इतिहासा (+पुराणा) ची ओळख

Submitted by माणूस on 16 November, 2009 - 14:08

ईतिहासा बद्दल प्रश्न मंजुशा

जुने लेखन ईथे वाचता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/34/40.html

कृपया प्रश्न लिहीताना तो बोल्ड करुन लिहीत जा, म्हणजे प्रश्न आणि उत्तरे शोधायला सोपे जाईल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रयोग, बरोबर. फक्त थोडी दुरुस्ती, मगधावर मिन्यांडराच्या आधी ग्रीक सेनापती डेमेट्रियस चालून गेला होता. तो मगधावर विजय मिळवणार इतक्यात कलिंग खारवेल आपले सैन्य घेउन त्यावर चालून गेला. त्याने ग्रीक्रांची दाणादाण उडवली. मगध विजया नंतर त्याने राजसुय यज्ञ केला. ह्या यज्ञाचे महत्व म्हणजे तो त्याआधीच्या ७५ वर्षात पूर्ण भारतवर्षात झालेला पहिला यज्ञ!!

परकिय आक्रमनाला ह्या खारवेलाने सर्मथपणे तोंड दिले. हे त्याचे कर्त्यव्य.

त्यानंतर आला तो तू लिहीतोस तो इतिहास.ह्या मिन्यांडर उर्फ मिलिंदने बुद्ध धर्म स्विकारायची घोषणा केली. मगधात आधी लिहील्याप्रमाने बौद्ध राज्यकर्ते होते, त्यांना वाटले की हिंदू राजे मगध पादाक्रांत करतील म्हणून त्यांनी ग्रीकांना तो परिकिय ग्रीक आहे हे विसरुन बोलावून आणले. देशी हिंदूंपेक्षा मगधात ग्रीक साम्राज्य उभे राहीले तर वैदिक धर्मियांना कायमचा धडा बसेल असे त्यांचे म्हणने!! ह्या मिन्याडंराच्या राजसभेत त्याने न जिंकलेले भारतीय बौद्ध राजे आपला वकिल धाडून त्यालाच सम्राट मानू लागले. हे युद्ध न होताच! अशी गम्मत.

तू लिहिलेला पुष्यमित्र मगधाच्या राज्यात केवळ सैनिक होता. पण स्वबळावर तो सेनापती झाला. ग्रीकांच्या आक्रमनावेळी पुष्यमित्राने बृहध्रथाचा वध केला. त्याला विरोध होउ शकला नाही, कारण सैन्य तेंव्हा परकिय आक्रमन थांबवन्यासाठी उत्सूक होते व पुष्यमित्र त्यांना त्यांचा नेता वाटत होता.
पंचनदात बौद्धधर्मियांनी चालविलेल्या अपप्रचाराचा परिपाक म्हणून हा वध झाला. शेवटचा बौद्ध सम्राट अश्या रितीने संपला. ग्रीकांना पुष्यमित्राने तलवारीच्या बळावर हाकलून दिले. तो सम्राट झाला. त्याने ग्रीकांचा इतका पाठलाग केला की ग्रीकांचे भारतावर राज्य करायचे स्वप्न, स्वप्नच राहीले, त्यांनतर कुण्याही ग्रीक सम्राटाने भारतावर स्वारी केली नाही.

ह्या युद्धाचा भारतवर्षावर फार वेगळा व मोठा परिणाम झालेला आहे. बौद्ध धर्माचा र्‍हास ह्याच युद्धामुळे सुरु झाला. स्वदेशद्रोह विरुद्ध देशप्रेम असे हे युद्ध होते.

सम्राट महापद्मनंदाचा खून जसा चद्रगुप्ताला करावा लागला तसाच पुष्यमित्राने बृहद्रथ मौर्याचा केला. हिस्ट्री रिपीटेड अगेन. Happy

ह्या सम्राट पुष्यमित्राचा मुलगा म्हणजे अग्निमित्र, तो बापासारखा पराक्रमी निघाला. विदर्भावर स्वारी करुन विदर्भ जिंकला पण वैदर्भिय राजकन्या मालविकेसोबत त्याचे पुढे लग्न झाले. कालिदासाने त्यावर "मालविकाग्निमित्रम" हे नाटक देखील लिहीले आहे.

(खरेतर माझा पुढचा प्रश्न पुष्यमित्र कोण होता हा होता? पण तू आधीच उत्तर दिलेस.)

