वेदांमधील अद्भुत विज्ञान

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 3 October, 2018 - 01:56

आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे ?

सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत वापरून सिद्ध करतो हि सगळी तार्किक दृष्टी आहे. आपला हा सुद्धा दावा आहे कि मानवाने ३०० वर्षात अफाट प्रगती केलेली आहे.

सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. असा आपला दावा आहे.

ज्या माणसाला वेद म्हणजे काय आहे हे माहित नाही. ज्या माणसाला उपनिषदे म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय गणिती पद्धत म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र काय हे माहित नाही त्या माणसाला हा लेख वाचून विज्ञानाबद्दल प्रेमाचे भरते येणे स्वाभाविक आहे. परंतु हे सगळे अर्ध सत्य आहे. मध्यंतरी एका विद्वानाने अशीच टिप्पणी केली होती सगळे काही वेदात असेल तर तुम्ही पुढचे १० -१५ शोध आजच लावा कि, विज्ञान हे शोध लावण्याची वाट का पहात बसला आहात.
तर विज्ञान विरुद्ध प्राचीन भारतीय ज्ञान / अध्यात्म या विषयावर आपण मुद्देसूद, पुराव्यांच्या सह चर्चा करूया. विज्ञानाचे जे प्रेमी असतील त्यांनी आवर्जून हा लेख वाचावा माझ्या मुद्द्यांच्या बद्दल काही आक्षेप असतील ते नोंदवावे. आणि जर माझे मुद्दे योग्य असतील तर मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा दाखवावा.

१) कुतुब मिनार च्या समोर एक लोहस्तंभ आहे. २२ फुट उंच सुमारे ६.५ टन वजन असणारा wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा बनलेला स्तंभ. ज्याचे वय कमीत कमी १६०० वर्षे आहे. ज्याच्यावर एक अत्यंत पातळ असे आवरण चढवले आहे ज्यामुळे गेली १६०० वर्षे या खांबाला गंज लागलेला नाही. आय आय टी कानपूर च्या धातू तज्ञांनी अभ्यास करून एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा उल्लेख केला आहे ज्याचे आवरण फक्त १० micron आहे त्यामुळे हा स्तंभ अजूनही गंज पकडत नाही.

