मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कालच्या एपिसोडमध्ये विशाल सोनालीबद्दल जेंव्हा लिहलेले वाचून दाखवत होता तेंव्हा मीनलची आणि विकासची रिॲक्शन बघा आणि काय वाटते ते सांगा!!

काल मांजरेकरांनी पण नरक चा उच्चार नर्क असा केला का?

बाकी ते अतरंगी डिमांड अगदीच फालतू असतात!

नीथा शेट्टी सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आले म्हणाली ते फटाक्यांच्या मागे वाचून एकदा रिहर्सल तरी करायची.... किती अडखळत होती!
ती कुणाला आपणहून नडणार नाही म्हणाली तरी तिच्याकडे बघून तसे वाटत नाही!
आल्याआल्याच ओळख करुन देताघेताना चक्क मास्टरमाइंडचे नावच विसरुन तिने झलक दाखवली आहे Wink

काल मांज्या पण जरा गोंधळून गेलेला वाटला राक्षसांची प्रॉपर्टी सांगताना. महिषासुरची प्रॉपर्टी मारीच ला आणि मारीच ची महिषासुरला दिली. महिषासुर रूप बदलतो असं काहीसा बोलत होता. की बरोबर बोलला? मला परत पाहायला पाहिजे तेव्हडा पार्ट. कदाचित माझ्याच ऐकण्यात चूक झालेली असेल.

कालचा एपिसोड बोर झाला. पत्रं फॉरवर्ड केली मी बरीचशी. चुगल्या मुद्दाम मीरा आणि गायत्रीला आल्या होत्या. बिबॉ चा इरादा लोहा गरम है मार लो हाथोडा असा असावा. सोनालीला इतके का आश्चर्य वाटले कळले नाही.
नीता काही फार दाखवलीच नाही अजून. तिचे ते फटाक्यांचे टास्क तिचे काहीतरी वाचण्यात चुकले असावे असे वाटले Happy डिड नॉट मेक सेन्स.
आज काही एक्स्ट्रा क्लिप्स दिसल्या. एकात उत्क्या आणि जय म्हणताहेत मीरा रागाचे अ‍ॅक्टिंग करत आहे. पण तिने त्यांना काही कल्पना न देताच हा गेम सुरु केला, त्यामुळे तिला मूर्ख म्हणत आहेत दोघे. तसं खरंही आहे ते, असं अ‍ॅक्टिंग वगैरे असेल तर एखादा टास्क पर्यन्त जमेल. नंतर लक्षात येईलच की ती अ‍ॅक्चुअल कोणाला सपोर्ट करतेय ते.
अजून एक फार फनी- उत्क्या जय आणि नीता ला म्हणतोय बी ग्रुप कडे "प्रायॉरिटीज"(?) तर आहेत पण त्यांना त्या ग्रॅब करत येत नाहीत. नंतर मग अपॉर्चुनिटीज असे करेक्शन केले Lol

आजच्या एक क्लिप मधे उत्क्या म्हणतोय ममांनी दिलेल्या हिन्ट्स मधून बोध (?) घेऊन तो आता जास्त हार्श खेळणार आहे Happy उगीच नाही हुषार म्हणत त्याला Wink

काल राक्षस ठरवताना जयला जेव्हा बकासुराची पाटी दिली आणि ममांनी लगेच कारण विचारल तेव्हा त्रुप्ती मँडमनी अगदी विश्लेषण करून जय खात असलेल्या अंड्यांची आणि पोळ्यांची संख्या सांगितली.त्याची एवढी खरतर गरज नव्हती. बकासुर म्हटल्यावर अंदाज येतो.
एखाद्याच खाण काढू नये अस म्हणतात.बर नाही दिसत ते.
त्रुप्ती मँडम विसरल्या बहुतेक.
या आठवड्यात त्रुप्ती, गायत्री ,मीरा,, विशाल आणि सोनाली नॉमिनेशन मध्ये आहेत.मीरा पहिल्यांदाच आली आहे का नॉमिनेशन मध्ये.
बिबॉसचा खेळ आहे का हासुध्दा,मीराला टीम ए शी जोडायला.म्हणजे त्यांना सोडल्यावर नॉमिनेट झाली.कारण मीरा टीम ए कडे परत गेली की गायत्री जाणारच.हे बिबॉसला माहित आहे.
बाकी एव्हिक्शन असेल की नाही माहित नाही,पण केल तर त्रुप्ती मँडम जातील.
दादूस चक्क ७ आठवडे घरात.

स्वयंघोषित मास्टरमाइंडचा जयला नॉमीनेट करून सेल्फ गोल. परिस्थिती वेगळी पण असू शकते. बिग बॉस सोयीनुसार प्रोमोत कायपण दाखवतो.

यावेळी कोणी जाणार नाही, दिवाळी दिवस आहेत. स्नेहाचा पचका होईल. बाय द वे वोटींग लाईन्स सुरु आहेत का. तर जाईल कोणीतरी मग गा दा जावी.

