मणिपूर : केंद्र सरकारने उचलले कडक पाऊल. धन्यवाद मोदीजी.

Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

sls.jpg

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.

१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्‍या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.

यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:

जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.

चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.

***

सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन

तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉट्स अ‍ॅप द्वारे पसरवले जाणारे मेसेजेस पडताळून पाहण्याची, शहानिशा करण्याची कोणतीच सोय सामान्य माणसाकडे नसते. सोशल मीडीयात लोक जितके चिरफाड करतात, तितके सोसायटीच्या, नातेवाईकांच्या ग्रुपवर चिरफाड करत नाहीत. संबंध जपणे आणि जाऊ द्या कशाला वादात पडा हा दृष्टीकोण, यामुळे खोटे मेसेजेस पसरायला मदत होते. कुणीच विरोध करत नाहीत म्हणजे मेसेज खरा असेल असेही वाटू शकते.

याउलट यांच्या मान्यतांच्या विरोधातला व्हॉटस अ‍ॅप मेसेज जर फॉर्वर्ड केला तर सोसायटीतली जी काही मोजकी टाळकी असतात ती टोळधाडीसारखी वाद घालतात. ही मंडळी कंपू बनवतात. विविध उपक्रमात अग्रेसर असतात. सण, उत्सव कमिटीत असतात.. सोसायटीच्या कामात पुढे असतात, त्यामुळे ग्रुपवर त्यांना बाकिचे पाठिंबा देतात. यामुळे जे खरे आहे ते बोलायची चोरी, पण खोट्याचा बोलबाला अशी अस्वस्था आहे.

हे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप नियंत्रित केले तरीही दंगली होण्यास आळा बसू शकतो.

तो एक भाग झाला what's up च
पण प्रतिष्ठित मीडिया हाऊसेस अशा घटनेचा वृत्तान्त देतात.

ते पण चूक .
हे सामान्य लोक पचवू शकत नाहीत.....

सत्य ह्या मध्येच कुठे तरी असते..
स्त्रिया ,स्त्री विषयी भारताच्या कायद्याचा फायदा घेवून सुरक्षा dalana कारवाई करण्यास अडचण निर्माण करतात.
हे सत्य असेल.
किंवा सर्व घटनेत हे सूत्र नसते हे सत्य असेल
पण हा प्रकार पूर्ण नाकारता येत नाही..किंवा १०० टक्के स्वीकारता पण येत नाही.
असे म्हणता येईल

(अल्पसंख्य) लोकांचा सुरक्षा दलावर विश्वास राहिला नाही हेही एक सत्य आहे. काश्मीरमध्ये एका माण साला जीपच्या बोनेटला बांधून फिरवलं. तसं हरयाणात कोण्या बाबाच्या अटकेवरून दंगे झाले तेव्हा करतात का? पेलेट गन्स फक्त काश्मीरातच का वापरतात? तिथल्या लोकांना आंधळं केलं तरी चालतं. याच अँगलने ईशान्येकडच्या राज्यांबद्दल विचार व्हावा.

ज्या कुकी स्त्रियांवर अत्याचार झाले त्या मैतेई बहुल भागातील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करायला जाऊ धजावल्या नाहीत. त्यांनी त्यांचे रिलीफ कँप आहेत तिथून जवळच्या ठाण्यांत झिरो एफ आय आर नोंदवले. त्या तीन स्त्रियांना पोलिसांनीच जमावाच्या हाती सोपवलं . त्यां चं पुढे काय झालं असेल हे माहीत असूनही पोलिस अडीच महिने शांत राहिले.

आता पालघरचं उदाहरण देईल. पालघरमधले ते दोन पोलिस सस्पेंड केले गेले. दुसर्‍या दिवशी मोठी कुमक आणून अनेकांना अटक केली गेली. कारण इथे काही कन्फ्लिक्ट नव्हता.

तेच गोरक्षकांनी मुस्लिम व्यक्तीचं मॉब लिं चिंग केलं तर पहिला गुन्हा मेलेल्या मुस्लिम व्यक्ती विरो धात नोंदला जा तो आणि दुसरा अज्ञात व्यक्तींविरोधात. घटनेचे व्हिडियो असले तरी अटक होत नाही.

