रस्ते, अपघात आणि आपण

Submitted by श्यामली on 25 December, 2012 - 00:16

काल घडलेली अतिशय सुन्न करणारी घटना.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याच्या दोन वर्शाच्या मुलाचं पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेलं अपघाती निधन.

या आधीपण अशा कितीतरी मंडळींना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. हे फक्त एक्सप्रेस वे वर होतं आहे असं नाही, पुण्यात रोज एकतरी अशी बातमी असते. मुंबईत हिट & रन केस असतेच असते.

याबाबत आपण काय करु शकतो? सरकारनी काय करायला हवय. हा अवेअरनेस गरजेचा नाही का? आज रस्त्यावर चालायच म्हटल तरी जीव मुठीत धरुन चालाव लागत. रस्ता ओलांडायचा म्हणजे अरे बाप रे... वाटावं अशी परिस्थिती. मुलांना सायकल्/दुचाकी घेऊन रस्त्यावर जाऊ द्यायला भिती वाटावी अशी परिस्थिती. आपल्यापैकी कुणी प्रवासात असेल तर ती व्यक्ती सुखरुप घरी येईपर्यंत जीवात जीव येत नाही.
घरातून बाहेर पडताना, रस्त्यावरच्या या दहशतीचं काय करायच?

हे सगळं कुठे तरी नीट व्हायला हवं म्हणून ही चर्चा आवश्यक वाटते.

मला सुचलेले मुद्दे लिहिते आहे

आर टि ओ च ढिसाळ रस्ता नियोजन - व्यवस्थापन
लायसन्स देताना योग्य प्रशिक्षणाची आणि कडक निकषांची गरज आहे
आपल्या वाहनाची योग्य ती काळजी आपण घेतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक प्रमुख कारण म्हणजे टायर मध्ये हवेचा योग्य दाब नसणं. त्यातही गैरसमज म्हणजे हवा जास्त भरली गेली तर फुटण्याचा धोका आहे. तसं नसून कमी भरलेली हवा टायर फुटण्यासाठी कारणीभूत असते >>

+१ लोकांना वाटतं की जोरात चालविल्यामुळे हवेचे प्रेशर निर्मान होऊन योग्य तो PSI आपोआप तयार होईल व चांगले अ‍ॅवरेज मिळेल. टायर प्रेशर योग्यच हवे. नेहमी चेक करणे टाळन्यासाठी चाकात एअर ऐवजी नायट्रोजन भरले तर नेहमी चेक करण्याऐवजी दोन पाच महिन्यांना केले तरी चालेल.

मला हायवेवर १२० +/- ने जाणार्‍या अल्टो, वॅगन आर, झेन, पोलो, आय टेन ह्या ड्रायवर बद्दल फार आदर वाटतो. त्या सर्वांनी खरे तर देशासाठी "बलिदान पथका" समाविष्ट झाले पाहिजे.

त्या बीम बाबत वर चर्चा वाचली. मला जोरात जायचे असेल (योग्य रितिने) आणि मी हाय बीम दाखवले तर तुम्ही साईड (योग्य ती सावधगीरी वगैरे बाळगून आणि तुम्ही अगदी ८० ने च जात असाल तरीही साईड देणे बंधनकारक (नियमानुसार) आहे, पण नेहमी हेच पाहिले की जर तुम्हाला जोरात जायचे असेल तर समोरच्याचा इगो दुखावतोच आणि तो तुम्हाला साईड देत नाही, मग तुम्ही थोडे पॅनिक होऊन दुसर्‍या लेन मधून ओव्हरटेक करणार (कारण पर्यायच नाही) त्यातदेखील अ‍ॅक्सिडेंट होऊ शकतो. त्यात चुकी खरे तर त्या न साईड देणार्‍याची आहे.

लोकांना वाटतं की जोरात चालविल्यामुळे हवेचे प्रेशर निर्मान होऊन योग्य तो PSI आपोआप तयार होईल व चांगले अ‍ॅवरेज मिळेल.>> अगदी अगदी.

नेहमी चेक करणे टाळन्यासाठी चाकात एअर ऐवजी नायट्रोजन भरले तर नेहमी चेक करण्याऐवजी दोन पाच महिन्यांना केले तरी चालेल.

काय चेक करायचे??

