गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.
(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)
मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार
काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.
हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.
गरोदरपणातील आहार
हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.
डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.
व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.
-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काय जेवायचं अस्त c section
काय जेवायचं अस्त c section नंतर??
Hi my daughter was only 2.5
Hi my daughter was only 2.5 kg at birth. Post op normal home food. Freshly made and not too spicy. Boiled water. Poli bhaji salad waran bhat. Moog dal khichdi. Fresh buttermilk. Fruit. You will get tiffin services details in your area on Facebook. Or talk to your society watchman for maid plus cook. At least for the first month. You will need to keep food handy for small boy also. Try to take paternity leave. Keep hospital bag for your wife ready and also on return you will need baby stuff ready. It is a happy occasion and focus on your family.
Thank you
Thank you
बर वाटल इकडे बोलून
बर वाटल इकडे बोलून
Bio oil कोणी वापरून पाहिले
Bio oil कोणी वापरून पाहिले आहे का? कि आपले कोकोनट ऑइल बेस्ट आहे. I am 5 months pregnant.plz guide.
2kg आणि 2.5 kg वजन कमी समजुन
2kg आणि 2.5 kg वजन कमी समजुन काळजी करणाऱ्या आयांनो, माझा मुलगा 1.1 kg (1100gm) वजनाचा होता. सहा पूर्ण होऊन सातवा लागला त्या पहिल्या आठवड्यात झालेला premature आणि underweight बेबी होता. त्याचे लंग्जही डेव्हलप झाले नव्हते. आम्ही सगळं डॉक्टरांवर आणि चारही आजी आजोबांनी देवावर सोपवुन टाकलं होतं. 19 दिवस खुप टेन्शन आणि अनेक ट्रीटमेंट्स मध्ये गेले. पण आता तो हँडसम, हेल्दीच नाही तर प्रोफेशनल फुटबॉल प्लेअर आहे. (सांगायचा उद्देश असा की लहानपणीचा लंग्ज इशु सुद्धा ठीक झाला आहे. वाढीवर परिणाम नाही किंवा दमछाक करणाऱ्या खेळावर बंधन नाही).
त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये योग्य काळजी घ्या पण उगीच टेन्शन घेऊ नका. बाळाचं सुरुवातीचं वजन, वाढीचे टप्पे, बौद्धिक किंवा शारीरिक वाढ हे दुसऱ्या बाळाबरोबर किंवा दुसऱ्या प्रेग्नंट आईबरोबर तुलना करून डोक्याला ताप करून घेऊ नका. नीट काळजी घेत आणि डॉक्टरांचा सल्ला घेत राहिलं तर सगळं व्यवस्थित पार पडतं.
( मी हे आता सांगत नाही, तेव्हा सुद्धा सांगोवंगी किस्से आणि लोकांचे अनुभव हसुन इग्नोर करत शांत डोक्याने पार पाडलं होतं)
Great
Great
खरच खूप छान वाटल वाचून
खरच खूप छान वाटल वाचून
Great Happy >> +१
मीरा
ग्रेट
Bio oil कोणी वापरून पाहिले
Bio oil कोणी वापरून पाहिले आहे का? कि आपले कोकोनट ऑइल बेस्ट आहे. I am 5 months pregnant.plz guide.>>>> फार उपयोग नाही होत. एवढी ताणलेली स्किन पूर्वपदावर येताना काहीतरी मार्कस् राहतातच. Don't worry about that. Enjoy your pregnancy. फक्त स्किन ड्राय होते आणि थोडी खाज येते त्यासाठी एखादं चांगलं मॉश्चरायजर लावा. मी Elovera cream वापरलं होतं. ६ व्या महिन्यापासून.
मीरा +1 ,
मीरा +1 ,
शुभेच्छा आहेतच ,काळजी करू नका होईल सगळे व्यवस्थित.
माझाही हाच अनुभव आहे मुलासोबत , 27 weeks ला (12 week premature ) जन्मला, 1200gm वजन व पंधरा इंच उंच होता. सगळे अवयव अंडरडेव्हलप्ड होते व नऊ आठवडे N ICU मधे राहीला , वर्षभर पंपिंग करून दूध दिले. कारण त्याला जमलेच नाही नंतर !
