जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किड्स प्रोग्राम इतके शेंबूड गाळे नसतात.
इथे वारंवार बाहेर आलेला आत खेचणे चालू आहे
पेटी ची झलक दोन महिने प्रोमोत दाखविली, आणि फायनली बाहेर काढली

घरातल्या बायका पण लहान मुलांच्या समोर हा प्रोग्राम कसा बघतात
तो आद्या कधीपण दरवाजा बंद न करता बायकोसोबत लागलेला असतो
दरवाजा सताड उघडा ठेऊन हा असले काहीतरी करणार असतो का? नाना यावर त्याला कधी लेक्चर नाही देत
घरात तीनतीन छोटी मुले आहेत त्यांच्या, त्यांनी या दोघांना असल्या अवस्थेत बघितले तर

होसुमीघच्या तुलनेत उलट ही मालिका कितीतरी सुसंगत आणि रिअलिस्टिक वाटते ( टिपिकल फिल्मी योगायोग असूनसुद्धा ) सगळ्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित वाटल्या. नानांची प्रतिक्रिया अगदी संयमित आहे. बायकोचं मन सांभाळायच्या नादात फार बोलत नाहीयेत पण बायकोला दुसरी बाजू दाखवायचा प्रयत्न करतायंत, अमित चिडलाय पण त्यानेही आदित्य असा का वागला असेल ह्याचं अगदी लॉजिकल उत्तर दिलं. सुमोच ( आत्तापर्यंत तिचं पात्र जसं रंगवलंय ते बघता ) जरा जास्त आक्रस्ताळेपणा करतेय. पण एखाद्या गोग्गोड वागणार्‍या व्यक्तीचा इगो हर्ट झाल्यावर वागूही शकेल कुणी असं.

पहिली शॉक रिअ‍ॅक्शन म्हणून ठीक आहे पण हे जास्त दिवस ताणलं तर मात्र अवास्तव होत जाईल. तसंही आधीचा तणाव आणि वटसावित्रीपासून दोघांचं बदललेलं वागणं टिपलंच होतं की त्यांनी. भूतकाळ काहीही असला तरी आता चांगलं चाललंय हे समजून घेणे फारसे कठीण नाही त्यांच्यासाठी.

ह्या मालिकेचे संवादलेखन चांगले आहे. होसुमी मध्ये अगदी बोंब आहे तिथेही !

मला अभिनय ह्या एका निकषावर ही मालिका होसुमीयाघपेक्षा बरी वाटते. मात्र स्वतंत्रपणे ह्या मालिकेतील पात्रांचा अभिनय फार ग्रेट ठरेल असे वाटत नाही.

कंटाळा आला राव. एकदम येडचापपणा चालला आहे.
एकतर मेदेचं लग्न तसं तिच्या मनाविरुद्ध झालं. पण तिनी नवर्‍याला आपल्या भुतकाळाबद्दल आधीच सगळं सांगितलं आणि त्यानी तिला समजुन घेतलं हे महत्वाचं नाही का? कोणती नवीन लग्न करून आलेली मुलगी सगळ्या सासरच्या लोकांना बोलावुन आपल्या लग्नाआधीच्या प्रकरणाबद्दल सांगेल? आणि ते सांगितलं तर तेव्हाच केवढा राडा होईल. आणि आदे मेदे नवरा बायको आहेत; त्यांना आयुष्य एकत्र घालवायचं आहे तेव्हा त्यांचं एकमेकात अंडरस्टँडिंग असणं सगळ्यात महत्वाचं. मी तर म्हणतो कि सुमो आणि गिओ ला मुलाचा अभिमान वाटला पाहिजे कि आदेनी हे सगळं माहिती असुनही मेदेचा गैरफायदा नाही घेतला किंवा तिच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही केली. उगाच बाकिच्या लोकांना चिडायला झालय काय? ह्या सगळ्या घरात कोणालाच हे समजु नये? जरा अतीच होतय.

आदे चं पात्र खरच खुप मॅच्युअर आणि जंटलमन वाटलं मला. रडकी मेदे आणि तिचा तो बावळट बाप ह्यांना सांभाळुन घ्यायचं आणी वर "उपास" सहन करायचे म्हणजे किती सहनशक्ती हो!.. आधी त्याचा उपास कधी सुटतोय ह्याची वाट बघत वेळ चांगला गेला. आता बोअर होतय... बर, त्या अर्चुला एवढाच खजिना मिळाला, तर तो ज्याचा आहे त्याच्याकडे आधी न्यावा. सगळ्या घरादारासमोर कशाला राडा करायचा? म्हणाव हे असले धंदे करण्यापेक्षा बम बम भोले वर नाच करत बस कि..