देशी जेम्स बाँड अजित दोभाल दिसले नाहीत बर्‍याच दिवसांत..>>> lol.... अव्हेंजर्स ने जितके सुपरहिरो बनवले नाहीत तेवढे या नऊ वर्षांत भाजपाच्या प्रचारतंत्राने बनवले आणि अंधभक्तांना हातोहात विकले देखील... व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी की जय हो।।

संरक्षण मिळावे आणि एस आय टी चौकशी व्हावी यासाठी त्या व्हिडियोतल्या स्त्रिया सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत.

बांसुरी स्वराज म्हणजे सुषमा स्वराज यांची मुलगी का? ती सर्वोच्च न्यायालयात या केसमध्ये प बंगालचं नाव घेऊन व्हॉट अबाउट्री करते आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1685844881661673472

https://twitter.com/lkantbhardwaj/status/1686013680683450369?s=19
या अगोदर बंगाल मध्ये महिलांना पब्लिक ने मारहाणीची घटना घडली होती , आता काँग्रेस च्या राज्यात राजस्थान मध्ये !
पण दोन्ही ठिकाणी फक्त मारहाण झालेली आहे आणि तीही काँग्रेसच्या गटातील राज्यांत त्यामुळे जास्त महत्व देण्याची गरज नाही ....

व्हॉट अबाऊटरी नेहमीच चुकीची असते असे काही नाही.
एखाद्या ठिकाणच्या पीडीतांकडे दुर्लक्ष करून अन्य ठिकाणी जर कुणी राजकीय फायद्यासाठी गळे काढणार असेल, तर त्या पीडीतांशी समवेदक असलेल्यांनी जाब विचारणे याला व्हॉट अबाऊटरी म्हणता येत नाही.

पण अशी समवेदना नसलेल्यांनी किंवा आपल्याकडूनही मानवी हक्कांची पायमल्ली झालेली असताना केवळ तुमचा बाब्या तर आमचं कार्टं म्हणून व्हॉट अबाऊटरी होत असेल तर तो संवेदनशून्य वैताग ठरतो.

र.आ - १००% सहमत. व्हॉटअबाउटरी कोण करत आहे हे महत्त्वाचे आहे.

ज्यांनी अ‍ॅक्शन घ्यायला हवी त्यांचे समर्थक सगळी चर्चा डिफ्लेक्ट करायला हे करत असतील तर ती चुकीची आहे. पण जे मुळात अशा नेत्यांचे समर्थकच नाहीत त्यांनी अशा इतर घटनांच्या बाबतीत "बाकी पक्षही त्यांच्या राज्यात झालेले दलितांवरचे हल्ले दडपत आहेत त्याचे काय" विचारणे बरोबर आहे. सामना यांच्या वरच्या पोस्ट्स पाहता त्यांची व्हॉटअबाउटरी दुसर्‍या प्रकारची आहे.

"फॅसिस्ट जर्मनीविरूद्ध लढायला आमच्याकडून मदत मागणारे इंग्लंड जर आम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार नसेल तर त्यांना ती मदत मागायचा काय नैतिक अधिकार आहे" म्हणणारे गांधी सुद्धा व्हॉटअबाउटरीच करत होते. पण ती बरोबरच होती. ही सामना आणि गांधी यांची तुलना नाही :), पण मुद्द्यांत फार फरक नाही.

सामना यांच्या पोस्ट व्हॉटअबाउटरी पेक्षा 'तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म' अशा अहेत.

र. आ. आणि फा सहमति.
मुद्यांशी सहमत आणि लिखाणही संयमित म्हणून आवडले.

मणिपूर विषयावर पंतप्रधानांचे संसदेत निवेदन / वक्तव्य आले का?
मागच्या वर्षभरातील संसदेतली गैरहजेरी बरेच काही सांगून जाते.