The Hindus’ has been a life of a continuous defeat. It is a mode of survival of which every Hindu will feel ashamed -- डॉ बाबासाहेब आंबेडकर

हा आरोप खरा आहे का?

घोड्याचे नाव लक्षात नाही. पण तो पांढरा शुभ्र होता आणि जगप्रसिद्ध होता. विनिता आणि कद्रू मधे पैज लागली. विनिता म्हणाली की तो पांढरा आहे आणि कद्रू म्हणाली की तो काळा आहे (की त्याची शेपूट काळी आहे). त्या दोघी तो घोडा बघायला जाण्यापूर्वी कद्रूने आपल्या पुत्रांना म्हणजे सापांना त्या घोड्यावर जायला सांगितले म्हणजे तो काळा दिसेल. त्याप्रमाणे झाले आणि जेव्हा त्या दोघी तेथे गेल्या तेव्हा तो घोडा काळा दिसला. विनिता पैज हरली आणि १००० वर्षे कद्रूची दासी बनून राहिली.
विनितेला २ अंडी झाली. कद्रूचि १००० मुले फटाफट अंड्यांतून बाहेर आली पण आपली कशी नाही आली म्हणून तिने उतावीळपणे ५०० वर्षांनी एक अंडे फोडले. त्यातून अरुण बाहेर आला. पूर्ण वाढ न झाल्याने तो पांगळा झाला आणि सूर्याच्या रथाचा सारथी बनला. १००० वर्षे झाल्यावर दुसर्या अंड्यातून गरुडाचा जन्म झाला. त्याने विनितेला दास्यत्वातून सोडवले. त्यासाठी त्याने सापांना अमृतकुंभ आणून दिला. असो, ती वेगळी गोष्ट आहे.

केदारः हा आरोप सपशेल चुकीचा आहे. तुम्ही सावरकरांचे सहा सोनेरी पाने नावाचे पुस्तक वाचा म्हणजे लक्षात येईल की हिंदूधर्माचा इतिहास हा दैदिप्यमान आहे. अतिशय पराक्रम करून संपन्नता आली आणि त्यातून गाफिलपणा आला. अतिथी देवो भव म्हणत शत्रूंना सुद्धा आपण या या म्हंटले ज्यांनी आपल्या देशाला अक्षरशः हजारो वर्षे लुटले. इतकी वर्षे गुलामगिरीत काढल्यावर हिंदूंचा स्वाभिमान हरवला आहे. आपसातली भांडणे आणि इतर धर्मांची शिस्तबद्ध हिंदू बदनामी, अहिंसावादाची भलामण वगैरे गोष्टींची त्यात भर आहे.
आपल्या राजांनी मोठी साम्राज्ये उभी केली होती आणि हिंदू धर्म सध्याच्या दक्षिण पूर्व आशिया, इंडोनेशिया, पाक, अफगाण वगैरे मधे नांदत होता. अजुनही बाली बेटावर हिंदू धर्म आहे. ह्या सर्व भागात पुष्कळ हिंदू मंदिरे आहेत.
आपण आपल्या धर्मावरचे सर्व आघात सहन करतो. जो प्रतिकार करतो त्याला आपलेच लोक अतिरेकी म्हणतात. आपल्या मनात धर्माचा आणि देशाचा अभिमान निर्माण होणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी खरा इतिहास शिकवला जाणे गरजेचे आहे.

गोत्र = गो + अत्र.

गोत्राची फोड काही पटली नाही... कारण अशी फोड असेल तर मग ते गोत्र नाही ग्वात्र होईल...

उच्चैश्रवा घोडा विष्णूच्या दुसर्‍या अवतारात म्हणजे समुद्र मंथनातून आला...म्हणजे त्याआधी हा घोडा नसणार.. ( किंवा असेल, आणि समुद्रात बुडवला होता आणि परत त्याला वर काढला, असे असेल तर मला माहीत नाही.. ) ... गरुड विष्णूचे वाहन झाला, देव दानव वैर... या घटना या पूर्वीच्या असाव्यात असा माझा अंदाज.. म्हणून मला वाटले, तो घोडा वेगळा असावा....