मीही नायट्रोजन भरलाय चाकात पण दर वेळेला गाडी पेट्रोल भरायला नेली की नायट्रोजन चेक करते. जसे आपण नॉर्मल हवा चेक करतो तसे. हे करायला नको का?

साधना, नायट्रोजन असेल तर दर वेळी चेक करायची अजिबात गरज नाही, तो सहज ३-४००० किमी पर्यंत चालतो. दर तीन महिन्याला वगैरे (किंवा तेवढे रनिंग झाल्यावर) चेक कर.

काय चेक करायचे?? >> गाडीचा बिपी अर्थात टायर प्रेशर. Happy

ओके. मी दर वेळेला नायट्रोजन चेक करते... चेक करणा-याने पण कधी सांगितले नाही, रोज रोज करायची गरज नाही म्हणुन. Happy

अलॉय व्हील्स असतील तर ३ महिन्यांनी नायट्रोजन भरला तर चालू शकेल. शिवाय अलॉय व्हील्स १०% नी थंड राहतात कारण त्यात अल्युमिनियम असतं जे लवकर उष्णता वाहून नेतं. माझ्या गाडीला साधे स्टील रीम्स आहेत त्याला टायरवाला १.५ ते २ महिन्यांनी भरण्याचा सल्ला देतो. मुख्य म्हणजे बाहेरगावी जाताना आवर्जून चेक करावं. स्टेपनी चेक करण्याचा कंटाळा करू नये. विशेषतः वॉशिंग सेंटर ला लागून असलेल्या ठिकाणी हवा भरू नये, कारण त्या हवेत आर्द्रता असते आणि ती हवेपेक्षा लवकर प्रसरण पावते. गाडी रस्त्याच्या कडेला लावताना टायर फुटपाथ ला घासणार नाही याची काळजी घ्यावी, साईड नाजूक असते, तिथे कट गेला तरी अगदी नवे टायरही फुटू शकते. हवे बरोबर चेक करण्याची हीदेखील गोष्ट आहे.

नायट्रोजन आपण गाडीला साधे टायर-ट्युब असल्यास भरु शकतो का? की ट्युबलेस सारखे वेगळे टायर्स असतात? आणि दुचाकीला (स्कुटी) ला पण नाय्ट्रोजन भरता येइल का? स्कुटीला चालत असेल तर मग किती महिन्यांनी/किमी नंतर प्रेशर चेक करायला हवं? हवेऐवजी नाय्ट्रोजन भरला तर अ‍ॅव्हरेजवर फरक पडतो का? ट्युबलेस ला अ‍ॅव्हरेज कमी बसतं असं ऐकुन आहे..

सॉरी, खुपच प्रश्न आहेत, पण ज्ञानात भर केव्हा ना केव्हा टाकायलाच हवीय..

गाडीला हव्या त्याच प्रेशरने हवा भरली असल्यास हवेचा आणि नायट्रोजनचा अ‍ॅव्हरेजशी फारसा संबंध नसतो. जर प्रेशर खूप कमी आणि खूप जास्त असल्यास चाक मात्र खराब होते आणि जास्त असेल तर राईड बम्पी होते.

तसेच ट्युब टायर वा ट्युबलेस टायर ह्या दोन्हीचा अ‍ॅव्हरेजशी संबंध नसतो. (गैरसमज आहेत)

ट्युबलेसचे फायदे जास्त असतात, पंक्चर झाले तरी हे चाक इत्सिप्त स्थळापर्यंत तुम्हाला पोचवू शकते. (त्यात प्कंचर फ्लुईड टाकले असल्यास)

स्कुटीचे टायर ट्युबलेस नसावे. (अर्थात मला नक्की माहिती नाही, पण स्कुटी अन तत्सम गाड्या ट्युबवाल्या आहे. ) ट्युबलेस आणि ट्युब टायर ह्या दोन्ही मध्ये नायट्रोजन भरता येते.

एक लक्षात घ्यावे की नायट्रोजन भरल्यावर फक्त दर आठवड्यात / महिन्यात प्रेशर चेक करायची गरज राहत नाही, बाकी दावे फोल आहेत. (नायट्रोजन मुळे अ‍ॅव्हरेज वाढते वगैरे)

नायट्रोजन हे स्पिड टायर्स मध्ये ( वेगात आणि अतिवेगात धावणार्‍या गाड्या) आवश्यकच आहे, नेहमीच्या वेगात धावणार्‍या गाड्यात नाही भरले तरी चालते. आणि नायट्रोजन दिलेल्या मर्यांदांपेक्षा एखाद PSI कमी भरले तरी चालते.