दादूस चक्क ७ आठवडे घरात. >>> मुर्ख आहे बिग बॉस. आदीशला काढून आणि ह्यांना ठेऊन काय मिळवलं. आदीश मस्त जयला नडायचा. मीनल सोडून दुस-या कोणांत ती हिंमत नाही.

मीरा हवीच फायनलला. तिथुन मीरा जय असावेत आणि इथुन दोन वि आणि मीनल. नीता असेल फायनलमधे. सहा ठेवतात. उत्क्याचा केळकर करा रे. गा दा ला या आठवड्यात आणि सारंगेला पुढच्या आठवड्यात पाठवा.

सारंगेने मीरावर रडायची वेळ आणली , आणि ही त्या दादुस स्न्हेहाला वीक प्लेयर म्हणुन नॉमिनेट करा असे शिकवत होती सगळ्यांना, पहिल्या का दुसर्‍या वीक मधे Lol Lol Lol

दिवाळीमुळे एलिमिनेशसन्स नसतील यावेळी .. जर असतील तर दादुस पुन्हा वाचला असं वाचलं Uhoh
जय विशाल तृप्ती सोनाली मीनल आहेत म्हणे नॉमिनेटेड !
यावेळी तृप्ती जाईल असे असेल तर .

तो प्रोमो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट असेल असे वाटलेच होते. अर्थात हेही होऊ शकतेच, पण आत्ता नाही. या गोष्टी शेवटचे ७-८ जण उरले की होतीलच.

विकासने जयला का सेव्ह केले?

शेवटचा उत्कर्ष गेला. त्याने जय, तृप्तीला नॉमिनेट करून विकास, गायत्रीला वाचवलं.

Voting lines are open.
आता प्रेक्षकांना उल्लू बनवू नये

आता दादुसला जिंकवतील अस वाटायला लागलं आहे, हाहाहा. होय सर, हा सर, बरोबर सर.

अय्यो गा दा नाहीच का नॉमीनेट.

आज कोणी ऐकल का,नॉमिनेशन मुळे पागल झालेला जय उत्कर्षला कखय म्हणाला
" सोनाली को हम जब चाहे तब उडा सकते है हमारा एक बंदा उनके टीम मे है"
आणि तो बंदा म्हणजे विकास आहे.
आता हळूहळू सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळत आहेत.
विशालला हे कळल असाव,मिनलला ही थोडफार कळल असाव.आता विशालच विकासच्या बाबतीतल वागण समजत.
पण जर हे ठर असेल,तर मात्र पहिल्यांदाच विशालला मानायला हव की अशा टीमला बरोबर घेऊन जायच ज्यात टीम ए ने बॉम्ब पेरून ठेवला आहे.
विकासच आहे का तो ज्याबद्दल जय सोनालीला सांगत होता की रविवारी आम्हालख सगळ कळत.
विकासला मिनल आणि विशाल स्ट्रॉंग आहेत माहित आहे,त्यांचा काटा असा काढत आहे.आणि यशस्वीही झाला आहे कारण सोमिवर त्याला प्रचंड रिस्पॉन्स आहे.
आस्तीन का साप निकला.
गायत्री मात्र अगदीच माठ निघाली.कळतच नाही अजून.
त्रुप्ती,दादूसनंतर जाईल.दादूसच्याही आधी जाऊ शकते.
नवीन आलेला फटाका फुसका निघाला अस आता तरी वाटत आहे.

पण असले काही करण्याची गरजच नाहिये जय च्या टीम ला. बी टीम मधे आधीच अनेक गोंधळ सुरु असतात. कसली स्ट्रॅटेजी अशी नसतेच. कोणीही कसंही टास्क खेळतं. प्रत्येक टास्क हरतात . त्यांच्यात ए टीम ने हेर वगैरे सोडला तरी फरक असा काय पडणार Happy

मला कधीकधी वाटतं कि जय उगाच असं बोलतो, मागेही म्हंटला होता हेच !
अधे मधे विकासशी बोलतो त्यावरून उगीच बढाया मारायला, आपण मास्टरमाइंड/लिडर आहोत असे दाखवायला Happy
त्याला नाही काढणार पण काही झालं तरी, एक स्ट्राँग निगेटिव कॅरॅक्टर म्हणून जय हवाच पण टॉप ३ मधे , तो डिझर्व करतो खरोखर, विशाल आणि जय हेच लिड कॅरॅक्टर्स आहेत या शो चे !
अगदी पहिल्याच आठवड्यात विशाल म्हंटला होता कि मी जयच्या विरुद्ध खेळणार हा सिझन!