आपल्या महान वैज्ञानिक प्रगती चे मापदंड असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कारला सुद्धा मुंबईच्या खाऱ्या वातावरणात ३ ते ५ वर्षात बुडाला भरपूर गंज लागतो आणि मुंबईतील जुनी कार नेहमीच निम्म्या किमतीला विकली जाते. १६०० वर्षांच्या पूर्वी जिवंत असणारी अंधश्रद्धाळू विज्ञान परान्मुख माणसे जे करून गेली आहेत त्याची नक्कल तरी करण्याची आजच्या वैज्ञानिकाची आणि त्यांच्या समर्थकांची तयारी आहे कां ???
२)लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश. या मंदिरात एक दगडाचा स्तंभ ( column ) आहे तो अधांतरी आहे. त्या खांबाच्या खालून आपण एक इंच जाडीची कोणतीही वस्तू फिरवून त्याची खात्री करून घेऊ शकतो. याच पद्धतीचा दीपस्तंभ मी विजयनगर साम्राज्यात सुद्धा पहिला होता. एक मेकानिकल इंजिनियर म्हणून मी तो कसा बनवला असेल हे नक्की सांगू शकतो. सुमारे १० टन वजन असणारा एक २ फुट व्यास असणारा दगड घ्या. त्याच्यावर तुम्हाला हवे तसे नक्षीकाम करा ( सुमारे ५ ते १० वर्षे लागणार हे करायला पारंपारिक हत्यारे वापरून. ) नंतर त्या खांबाच्या एका बाजूला एक मोठे गोल भोक करा त्यात लोहकांत दगड ( चुंबकीय गुणधर्म असणारा दगड ) घट्ट ठोकून बसवा. नंतर जिथे हा स्तंभ उभा करायचा असेल तिथे जमिनीत या दगडाचे वारा, पाउस, उन, वादळ या सगळ्या प्रकारात सुद्धा रक्षण करू शकेल इतका मजबूत पायाचा दगड बसवा त्यात तितकाच मजबूत पायाचा लोहकांत दगड ठोकून बसवा. आता या दोन्ही लोह्कांत दगडांचा असा संयोग हवा कि त्यांनी परस्परांना दूर तर लोटले पाहिजे पण ते स्थिर सुद्धा राहिले पाहिजेत ( १० टन वजनाचा दगड घेऊन आजच्या कोणत्याही वैज्ञानिकाने हे करून दाखवावे ) मग खालील दगडावर हा वरील दगड ढकलत ढकलत आणा दोन्ही दगड एकमेकांच्या चुंबकीय क्षेत्रात आले कि ते स्थिर होतील. आणि नंतर १००० वर्ष तसेच राहतील.. ( अजून किती काळ राहतील ते माहित नाही ) असा अफलातून तंत्रज्ञानाचा वापर करणारी मंडळी निर्बुद्ध होती ? त्यांना विज्ञान तुमच्या न्यूटन पेक्षा कमी समजत होते असे तुमचे मत आहे का ? बर हे करणारी मंडळी कलाकार होती, शिल्पी होती, तुमच्या पुरोगामी भाषेत बहुजन.. ब्राह्मण सुद्धा नव्हती तरी त्यांचे गणित, विज्ञान आणि निसर्गाचा अभ्यास इतका पक्का होता कि ती मंडळी या गोष्टी लीलया करत होती.
३) महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर किरणोत्सव : आदिमाया महालक्ष्मीचे हे मंदिर कमीत कमी १००० वर्ष जुने आहे. या मंदिरात भूगोलाचा अभ्यास करून मुख्य द्वार असे बनवले आहे कि दर वर्षी विशिष्ट नक्षत्र असताना सूर्याचे पहिले किरण हे देवीच्या पायावर पडते आणि जसा सूर्य वर वर जातो ती किरणे तिच्या मुखापर्यंत पोचतात. हा सोहळा किरणोत्सव म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांनी हे मंदिर बांधले त्यांचा भूगोल अत्यंत पक्का असल्या शिवाय आणि त्यांचे गणितीय ज्ञान अत्यंत चपखल असल्याशिवाय हे शक्य होऊ शकेल ? आज असेच एक मंदिर उभे करायचे ठरले तुमचे शास्त्रज्ञ सध्या ज्ञात असणारी साधने आणि तंत्रज्ञान घेऊन सुद्धा १००० वर्ष टिकेल अशी वस्तू निर्माण करू शकतील ? आणि याच पद्धतीचा किरणोत्सव तुमच्या न्यूटन च्या मूर्तीवर पाडून दाखवू शकतील ?

४) कैलाश मंदिर वेरूळ : वेरूळ येथील लेणीनच्या मध्ये असणारे कैलास मंदिर हे जगातील पहिले आधी कळस मग पाया या पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. ७व्या शतकात बांधलेले हे मंदिर एकाच शीलाखंडाला पूर्णपणे कोरून बनवले आहे. कमीत कमी तीन पिढ्या या मंदिराच्या निर्मितीसाठी राबल्या आहेत. त्या काळातील लोकांना एकच इतका मोठा दगड कसा ओळखू आला असेल. त्याचे माप कसे कळले असेल कि त्यांनी बरोबर तीन मजली मंदिर उभे केले. आधी कळस मग पाया पद्धती वापरून बनवलेले हे एकमेव मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि तत्कालीन लोकांच्या भूमीच्या गर्भाच्या अभ्यासाचा एक जिवंत नमुना आहे.

५) बाण स्तंभ. सोरटी सोमनाथाचे सुप्रसिद्ध मंदिर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे मंदिर गझनीच्या मोहमदने १७ वेळा लुटले होते. या मंदिरात एक बाणस्तंभ आहे. त्या स्तंभावर संस्कृत मध्ये असे कोरले आहे कि या स्तंभापासून अंतर्क्तिका पर्यंत सरळ रेषा मारली तर भूमी लागत नाही. या लेखासोबत त्याच्या लिंक सुद्धा दिल्या आहेत. गुगल map चा फोटो सुद्धा दिला आहे. त्या काळातील लोकांच्याकडे आज असणारी कोणतीही सामुग्री नसताना सुद्धा ते या पद्धतीची घोषणा कशी काय करू शकले असतील ??? आज च्या विज्ञानाकडे याचे उत्तर आहे ??? त्यांनी नक्की कोणती यंत्रे, कोणती तंत्रे वापरली असतील ज्यामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ???

