क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण चँपिअन सारख नाहीच खेळलो.. कधीच वाटल नाही की आपण जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. ऑस्सीज नंबर वन ला होते त्यावेळचा खेळ त्यांच्या चँपिअनशीपला साजेसा असायचा ( भले आपण त्यांना तोंडघशी पाडलं आणि ते रडीचा डाव पण करायचे Wink ) पण भारताचा निदान कालचा खेळ तरी तसा नव्हता. जणू आपण हारणारच आहोत अशा अ‍ॅप्रोचने सुरुवात केली. त्यात वीरु गेल्यावर लक्ष्मण आला असता तर बरं झालं असत, कारण लक्ष्मण तंबू टाकून बसतोच पण धावा ही काढतो, जेणे करुन रनरेट हलता राहील, पण द्रविडअण्णांच तसं नाहीये, त्यांनी तळ ठोकला की हालायचं नाव घेत नाहीत. निदान काल तरी बॅटींग ऑर्डर बदलायला हवी होती. नंतर द्रविड आउट झाल्यावर पुजाराला पाठवायल होतं असं वाटतयं. निदान पहिला थोडी रिस्क घेवून प्रय्त्न करायला पहिजे होतं आणि जड जातय असं कळल्यावर मग शांतपणे ड्रॉसाठी दळत बसायच होत.

आफ्रिकेच्या नकारत्माक खेळी पण कारणीभूत आहेच, सेहेवाग फॅक्टरला घाबरुन स्मिथ डाव घोषित करत नव्हता. आणि घाणेरड्या हॅरिसचे बॉल खड्ड्यात पडून वळत होते म्हणून तो सर्वश्रेष्ठ स्पिनर असल्याचा आव कॉमेंटेटर्स आणत होते. सगळ्यात भारी म्हणजे ६८-६९व्या ओवरला कॉमेंटेटर्स दंगा करत होते की एकद नवीन बॉल मिळाल्यावर (८० व्या ओवरनंतर) काही तरी चमत्कार घडणार वगैरे वगैरे Happy

सध्या खेळत असलेल्यांत सर्वाधिक कसोटी बळी हरभजनच्या नावावर-३९३(एकंदरित बारवा)..त्याच्या मागोमाग व्हेटोरी ३३९ आणि ब्रेट ली ३१०, झहीर २७१.

<त्यांनी कुठं तसं केलं ? मॅच संपली तेव्हा आपले तीनच आउट झाले होते. मग त्यांचे तीन आउट असताना त्यांचा काय स्कोर होता ते पहायचं ना..>
थोडक्यात् डकवर्थ लुईस सारखा एखादा नियम करायचा. अर्थात् अमेरिकेत म्हणतात तसे त्याचे 'कॅलक्युलस' बदलावे लागेल. (अमेरिकेत अर्थ माहित असण्यापेक्षा बोलायला मजा वाटते म्हणून शब्द वापरतात.)
बॉक्सिंगमधे टीकेओ असते, सारेगमप मधे निरनिराळ्या गोष्टींवर अवलंबून दहापैकी ७, ८, असे मार्क देतात. तसे क्रिकेट खेळात ज्या काहि गोष्टींना महत्व आहे त्यावर मार्क ठरवावेत. क्षेत्ररक्षणात चुका म्हंटल्यावर नक्कीच मार्क कापावे लागणार!

सचिन आणि मुरली यांचे विक्रम मोडले जातील का ?

( भविष्यात चमत्कार होऊन कसोटी क्रिकेट लोकप्रिय होईल असं वाटत नाही . सध्याचे खेळाडू अपवाद वगळता मॅरेथॉन कारकीर्द घडवू शकत नाहीत. या परिस्थितीत अशक्यच असा माझा अंदाज..)

सचिन आणि मुरली यांचे विक्रम मोडले जातील का ? >>> हो. कसोटी क्रिकेट लोकप्रियतेच्या शिखरावर परत येत आहे. भविष्यातही ते खेळले जाईल. वनडे सुरू झाल्यावरही (अनेक वर्षांपूर्वी) हाच वाद होता.

