इतिहासा (+पुराणा) ची ओळख

Submitted by माणूस on 16 November, 2009 - 14:08

ईतिहासा बद्दल प्रश्न मंजुशा

जुने लेखन ईथे वाचता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/34/40.html

कृपया प्रश्न लिहीताना तो बोल्ड करुन लिहीत जा, म्हणजे प्रश्न आणि उत्तरे शोधायला सोपे जाईल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परीक्षित राजाचा मृत्यु सापाच्या दंशाने झाला होता म्हणुन त्याने (बदला म्हणुन) सर्व नागांचा बळी देण्यासाठी यज्ञ केला त्याचे नाव तक्षकयाग.

कंप्युटरची मदत न घेता अझीमुल्ला खान हा कोण होता हे सांगता येईल का. त्याच बरोबर त्याची थोडी माहीती.

कंप्युटरची मदत न घेता अझीमुल्ला खान हा कोण होता हे सांगता येईल का. >>>उत्तर ईथे टाईप करायला तर मदत घ्यावीच लागेल ना कंप्युटरची? Wink

Lol तेवढीच मदत घेउन ... तो नानासाहेबांचा दिवान होता.

बरं आता माझा प्रश्न कनिष्क कोण होता? त्याचे कार्य काय?

कुणी मला सांगू शकेल का?
रामायणातील सीतेच्या आईचे नाव काय होते?
म्हणजे जनक राजाच्या पत्नीचे नाव ?

<<रामायणातील सीतेच्या आईचे नाव काय होते?>>
माझ्या मते
सीता यज्ञातून निर्माण झाली आहे.
का ? कशी ? यावर जाणकारांना विचारावे लागेल.

सीता यज्ञातून निर्माण झाली आहे.
>> सीता नव्हे, द्रौपदी यज्ञातून निर्माण झाली होती. सीता ही भूमिकन्या (जमीन नांगरताना सापडली).
असो. जनकाच्या पत्नीचे नाव वाचल्याचे कुणाला आठवतंय का?

कनिष्क का कुशाण वंशाचा राजा होता..
हे लोक मूळचे चीनचे..
अशोकानंतर ३०० वर्शानी भारतात आला..
अशोक रावानी सगळीकडे अशोक स्तंभ, स्तूपे उभारलेली होती. ( यज्ञावर बंदी, वैदिकांवर पण बंदी घातलीली होती, त्याच्या काळात.)
अशोक स्तंभाना कवटाळून कुशाणाने बौध्ह धर्म स्वीकारला...
त्याने तलवारीच्या जोरावर बौद्ध धर्म वाढवला... म्हणजे तो अकबराचा बौद्ध अवतार म्हणायला हरकत नसावी..

तोवर बौद्ध धर्माला ६०० वर्शे झाली होती.... बौद्ध धर्म स्वीकारणारे हिन्दु आपल्या मूर्त्या, तत्वे घेऊन त्या धर्मात गेलेले होते... त्यात बरेच वाद होते.... हे वाद संपवायला म्हणून कुशाणरावानी धर्म परिषद मांडली... त्यात भंडणेच जास्त झाली... अखेर महायान म्हणजेच वज्रयान आणि हीनयान असे दोन पंथ आले..

वज्रयानी लोक वज्रपाणी देवाची पूजा करतात.... बौध्हानी अहिंसा सांगितली, पण वज्रयान्यांचा देव हातात वज्र घेऊन बसतो... हा वज्रपाणी म्हणजेच स्कंदमुनी... म्हणजेच कार्तिकस्वामी..म्हणजेच मुरुगन=कुमारस्वामी=सुब्रमन्यम्=सर्वनन्=गणपतीचा भाऊ. पुढे चिन्यानी त्याना बौद्ध धर्माबरोबर चीन मध्ये नेले... तिथेही लाफिंग बुद्धासारख्या दिसणार्‍या याच्या मूर्ती आहेत.

बौद्ध प्रसारासाठी सैन्य अतोनात राबवल्याने अखेर त्याच सैन्याने कुशाणाचा वध केला....
कुशाणाच्या नातूने अखेर वैदिक धर्म स्वीकारला..