६) मीनाक्षी टेम्पल मदुराई : सुमारे २५०० वर्ष जुने मंदिर. बांधकाम करताना ३० ते ३५ टन वजनाच्या शिळा हत्तींच्या सहाय्याने ढकलत आणून निर्मिती केलेली आहे. या मंदिरात सहस्त्रखंबी मंडप आहे. त्यात ९८५ खांब आहेत आणि त्यातील काही खांबांवर आपण नाणे वाजवले तर सा ते नि असे सप्तसूर ऐकू येतात. मी मध्यंतरी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता ज्यात या मंदिराचे वर्णन आहे. त्यात त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला कि २५०० वर्षांच्या पूर्वी ३० टन वजनाचा दगड कसा हलवला असेल. त्या साठी त्यांनी एक दगड आणला सुमारे २५ टन वजनाचा कारण आजच्या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत भारतात दगड वाहण्यासाठी असणारा सगळ्यात मोठा ट्रेलर सुद्धा २५ टन वजनच वाहून नेऊ शकतो. आणि जुन्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी लाकडी ओंडके तासून गोल केले त्यावर तो दगड टाकून त्यांनी हत्तींचा वापर करून ढकलून पहिले आणि त्यांना तसे करता आले . ( ज्याला आपण तरफ चे तत्व किंवा लिव्हर आर्म प्रिन्सिपल म्हणतो त्याच तत्वाचा वापर करून हि अत्यंत अवजड वस्तू हत्तींनी लीलया ढकलून दाखवली )

७ ) कोणार्क चे सूर्य मंदिर : संपूर्णपणे लोह्कांत दगड वापरून बनवलेले मंदिर म्हणजे कोणार्क चे सूर्य मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोह्कांत दगड एकमेकांचे magnetic forces balance करून घट्ट बसवले होते. त्या नंतर त्यावर शिल्पे घडवली. मंदिराचा कळस हा सुद्धा लोह्कांत दर्जाचा होता आणि तो कळस संपूर्ण मंदिराचे magnetic forces control करत असे. या मंदिराच्या आत जे राशी चक्र काढले होते ते या पद्धतीचे होते कि रोज सूर्य उगवताना ज्या राशीत असेल त्या राशीवर बरोबर सूर्याचे पहिले किरण पडणार. अर्थात रोज राशी बदलला अनुसरून किरणांची जागा बदलणार. कल्पना करा याला भूगोल आणि स्थापत्याचा काय दर्जाचा अभ्यास लागला असेल.
या मंदिराची मला माहित असणारी कथा सांगतो. हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे. आणि त्या भागात समुद्र किनारा अत्यंत खडकाळ आहे. या किनाऱ्याजवळ येणारी जहाजे त्यातील लोखंड या magnetic forces ने ओढली जाऊन खडकावर आपटून फुटून जात असत. ज्यावेळी वास्को द गामा भारतात आला त्याच्या दोन पैकी एका जहाजाचा याच पद्धतीने खडकावर आदळून अंत झाला. त्याला यात मंदिराचा काही तरी परिणाम आहे हे लक्षात आले त्याने जहाजावरून तोफा डागल्या. त्यामुळे मंदिराचा कळस निखळला. कळस निघाल्याने सगळे magnetic forces unbalance झाले आणि मंदिर जवळ जवळ उध्वस्त झाले. नंतर ब्रिटीश कालखंडात ब्रीटीशांना कल्पना होती कि आपण हे मंदिर पूर्ववत करू शकत नाही. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात चक्क कॉन्क्रीट ठासून भरले.
आजच्या महान विज्ञान आणि वैज्ञानिकांना आवाहन आहे. ते कॉन्क्रीट काढा आणि पुन्हा ते मंदिर पूर्ववत करून दाखवा.