मगध सम्राट बृहद्रथ हा केवळ बौद्ध होता म्हणून पुष्यमित्र त्याच्याविरूद्ध असे नाही >>> अगदी अगदी. हेच मी पण लिहीले आहे की हा लढा स्वदेशद्रोह विरुद्ध देशभक्त होता. इथे धर्माचे नाव मी फक्त रेफ म्हणून दिले आहे. वाद म्हणून नाही. कारण त्या युद्धामुळे परत एकदा जनता वैदिक धर्माकडे वळली. ह्या घटनांकडे आता इतिहास अभ्यासक एका वेगळ्या दॄष्टीने पाहतात.

मात्र पुष्यमित्र सम्राट झाला होता व त्याचामुळेच त्याने अश्वमेध केला होता. पुष्यमित्राने जेंव्हा यज्ञ केला तेंव्हा एका यवनाने तो घोडा अडवला, त्याला हरविन्यासाठी पुष्यमित्राने त्याचा नातू वसुमित्राला पाठवले. वसुमित्र हा एक पराक्रमी व प्रतिभाशाली राजा झाला.

चांगल्या चर्चेबद्दल धन्यवाद.

अहो काश्यपगोत्रोत्पन्न, शास्त्रात तसाच सन्धि सान्गितला आहे.
माहिति उत्तम सान्गितलि आहे. केदार, धर्माचे नाव रेफपुर्ते घेवुन सत्य मान्डलेत हे बरे केलेत. आजकाल या निधर्मि, बुप्रावादि, पुरोगाम्यान्मुळे धर्माचि जागा रेफपुर्तीच राहिलि आहे. तुम्हि या बाफच्या आडुन शरसन्धान करताय ते पाहुन ग्रीकान्नी घोड्याच्या पोटातुन सैन्य धाडले होते ते आठवले आणि शत्रुकडुनहि शिकणारे आम्हि हिन्दु किति थोर हे जाणवुन छाति भरुन आलि. तुम्हि लढा, मि आहे. ही माय्बोलि आबाफबाफ भगव्या रन्गात रन्गवुन टाकु. काय समज्लेत ?

मन्दार पर्वतावर हे देव बसले असता त्यान्च्या बायकोने मागुन येवुन त्यान्चे डोळे झाकले. प्रभुन्चे डोळे झाकल्यामुळे सारे विश्व अन्धकारात बुडाले. हाताला नेत्रान्च्या तेजामुळे घाम येउ लागला. त्याचे दोन-चार थेम्बुटे जमिनिवर पडले आणि त्यातुन माझा जन्म झाला. मी जन्मतःच अन्ध होतो. येका खुप प्रसिद्ध असुराच्या भावाने पुत्रप्राप्तिसाठि तप केले असता प्रभुन्नि मला त्या असुरास देवुन टाकले. मि ब्रह्मदेवाचि तपश्चर्या केलि आनि मला द्रुश्टि प्राप्त झालि व मि सामर्थ्यशालि झालो. त्याचवेळि मि ब्रह्मदेवाकडे वर मागितला कि कुठल्याहि स्त्रिकडे मि माता समजुन बघावे, जर मि दुसर्या कुठल्याहि नजरेने पाहिले तर माझा नाश व्हावा. मला द्रुश्टि आणि शक्ति येताच मि गर्वोन्नत झालो आनि ऋशिमुनिन्ना त्रास देवु लागलो, माझा भुतकाळ विसरुन गेलो. एकदा मि साक्षात देवि पार्वतिचिच अभिलाशा धरलि आणि महादेवाशि युध्द केले. त्यात प्रभुन्नि माझ्या ह्रुदयात त्रिशुळ खुपसुन मला सुर्यापाशी धरले. सुर्याच्या उश्णतेने माझे शरिर वाळुन कोळ झाले. मग प्रभुन्नि माझेवर त्यान्चि क्रुपाद्रुश्टि टाकलि आनि माझे ह्रुदयपरिवर्तन झाले. माझा गतकाळ मला आठवला आणि मि प्रभुचरणान्पाशि लिन झालो. क्यारेक्टर्स ओळखा Proud

खारवेलाने नंतरच्या आयुष्यात एक मोठे काम केले म्हणजे जैन संन्याश्यांचे एक शिबीर भरवले. त्या शिबीराला २५०० पेक्षा जास्त जैन सन्यासी जमले व त्यांनी जैन धर्माच्या पुस्तकांना परत एकदा लिहून काढले. आधिच्य घडामोडीत ह्या धर्माची अनेक पुस्तकं / ज्ञान नाहीसे झाले होते, ते ह्या निमीत्ताने परत एकदा निर्माण केले गेल.