आधी अशक्तपणा व प्रतिकारशक्ती कमी होती. आता 6'2" आहे . दणकट आहे. उत्तम बांधा आहे . मी जायंट बेबी म्हणते त्याला. शाळेत वर्षभर आधी जाऊनही हॉनर रोल स्टुडंट आहे. अत्यंत शांत, समजदार व तल्लख आहे. मीही पाच पाऊंड होते (आईला व आजीला काळजी वाटायची) , पण नंतर वाढले उंची पाच सहा , बांधा उत्तम व सशक्त आहे, रंगरूपउंचीमुळे पंजाबी म्हणायचे मला. चिला नवपालकांनो , you guys will be fine !!
(हे मी याकरिता लिहिले की मी भयंकर काळजी करायचे पण खरंतर गरज नव्हती. )
शाळेत वर्षभर आधी जाऊनही हॉनर
शाळेत वर्षभर आधी जाऊनही हॉनर रोल स्टुडंट आहे
>> हे कसे जमवले? शाळेत एक वर्ष आधी टाकणे? इथे रुल्झ कडक आहेत ऑगस्ट नंतर वाढदिवस असेल तरी घेत नाहीत
H is silent in Honour as per
H is silent in Honour as per British English.
Thank you...मी चिन्मयी.
Thank you...मी चिन्मयी.
१) आठवा महिना असेल तर
१) आठवा महिना असेल तर कोविडच्या लशी घ्यायला चालतील का? आधी नव्हते चालत पण आता ऐकले की लस घ्यायला चालते. तुमचे अनुभव असतील तर सांगू शकाल का? धन्यवाद.
२) आईचे रक्तगट जर बी नेगेटिव्ह असेल तर संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात का?
लस सुरक्षित आहे.
लस सुरक्षित आहे.
निगेटिव्ह साठी: चौथ्या महिन्यात एक इंजेक्शन दिलं असेल.मातेचा ग्रुप निगेटिव्ह बाळाचा पॉझिटिव्ह असेल तर मातेच्या अँटी बॉडीज ने बाळाला अपाय होऊ नये म्हणून देतात.
इंजेक्शन दिले नसेल तर कदाचित बाळाचा पण निगेटिव्ह ग्रुप असेल.
डिलिव्हरी नंतर ऱ्होगॅम किंवा अँटी डी इंजेक्शन देतात.दुसऱ्या बाळाच्या वेळी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ब्लड ग्रुप ने गुंतागुंत होऊ नये म्हणून.
(आणि चांगल्या शब्दात इथले डॉ लोक सांगतील.)
धन्यावाद अनु.
धन्यावाद अनु.
परवा एका बारशाला गेले होते
परवा एका बारशाला गेले होते.आईचे सी सेक्शन झाले होते.दुसरे बाळंतपण होते.बाळ खूप बारीक आहे.असेच बोलताबोलता तिची नणंद म्हणाली माझी बहीण स्त्रीरोगतज्ञ आहे आणी तिच्या म्हणण्यानुसार सीझर केलेले चांगले त्यामुळे बाळाला त्रास होत नाही.मला हे पटले नाही.कृपया या बाबतीत तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
सीझर चा आणि बाळाच्या हेल्थ चा
सीझर चा आणि बाळाच्या हेल्थ चा काही संबंध नसतो....
माझी मुलगी 2 किलो ची होती... मला जेवण जात नसे त्यामुळे तिचं वजन वाढत नव्हतं... शिवाय तिने गळ्यात 4 नाळेचे वेढे घालून घेतलेले त्यामुळे 9 महिने 9 दिवस झाले तरी पिंड खाली सरकला नव्हता...
म्हणून सीझर करावे लागले....
नैसर्गिक प्रसूती चांगलीच.. पण कॉम्प्लिकेशन किंवा काही अडचणी मुळे सीझर करावे लागले तर त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो..
100 पैकी 80 डॉक्टर पैसे काढण्यासाठी हे करतात. पण आपण त्यात डॉक्टर बद्दलण्याशिवाय काही करू नाही शकत...
तुमच्या ओळखीच्या डॉक्टर सीझर म्हणत आहेत तर काहीतरी कारण असल्याशिवाय म्हणणार नाहीत.
त्यांना तुमचं समाधान होई पर्यंत प्रश्न विचारा...
माझी पण पसंती सी सेक्षनला आहे
माझी पण पसंती सी सेक्षनला आहे. उगीचे पेन्स सहन करण्यात काहीच अर्थ नाही. माझे पण सी सेक्षन. चार दिवसात घरी. दहा दिवसांनी टाके काढले. बेबी परफेक्ट २.५ किलो. नंतर पण काहीच त्रास झाला नाही.