८) हि माझी पोपटपंची नाही. विकिपीडियाच वराह मिहीर चे गणितातील योगदान सांगतो आहे. सदरील ऋषींच्या बद्दल अजून एक ज्ञात बाब म्हणजे ते सूक्ष्म देह धारण करून ( यावर विज्ञानाचा बिलकुल विश्वास नाही ) अंतराळात भ्रमण करत असे. आणि त्यांनी काही श्लोक लिहिले आहेत ज्यात त्यांनी तुम्ही अंतराळात प्रवास करत असला आणि तुम्हाला जिथे आहात तेथून सूर्य अथवा पृथ्वी दोन्ही सुद्धा दिसत नसेल तरीपण आपले लोकेशन ( स्थान ) कसे ओळखावे आणि प्रवास करावा यावर मार्गदर्शन केलेले आहे.

मध्यंतरी डिस्कव्हरीवर मंगलयान सफल झाल्यावर एक कार्यक्रम दाखवला गेला. त्यात नासा पहिली प्रयत्नात का अपयशी झाली याची चर्चा होती. आणि भारत का सफल झाला याचे सुद्धा विवरण होते. मंगलयान मंगल ग्रहाच्या कक्षेत स्थिर करताना एक समस्या वर सांगितल्या प्रमाणेच उद्भवली कि मंगल यान मंगल ग्रहाच्या उलट बाजूला होते. एका बाजूला सूर्य अन दुसऱ्या बाजूला पृथ्वी होती यानाला या पैकी काहीही दिसत नव्हते. या ठिकाणी वराह मिहीर ने सांगितलेली पद्धत वापरून प्रोग्राम बनवला होता आणि तो परफेक्ट होता त्या प्रमाणे मंगल यान सफलपणे मंगळावर उतरले.

आचार्य कणाद ज्यांनी अणु त्याच्या गर्भातील छोटे पार्टिकल यांच्यावर शास्त्रीय भाष्य केलेले आहे. आणि हा लेख वाचा. मी सांगत नाही तज्ञ अश्या पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा यावर शिक्का मोर्तब केलेलं आहे.

१०) वैदिक गणित, आपले पंचांग आणि त्यावर आधारित पर्जन्य मानाचे अंदाज:
गणित हा भारतीयांनी जगाला दिलेला शोध आहे. शून्यावर आधारित गणमान पद्धती हि भारताची देण आहे. भारतातून हे ज्ञान मध्य पूर्वेला गेले अरब लोकांनी ते युरोपात नेले. त्यामुळे गणिताला युरोपियन लोक अरेबिक म्हणत आणि अरबी लोक हिंदसा म्हणत अर्थात हिंद मधून आलेली गणन पद्धत. यावर आधारित आपले पंचांग हे आज सुद्धा सगळ्यात परफेक्ट आहे. आपल्याकडे पर्जन्यमान दर्शवणारे जितके ग्रंथ आहेत ते नक्षत्रांची स्थिती आणि त्यानुसार पर्जन्य आणि येणारे पिक हा अंदाज वर्तवतात तो अंदाज आपल्या हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक चांगला असतो.

११) ज्या विज्ञानाच्या यशाच्या आपण गप्पा मारत असतो त्याचा पाया उत्तम गणिती ज्ञान हा आहे आणि त्यात भारतीय खूप आधी पासून तज्ञ आहेत. आज तुम्ही गणिताचे ऑलिम्पियाड जिंकलेल्या कोणत्याही मुलाला विचारा तू काय करणार तो सांगतो मी पाय चे मूल्य अधिकाधिक चांगले मांडणार. पाय हा वर्तुळाचा व्यास मोजण्यासाठी वापरला जाणारा स्थिरांक आहे.
पाय चे मूल्य ३२ अंशापर्यंत या श्लोकातून समजते. पाय चे मूल्य शुल्बसूत्रातून काढले गेले आहे. आधुनिक विज्ञानाने पाय चे मूल्य २२ अंशापर्यंत काढले आहे.

१२) आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात
trillion च्या पुढे गणना नाही. आपल्या पद्धतीत. पद्म, महापद्म, अर्व, खर्व पर्यंत गणन करण्यासाठी शब्द आहेत.

