पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

अरे चांगल्या लिहील्या आहेस..त्याबद्दल नाही काही. दोनमध्ये भागतं आहे,तर चांगले आहे. पण याला चारोळी नाही म्हणता येणार.चु.भु.द्या.घ्या.

आम्ही आजकाल
प्रार्थनाही करतो
नाहीच जमलं तर
आईला आठवतो ...!

******************************

आम्ही रोज त्याला पाहतो
त्याने म्हणे देव पाहीला ....
आम्ही माणुसपण सोडले
आणि तो म्हणे संत झाला ..!

*********************************

स्क्रीनकडे बघता बघता डोळे दुखू लागले
मानेचा काटा ढिला हात आखडू लागले
पाठीतुनी कळ धावे तरीही व्यसनी सारे
व्हिडियो गेमिंगचे बळी ठरू लागले.....

मिठु, प्रकाश
>>>मार्ग तुझा माझा वेगळा
बोलुन सखे निघून गेलिस
नकळत येउन बोचणारी
एक आठवण ठेउन गेलिस

आठवण तुझी आली
की मनं प्याला भरतं
शेवटी दोघं रितेच
हे त्याला देखिल कळतं

सोडून मला जातांना
तु वळुन का पाहिलं
खरं सांग माझ्याकडे
तुझं काय राहिलं

माघारी तू आलिस
की भेट माझी टाळतेस
न दिलेलं वचन
तू अजुनही पाळतेस <<<

असं टायपलं की चारोळी होइलच ना Happy

सुख आणि दुख हे रस्त्याचे दोन अलग अलग मार्ग आहेत,
एक सुखा कडे जातो तर दुसरा दु:खा कडे येतो,
पण कोणी कोणत्या मार्गाने जायचे हे दैवच ठरवते.

प्रीती आणि अहंकार
भिन्नलिंगी असतात
म्हणुनच त्यांची नाती
फ़ार लवकर जुळतात !

**********************************

कधी उन्मादाच्या भरात
तिला चंद्राची उपमा देतो
विसरतो नकळत, चंद्रही
स्वत:च शापित असतो !

***********************************

चकोरालाच विचार
वाट पाहणं काय असतं?
चंद्रदेखील सांगेल ...
हे त्यालाही जमलं नसतं !

************************************

काय लिहावे सुचतच नाही
हात मात्र लिहीतच आहेत
तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट
कुणालाही ती कळलीच नाही

फुलाचा गंध कुणासाठी
माहीतच नाही फुलाला
मधाच पोळ कुणासाठी
माहीतच नाही माशीला

तुझ्या माझ्या जन्माच कारण
माहीत नाही आईला
तुझ्या माझ्या जन्माच कारण
आता कळलय प्रेमाला

चार ओळींच्या कवितेत,
तुझ्याबद्दल लिहावं तरी कसं,
अप्सरेला धरतीवर बघतानां,
पापण्यांना मिटावं तरी कसं...

त्रिवेणी (तिनोळ्या Wink )

बस्स.., नको आता खुप कंटाळा आलाय..
कविता लिहायचा..., खर्डेघाशी करायचा...
एखादी कविता जगुन बघावी म्हणतो..., कस्से?

**********************************************************************

खुप लिहायचो..., खुप वाचायचो..., अगदी भरभरून..!
आजकाल सगळंच बंद, वेळच मिळत नाही बघ....
तुला वाचायला सुरूवात केल्यापासून...., खर्रच, तुझी शप्पत !

***********************************************************************

तू सुर छेडले की माझी बोटे सळसळायला लागायची...
तुझ्या गळ्यातले अमृत..., नसानसात चैतन्य फुलायचे ...
तू गात राहा... माझ्या मात्र सतारीची तार निखळलीय.....!

*************************************************************************

खुप लिहायचो..., खुप वाचायचो..., अगदी भरभरून..!
आजकाल सगळंच बंद, वेळच मिळत नाही बघ....
तुला वाचायला सुरूवात केल्यापासून...., खर्रच, तुझी शप्पत !

हे सही अन खरं आहे विशाल Wink

प्रेमात 'पडलं' तरी
स्वतःला सावरता आलं पाहिजे
किती ही बेलगाम झालं तरी
मनाला आवरता आलं पाहिजे

हल्ली का कुणास ठाऊक
पण मी वेड्या सारखी वागते
आकाशातल्या चांदण्या निरखत
उगीचच रात्रभर जागते

आता सवयीचं झालंय मला
मी निघताना तुझं माझ्या डोळ्यात पाहणं
आणि त्या नजरेनं जखडून
माझं सवयीनं काही क्षण रेंगाळणं

तू असाच समोर बसून रहा
मला तुला डोळे भरून पहायचंय
या अबोल, शांत क्षणाला
क्षणभर अनुभवून पहायचंय

तुझ्यावर किती ही राग आला तरी
मला रागावता येत नाही
तुझ्याच बाबतीत असं का होतं
मला सांगता येत नाही

पहिला पाऊस पडला तेव्हा
माझ्या डोळ्यांतही पाऊस होता
कुणालाच कळला नाही तो
इतका बाहेरच्या पावसाशी एकरूप होता

गार गार जलधारांत
चिंब भिजायचं होतं
पहिला पाऊस कसा असतो
ते तुझ्या मिठीतून पहायचं होतं

एक कळी मिटलेली
कायम मिटलेलीच राहिली
पूर्ण उमलण्या आधीच
कुणी तरी खुडून नेली

संध्याकाळ झाली म्हणून
तुळशी पुढे दिवा लावला
बाहेरचा अंधार निमाला
मनातला मात्र तसाच रहिला

मनातला अंधार
आच लागून तप्त झालेला
कुणी फ़ुंकर घालून काजळी दूर करेल
या वेड्या आशेने आसुसलेला

>>>निंबुडा, दुसर्‍याच्या चारोळ्या चोरुन इथे पोस्ट करु नका ! <<
कोण म्हणतंय दुसर्‍याच्या चारोळ्या आहेत म्हणून्.............माझ्याच आहेत त्या............ ज्या कुणाच्या आहेत असं तुम्हांला वाटतंय, त्या वक्तीचं नाव तरी सांगा............. म्हणे दुसर्‍याच्या Angry

Pages