पेन्स सहन करायचे नसतील तर
पेन्स सहन करायचे नसतील तर एपिड्युरल, ते पण Intravenous (IV) मिळते, ते घ्यावे. कुठल्याही बाबतीत, गरज नसताना उगीच शरीराची कापाकापी करू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे. (अर्थात त्याला काडीचीही किंमत नाही). योग्य काय ते डॉक्टरच सांगतील.
ड्यू डेट (४० आठवडे) उलटून ही
ड्यू डेट (४० आठवडे) उलटून ही मला लेबरपेन आलेच नाही. केले मग सी सेक …(अर्थात गायनॅक नी च सजेस्ट केलं). सासरे बूवा पण तेच बोलले…. उगाच ईंड्यूस्ड करून वेळ काढण्यात अर्थ नाही असं त्यांच मत होतं. तेच माझे रेडीयोलॅाजीस्ट होते, त्यांना सगळी कंडीशन माहीतच होती. अजिबात त्रास झाला नाही. Baby s also fit n fine .3.25 kgs.
अभिनंदन श्यामली.
अभिनंदन श्यामली.
नॉर्मल काय सी सेक काय, आई आणि बाळ उत्तम निरोगी हॉस्पिटल मधून बाहेर येणे हा मुख्य एम.त्यासाठी चांगले अनुभवी डॉक्टर सांगतील ते निःशंकपणे करावे.तसंही आपल्याला त्यातलं काही कळत नसतंच.
अनु +१
अनु +१
नॉर्मल काय सी सेक काय, आई आणि
नॉर्मल काय सी सेक काय, आई आणि बाळ उत्तम निरोगी हॉस्पिटल मधून बाहेर येणे हा मुख्य एम.त्यासाठी चांगले अनुभवी डॉक्टर सांगतील ते निःशंकपणे करावे.
>>>>
अगदी अगदी.
गरोदरपणातही ज्या काही शंका असतील त्या बिनधास्त विचाराव्यात. माझ्या पहिल्या डॉ अतिशय नावाजलेल्या पण वयस्क होत्या. त्या फार काही बोलत नसत. त्यांच्यासाठी कदाचित रुटीन गोष्ट असेल पण माझ्यासाठी सर्वस्वी नविन अनुभव असल्याने मी कंफर्टेबल नव्हते. शेवटी फॅमिली डॉ च्या सल्ल्याने दुसर्या डॉ शोधल्या. त्या व्यवस्थित कम्युनिकेट करत असल्याने त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला.
९ व्या महिन्यात डॉ ऍवेलेबल नसल्या तरी त्यांच्या जागी कोण असणार आहे त्याची खात्री करून त्यांनाही एकदा भेटले पाहिजे. बाळंतपणासाठी माहेरी जाणार असाल तर तिथल्या डॉ कडेही एक दोनदा रुटीन चेकपला गेले पाहिजे. थोडक्यात काय गरेदरपणातल्या ९ महीन्यात रॅपो सेट झाला पाहिजे.
तुमच्या ओळखीच्या डॉक्टर सीझर
तुमच्या ओळखीच्या डॉक्टर सीझर म्हणत आहेत तर काहीतरी कारण असल्याशिवाय म्हणणार नाहीत.
त्यांना तुमचं समाधान होई पर्यंत प्रश्न विचारा...
त्या ताई असे म्हणत होत्या की नॉर्मल डिलीव्हरीत सर्वसकट सगळ्या मुलांना त्रास होतो म्हणून सगळ्यांनी सी सेक्शनच करणे चांगले.हेच मला पटले नाही .
सगळ्यानी रिप्लाय दिल्या बद्दल
सगळ्यानी रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद सगळ्यांचे.
माझ्या दोन्ही डिलीव्हरी
माझ्या दोन्ही डिलीव्हरी नॉर्मल आहेत.पहिल्या वेळी त्रास जास्त झाला आणी वेळही जास्त लागला.दुसर्या डिलीव्हरी वेळेस मी प्रेग्ननंट असताना माझे 8 ते 9 किलो वजन कमी झाले होते.भूक लागत नव्हती.मुलगी मात्र पावणेतीन किलोची गुटगुटीत छान होती.त्रास जास्त झाला नाही. एका तासाच्या आत डिलीव्हरी झाली.