मणिपूर विषयावर पंतप्रधानांचे संसदेत निवेदन / वक्तव्य आले का?>>>
संसदेत, मिडीयावर, सोशल मिडियातील प्रत्येक फोरमवर, इतकेच काय नाक्या नाक्यावर मोदींचे भक्त देशाला मोदींची मणिपूर विषयी काय भूमिका आहे हे स्पष्ट करुन झाले ( गेला बाजार अगदी माबो वरही कानी कपाळी ओरडून झालं) , स्वतः मोदींनी तब्बल ३६ सेकंद मणिपूर प्रकरणामुळे त्यांचा कसा तिळपापड होतो आहे हे सांगितले आणि तरीही तुम्हाला मोदी संसदेत निवेदन द्यायला हवेत हे मात्र अतीच होतय आता...

सर्वोच्च न्यायालयांत सुरु असलेली सुनावणी पूर्ण होईपर्यंत CBI ने मणिपूर पीडित महिलांचे जबाब नोंदवू नयेत असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

https://timesofindia.indiatimes.com/india/manipur-viral-video-case-supre...

NDA च्या २० पेक्षा जास्त खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहीले.... हे पत्र मणिपूर मधल्या दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर मानवतेला लाजवणारा अत्याचार करण्यबद्दल नाहीच्च आहे. या महिला खासदारांना मणिपूर मधल्या महिला अत्याचारांबद्दल अवाक्षरही काढावा असे वाटत नाही.

पत्र राहुल गांधी यांच्यावर कडक कारवाई करण्यासंबंधांत आहे कारण त्यांनी फ्लाईंग किस दिल्याचा " आरोप " आहे.

राहुल गांधीच्या पंजाब मध्ये मोहब्बत की दुकान ची शाखा नाही का ?
काल तेथे बापाने मुलीला गाडीला बांधून फरपटत नेल्यामुळे तिचा मृत्यू झाला !
काँग्रेस पक्षाचा अघोषित अध्यक्ष आणि INDIA पुरस्कृत भावी पंतप्रधान राहुल आहे , मग पंजाब मधील त्या घटनेची जबाबदारी त्याच्यावर टाकायला काय हरकत आहे ?

अडाणी,अशिक्षित व्यक्ती प्रमुख पदावर असला की देशाची वाट लागलीच म्हणून समजा.
साध इंग्लिश बोलता येत नाही भारताच्या प्रमुख ल.
मला तर वाटतं इंग्लिश समजत पण नसेल .
आणि हिंदि लिहिता पण येत नसेल.
इतके अज्ञान नक्की असेल

Father held for killing teen in Maharashtra's Nanded after wife files complaint ##फुगु, फ20 आणि मिंधेची जबाबदारी नाहीच ना? मोदी तर कसलीच घेत नाही, आपल्या बायकोचीपण नाही.

आज राहुलने पत्रकार परिषदेत हाच मुद्दा पुन्हा पुन्हा मांडला. मणिपूरमध्ये हिंसाचाराचा चौथा महिना सुरू आहे. मुलं, बायकांसकट लोक मारले जाताहेत , बायकांवर बलात्कार होताहेत आणि पंतप्रधान संसदेत हास्यविनोद करतोय, घोषणाबाजी करतोय.

त्याने हेही विचारले की गृहमंत्री म्हणतात मणिपूरचा मुख्यमंत्री को -ऑपरेट करतोय, म्हणून त्याला बदललं नाही. पोलिस मुख्य आणि मुख्य सचिव बदलले. म्हणजे मणिपूरमध्ये जे चाललं आहे, तेच गृहमंत्र्यांना हवं आहे का?

राहुलची वर उल्लेखली पत्रकार परिषद आताच बघितली. अगदी योग्य मुद्दे मांडले आणि उत्तरे दिली, विषय जराही न भरकटु देता. ही वेळ (कालच्या संसदेतील भाषणात) मोदींनी २०२४ मध्ये कोण निवडून येईल वगैरे बोलण्याची (आणि हास्य विनोद करण्याची नाही) मणिपूर शांत कसे करायचे, काय तोडगा काढायचा यावर बोलण्याची आहे याकडे लक्ष वेधत राहिला. Impressed.

मणिपूरवरून लोकसभेत तीन दिवस चर्चा झाली. त्यात मणिपूरचे खासदार दिसले का?
"मणिपुर पर बोलने से हमें रोका गया, हमारे हाथ बांध दिए गए"

◆ एनडीए की सहयोगी पार्टी MNF के सांसद लोरहो पफोज ने कहा

Pages