जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

≥>>>>मुळात अर्चुचेच चुकले नवरा म्हणत असताना (कि आपण एक्दा आ.दे शि बोलु)ती पेटी ऐकदम आई-नाना ना दाखवायची घाई का केली तिने?
.
मुळात मेदेची मेंदूशी दुष्मनी आहे
लग्नाआधी एक महिनाभर सांगायला वेळ नाही भेटली
लग्नानंतर आठ महिने आदु पादु आदु पादु करत बसली
कालेजात फाटक्या चड्डी वाल्याशिवाय आणि त्याच्या मित्राशिवाय कोणालाच ओळखत नाही. फक्त मित्र आहेत , मैत्रीण एकही नाही
फाटक्या चड्डीच्या आठवणी सोडायला अजिबात तयार नाही

>>मुळात ती पेटी ऐकदम आई-नाना ना दाखवायची घाई का केली तिने? <<
मुळात ती पेटी त्या झाशीच्या राणीने सासरी का आणली हा संशोधनाचा विषय आहे.

मुळात मेदेची मेंदूशी दुष्मनी आहे
लग्नाआधी एक महिनाभर सांगायला वेळ नाही भेटली
लग्नानंतर आठ महिने आदु पादु आदु पादु करत बसली
कालेजात फाटक्या चड्डी वाल्याशिवाय आणि त्याच्या मित्राशिवाय कोणालाच ओळखत नाही. फक्त मित्र आहेत , मैत्रीण एकही नाही
फाटक्या चड्डीच्या आठवणी सोडायला अजिबात तयार नाही>>>:फिदी:

आता एकदम टीप्पीकल सासू नणंद ड्रामा सुरू झालाय. वैताग नुसता!>>>> खरे आहे. आधी मारे तत्वज्ञान पाजळत होते सर्वजण. मूळ पदावर आले एकदाचे. नुसती बोलाची कढी अन बोलाचा भात

>>मुळात ती पेटी ऐकदम आई-नाना ना दाखवायची घाई का केली तिने? <<
मुळात ती पेटी त्या झाशीच्या राणीने सासरी का आणली हा संशोधनाचा विषय आहे.>>>> खरे आहे. पण मला वाटत ती आदेने तिला आणायला सान्गीतली होती किन्वा त्यानेच आणली असा घरात विषय चालला होता. ही सिरीयल मी तळ्यात मळ्यात करुन बघते, त्यामुळे नक्की माहीत नाही.

फालतु सिरियल आहे.

सगळं देसाई कुटुंब बनावटी आहे. आधी म्हणायचे नवरा-बायकोने आपापले प्रॉबलेम सॉल्व करावे. मग पुढच्या भागात , आपल्या घरात पारदर्शक पण आहे. आपण काहीच लपवत नाही भाषणं.

आता अशी रडतात की, कि कोणी गचकलं...
आधी स्वतःच्या मुलीला शिस्त शिकवा.. अर्चू एक नंबर बेक्कार पात्र आहे.
स्वतः आदे, मेदेशी बोलत नाही, आणि म्हणे आम्हला वगळलं.... ह्यांव नाही सांगत आणि त्यांव नाही सांगत आणि रडारडी.
आता नवरा बायकोने काय ते ठरवलं आणि केलं ना निर्णय. मग कशाला रडारडी. सगळं चांगलय म्हणून सोडावं तर नाय....
मुळात, ती पेटी इतके दिवस कशाला ठेवली त्या दोघांनी निर्णय झाल्यावर हाच लोचा आहे. अजून मुंबईतला समुद्र मिळाला नाही वाटतं.
खरं तर १२ जूनलाच सिरियल संपायला हवी होती निर्णय झाला, गाठी जुळल्या पण ह्या झीं मराठींना पण इंगा चावलाय केकताचा.....

(हुश्श... केलं साफ मन. काहीच लपवलं नाही मी. आता बर वाटतय.)

अर्चुला सासरी कधिच जायचे नसते काम करायची नसतात. बर नोकरी करते तर ते पण नाही. जगाला उपदेश देणार्यना त्यात काहिच वावगे वाटत नाही.

खरं तर १२ जूनलाच सिरियल संपायला हवी होती निर्णय झाला, गाठी जुळल्या पण ह्या झीं मराठींना पण इंगा चावलाय केकताचा.....

१२ जूनला संपला तो 'ह दि दे चू स' सिनेमा आणि सुरु झाली खरी मालिका.
होसूमीयाघ आणि जूयेरेगा या मालिका बघायच्या मी कधीच बंद केल्या. सध्या फक्त एलतिगो मालिका बघतेय. ती संपली कि झी मराठीला टाटा, बाय बाय.

>>>>>१२ जूनला संपला तो 'ह दि दे चू स' सिनेमा आणि सुरु झाली खरी मालिका..
...
संपली ती वो सात दिन , हम दिल…. , धडकन ….
मागणी तिथे पुरवठा ,जो पर्यंत TRP शिल्लक आहे तो पर्यंत नवीन शिरेल आणणे म्हणजे मूर्खपणा it's business
चालू द्या तुमचे

चालू द्या तुमचे>>>> आमचे कुठे काय चाल्लेय आता पर्यन्त? नाहीतर तुतिमी, राहिबा, होसुयामीघ च्या पण इस्टोर्‍या दणक्यात बदलल्या असत्या बघा.:फिदी:

तुतिमीच्या प्रियाला जुयेरेगा मध्ये घुसवली असती, जान्हवीला तुतिमी मध्ये टाकली असती, मेघनाला होसुयामीघ मध्ये फिरवली असती, मग सगळ्याच नायकाना या नायिकाना पाहुन जाम न्युनगन्ड निर्माण झाला असता.:खोखो:

>>हुश्श... केलं साफ मन. काहीच लपवलं नाही मी. आता बर वाटतय
Rofl

लोकांना इतके प्रॉब्लेम असतात तर बघतात का लोक ह्या शिरेली..... आवडणारी आवडतीय तेव्हढे दिवस बघावी.... डोक्यात जायला लागली की सोडून द्यावी
सतराशे साठ चॅनेल्सवर सतरा लाख कार्यक्रम चालू असतात.... बघावा आवडेल तो.... झी मराठीला काय एव्हढे सोने लागलेय Wink

कालचा गिओ आणि आदेचा प्रसंग चांगला झाला.. डायलॉग चांगले होते आणि दोघांची अ‍ॅक्टींग पण..
सुमोची चिडचिड आता ताणू नये फार.. !

हो, त्याच्यावर पण एक धागा काढुन श्रावणात धागा धागा अखन्ड विणुयाचे व्रत मनोभावे चालू ठेऊया.:फिदी:

आबासाहेब, ही बघा मी पुढे चाल्ले.:फिदी:

आदे आणी मेदेच्या आई वडिलान्ची जुगलबन्दी दाखवणार आहेत आजच्या किन्वा उद्याच्या भागात. जरुर जरुर जरुर बघा. सुमो जास्तच गट्टाणे डोळे करुन बोलत होती आणी बाबाजी गयावया करत होते.

मेदेची आई आणी आदेचे बाबा जाम दिनवाणा चेहेरा करुन बसले होते.

Pages