विकास ला बरोबर कळाल आहे की मराठी प्रेक्षकांना हे असले स्नेहा जय चे प्रेमाचे चाळे अजिबात आवडत नाहियेत.तो म्हणाला सर तिला टोमणा मारुन/उपरोधीकपणे बोलत होते तर ती येडी हा हा करत हसत होती..perfect vikas ..त्या सोनालीला समजवा आता..ती रुसुन बसलिये आम्हाला चिडवत नाहीत ममा म्हणून.. Lol

विकास नसेल टीम ए च्या बाजुने. तो हुशार आहे डोक्याने, पब्लिकला अस आवडणाआवडनार नाही हे माहिती असेल त्याला.

जय मुद्दाम टीम बी लाडकी आहे प्रेक्षकांची म्हणून म्हणत असेल.

त्याला तरी कळलं का स्नेहाला टोमणे मारतायेत.

विशाल आणि जय हेच लिड कॅरॅक्टर्स आहेत या शो चे >>> हेच ठेवतील पहिले दोन. जयची नेहा करतील. विकासला जास्त वोटिंग असले तरी तिसरा किंवा चौथा ठेवतील.

विकास ला बरोबर कळाल आहे की मराठी प्रेक्षकांना हे असले स्नेहा जय चे प्रेमाचे चाळे अजिबात आवडत नाहियेत. >>>>>>> जय-गायत्रीबद्दल सुद्दा विकास हेच म्हणाला होता.

विकासला काल ' शेन्टिमेण्टल' सिनेमात बघितल सोनी मराठीवर.

बादवे, विशालच लग्न झालय का? त्याने एका एपिसोडमध्ये बायकोचा उल्लेख केल्यासारखा ऐकल होत. नॉट शुअर!

उत्कर्षने एका दगडात २ पक्षी मारायचा प्रयत्न केला आपण जयच्या इन्फ्ल्युअन्स खाली खेळत नाही हे दाखवल आणी गादाला सेव्ह करुन तिला आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली ठेवल.
तो गादाला का सान्गत होता की जाउन जयशी बोल म्हणुन आणी ही मठ्ठ पण गेली त्याच एकून! जयने तिला पुर्ण इन्गोर मारल , आल्या मॅडम टल्ले खात वापस , स्नेहा तर जयची दासी असल्यासारखी आता हे कर ते कर ह्याच्याशी हे बोल ते बोल.
मागच्या विकेन्ड ममानी आरडाओरडा केला पण हे सुधारले नाहीच यावेळेस ममानी सर्काझमची कमाल केली होती तरी स्नेहा बेअक्कल असल्यासारखी हसत होती. विकासने बरोबर अ‍ॅनॅलिसिस केल, जयला कशाचाच फरक पडत नाही.
गायत्रीच परत येरे माझ्या मागल्याच चालू आहे, मिरा रडतेय आणी याची समजवाण्याचि पद्धत काय अप्फाट होती आणि एवढ्या इगोइस्टिक माणसाचे पाय चाटण्यापेक्षा कुणी स्वाभिमानी व्यक्ती जवळपास फिरकलीही नसती.
विकास जातोच याच एकायला, सोनाली पण एक यडपट वाटते, विशाल अन मिनल आर स्मार्ट ते दुसर्या ग्रुपला कसलीच भिक घालत नाहित.
निथा शेट्टि फुसकी बॉम्ब! काहिच इम्प्रेशन पडल नाही तिच , ती काय फार करेल अस आत्ता तरी वाटत नाही.

स्नेहा जय आणि उत्कर्ष एकत्र असतात जास्त, त्यात उत्कर्ष समोर बसतो, हे दोघे एकत्र आणि म मां ना त्या दिवशी अस काही नाही, अस काही नाही सांगत होती ही.

जयला मीरा का नाही आवडत, मला आवडली असती त्यांची जोडी, जाउद्या झालं.

मीरा आणि गायत्रीला कोणत्याही परिस्थितीत सेव्ह करू नये असं म्हणाला होता का जय?
त्या दोघांना आता वाटू लागलंय की कोणाला कॅप्टन करायचं, ठेवायचं , काढायचं हे आपल्या हातात आहे.
नीताला कॅप्टन केलं की लोक आदिशच्या विरोधात गेले तसे तिच्या विरोधात जातील असा बेत आहे.

जयने काल मीराला पण उचलून घेतलं. आणि त्यावर या मुली खिदळतात.

विकासने जयला वाचवून खऱच संशय निर्माण केलाय. त्याचा त्या गोवा ट्रिपसारखा काही विचार असेल - ए मधले
सगळे आता सेफ असले की पुढच्या फेरीत बाहेर पडतील.
इतरांशी बोलण्यासारखे १०० दिवसांचा विचार आहे.

जयला माहीत आहे की तो हलकटपणा करतो आणि म्हणून त्याला नाॅमिनेशन मधे आलयाचं वाईट वाटतंय बहुतेक कारण मग लोक वाचवणार नाहीत.

उत्कानं जयला नाॅमिनेट करण्याचंकाय लाॅजिक दिलं ते समजलं नाही.

Pages