कॉँग्रेसमुक्त भारत का नको?

Submitted by आशुचँप on 24 May, 2019 - 07:18

निकालाची रणधुमाळी संपली आहे आणि भाजपने निर्विवादपणे कॉँग्रेस आणि अन्य पक्षांना भुईसपाट केले आहे. २०१४ पाठोपाठ २०१९ मध्येही भाजप असा काही दणका देईल असे मुळीच वाटले नव्हते.
भाजप कॉग्रेसपेक्षा जास्त सीट्स घेणार यात शंका नव्हती, पण इतक्या मोठ्या फरकाने धूळधाण उडेल याची मुळीच शक्यता वाटत नव्हती.
याला कारणे अनेक होती, त्या नोटबंदी, राफेल घोटाळा, निवडणूकीआधी भ्रष्ट्राचारी नेत्यांच्या नावाने केलेली आगपाखड पण पाच वर्षांत त्यांच्याविरुद्ध काहीही न करणे, मंत्रीपदी असूनही बेताल बोलणे, खुद्द मोदींचे अनेक हास्यास्पद दावे, घटक पक्षांशी चाललेली हाणामारी, पार अफझालखान वगैरे ऐकून घेऊनही शिवसेनेच्या गळ्यात गळा घालणे, पुलवामा संदर्भात अनेक उलट सुलट दावे या सगळ्याचा परिपाक अंतिमत भाजपला महागात पडेल असे वाटत होते पण तसे काही झाले नाही.
जनतेने सर्व मुद्दे निकालात काढत मोदींच्या ओंजळीत भरभरून दान टाकले. यावर आज अनेक तज्ज्ञ लोकांची मते वाचली असता असे जाणवत आहे की समर्थ पर्यायी पक्ष नसणे हे भाजपच्या विजयात फार मोठे योगदान ठरले.
कॉंग्रेसपक्षाची गोंधळाची स्थिती, राहुल गांधी यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या वक्तव्यात आणि राजकीय समजात बरीच चांगली प्रगती घडवून आणली पण अजूनही अनुभवी मोदींसमोर त्यांची डाळ शिजली नाही. अद्याप राहूल गांधी यांना मोठी मजल मारावी लागणार आहे, बरेच काही शिकावे लागणार आहे, प्रियंका गांधी म्हणलं तर आहेत म्हणलं तर नाहीत अशा दोलायमान स्थितीत आणि एकूणच धरसोड राजकारण यामुळे भाजपचे फावले असे म्हणायला हरकत नसावी.

आणि आता विजय मिळताच भाजप नेत्यांनी आणि समर्थकांनी विजयोन्मादात डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली आहे की कॉँग्रेसमुक्त भारत म्हणून. आणि एकेकाळचा मी कट्टर भाजप समर्थक असूनही ही बाब अतिशय चिंतेची वाटत आहे.

सत्ताधारी पक्ष कुठलाही असु दे त्यांना कायम धारेवर धरणारा आणि चाकोरीत रहायला भाग पाडणारा समर्थ विरोधी पक्ष असणे हे निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे. गेली पाच वर्षे निष्प्रभ विरोधी पक्ष म्हणून कॉँग्रेसने काहीही केले नाही याचीच फळे त्यांना २०१९ ला मिळाली आहेत. मोदी नकोत तर दुसरे कोण हा प्रश्न मतदारांना पडला हेच कॉंग्रेसचे दारूण अपयश आहे. आणि हे अपयश कायम रहावे ही भाजपची इच्छा असणार हे उघड आहे.

सरकारला नुसते प्रश्न विचारणे किंवा भाषणात त्यांचे दावे फोल असल्याचे सांगणे इतक्याने सत्ताधारी पक्ष नमत नाही हे आता पाच वर्षात उघड झाले आहे. आता त्यामुळे कॉँग्रेसला तळागाळापासून बांधणी करत येत, नव्या दमाच्या तरुण पिढीला संधी देत आणि ज्या राज्यात मतदारांनी पसंती दिली आहे चांगले भरीव काम करून दाखवणे गरजेचे आहे.

सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने देखील कॉँग्रेसचे भवितव्य टिकून राहणे आवश्यक आहे. जेव्हा केव्हा कुठल्या देशात एखाद्याच पक्षाला अनिर्बंध सत्ता मिळते तेव्हा त्याची परिणीती कशात होते याचा इतिहास साक्ष आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला एक जरब असावी यासाठी एक समर्थ पर्याय म्हणून कॉंग्रेस असणे ही तमाम भारतीय लोकांची गरज आहे. काही लोकांना हे पटणार नाही कदाचित कारण जोवर बहुमत आपल्या बाजूने असते किंवा आपण बहुमताच्या बाजूने असतो तेव्हा सगळे गोड गोड छान छान वाटते, त्याचा जेव्हा बडगा बसायची वेळ येते तेव्हा उशीर झालेला असतो आणि मग अरुण्यरुदन करून काहीही उपयोग नसतो.

विशाल भारद्वाजच्या चित्रपटात एक संवाद आहे. हमेशा संतुलन बने रहना जरुरी है, आग के लिये पानी का डर बना रहना चाहीये

त्याप्रमाणे सत्ताधीश भाजपला आणखी उन्मत्त न होऊ देता त्यांना सतत टांगती तलवार डोक्यावर ठेवणे हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे आणि यासाठी कॉंग्रेसला आमुलाग्र बदल घडवून आणावा लागणार आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून चालणार नाही. ही पाच वर्षे त्यांच्यासाठी आणि त्यांच्याकडून काही चांगले भरीव अपेक्षीत असलेल्या जनतेसाठी कसोटीची आहेत.

तोवर अशी आशा आणि प्रार्थना करुया की भाजप सरकार या विजयाचा आपल्याला हवा तो अर्थ काढून मतदारांना गृहीत धरणार नाही. मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे तो योग्य ठरवेल आणि देशाच्या भल्यासाठी काम करेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडे दिवस धीर धरावा..
राहुल यांचा राजिनामा, पक्षातील अंतर्गत गोंधळ, ई. सर्वाची परिणती लवकरच कॉं स्वतः स्वताच्या विनाशाकडे चालली अहे हे ऊघड आहे. ईतर कुणाला काहीही करायची गरज नाही.
तेव्हा कॉं मुक्त भारत होतोय.. आता दुसरा पर्याय शोधावा.
तिकडे ममशाही देखिल लवकरच संपुष्टात येणार असे दिसते... गळती सुरू झाली आहे.

ते कुणीतरी निवडून न आल्यास कुणीतरी संन्यास घेणार होतं, कुणी तरी निवडून न आल्यास आत्महत्या करणार होतं..
तिथपर्यंत पाळी आली नाही हे एक चांगलं झालं.

काही गोष्टी लिहिल्या होत्या. पण त्या उघड करणे योग्य वाटले नाही म्हणून प्रतिसाद काढून टाकले आहेत.

100 वर्ष जुना काँग्रेस पक्ष सत्तेतून पाय उतार झाल्यापासून त्यांच्या नेत्यांना भिकेचे डोहाळे लागलेले दिसत आहेत .

मुंबई दहशतवादी हल्ल्या नंतर पाकिस्तान वर कारवाई न करता मिळमिळीत धोरण स्वीकारले असा उल्लेख करून आणि पुस्तक खापावे म्हणून स्वतःच्याच काँग्रेस पक्षावर मनीष तिवारी ने पुस्तकात टीका केली आहे .

तर त्या हल्ल्या अझीज बरणी या फडतूस जर्नालिस्ट ने आर एस एस , भारतीय लष्कर , मोसाद , आणि एफ बी आय ला जबाबदार धरून लिहलेल्या
पुस्तकाचे प्रकाशन दिग्विजय सिंग ने केले होते .
या दोघांच्या निमित्ताने आई मरायला टेकली तरी दुधासाठी तिची थाने चोखणाऱ्या कुत्रीच्या पिल्लांची आठवण झाली .

लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्या अगोदर ममता ने इतर विरोधी पक्ष नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन भाजप विरोधी रणनीती आखायला सुरुवात केली पण तेही
काँग्रेस ला फाट्यावर मारून ......