हॅरिस (२३-१४-२२-०) आज बापू नाडकर्णीचं कानपूरमधलं रेकॉर्ड (Kanpur 32-24-23-1) मोडणार बहुतेक.

>>>>

बापू नाडकर्णी यांनी ती निर्धाव षटके सलग टाकली होती हाही त्यातला फरक आहे....

पुन्हा कळवळून सांगितल्याशिवाय रहावत नाही -<<आणि हो, कृपया बापू नाडकर्णी व हॅरिसची तुलना नका करू; बापू पर्फेक्ट गुड लेंग्थवर, पेर्फेक्ट फ्लाईट देवून अचूक व सतत चेंडू टाकून फलंदाजाना हतबल करत असे.वाईड टाकून नव्हे !!>>

न्यूझीलँडची घसरण अजूनही थांबलेली नाही. चक्क तळाला असलेल्या पाकिस्तानने त्यांना त्यांच्याच भूमीवर केवळ तिसर्‍या दिवशी १० गडी राखून हरविले. बांगलादेश आणि भारतापाठोपाठ आता पाकिस्तानकडून त्यांना नामुष्की पत्करावी लागली आहे.

कालच्या २०-२०च्या सामन्यात रोहित शर्माने ते निरुपा रॉय एक्स्प्रेशन सोडलेले बघून बरे वाटले.(निरुपा रॉय एक्स्प्रेशन काय ते विक्रम साठेला विचारा)...राहुल द्रविडचा वारसदार व्हायचं म्हणुन काय सगळंच त्याच्यासारखं करायला नको!

साहेबही गेले .. आता ग्रंथ आटोपल्यात जमा आहे. बाकीचे जमालगोटा घेतल्यासारखे पव्हेलिअनकडे पळत सुटतील नाहीतर कुंथतील तरी Sad

आता कळेलच. तसे हे कोहली, शर्मा, युवराज सिंग वगैरे जिगरबाज लोकं आहेत. त्यात आता हरभजन ही ब्याट्समन झाल्यामुळे जरा आशा आहे. Proud

साहेबही गेले .. आता ग्रंथ आटोपल्यात जमा आहे. बाकीचे जमालगोटा घेतल्यासारखे पव्हेलिअनकडे पळत सुटतील नाहीतर कुंथतील तरी >>>

चला म्हणजे अजुनही सचिन गेला की वनडे संपला हे समीकरण आहे तर.

यप्प फारेंडा. ह्या पठ्ठ्यांनी थोडे ऑफ च्या बाहेरचे बॉल सोडलेलेच बरे!!! फुल्ल इन्विटेसन आहे निक करायचे! Happy
हुड Lol
केदार, हे फकस्त खलबल ठुबे साहेंबांचेच समीकरण आहे असं म्हणण्यास हरकत नाही. Proud

गयो!!! युवराज भी गयो!!!
आता पुढच्या मॅच बद्दल बोलायला हरकत नाही.

एकदा फिंगर दाखवल्यावर शर्मा साहेब काय अंपायरच्या निर्णय बदलण्याची वाट बघत होते की काय?
तो मुरली विजय एक अजून चमण! आऊट झाल्यावर शॉट ची अ‍ॅक्शन करत होता. तो घाबरला नाही हे दाखवून तो पुढच्या मॅच करता आताच प्रेशर टाकत होता बहुतेक.

पहिल्याच सामन्यात आपला बोर्‍या वाजला. रोहीत शर्मा व मुरली विजयचा रविंद्र जडेजा झालेला आहे. अजून किती वेळा त्यांना संधी द्यायची?

धोनी पण गेला... आता विराट कोहली आणि रैना दोघेही शतक कर्णार अन म्याच जिंकणार.. (आमचा B + मोड ऑन... दिवास्वप्न पहायला काय जातंय .. एखाद्या म्याच मध्ये चुकून असं झालंच तर मात्र मजा येते .. Proud Proud Proud )

अरे त्या दिवशी पठाण नी कसली ओढली होती मॅच. ही जोडी गेली की काही खरं नाही. आता बराच काळ टिकले तरी शेवटी अ‍ॅक्सलरेट करता यायला हवं. आपण तर आशावादी आहे बॉ!

Pages