जनकाचि बायको सुनेत्रा ?
माझि सख्खी मावशि हिच माझि सावत्र आई. त्या दोघिन्मध्ये फार खुन्नस. बाबान्नी त्यान्ना प्रत्येकि एक भेट मागायला सान्गितले. सा. आईने १००० मुले मागितलि जि एकसारखी तेजस्वी आणि शक्तिमान असतिल. आईने दोनच मुले मागितली जि हजारान्पेक्षा जास्त तेजस्वि आणि शक्तिमान असतिल. बाबान्नी सा आईला १००० आणि आईला २ अन्डी दिलि. ५०० वर्शान्नि १००० अन्ड्यान्मधून मुले बाहेर आली, पण दोन अन्ड्यान्मधुन काहिच नहि. तेव्हा आईने माझेवाले अन्डे फोडले. तोपर्यन्त मी फक्त डोक्यापासून कमरेपर्यन्तच तयार झालो होतो. तेव्हा मी चिडुन आईला शाप दिला कि तु तुझ्या बहिणिचि दासी होशिल आणी तुझा दुसरा सम्पुर्ण झालेला मुलगाच तुला त्यातुन सोडवेल. एवढे बोलुन मी निघुन गेलो आणि एका देवाकडे ड्रायव्हर म्हनुन कामाला लागलो.
पुढे माझ्या आई आणि सा आई यान्च्यामधे एका घोड्याच्या रन्गावरुन पैज लागलि. ही पैज आई हरल्यामुळे तिला सा आईची दासी व्हावे लागले. आई देवान्ना हरवुन अम्रुत आणत नाहि तोपर्यन्त ती दासी राहिल असे ठरले. अनेक वर्शान्न्नि शेवटि माझा भाऊ अन्ड्यातुन बाहेर आला. त्याने देवान्शि युद्ध केले आणि अम्रुत मिळवुन आणले. आईचि स्त्रिमुक्ति झालि. या सगळ्या प्रकरणामुळे माझा धाकटा भाऊ आणि आणि माझे १००० सावत्र भाऊ एकमेकान्चे जानी दुश्मन झाले आहेत. भाऊ एका देवाचा वाहन झालाय.
या गोश्टितली सगळिच्या सगळि क्यारेक्टर्स (घोडा आणि १००० सावत्र भाऊ धरुन) ओळखा Proud

बाबा- ऋषी कश्यप
आई- विनीता
सावत्र आई- कद्रू
मी- अरूण
देव- सूर्य
भाऊ- गरूड
देव- विष्णू
१००० सावत्र भाऊ- सर्प
घोडा- ??

योग्या,
कश्यप मुनीला १३ पत्नी होत्या... (दक्ष राजाच्या कन्या)
आणि त्यांच्यापासून चराचर सृष्टी, देव, दानव, अग्नी इत्यादी तयार झाले...

वा पळसुले, अगदि *जातिवाचक शब्द* शोभता हो ! घोडा म्हणजे उच्चैश्रवा. (कद्रुचि पोरे म्हणजे कोब्रा हे उत्तरही चालले असते हो Proud ) प्रयोग, तुम्ही *जातिवाचक शब्द* दिसत नाहि. सरा बाजुला. खाऊ मागतायेत !
आता हे खरेच असे घडले कि कसे याचे उत्तर बुप्रावादिच देऊ शकतिल. ३ब्या, तुला काय कळते त्यातले ? असो.

केस उपटत जंगलात कसे गेले नाहीत कुणास ठाउक?

Happy

अहो, ते जंगलात रहात असणारर...

आमचे गोत्र काश्यप....... म्हणजे हे आमचे खापर पणजोबा की काय?

मग ? मन्थनातुन बाहेर येणे येवढेच त्याचे काम होते कि काय ? काश्यपगोत्रोत्पन्न असुन असले अज्ञान. असल्या दिवट्यान्मुळेच सनातनधर्माला उतरती कळा लागलि.
गोत्र = गो + अत्र. म्हणजे तुम्च्या पुर्वजान्च्या गायी-गुरे ज्या ऋशीन्च्या आश्रमातील खिल्लाराबरोबर असायचि ते ऋशि. लगेच ते तुमचे पुर्वज होत नहित.

सीता हि रावणाची कन्या होती असे मी कुठेतरी वाचले होते. तिच्या जन्मानंतर तिच्यामुळे रावणाला म्रुत्यु(हे कसे लिहायचे?) येणार आहे अशी भविष्यवाणि झाल्याने तिला पेटीमधे घालुन जमिनीमधे ठेवले जाते.(इथे पुरले हा शब्द मला योग्य वाटला नाही.)
नंतर ही पेटी जनकाला सापडते. पुढचे रामायण तर सर्वाना ज्ञात आहेच.......
मी हे खुप वर्षांपुर्वी वाचले होते. आता फक्त इतकेच आठवते आहे. पुस्तकाचे नावही आठवत नाही. कोणाला याबद्दल माहिती आहे का?

Pages