Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली कोणी किंचितशी विरोधी सूर असणारी पोस्ट टाकली की अगदी सगळीकडे जो गोंधळ माजवला जात असे की त्यामुळे कोणी काही बोलूच धजावत नसे ते जरी बंद झालं तरी मोठी स्टेप असेल.>>>> अर्रे डायरेक्ट देशद्रोही उपाधी देतात की लोक, फेकू च्या विरोधात ब्र काढला तरी. वेगळं मत, वेगळं सोल्युशन म्हणजे देशद्रोह? वाआआह

दिल्लीतील आंदोलनात साहिल लोच या तरुणावर पोलिसांनी पेलेट गन चालवली . त्याच्या एका डोळ्याला इजा झाली आहे. राहुल गांधी आज त्याला घेऊन संसद मार्ग पोलिस कार्यालयात गेला. तिथे ठाण मांडून बसला. पोलिसांना एफ आय आर करायला लावला. पाच साडे सात तास लागले.

The Uttar Pradesh government issued a 14-point checklist and ordered an administrative overhaul for over 40,000 basic, secondary, and residential Sarvodaya schools.

14-Point Checklist: Sent to primary and secondary schools to mandate baseline improvements in cleanliness, drinking water, infrastructure, and monsoon safety
.Sarvodaya Schools Overhaul: Chief Minister Yogi Adityanath directed officials to speed up teacher recruitments and establish a dedicated management society for residential institutions.
Online Monitoring: District Magistrates (DMs) and nodal officers have been assigned to track school complaints digitally and ensure direct communication with students.
Entry Regulations: Several district education offices restricted unauthorized entry and video recording by outside vloggers or YouTubers inside school grounds to minimize classroom disruptions.

Delhi Police: We did not use
Pellet guns against anyone.

Rahul Gandhi: This is the report of AIIMS which says there are 200 pellets inside his body. 3 pellets in his eye, he has lost his eye. There are pellets near his heart which can not be touched or removed even by surgery. Who fired this pellet gun if you did not? May be he himself shot him with the pellet gun.
--
Not a Single Person Died’, ‘Delhi Police Should be Praised’: Rijiju Defends Action on Protesters

जंतरमंतरवर सध्या जनरल जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे.
https://generaljantaparty.org/
इथल्या वर्ड सॅलडचा अर्थ एकच - जात्याधारित आरक्षण बंद करा.
अनेक मायबोलीकरांना त्या पार्टीत आपलंसं वाटेल.

दिपके ने सगळ्यांच्या नाकात दम आणालाय
भाजप ला वाटलं असेल झालं आंदोलन संपले पण झुरळं गप्प बसत नाहीत

शाळा शाळेत जाऊन तो जे काही दाखवतोय ते बघून झोप उडालीय यांची
त्यामुळे हल्ला झाला, त्याला शाळेत जाण्यापासून रोखण्यात आलं

आता तर सोशल मीडियावर सगळे गोबरभक्त याला काय अधिकार शाळा तपासणी करण्याचा असे विचारत आहेत

कहर गुलामी भरलीये लोकांच्या डोक्यात

आता तर सोशल मीडियावर सगळे गोबरभक्त याला काय अधिकार शाळा तपासणी करण्याचा असे विचारत आहेत>>> प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जे आयकर भरतात त्यांचा तर आहेच आहे, कारण भारत सरकार आयकर विभागा मार्फत आयकरा व्यतिरिक्त ४% Health & Education cess आकारतो. यावर्षी निर्मला ताईंनी राज्यसभेत सांगितलेल्या आकड्यांप्रमाणे मागील ३ वर्षांत मिळून २ लाख करोड या cess च्या रुपाने सरकारकडे जमा झाले....पी एम केअर चा हिशेब नाही देत तसा आता हे पैसे कुठे वापरले गेले हे ही विचारायचे नाही का??

मला नेहा बोराचा हा स्टॅन्ड पुर्णपणे पटला आहे. मोदींना कितीही विरोध असला तरी "बाई म्हणून हिणवणे" हा मिसोजिनीस्ट प्रकार अजिबात चुक आहे. दुर्दैवाने हा मिसोजिनीस्ट प्रकार संघभाजपे विरोधकांसाठी सातत्याने करत आलेत.
https://www.facebook.com/reel/898240189655931/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v

नवा सेन्सेशनल आयटम मिळाला की सर जुना वार्‍यावर सोडून देतात.

तर ज्यांना सोशल मीडियावर हॅरॅस केलं गेलं अशा विशेषतः मुलींची राहुलने भेट घेतली. त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवलं.
पेलेट गनमध्ये जखमा झालेल्या मुलाला आधी मीडियासमोर आणलं आणि मग पोलिसांच्या डोक्यावर बसून एफ आय आर नोंदवला.
मग दिपके साहेबांना पण या मुलाची आठवण आली आणि त्यांनी फोन करून त्याची चौकशी केली आणि मदतीचं आश्वासन दिलं.
ज्यांच्या उपोषणामुळे तरुणाई या आंदोलनात सामील झाली त्या सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारपेक्षा राहुलवर टीका केली आणि उपोषण सोडल्यावर त्यांचा अण्णा हजारे झाला.
मग त्यांची पत्नी सनातन आणि काय काय प्रवचन देऊ लागली.