१३) प्राचीन भारतातील हि सात शिव मंदिरे एकाच अक्षांशाला संदर्भ घेऊन बांधली आहेत. सर्व मंदिरे एकमेकांच्या पासून कमीत कमी काही हजार किलोमीटर दूर आहेत. असे असताना त्यांना ती एका रांगेत बांधता आली याचा अर्थ त्यांचे भूगोलाचे आणि अक्षांश आणि रेखांशाचे ज्ञान किती परिपूर्ण होते याचे द्योतक आहे.
मी इथे दिलेली माहिती म्हणजे सागरातील काही थेंब आहेत. शक्यतो प्रत्येक मुद्याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक विज्ञान म्हणजे कचरा आहे असे माझे बिलकुल मत नाही. आधुनिक विज्ञानाची दृष्टी वेगळी आहे. प्राचीन ऋषींची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या दृष्टीत लोककल्याणाची तळमळ अधिक होती. त्यांची दृष्टी अधिक निसर्गपूरक होती. दुर्दैवाने सध्याचे विज्ञान हे निसर्गाला आव्हान देण्यासाठी विकसित होते आहे. भारतीय ऋषींनी विकसित केलेले विज्ञान हे निसर्ग आणि मानव यांनी शांततापूर्वक सहजीवन व्यतीत करावे असे होते.
याठिकाणी मला चीनमधील एक महान विचारवंत कान्फूशियस याचे एक वाक्य उधृत करायचे आहे. तुम्ही निसर्गाच्या नियमांना बांधील राहून काही निर्माण केले तर निसर्ग ते टिकण्यास मदत करतो. तुम्ही निसर्गाला आव्हान देऊन काही निर्माण केले तर निसर्ग ते उध्वस्त करण्याच्या उद्योगाला लागतो. आपले आजचे विज्ञान असे संहारक होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पर्यावरणाच्या बदलांशी झुंजतो आहोत.

मी अध्यात्माच्या मार्गावर चालणारा एक छोटा पांथस्थ आहे. मला स्वतःला प्राचीन विज्ञान आणि अर्वाचीन विज्ञान असा लढा उभा करण्यात काहीही रस नाही.

पण इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपल्या देशात चार प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारात त्यांना भारतीय आणि त्यातल्यात्यात हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटते. त्यांना आपले सगळे जुने ज्ञान म्हणजे कचरा वाटतो आणि ते पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रेमात पडलेले असतात. दुसऱ्या प्रकारातील लोक स्वार्थी असतात. त्यांना वेद आणि प्राचीन ज्ञान यातील शून्य माहिती असते परंतु काहीही असले तर ते वेदात आहे म्हणून हि मंडळी ठोकून मोकळी होतात. त्यांचे वेद आणि प्राचीन ज्ञानाच्या बद्दलचे प्रेम बेगडी आणि स्वतःची तुंबडी भरणारे आहे. तिसऱ्या प्रकारातील लोक श्रद्धाळू असतात. लोक म्हणतात म्हणजे वेदात काही तरी भारी असेल असा विचार करून ते गप्प बसतात हि पाप भीरु मंडळी असतात. आणि स्वार्थी लोक यांनाच फसवतात. चौथ्या प्रकारात माझ्या सारखे लोक असतात. जे आपली मती वापरून या प्राचीन ज्ञान सागरातील एक दोन थेंब जरी मिळवता आले तरी त्याची चव कृतज्ञपणे चाखतात...
माझा लेख सर्वत्र प्रसारित करण्यास काहीही हरकत नाही..

वैज्ञानिक विचारसऱणी वर आधारित असलेल्या हिंदू धर्मात माझा जन्म झाला याचा मला अभिमान वाटतो .

*संकलित - साभारः सुन्दर मराठी

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाडीतून त्यांनी जाणले कि याने एक खून केला>>>
आपण आयुर्वेदाच्या बाजूने लिहिताय की विरोधात?

नाडी परिक्षेतून कोणी खून केलाय, कोणी चोरी केलीय वगैरे ओळखण्याचे आयुर्वेदात कुठे वर्णन केले आहे याचे श्लोक मिळतील का?