वर उल्लेख केलेल्या अपघातात ज्याला आपण गमावले असा गुणी कलाकार 'अक्षय पेंडसे' याचा लहान भाऊ 'तन्मय पेंडसे' हा "Movement Against Road Accidents" सुरु करतो आहे. ज्यांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्याला संपर्क करावा:

Tanmay Pendse
9604389735
naturecubs@gmail.com

मृत्यूबद्दल , अपघाताबद्दल बधीरपण आलेलं आहे.
एखाद्या अपघाताबाबत सामूहिक आक्रंदन सुरू झाल्यानंतर त्या त्या केस पुरतं ते बधिरपण गळून पडल्यासारखं होतं. खरं तर ते पाण्यात दगड मारल्यावर उमटणार्‍या क्षणिक आंदोलनाप्रमाणे असतं. समाजमन हे असंच तात्पुरतं ढवळून निघतं.

अफाट वाढत चाललेली लोकसंख्या, त्यातून मानवी हक्क आणि अधिकारांचा संकोच , नैसर्गिक साधन संपत्तीवर होणारे function at() { [native code] }इक्रमण हे आता अनिवार्य आहे ही स्वतःची समजून प्रत्येक जण नकळत घालतो. अपघात झाल्यावर आता लोक थांबत नाहीत. थांबणारे लोक हे सहसा आर्थिकदृष्ट्या एका विशिष्ट वर्गातून येत असतात. शिस्त, वेळेचं बंधन अशा कंपल्शनपायी एक वर्ग थांबत नाही.

रोज अपघाताची कारणं दिसत असतात. त्याचा पाठपुरावा करायला या वर्गाला वेळ नाही. खरे तर अपघात का होतात याचे बौद्धीक विश्लेषण करू सकणारा वर्ग उदासीन होत चालला आहे याचे कारण सुद्धा बधिरलेपणच आहे.

खरे तर अपघात का होतात याचे बौद्धीक विश्लेषण >> माझ्या मते याचे कारण म्हणजे (जीवनात) एकंदर वाढलेला अफाट वेग, and nobody wants to slow down because everyone is afraid that they will be run over if they slow down or stop.

सांगली येथील एकाच घरातील सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला. दीड कोटींची जगातली सर्वात सुरक्षित कारपैकी एक कार ते चालवत होते. कारचालकाची काहीच चूक नव्हती. तरीही हा अपघात झाला.

या अपघातामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. आधी हा व्हिडीओ रिपोर्ताज पहा.
https://www.youtube.com/watch?v=5Ar2N1BMigs

याच अपघाताविषयी आणखी माहिती मिळाली ती अशी..
हे कुटुंब सांगलीकडे चालले होते. विरूद्ध बाजूने म्हणजे सांगलीकडून येणार्‍या बाजूच्या लेनमधून कंटेनर डिव्हायडर वरून या लेनमधे आला. या कंटेनरच्या समोर एक कार होती. कारचालकाला रेस्टॉरण्ट दिसल्याबरोबर त्याने जोरात ब्रेक मारला. धडक टाळण्यासाठी कंटेनरवाल्याने स्टिअरिंग जोरात फिरवलं. त्याला ते धूड कंट्रोल झालं नाही आणि तो विरूद्ध दिशेने येणार्‍या दूधाच्या कंटेनरला जाऊन धडकला. हा कंटेनर पलटी झाला तेव्हां ही दुर्दैवी कार त्या दूधाच्या कंटेनरच्या बाजूने चाललेली होती. त्या कारवर कंटेनर आदळल्याने कारचा चक्काचूर झाला.