दिल्लीत आलेली असताना पत्रकार ने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ममताने दिल्ली में आये तो सोनिया से मिलना ही चाहीये , इस बात की कोई जरूरत ही नही असे सांगून 100 वर्ष जुन्या आणि वार्धक्याला टेकलेल्या काँग्रेस ची आता गरज नाही , इतर पक्ष काँग्रेस शिवाय देशाचे नेतृत्व करू शकतात हा भाजप चा अजेंडा पुढे सरकवला .
यात मुख्य म्हणजे काँग्रेस घराण्यातील युवराज राहुल ची मात्र अजून ससेहोलपट होत आहे .
अगोदरच काँग्रेस पक्षातील 29 जुन्या नेत्यांनी राहुल चे नेतृत्व नाकारलेले असताना इतर पक्ष ही तीच री ओढत आहेत .

हा भाजपला धोबीपछाड देण्याचा डाव आहे विरोधी पक्षांचा. काँग्रेस शिवाय विरोधी आघाडी होऊ शकत नाही हे ममतालाही ठाऊक आहे .

ममतादीदीने वाजपेयी सरकार 2001 मध्ये सोडले होते

तेही शवपेटी घोटाळा आरोप करून

बटर ऑन बॉडी खाणारे हे लोक आहेत , हे तेंव्हाच तिने ओळखले होते,

आई मरायला टेकली तरी दुधासाठी तिची थाने चोखणाऱ्या कुत्रीच्या पिल्लांसारखे हे निवडणुकीपूरते हिंदुत्व चोखतात , चाळीशी झाली तरी मतिमंद पोरे आईकडूनच भात भरवून घेतात , तसे हे अजून 5000 वर्षांपूर्वी मेलेल्या राजांच्या नावे भात भरवून घेतात

२००४ च्या सुरुवातीला ममता पुन्हा एन डी ए म ध्ये सामील झाल्या होत्या.
काल अडानीला भेटल्यात.
तृण मूलच्या नेत्यांवरच्या सीबीआय ईडी केसेस थंड पडल्यात का ते बघा.

आई मरायला टेकली तरी दुधासाठी तिची थाने चोखणाऱ्या कुत्रीच्या पिल्लांसारखे हे निवडणुकीपूरते हिंदुत्व चोखतात , >> Biggrin Biggrin Biggrin

आई मरायला टेकली तरी दुधासाठी तिची थाने चोखणाऱ्या कुत्रीच्या पिल्लांसारखे हे निवडणुकीपूरते हिंदुत्व चोखतात >>>>>>>
हे राहुल आणि प्रियंकाला जास्त शोभेल नाही का ?
Lol
निवडणूक जवळ आली की यांची रात्र कमी आणि सोंगे फार सारखी अवस्था होते .
हिंदूंच्या पाठींब्या साठी काय एक एक रूपे घेतात , ते ही आपले ढोंग हिंदू जनतेला समजलंय , याची तमा न बाळगता .

अदानी ची भेट घेऊन ममता ने अदानी विरोधात बोंब मारणाऱ्या अडाणचोट काँग्रेसी गुलामांना बुच मारले Happy
आता अदानी विरोधात बोंबलायचे कसे हा त्यांच्या बालमेंदूना न झेपणारा प्रश्न पडला असेल Happy

ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातील लोकांना भुलवण्यासाठी रूपे घेतली असतील तर बिनधास्त दाखवा Happy

प. बंगालमधल्या निवडणुकीसाठी वर्षभर टागोरांसारखी दाढी वाढवली. काही उपयोग झाला नाही.

गोव्यात निवडणुका म्हणून पोपला भेटून आले

प. बंगालमधल्या निवडणुकीसाठी वर्षभर टागोरांसारखी दाढी वाढवली. काही उपयोग झाला नाही.

गोव्यात निवडणुका म्हणून पोपला भेटून आले >>>>>
कायच्या काय Lol
इकडे राहुल आणि प्रियांका तर रुद्राक्षाची माळा घालून , कावड यात्रेत भाग घेऊन , विविध मंदिरात पाया पडतात आणि छटपूजा सुद्धा करतात.

ते करू दे करतात तर.. पण मोदीला काय धाड भरली? मोदीने केलं तर चालतंय अन् इतरांनी का करू नये..?

ते पोप वेगळे आहेत ते एक वेळ ठीक आहे परंतु कर्मधर्मसण्योगाने हुकुमशाही वृत्त्ती मात्र तीच आहे.पोपच्या भेटीनंतर ही नवीन हुकुमशाही पण वर्षाच्या आत नेस्तनाबूत व्हावी हीच आशा.

Pages