सीझर आणि बाळाच्या वजनाचा काही
सीझर आणि बाळाच्या वजनाचा काही एक संबध नाही.
वर उपाशी बोका यांनी लिहिलं की कापाकापी वगैरे करण्यात अर्थ नाही...
हेच मुळात चुकीचं आहे.
जिथे नॉर्मल डिलिव्हरी नॉर्मल रित्या होतेय तिथे होतेच की...
पण जिथे जेन्यूईन प्रॉब्लेम होतात...
मी माझ्यावरून च सांगते.
मला ही नॉर्मल च हवं होतं...
9 महिने झाले तेव्हा रेहा च्या गळ्यात नाळेचे 4 वेढे होते.
सोनो मध्ये 2 च दिसले म्हणून डॉक्टर बोलले आपण अजून आठवडा भर थांबू. बाळ स्वतः सुटले म्हणजे पोट खाली उतरेल तुझं.
9 व्या महिन्यात पोट म्हणजे पिंड खाली येतं आणि पोट उतरल्या सारखं दिसतं. माझ्या केस मध्ये हे नव्हतं. माझं पोट अगदी 6 व्या महिन्यातल्या सारखं च दिसत होतं. वर....
आणि रेहा पायाळू नाही , आडवी नाही पण तिरकी म्हणजे ब्रीच पोझिशन मध्ये होती.
आठवडा भर थांबून पण तिने वेढे नाहीच सोडवले तर डॉक्टर बोलले सीझर करू. कारण पेन देऊन पण मी बाळाला खेचले तरी गळ्यातल्या नाळेने तिला फास बसेल.
जेव्हा सीझर साठी माझं पोट सो कॉल्ड कापलं तेव्हा ही रेहा दिसली नाही. मग अनेस्थेशीया देणाऱ्या डॉक्टर ने पोट वरून थोडं दाबलं आणि तिला खाली सरकवली.
बाळ बाहेर आल की ते श्वास घेऊ लागतं. म्हणून तिच्या गळ्याला गुंडाळलेले वेढे काढायची धांदल झाली. कारण ते घट्ट होते.
माझी नाळ नॉर्मल लांबी पेक्षा अधिक होती. त्यामुळे 4 वेढे पडलेले. डॉक्टर ही अचंबित होते. आणि हिचा गळा नुसता लाल लाल झालेला....
डिलिव्हरी च्या वेळेस वजन 2 किलो होतं. मग 4 दिवसात ते 1.8 झालं..
पण एक महिन्याने तिने जे बाळसं धरलं. 3 रया महिन्यात तिचं वजन काहीतरी 8 किलो होतं... आता ती 7.5 वर्षाची आहे आणि अजून ही ती चांगली गुटगुटीत आहे...
कधी आजारी नसते... सर्दी वगैरे नॉर्मल मुलांसारखी असते पण तेवढं चालतं...
हे सर्व लिहिण्याचा प्रपंच म्हणजे सीझर ने कापाकापी होते, बायकांना त्रास होतो , मुलं वजनाचा बाबतीत कमी पडतात, आणि असे बरेच काही जे विनोदी गैरसमज लोकांमध्ये असतात ते 0.05 टक्का तरी कमी व्हावेत असं मला वाटतं.
आणि पेन न होता डिलीव्हरी
आणि पेन न होता डिलीव्हरी होण्याचे कोणतेही औषध नाही. जिथे बाळ बाहेर येताना तिथले स्नायू आणि बोन्स फाकले जातात तिथे पेन होतं च...
त्याच नॉर्मल डिलिव्हरी आहे त्याला पेन सहन करावे च लागते...
आणि सीझर मध्ये पेन होत नाही हे कोण म्हणतं???
डिलिव्हरी करताना पेन नसेल होत पण जेव्हा दिलेली भूल उतरते तेव्हा पेन काय असतं ते कळतं.
माझी मावशी म्हणलेली, " तुला तर काय आयत बाळ मिळालंय. सीझर झालं तर"
तेव्हा पण तिच्या एक थोबाडीत ठेऊन द्यावीशी वाटलेली.
सीझर काय नॉर्मल काय त्रास दोन्ही मध्ये थोड्या अधिक प्रमाणात होतोच... ज्याला त्रास च नको असेल त्याने बाळ दत्तक घ्यावं. म्हणजे मूल असणं हा हेतू साध्य होईल आणि त्या बाळाचं आयुष्य ही चांगलं होईल...
Pages