दर्शनस्पर्शनप्रश्नैः परीक्षेताथ रोगिणम्।
रोगांश्च साध्यान्निश्चत्य ततो भैषज्यमाचरेत्।।
दर्शनान्नेत्रजिह्वादेः स्पर्शनान्नाड़िकादितः
प्रश्नाहू1 तादिवचनैः रोगाणां कारणादिभिः।।

रोगाक्रान्तशरीस्य स्थानान्यष्टौ परीक्षयेत्।
नाड़ीं जिह्वां मलं मूत्रं त्वचं दन्तनखस्वरात्।।
कातरस्वरं चंचलनैंनं दर्शति व्यभिचारम ।
कंपनकरांगुली परीक्षयेत रिझल्टम मर्डरम ||

अहो नाडी परीक्षेतून बऱ्याच गोष्टी कळतात तश्या ...फक्त माणूस तसा भेटला पाहिजे .. इथं पाथर्डी तालुक्यात मढी गावा मध्ये पोपट मरकड म्हणून एक व्यक्ती/बुवा आहे ...ते नाडी पाहून काय दोष बाधा आहे ते सांगतात.. गुरुवारी शनिवारी तिथं प्रचंड गर्दी असते लोकांची ... मी स्वतः अनेक चित्र विचित्र प्रकार तिथं पहिले आहेत... आपणही येउन पाहू शकता ..तिसगाव-मढी रस्तावर त्यांचं घर आहे .. .. अगदी १००% करेक्ट प्रत्येक केस नाही निदान होत पण जेवढं पाहिलं आणि अनुभवलं त्यावरून तरी मला ते ढोंगी नाही वाटले .
बाकी आयुर्वेदाच्या पुस्तकाबाहेर हि बऱ्याच गोष्टी असतातच कि.. त्या डॉक्टरांचा नाव मी आता विसरलोय पण चौकशी करून नक्की सांगतो .

ज्यांना नाडी परीक्षेचा चमत्कार पाहायचाय आणि नगर ला येणे शक्य असेल तर मुळे म्हणून आयुर्वेदतज्ञ् आहेत . चितळेरोड ला लोढा टॉवर मध्ये त्यांचं क्लिनिक आहे . हे नाडी पाहून आजार च निदान करतील पण महत्वाचं म्हणजे आयुर्वेदाच्या ग्रंथात वर्णन नाहीत अश्या तुमच्या वैयक्तिक जीवनातील सवयी आणि अश्या गोष्टी ज्या फक्त तुम्हालाच माहितेय ते पण सांगतील ... मला त्यांनी डायरेक्ट सांगितलं कि मला अमुक अशी वाईट सवय आहे आणि मी दिवसभर कॉम्पुटर पुढे बसून असतो.. माझ्या आईला सांगितलं कि तुमचं अमुक अमुक इतकं हिमोग्लोबीन आहे आणि गर्भाशयावर अमुक ठिकाणी गाठ आहे ... .. आता सांगा कोणत्या पुस्तकात हे वर्णन मिळेल .. माझा विश्वास नसेल तर स्वतः जाऊन पहा ..

बाकी यांच्या औषधाचा मला किंवा आईला काही गुण नाही आला तो भाग वेगळा ... खीखीखी .....