- लांबच्या प्रवासाला कारने जावे का ?
- सार्वजनिक वाहतुकीची साधने वापरली तर अपघाताचा धोका निश्चित कमी झाला असता. किमान जीवितहानी टळली असती. अगदी खासगी बसने गेले असते तरी अपघाताची तीव्रता कमी झाली असती.
- स्वतःचे वाहन घेताना ते भले मोठे आणि महागडे घेण्याकडे कल वाढत चालला आहे. स्वतःचे वाहन हे रोजच्या वापरासाठी म्हणजे ऑफीस ते घर या कामासाठीच असावे.
- ते त्या शहरातल्या रस्त्यांच्या अवस्थेप्रमाणे लहान किंवा मध्यम आकाराचे असावे. महागडी गाडी घेऊन स्टेटस दाखवण्याचा प्रयत्न करू नये.
- लांबच्या प्रवासाचे क्रायटेरियाज लावून भलं मोठं, पूर्ण कुटुंबासाठी वाहन घेऊ नये. एका प्रसिद्ध बिल्डरचं कुटुंब अपघातात गेलं होतं.
- मोठमोठ्या बिझनेस हाऊस मधे संपूर्ण फॅमिली एका वाहनातून कधीच प्रवास करत नाही. अपघात झालाच तर सगळेच संपून जाऊ नयेत हा उद्देश त्यामागे असतो. म्हणूनच संपूर्ण फॅमिलीसाठी एसयुव्ही घेण्याचा जो ट्रेण्ड आलेला आहे तो घातक आहे. दोन कार्स घेतल्या असत्या तर चालले असते. एका कारवर ड्रायव्हर घ्यायचा होता.
- प्रवासापेक्षा खाण्यासाठी प्रवास हे आता नवंनॉर्मल झालेलं आहे. या खाण्यापायीच हा अपघात झाला. दिसलं हॉटेल मारला ब्रेक, यामुळे अपघात झाला.
- लोक कुठेही भल्या मोठ्या गाड्या घेऊन यू टर्न घेत असतात.
- रस्त्याच्या कडेला वाहन थांबवलेलं असतं. त्यामुळे मागच्या वाहनाला लेन बदलताना त्या लेनमधल्या वाहनाशी धडक होण्याचा धोका निर्माण होतो.

जागोजागी निघालेले ड्रायव्हिंग स्कूल्स पैसे घेऊन एकही सेशन ड्रायव्हिंगच्या क्लासला न येणार्‍यालाही परवाना मिळवून देतात. असे परवानाधारक रस्त्यावर बेफाम गाड्या चालवतात. त्यांना कुठलेही नियम माहिती नसतात. कुणी जाब विचारला तर मारायला अंगावर येतात. मोबाईलवर बोलत टू व्हीलर चालवणे ही फॅशन झाली आहे. पण आता एस एम एस, व्हॉटस अ‍ॅप वाचत गाड्या चालवतात.

बेदरकार वृत्तीत वाढ होत चालली आहे.

केवळ सरकारवर खापर फोडून काहीच होणार नाही. सरकारच्या चुका तर माहिती असतातच. पण लोकांना शिस्त नसेल तर जगातले आदर्श सरकार सुद्धा काहीच करू शकत नाही.

अपघात आणि एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू घटना वाईट वाटले. Sad

अपघात होण्यामधे SUV ड्रायव्हरची चूक दिसत नाही. कंटेनर ड्रायव्हरचा वेग, वजन, आकारमान आणि किती steer करायला हवे याबाबतचा अंदाज मोठ्या फरकाने चुकला. एव्हढ्या जवळ खेटून कंटेनर का चालवत होता ? समोरची गाडी अचानक थांबल्यावर माझ्याकडे काय पर्याय रहातात?

व्हिडिओ बघितला, आधी गाडीची जाहिरांतच करत आहे का असे वाटले. गाडीमधे air-bags, lane Detection, forward collision warning म्हणजे सुरक्षित आहे असे होत नाही. १०० % सुरक्षित कार अजून बनलेली नाही.

बाजूने चालणारा कंटेनर असे एकले आहे म्हणजे एका दिशेने जाणार्‍या दोन लेन होत्या का? गुगल वर सिंगल लेन रस्ता दिसत आहे.

या अपघाताची बातमी काल वाचली. खूप वाईट वाटलं. जे गेले त्यांचं पूर्णपणे दुर्दैव! दुसरं काही नाही. महामार्गावर गाडी चालवताना अचानक स्लो होणाऱ्या कारचालकाची चूक आहे. कंटेनरवाल्याकडे कदाचित दुसरा पर्याय नसावा.
बेदरकार वृत्ती वाढत चालली आहे याला +१
मी शहरात गाडी चालवते आणि लांबच्या प्रवासासाठी महामार्गांवरही चालवते. गेल्या काही वर्षांमध्ये मला तरी या बेदरकार वृत्तीत वाढ झालेली जाणवते. उदा. शहरात लेन बदलताना सिग्नल देणं हे सगळेजण पाळत नाहीत. (मी पाळते) पण गर्दीच्या रस्त्यावर आपण वेगात नसल्यामुळे ते चालून जातं. पण आता हायवेवरही लोक बिनधास्तपणे सिग्नल न देता अचानक लेन बदलून आपल्या पुढे येतात.