खारवेलाचे पुढे काय झाले हे मलाही माहीत नाही. पण एकंदरीतच हा राजा महान होता हे नक्की. येत्या भारतभेटीत भांडारकरला भेट द्यायची इच्छा आहे, त्यात काही मिळाले तर नक्की लिहीतो.

तुम्हि या बाफच्या आडुन शरसन्धान करताय ते >>> सत्य आहे ते नाकारन्यात काय हशील?

इतर बाफ वर नाहीका कसा गोंधळ घातला जातो. ते पण रेफ न देता. आता रेफ देउन सत्य मांडत आहे तर उपरोधात म्हणता "भगव्या रन्गात रन्गवुन टाकु. काय समज्लेत ? "

म्हणजे इतरांनी काही चुकीचे, खरे रेफ न देता लिहीले ते चालते पण इथे मी झालेला खरा इतिहास मांडतोय तो झोंबतोय.

इतिहास लिहीताना मी जात पात धर्म बघत नाही, पेशव्यांविरुद्ध व मराठा योद्धांबद्दलही लिहीले आहे इथे बरेचदा. ते तुम्ही दृष्टीआड केले, पण चालायचेच, तुम्ही अपेक्षाभंग नाही केला.

बरं मग वरचा बाबासाहेबांचा आरोप किती खरा किती खोटा तो मांडाना? संधी इक्वल आहे. शिवाय तो आरोप खोटा आहे हे माझे म्हणने. मग तो खरा कसा हे नविन इतिहासाची दखल घेउन मांडा, आम्ही पुर्वग्रह सोडून ते मान्य करु याची खात्री बाळगा.

बरं ते जाउ द्या. मी तुम्हाला फुलटॉस देतो. आपण पेशव्यांचे सत्ताकारण कसे चुकले ते लिहू. मला त्यांचाविरुद्ध लिहायला काही त्रास नाही. होउन जाऊदेत. Happy

मिसुध्दा आपल्या श्रेश्ठ धर्माचाच पाइक हे. मला तुमचे सर्व म्हणणे पटले म्हणुन तर तुमचे कौतुक केले. मि तर सत्य कधिच नाकारत नाहि, उलट जिथे सन्धि मिळेल तिथे तुम्हि हे सत्य मान्डता त्याबद्दल तुमच्या धर्याचे कौतुकच करावेसे वाटते, अन्यथा तुम्हि मान्डलेला "खरा" इतिहास आता कुठे शिकायला मिळतो ? उलटे तुम्हि सत्यकथन केले तर ज्यान्ना "झोम्बते" तेच तर झुन्डशाहि करुन, वर त्यावर स्वताहाच "आतापर्यन्त" सत्य दडपले गेल्याचि मखलाशि करुन शाळान्मधे शिकवला जाणारा इतिहास बदलायला भाग पाडत हेत आणि यापुढिल पिढ्यान्ना दर पिढिमागे बदलणारा इतिहास शिकायला मिळेल. आधि या शिर्शकात केवळ इतिहास हा श्ब्द असताना मि सान्गितलेल्या "गोश्टिनन्तर" मात्र अचानक कन्सात पुराणे असा उल्लेख झाला म्हणजे ह्या गोश्टि ऐतिहासिक नसुन पुराणातिल वान्गि हेत असे सुचवल्या गेल्यामुळे माझाच अपेक्षाभन्ग झाला हे.
तर प्राप्त परिस्थितिला तोन्ड देण्यासाठि आमचे म्हणणे तर असे कि असा "खरा इतिहास" मान्डण्यासाठि हा असा गनिमि कावा करण्याचिच गरज हे, म्हणजे आग लागलि होति "तिकडे" रामेश्वरि आणि आपण कालान्तराने बम्ब धाडायचा "इकडे" सोमेश्वराला अशा पध्दतिनेच "खरा" इतिहास समोर येणे आवश्यक हे किन्वा हिच पध्दत वापरणे हा एकमेव उपाय हे. आता "काहिजणान्ना" हि म्हणसुध्दा आवडणार नाहि व ते आग बोधगयेला लागलि आणी बम्ब सारनाथला धाडला अशि म्हण करा असा आग्रह धरायलाहि कमि करणार नाहित आनि असा आग्रह झालाच तर आपले निधर्मि पुरोगामि बुप्रावादि सरकार त्यान्च्या इच्छे/आज्ञेपुढे मान तुकवणारच नाहि याचि काय शाश्वति ? "त्यान्चि" झुन्डशाहि चालते/खपवुन घेतलि जाते, तिथे आपण आपला *जातिवाचक शब्द* कावेबाजपणा दाखवुन "त्यान्ना" जशास तसे उत्तर देउन सत्य मान्डत राहावे हेच योग्य हे. आपण हिन्दुन्चि सहिष्णुता नेभळटपणाकडे झुकत चाल्लिये असे माझे ठाम व स्स्पश्ट मत हे. ते असो.
मि सान्गितलेल्या गोश्टितलि क्यारेक्टरे ओळखलित का ? तुम्हि पेशव्यान्च्या सत्ताकारणातिल नक्कि कोणाबद्दल विचारता हात ?