आता स्कूल ठीक करो हे आंदोलनही ऑर्गॅनिक आहे. जंतर मंतर वरचं आंदोलन सुरू असतानाच काही शाळांतल्या मुलांनी आपल्या समस्यांवर व्हिडियो बनवून सोशल मीडियावर टाकले. काहींनी मोर्चे काढले. धरणं धरलं. यात मूकबधीर मुलंही होती.

सीजेपीच्या टॉप लीडर्सचा आराम संपल्यावर मग त्यांनी हा मुद्दा उचलला. अर्थात कोणाच्या का होईना आरवण्याने सूर्य उगवल्याशी कारण.

हा मुद्दा इथे आलाय का कल्पना नाही. पण २० जुलैला मुलं मार खात असताना सीजेपी लीड र्सपैकी कोणीही त्यांच्यात नव्हतं. दोघे नड्डांच्या घरी होते आणि तिथे जॅमर असल्याने त्यांना सिग्नल नव्हता म्हणे. दिपके साहेब तेव्हा नेमके कुठे होते ?

ते भारतात आले तेव्हा त्यांना सगळीकडे पोलिस एक्सॉर्ट्स, आंदोलनाला परवानग्या मिळाल्या. सोनम वांग चुकना उपोषणाचा अनुभव आहे. त्यांना करू दे. आम्ही आमचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा बाकीची कामं बघू असे ते म्हणाले.

बिहारमधल्या आंदोलनाच्या नेत्यांना अटक झाली तेव्हा AISA ची नेहा तिथे गेली.

काल की परवा तिचा मुंबईत कार्यक्रम होता.

भरतना सीजेपीच्या एकुणच अस्तित्त्व आणि हेतुविषयी पहिल्यापासून शंका आहे. पण ते ''कुणाच्याही कोंबड्याने का होईना..'' असंही म्हणताहेत. त्यांची आतली मतं जाणून घेण्यासाठी पत्रकार परिषद घेऊया.

'जी' लावणं हे खरंच फार वाईट आहे. आपला गायपट्टा होत चालला आहे नाही? Proud

. दिपके साहेब तेव्हा नेमके कुठे होते ?>>>

दिपके ला लाठीचार्ज सुरू असतानाच दिल्ली पोलिसांनी त्याला उचलले अशी बातमी होती पण दिल्ली पोलिसांनी स्वतः अधिकृतपणे स्पष्टीकरण दिले होते की, अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही, ते आंदोलनस्थळी स्टेजवरच उपस्थित आहेत.

चलो संसद अशी घोषणा दिलेली असताना त्यांनी त्या मार्चचं नेतृत्व करायला हवं होतं.

आणखी दोन गोष्टी
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यावर आंदोलन संपलं. जंतर मंतर रिकामं झालं. या आंदोलनासाठी अनेक राज्यांतून विशेषतः ग्रामीण भागातून गरीब तरुण आणि अगदी मुलं सु द्धा आली होती. त्यांच्याकडे काही फार पैसे नव्हते. त्यांना परत त्यांच्या गावी पाठवायची आणि ती होईतो राहायची व्यवस्था NSUI ने केली. अभिजीत दिपक सरांची मुलाखत ज्याने घेतली आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात काहीतरी ठोस कृती करा असं ज्याने सुचवलं त्या मेघनादनेच हे सांगितलं. मुलांना मदत करणार्‍यांत त्यानेही पुढाकार घेतला.

मुंबईतल्या आंदोलनांत ज्यांच्यावर पोलिस केसेस झाल्या , त्यांना कायदेशीर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने उपलब्ध केली.

आता सीजेपी ही काही संघटना नव्हती. आंदोलक त्यांच्यापेक्षा वांगचुक आणि त्यांना उचलून नेल्यामुळे तिथे मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने आले.
हे १९४२ च्या चलेजाव आंदोलनासारखंच पसरलं. कोणीही नेता नाही. लोकच नेते बनले. इंटरनेटमुळे त्याला काही दिशा देणं सोपं गेलं. पण सरकार आंदोलकांच्या मागे लागल्यावर त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं होतं. दिपके सरांवर आपचा वरदहस्त उघड होता. पण आपवाल्यांनी काही मदत केली का? की काँग्रेसवर दुगाण्या झाडत होते?

अपोलिटिकल लोकांनी आंदोलन केलं , की आपण राजकारणापासून दूर राहावं, सगळे पक्ष सारखेच असं म्हणणारे - स्वतःला अपोलिटिकल म्हणवणारे लोक त्यात सामील होतात.

यातले दिपके सर अपोलिटिकल नव्हते. त्यांचा आपशी संबंध मला नंतर कळला. पण मी त्यांनी ट्विटरवर सीजेपीची स्थापना व्हायच्या आधीपासून फॉलो करत होतो. सौरभ दासलासुद्धा आधीपासून फॉलो करतोय. त्यालाच सरन्यायाधीश झुरळ म्हणाले होते.

इंडिया अगेन्स्ट करप्शन मागे अजित दोभाल होते. इथे त्यांनी धुरंधर म्हणावं असं खरं काम केलं. त्यातून केजरीवालला महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या आणि आपची स्थापना झाली.

इथेही तेच प्रकार दिसत होते. नीट, सीबीएसई वरून तरुणांमध्ये असंतोष होता. ते प्रेशर रिलीज करायला दिपकेसर आले , असं माझ्यासकट अनेकांना वाटतं. यात काँग्रेस समर्थक नसलेलेही लोक आहेत. राजू परुळेकर हे एक ठळक नाव.

असो.

Pages