चौकट राजा,

त्यात एक गोची आहे.

आदेच्या आईच्या तोंडी तो संवाद दोन दिवसांपूर्वी ऐकला होता आणि मला (मी आतल्या खोलीत असूनही :फिदी:) तो पटला होता. जे लग्नाच्या पहिल्या रात्री सांगून प्रामाणिकपणाचा आव आणला तेच लग्न ठरतानाच का सांगितलं नव्हतं?

तेवढं त्या मेदेने केलं असतं तर सिरियल उभीच राहिली नसती. आता भोगा!

समथिंग व्हेरी सिमिलरः

१. टू स्टेट्समध्ये भर होस्टेलमध्ये पहिल्याच अ‍ॅकॅडेमिक वर्षी बॉयफ्रेंडबरोबर स्वतःच्या खोलीत प्रणयरंग उधळणारी आलिया लग्नाच्या बाबतीत मात्र एकदम दशकांपूर्वीची पारंपारिकता स्वीकारते

२. जुयेरेगामध्ये लग्नाच्या पहिल्याच रात्री अभूतपूर्व प्रामाणिकपणा दाखवणारी आदे लग्न ठरत असताना मात्र कोणाशीही प्रामाणिकपणे बोलू शकत नाही.

(विषयांतराबद्दल क्षमस्व)

हो, ह्या मालिकेचे संवादलेखन चांगले आहे.

ह्याबाबत पुन्हा एक थोडेसे अवांतर मतः

एकुणच मालिकांमध्ये सहजपणे बोलल्यासारखे कोणीच बोलत नाही. असे का? आपण घरात असे कुठे बोलतो?

ह्यामुळेही गॅप पडते थोडी!

हा आद्या इतक्या मोठ्या तोंडाने मेद्याचे कौतुक करतोय, निर्णय घेतला वगैरे
ती मेदे लग्नानंतर फाटक्या चड्डी वाल्याकडे गेली होती, मी फक्त तुझ्याकडे परत आलेय सांगायला
पण फाटक्या चड्डी वाल्याने तिला ठेऊन नाही घेतली
इथे अडला हरी गाढवाचे पाय धरी बोलत तिने वट पौर्णिमेला स्वताचा हेका सोडला
पण एखाद्याचे कौतुक करायचे ठरवलेच तर काय "किती छान घसरलात हो तुम्ही केळ्याच्या सालीवरून" असेही करणारे कमी नसतात

जुळून येती रेशिम गाठी मधील मेघना आणि होसूमी मधील मोठी आइ (इंग्रजी फेम) यांना बघितलं की कानफडावसं वाटतं...

़कथेच्या आणि पात्राच्या घोळात एक घोळ कुणा माबोकरा च्या लक्शतआला नाही का?
अर्चूला जेव्हा पेटी सापडते तेव्हा ती कपाटात असते. सो पेटीचा क्लोस अप घेताना ती कपाटात उभी ठेवली होती आणी नेक्स्ट शॉट मध्ये जेव्हा पेटीच्या पॉइन्ट ओफ व्यू ने शॉट होता तेव्हा ती आडवी होती.
कपटातल्या कपाटात पेटी उभ्याची आड्वी होते. कमालचए नै ( सुमो स्टाइल)
डीओपी ला चान्गलीच डुल्की लागली नै.

कौतुक करायचे ठरवलेच तर काय "किती छान घसरलात हो तुम्ही केळ्याच्या सालीवरून" असेही करणारे कमी नसतात >> काकावि Lol अजून एक भारी उदा. सांगू का?
Lol

दक्षे सांग कि . तू का बर परवानग्या घेऊन राहिली आहेस ? Happy
<<कौतुक करायचे ठरवलेच तर काय "किती छान घसरलात हो तुम्ही केळ्याच्या सालीवरून" असेही करणारे कमी नसतात >> Lol

>>>>>>>काकावि हाहा अजून एक भारी उदा. सांगू का?
........
माझी परवानगी घेणाऱ्या तुम्ही पहिल्याच

ती मेदे लग्नानंतर फाटक्या चड्डी वाल्याकडे गेली होती, मी फक्त तुझ्याकडे परत आलेय सांगायला
पण फाटक्या चड्डी वाल्याने तिला ठेऊन नाही घेतली >>> माझ्या आठवणीप्रमाणे तरी असे काही झालेले नाही. ती फक्त त्याला जाब विचारायला गेली होती की शेवटपर्यंत का आला नाहीस आणि त्याने काहीतरी ( मोबाईलच्या युगात ) काहीतरी फुसके कारण सांगितले.