अहो नाडी परीक्षेतून बऱ्याच गोष्टी कळतात तश्या ...फक्त माणूस तसा भेटला पाहिजे .. इथं पाथर्डी तालुक्यात मढी गावा मध्ये पोपट मरकड म्हणून एक व्यक्ती/बुवा आहे ...ते नाडी पाहून काय दोष बाधा आहे ते सांगतात.. गुरुवारी शनिवारी तिथं प्रचंड गर्दी असते लोकांची ... मी स्वतः अनेक चित्र विचित्र प्रकार तिथं पहिले आहेत... आपणही येउन पाहू शकता ..तिसगाव-मढी रस्तावर त्यांचं घर आहे .. .. अगदी १००% करेक्ट प्रत्येक केस नाही निदान होत पण जेवढं पाहिलं आणि अनुभवलं त्यावरून तरी मला ते ढोंगी नाही वाटले .
बाकी आयुर्वेदाच्या पुस्तकाबाहेर हि बऱ्याच गोष्टी असतातच कि.. त्या डॉक्टरांचा नाव मी आता विसरलोय पण चौकशी करून नक्की सांगतो .
ज्यांना नाडी परीक्षेचा चमत्कार पाहायचाय आणि नगर ला येणे शक्य असेल तर मुळे म्हणून आयुर्वेदतज्ञ् आहेत . चितळेरोड ला लोढा टॉवर मध्ये त्यांचं क्लिनिक आहे . हे नाडी पाहून आजार च निदान करतील पण महत्वाचं म्हणजे आयुर्वेदाच्या ग्रंथात वर्णन नाहीत अश्या तुमच्या वैयक्तिक जीवनातील सवयी आणि अश्या गोष्टी ज्या फक्त तुम्हालाच माहितेय ते पण सांगतील ... मला त्यांनी डायरेक्ट सांगितलं कि मला अमुक अशी वाईट सवय आहे आणि मी दिवसभर कॉम्पुटर पुढे बसून असतो.. माझ्या आईला सांगितलं कि तुमचं अमुक अमुक इतकं हिमोग्लोबीन आहे आणि गर्भाशयावर अमुक ठिकाणी गाठ आहे ... .. आता सांगा कोणत्या पुस्तकात हे वर्णन मिळेल .. माझा विश्वास नसेल तर स्वतः जाऊन पहा ..

बाकी यांच्या औषधाचा मला किंवा आईला काही गुण नाही आला तो भाग वेगळा ... खीखीखी .....
plz excuse if ithis is repost since I couldnt saw my earlier replies

>>>>मला त्यांनी डायरेक्ट सांगितलं कि मला अमुक अशी वाईट सवय आहे आणि मी दिवसभर कॉम्पुटर पुढे बसून असतो.. >>>>>
हायला , कसले लोडेड स्टेटमेंट आहे हे Wink

@सिम्बा आता जे आहे ते आहे ... हि घटना तशी २००५ मधली आहे ... मी पिंपल्स च्या समस्येसाठी त्यांच्याकडे गेलेलो .. त्यांनी मात्र भलतंच सांगितलं .... दहावी चे पेपर्स संपले होते आणि भरपूर सुट्ट्या होत्या ..मग आता मोकळ्या वेळेत काय करायचं असा प्रश्न असायचा .. बाकी आयुष्यात तो काळ मात्र मस्त होता ..
त्या नंतर त्यांचा एवढा धसका घेतला कि बरेच वर्ष त्यांच्याकडे गेलोच नाही.

हा धागापण भलतीकडे भरकटण्याआधी मूळ मुद्यावर येउन काही टाकतो
वाईच्या वेद पाठशाळेत पुर्वी वेदमंत्र उच्चाराच्या स्पर्धा भरत .. यात एक मडके समोर लटकावले जात असे .. जो कोणी आपल्या मंत्रोचारच्या साहाय्याने ते मडके फोडत असे तो जिंकत असे ...
अथर्ववेदी ब्राह्मण हा यद्न्यकर्माच्या रक्षणासाठी जबाबदारी घेत असे .. या वेदामध्ये मंत्र , मणी, आणि औषधी असे तीन भाग असतात ढोबळमानाने .. अधिकारी अथर्वण ब्रह्मन् फार आधीच नामशेष झाले असून आता जे जे आहेत ते बहुतेक नावापुरते असतील फक्त ..
या विषयीची एक घटना एका पुस्तकातून टाकत आहे .. ज्याला वैदिक मंत्र विद्येविषयी माहिती हवी आहे त्यांनी जरूर ते पुस्तक वाचावे ..Untitled.png

नाडीपरीक्षावाले पोलिसांना गुन्हेअन्वेषणात मदत करू शकतील. छान आहे ते.

