्राट त्याला दिल्यावर त्याला मुद्दाम निर्माता दिग्दर्शकांना आधी डोक्यावर आपटला असेल आणि मग कथा लिहायला सांगितली असेल.

बाहेरच्या खोलीत लागलेल्या टीव्हीतून जानूबाळाचा अत्यंत कंटाळवाणा संवाद ऐकू येत आहे. त्या तुलनेत जुयुरेगा बरी म्हणावी की काय असे वाटावे हेच होसूमीयाघ चे खरे यश आहे.

बाबाजी प्रश्न विचारतायत की अर्चु अश्या मुलाच्या प्रेमात पडली असती तर काय केलं असतं >>>.तिचा प्रेम विवाहच आहे की....मला लख्ख आठवतय सुमोचाच तोंडून ऐकलेल...
त्या मेदे ला "उठ आणी त्या अर्चु कानाखाली सनसणीत वाजव कि तू माझा खोलित शिरलीसच का??" अस म्हणावस वाटत...
काय ती सुमो... दाखवायचे दात वेगळे अन...तो सॉरी म्हणाला तरी प्रॉब्लेम्,नाही म्हणाला तरी प्रॉब्लेम त्या पेक्षा ती मेदे कैक पटीने बरी...रंग तरी नाहि बदलत...

आपण इथे आदे मेदे हे जे शोर्ट्कट केलय ना...त्यमुळे आज मला मेदेचा आइचा संवाद असा भास झाला "अहो त्य तर अस बोलत होत्या जसकि त्यांच मेदेशी काहि घेणदेणच नाहिये" Uhoh

मॅनियॅक्?:अओ: यॅक यॅक.

ह्या सिरीयली रोज नेमक्या अर्ध्यातुन बघण्याचेच भाग्य मला लाभते. काल ती पिम्पलसवाली, फताड्या चेहेर्‍याची विजया मेघनाला जाम कुचकटासारखी बोलत होती. एकतर हिचे हिच्या मुलान्कडे लक्ष नाही. शाळेतुन कधी आले, कधी गेले काय कळत नाही. त्या मेघनाने जाउन आणले तर म्हणते उगाच माझ्या मुलान्साठी काही करण्याचा आव आणु नकोस.

आता मी काल तर थोडा भाग पाहीला. हे वर लिहीलेले काल घडले की झलक होती देव जाणे.

काल विजया मेदेला ओरडते पिझ्झा खाऊ घातल्याबद्दल कारण पावसाळा बाहेरच्या खाण्यामुळे आजारपण येऊ नये म्हणून . मग दुसर्या दिवशी शाळेत कॅटिनमधलं खाणं कसं चालतं ?

>>>>>>>>दिवसेंदिवस अर्चू सॉलीड खंग्री दिसू लागली आहे.

काय डोळे, काय पापण्या, व्वा!
..............................
मादक सौंदर्याचा आटमबोंब

सुमो बसकन/बैठी फुगडी घालताना कशी दिसेल्?<<<

नेहमी दिसते तशीच!

सिरियल सुरू झाल्यापासून घरात बैठ्या फुगड्याच तर चालू आहेत. फक्त जोडीदार बदलत आहेत.

मला वाटले खंग्री म्हणजे खतुरडी, भंगार<<<

काहीतरी वाटायला पाहिजे तुम्हाला असे बोलताना!

फायनली त्या पिझ्झा प्रकरणावर पडदा पडला. सुमोबैंनी एकदाचे सांगून टाकले की त्यांनीच पिझ्झा मागवला होता. एवढ्याशा गोष्टीवर दोन-तीन दिवस घालवले..

>>मादक सौंदर्याचा आटमबोंब
मादक सौंदर्याचा आटमबोंब..... दादू दगडू न्हावी Wink

ही सिरीयल म्हणजे आठवं आश्चर्य आहे. काहीही- अगदी का ही ही स्टोरी नसताना पण सिरीयल रोज चालू आहे.
सलमान खानच्या चित्रपटांना स्टोरी नसते असं म्हणतात पण ही सिरीयल बघून तो पण शरणागती पत्करेल.

बाय द वे, सलमानला आधी आदेच्या रोलबद्दल विचारणा झाली होती, पण इतका वारंवार अभिनय करणे, तेही पूर्ण शर्ट घालून, शक्य नसल्याने त्याने विनम्र नकार दिल्याचे समजते.

केवढी मोठी संधी घालवली.

≥>////मादक सौंदर्याचा आटमबोंब..... दादू दगडू न्हावी
,......
तशी गोष्टी करण्यात अर्चू पण न्हाव्या पेक्षा कमी नाय

Pages