त्या घोड्याचे नाव उच्चैश्रवा हे बरोबर आहे. मी आत्ताच पुस्तकात बघितले.
ही गोष्ट समुद्रमंथनानंतरची आहे.
संदर्भः संपूर्ण महाभारत, वरदा प्रकाशन, खंड १. संपादक: प्रा. भालबा केळकर

थायलंडमधे बँकॉकच्या नवीन विमानतळावर समुद्रमंथनाची सुंदर प्रति़कृती बनवलेली आहे.

वरील सर्व ऐतिहासिक माहीति देताना कृपया संदर्भ सुद्धा द्या. म्हणजे पुस्तकाचे नाव, लेखक आणि प्रकाशन.

प्रश्नः समुद्र मंथनातून कीति आणि कोणत्या गोष्टी बाहेर आल्या? समुद्र मंथन कोणी केले आणि त्यासाठी काय साहित्य वापरले?

समुद्र मंथनातून कीति आणि कोणत्या गोष्टी बाहेर आल्या?
>>
देव व दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन केले. या मंथनातून चौदा रत्ने तयार झाली. ती पुढीलप्रमाणे:

सुरा
अप्सरा
कौस्तुभ
उच्चै:श्रवा
कल्पवृक्ष
कामधेनू
ऐरावत
लक्ष्मी
पारिजात
हलाहल
चंद्र
धन्वंतरी
अमृत

माझ्या माहितीनुसार चौदावं रत्न शार्ङधनू (हा शब्द कसा लिहायचा?).
तसंच कल्पवृक्ष नाही यात. पारिजातक आहे. पाञ्चजन्य हा शंख हे आणखी एक रत्न.

लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश्चंद्रमा
गावःकामदुधा सुरेश्वरगजो रंभादि देवांगना
अश्व:सप्तमुखो विषं हरिधनुं शंखोमृतं चांबुदे
रत्नानि इह चतुर्दशं कथितयेत् कुर्यात् सदा मंगलम् ||

असा काहीतरी श्लोक लहानपणी पाठ केल्याचं आठवतं.

समुद्रमंथन देव आणि दानवांनी केलं. मंदार पर्वताची रवी केली आणि वासुकीची दोरी. विष्णूच्या कूर्मावताराने मंदारपर्वताला आधार दिला होता. मंथनातून निर्माण झालेलं विष (हलाहल) शंकराने प्राशन केलं आणि अमृतासाठी देव आणि दानवांमधे उद्भवलेला प्रसंग विष्णूने मोहिनीची रूप घेऊन सोडवला.

मराठी विकी नुसार

हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी एका नंतर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्नसमान वस्तू मिळाल्या.

त्यांचे वर्णन असे केले जाते -

लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश्चंद्रमा।
गावःकामदुधा सुरेश्वरगजौ रंभादि देवांगना।
अश्वःसप्तमुखौ विषं हरिधनुः शंखोमृतम् चांबुधे।।

१. लक्ष्मी - धनभांडार.
२. कौस्तुभ - कौस्तुभ मणी. वदंतेनुसार हाच कोहिनूर होय.
३. पारिजातक - प्राजक्ताचे झाड.
४. सुरा - दारू, मद्य.
५. धन्वंतरी - वैद्योत्तम.
६. चंद्र - चंद्र.
७. कामधेनू - इच्छापूर्ती करणारी गाय.
८. ऐरावत - इंद्राचे वाहन असलेला हत्ती.
९. अप्सरा - रंभा, मेनका, इत्यादी अप्सरागण.
१०. उच्चैःश्रवा - सात तोंडे असलेला घोडा.
११. विष - कालकूट विष.
१२. शांगी धनुष्य - विष्णुचे धनुष्य.
१३. शंख - पांचजन्य शंख.
१४. अमृत - अमृत.