जिद्दू , तुम्ही लोकसत्तेतल्या लेखाचा विषय काढला ते छान झालं. ती लेखमाला या विषयासाठी खूपच रेलेव्हंट आहे.
तुम्ही म्हणता ते आयुर्वेदावरचे लेख
१. आयुर्वेद - विज्ञान की भाकडकथा
२. आयुर्वेद = एकविसाव्या शतकासाठी
३. आयुर्वेद - आव्हाने आणि शक्याशक्यता

वेदांमधील अद्भुत विज्ञान या संकलित लेखावर हा उतारा योग्य आहे - : पुराणातील वानगी पुराणात

त्याच मालिकेतला प्राचीन भारतातील विमानविद्या हा लेख

आयला!
जिद्दुचे प्रतिसाद वाचून 'ती' नाडी अन तिच्यावर्च्या चर्च्या आठवल्या. तिथे पण सेम आर्ग्युमेंट असे, 'पेहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो'.

@भरत या लेखांसाठी आपले खूप आभार ... मुळात हे नाडीतज्ञ् दुर्मिळ झालेत आणि त्यात असल्या लफड्यात कोण पडणार ? ..शिवाय जरी कोणी तयार झाला तरी त्याचा पुरावा कोणतं कोर्ट ग्राह्य धरणार .. शिवाय त्यात भूतकाळाची जाणीव होत असली तरी विशिष्ट इव्हेंट पकडणं अवघड आहे कारण फार जुन्या गोष्टी कळायला तेवढ्या तयारीचा तज्ञ् हवा तरच हे शक्य आहे . माझ्या अनुभवत चालू काळातल्याच गोष्टी कळतात बहुतेकांना .. बाकी एवढं मात्र नक्की कि एक वेळ नार्को टेस्ट ला फसवता येईल पण याला फसवणं अवघड आहे ..
दाभोलकर प्रकरणात हे असला कोण प्लँचेट वाला पकडला होता पुणे पोलिसांनी तपासासाठी तेव्हा पोलिसांवर कसा हे प्रकरण शेकलं ते चान्गलाच आठवतंय .. माझे एक नातेवाईक त्यावेळी पुण्यात मोठ्या हुद्दयावर काम करत होते ... त्यांनी याचा किस्सा मोठा रंगवून सांगितलेला पण ते सगळं इथं टाकणं योग्य नाय होणार ..

बाकी माझ्या माहितीत एल नाथसंप्रदायात वयोवृद्ध आहेत .. ते धनकवडीच्या शंकर महाराजांचे कृपांकित आहेत. शंकर महाराजांचे पट्टशिष्य डॉ. नागेश धनेश्वर यांचे गुरु होते .. धनेश्वर शेवटच्या काळात नगरहून मुलांकडे पुण्याला राहायला गेले .. तर या गृहस्थांकडे एक सिद्ध शाबरी मन्त्र आहे ज्यात काश्याच्या एका थाळीला भस्म स्नान घालून मंत्र म्हणून फुंकल्यावर पाहिजे ती गोष्ट दिसू शकते .. तरुणपणात त्यांनी याचा काही वेळा उपयोग केला पण नंतर गुरूच्या आदेशानंतर हे प्रकार बंद केले .. बाकी गडी एकदम ठणठणीत अजूनही गायत्री अनुष्ठान आणि हठयोगाचा अभ्यास चालू असतो. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खातात आणि बरेच कडक नियम आहेत त्यांचे .. बाहेर फार लोकांना त्यांच्या विषयी माहित नसल्याने बोभाटा व्हायचा प्रश्न नाही आणि ज्यांना माहिती आहे ते गेले तरी पण फार त्रोटक काहीतरी सांगतात .. मी बराच वेळा काही शिकवायचा आग्रह केला पण नाही म्हणतात .. याना बटुक भैरव सिद्ध आहे त्याचा काहि उपयोग करत नाहीत .. बहुतेक अध्यात्मात वरच्या लेवल ला गेल्यावर असल्या भानगडीत हि मंडळी पडत नसावीत .. बाकी असल्या बऱ्याच लोकांचा शोध घेतला पण बहुतेक सगळे झोलझाल असतात ..
आयुर्वेदाचे मात्र जबर अनुभव आहेत माझ्या माहितीत कारण ते कोणीही करून पाहू शकतो योग्य मार्गदर्शन आणि वैद्य भेटल्यास

Pages