ह्या सिरियल्सची वकिली करावी इतक्या त्या ग्रेट नसतात पण तरी ...;)

अगो ला अनुमोदन Happy

होसुमीघच्या तुलनेत उलट ही मालिका कितीतरी सुसंगत आणि रिअलिस्टिक वाटते ( टिपिकल फिल्मी योगायोग असूनसुद्धा ) सगळ्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित वाटल्या. नानांची प्रतिक्रिया अगदी संयमित आहे. बायकोचं मन सांभाळायच्या नादात फार बोलत नाहीयेत पण बायकोला दुसरी बाजू दाखवायचा प्रयत्न करतायंत, अमित चिडलाय पण त्यानेही आदित्य असा का वागला असेल ह्याचं अगदी लॉजिकल उत्तर दिलं.
पण हे जास्त दिवस ताणलं तर मात्र अवास्तव होत जाईल. तसंही आधीचा तणाव आणि वटसावित्रीपासून दोघांचं बदललेलं वागणं टिपलंच होतं की त्यांनी. भूतकाळ काहीही असला तरी आता चांगलं चाललंय हे समजून घेणे फारसे कठीण नाही त्यांच्यासाठी.

ह्या मालिकेचे संवादलेखन चांगले आहे.

ह्या सिरियल्सची वकिली करावी इतक्या त्या ग्रेट नसतात पण तरी
++ १

>>>>माझ्या आठवणीप्रमाणे तरी असे काही झालेले नाही. ती फक्त त्याला जाब विचारायला गेली होती की शेवटपर्यंत का आला नाहीस आणि त्याने काहीतरी ( मोबाईलच्या युगात ) काहीतरी फुसके कारण सांगितले.

ह्या सिरियल्सची वकिली करावी इतक्या त्या ग्रेट नसतात पण तरी ...
.
माय मिस्टेक ,
पण त्या फाटक्या चड्डी वाल्याला जाब विचारण्याचे काहीच नव्हते , त्याला कुठलाच रिक्षावाला घ्यायला तयार नव्हता त्याला तो तरी काय करणार
दिल्लीवरून परत आला होता म्हणजे कमीत कमी दादर स्टेशन वरून तरी तो पळत आला होता

हा आदे जाम संत माणूस असला पाहिजे
हापिसात बॉस ची झेलतो, घरी असली बायको
… टेन्शन ने मरेल बहुतेक
तरी बरा याला नोकरीच दिलीय त्या जावई विकत बाल्या हिरो ला धंदा दिलाय
तो बिचारा आपल्याकडे तेल आहे, आपल्याकडे स्टील आहे असल्या गप्पा मारत असतो
तेल नि स्टील घेऊन मल्लखांबाला मालिश करतो का काय कळत नाय

मला आठवतयं की नानांचीही एक पेटी आहे. ती ते सुमो आणि ईतर कोणालाही उघडू देत नाहीत. त्यातही काही गोड गुपीत असावे. त्यामुळे ते मेदेची अवस्था समजू शकले असतील.

>>>>>मला आठवतयं की नानांचीही एक पेटी आहे. ती ते सुमो आणि ईतर कोणालाही उघडू देत नाहीत. त्यातही काही गोड गुपीत असावे. त्यामुळे ते मेदेची अवस्था समजू शकले असतील.
...........
नानाचं कसलं आलंय गोड गुपित , शारंगधर सुखकारक वटीच पाकेट असेल त्यात
आणि एखादी नानी असतीच तर सुमोला सोबत मोर्निंग वोल्कला नेलीच नसती

तरी बरा याला नोकरीच दिलीय त्या जावई विकत बाल्या हिरो ला धंदा दिलाय
तो बिचारा आपल्याकडे तेल आहे, आपल्याकडे स्टील आहे असल्या गप्पा मारत असतो
तेल नि स्टील घेऊन मल्लखांबाला मालिश करतो का काय कळत नाय
>>>>>>>> Rofl

<<मला आठवतयं की नानांचीही एक पेटी आहे. ती ते सुमो आणि ईतर कोणालाही उघडू देत नाहीत<< अरेच्या .अस पण आहे का ? Happy थोडक्यात देसायांच्या घरात भरपूर गुपित दडलेली आहेत Happy

Pages