ईंग्रजी भाषेत जास्त माहीती आहे http://en.wikipedia.org/wiki/Samudra_manthan
कोणीतरी, please भाषांतर करुन मराठी विकी उपडेट करा.

बदल करण्यासाठी ईथे टिचकी मारा

विष्णूचे (कृष्णाचे) धनुष्य = शारङग. म्हणून त्याचे नाव शारङगपाणि किंवा शारङगधर.
ह्या धनुष्याचा उल्लेख महाभारतात आहे.

समुद्र मंथनातून १४ गोष्टी बाहेर आल्या असे वाचले आहे. आणि १४वी वस्तू = चाबूक असावा, त्यावरून "चौदावे रत्न दाखवणे" असा वाक्प्रचार तयार झाला असावा.

१. हलाहल = कालकूट विष (शंकराने प्राशन केले व नीळकंठ नाव मिळाले, विषाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि ते सर्प, विंचू ईत्यादी प्राण्यांनी भक्षण केले आणि ते विषारी बनले.)
२. कामधेनू (= सुरभि असेही नाव आहे बहुतेक. ही नंतर वसिष्ट ऋषींकडे होती असा उल्लेख आहे.)
३. उच्चैश्रवा घोडा
४. ऐरावत हत्ती (इंद्र)
५. कौस्तुभ मणी (विष्णू)
६. अप्सरा गण
७. लक्ष्मी (विष्णू)
८. वारुणी (सुरा = मद्य निर्माण करणारी देवी)
९. धन्वंतरी
१०. अमृत (असुरांनी बळकावला जो विष्णूंनी मोहिनीरुपाने परत आणला.)
११. सोम (चंद्र)
१२. कल्पवृक्ष
१३. पारिजातक
१४. चाबूक (?)

ही यादी आणि त्यांचा क्रम वेगवेगळ्या पुराणांत, महाभारत व रामायणात, भागवतात वेगवेगळी आहे. आणि बर्‍याच ठिकाणी सर्व १४ गोष्टी दिलेल्या नाहीत. शंख, धनुष्य, चाबूक ह्यांतील कुठलीतरी एक गोष्ट असणार.

अमृताने देवांना अमरत्व प्राप्त झाले काय? कारण जर का ते अमर झाले होते, तर त्यांना असुरांचे काहीच भय असायचे कारण नव्हते. पण पुढे दैत्यगुरू शुक्राचार्य व त्यांच्या संजीवनी विद्येच्या उपयोगाने मेलेले राक्षस पुन्हा जिवंत व्हायला लागले आणि देवांकडे ही विद्या नसल्याने युद्धात मेल्याने (?) देव कमी व्हायला लागले असा उल्लेख आहे. म्हणून देवांनी कचाला ही विद्या शिकण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठविले.

ह्या वरून असे वाटते की अमृतामुळे नैसर्गिक मृत्यू येत नसावा पण मारल्यावर (युद्धात) मात्र मृत्यू येत असावा. मंथनाच्या वेळी अनेक प्रकारची द्रव्ये एकत्र घुसळली जाऊन अमृत तयार झाले म्हणजे ते एक प्रकारचे औषध असावे ज्यामुळे आजार येणार नाही, वय वाढणार नाही....

अरे, सर्व शांत शांत कसे काय?

नविन प्रश्न: अज्ञातवास संपल्यावर कौरवांनी पांडवांना पुन्हा द्यूतासाठी का नाही बोलावले? युद्ध करायची काय गरज होती? कारण युधिष्ठीराचा नेम होता की कोणीही कसल्याही प्रकारचे आव्हान दिले तर मागे फिरायचे नाही.

दुसरा प्रश्न : पांडवांच्या आधी द्यूत खेळल्यामुळे कोणत्या प्रसिद्ध राजाची वाताहत झाली? त्याने त्याचे राज्य गमावले, अरण्यात जावे लागले, पत्नीचा त्याग करावा लागला आणि बराच काळ वेषांतर करून दुसर्‍या राजाकडे नोकरीला रहावे लागले?

Pages