जितकी महागडी गाडी तितके सुरक्षित वाहतुकीचे आणि ड्राइविंगचे नियम न पाळणे हा हक्क असल्याप्रमाणे लोकं गाड्या चालवतात. हॉटेल वाले काही किलोमीटर आधीपासून त्यांच्या हॉटेलची जाहिरात करत असतात महामार्गावर, असे असताना त्या कार वाल्याला असे काय झाले होते की त्याला इतक्या घाईत गाडी वळवावीशी वाटली. नक्कीच वळण्याचा किंवा अचानक थांबण्याचा इशारा केला नसणार. त्याच्या चुकीपायी एक कुटुंब उध्वस्त झाले, त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही.

मोठमोठ्या बिझनेस हाऊस मधे संपूर्ण फॅमिली एका वाहनातून कधीच प्रवास करत नाही. अपघात झालाच तर सगळेच संपून जाऊ नयेत हा उद्देश त्यामागे असतो. म्हणूनच संपूर्ण फॅमिलीसाठी एसयुव्ही घेण्याचा जो ट्रेण्ड आलेला आहे तो घातक आहे. दोन कार्स घेतल्या असत्या तर चालले असते.
>>> not everyone can afford two cars. Middle class lokancha vichar Kara…

प्रोफाईलला का नाही लिहीले कि विनोदी आहे ? हसलो असतो.

साईट तुमच्याच मालकीची असेल तरीही या धाग्यावर तुमचे भंगार विनोद नकोत प्लीज.

यात काय जोक दिसला.. मिडल क्लास जनतेने दोन कार घ्या हा सल्ला हाच विनोद आहे पण तो मी नाही टायपला- तुमचाच प्रतिसाद आहे तो .. वर स्क्रोल करा…

साईट तुमच्याच मालकीची आहे. भंगार आणि इरीटेटींग जोक तुमच्याच मालकीचे आहेत.
मी काय सांगणार ?
एक फालतू थर्डक्लास प्रोफाईल बनवून रोज दोन धागे काढले, तिकडे प्रतिसाद दिले नाहीत तर प्रत्येक धाग्यावर फालतुगिरी चालू आहे.
उडवा कि सरळ अकाउंट.
कशाला सर्वांना प्रतिसाद देऊ नका म्हणून सांगून मोहीम चालवताय ? हसू पण येत नाही आता.

च्रप्स
तुम्ही वेमाही असाल. पण हा धागा अपघाताचा आहे आणि इथे एका अपघातात गेलेल्या संपूर्ण कुटुंबाबद्दल चर्चा चालू आहे.
यात दोन लहान बाळं आहेत.
तुम्हाला माझा आयडी इरीटेट करून उडवायचा तर उडवा. पण या धाग्यावर या घटनेला अजिबात किंमत न देता पोपटाचा डोळा दिसावा तसा फक्त माझ्या आयडीने कुठे प्रतिसाद दिलाय तिथे काहीतरी फालतू गिरी करायच्या नादात गांभीर्य पण ठेवलं नाही.
या अपघातात तुमचे कुटुंब नाही याबद्दल आभार मानूयात आपण. पण जे गेले त्याबद्दल एव्हढी संवेदनहीनता पटली नाही.
बाकी तुमची मर्जी.
आता या दुसर्‍या अकाउंटने.

not everyone can afford two cars. Middle class lokancha vichar Kara… <<
मोठमोठ्या बिझनेस हाऊस मधे सुरक्षिततेसाठी काय करतात त्याचं फक्त उदाहरण दिलं आहे. त्यातला 'Precautionary Element' एक संकल्पना म्हणून सांगितला आहे.
ती किंवा तत्सम संकल्पना वेगवेगळ्या आर्थिक गटांसाठी कशी वापरायची त्याचा स्वतंत्र विचार करावा लागेल.

Pages