सध्या अमेरिकेत भारतीयांविरुद्ध हेट क्राईम्स होण्याच्या काही कारणांपैकी एक म्हणजे अमेरिकन लोकांना भारतीय (हिंदू), मुस्लिम आणि शीख लोकांमधला फरक समजत नाही हे दिले जाते. त्यानंतर अमेरिकन लोकांचे "जगाबद्दलचे" ज्ञान हमखास काढले जाते. साधारण अमेरिकन माणसाला जगाची कशी काहीच माहिती नसते, कारण त्यांना अमेरिका सोडून बाकी फारसे काही माहिती नसते. त्यामुळे चुकून त्यांच्या हातून मुस्लिम समजून हिंदू मारले जातात.
या अशा लॉजिकचा ज्यांच्या जवळच्यांचा जीव गेला आहे अशाना काहीच उपयोग नसतो. बंदूक बाळगण्याचे स्वातंत्र्य काढून घेण्यासाठी ओबामा सरकारने बरेच लॉबिंग केले होते. ओबामा सरकारच्या काळात सँडी हुक (कनेटिकट) मध्ये असेच अमानुष हत्याकांड घडले होते, आणि तिथे तर १० वर्षांखालील मुलांवर अंदाधुंद गोळीबार झाला होता. तेव्हा बाराक ओबामांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते. कोणालाही हलवून टाकेल असा तो प्रसंग होता. आणि त्यामुळे बंदूक वापरायचा परवाना मिळवणे कठीण केले पाहिजे इथपर्यंत तरी चर्चा झाली होती.
पण असे प्रसंग घडतात आणि विसरले जातात. भारतीयांविरुद्ध असे चुकून हेट क्राईम्स ९/११ नंतर देखील झाले होते. यात शीख लोकांचे नाहक बळी गेले. पण मुस्लिम समजून चुकून मारले गेले असले तरी असा द्वेष करणाऱ्या माणसाच्या हातात बंदूक द्यावी, आणि ती बाळगणे हा त्याचा मूलभूत हक्क असावा हा मोठा विरोधाभास आहे.
अमेरिकन लोकांना भूगोलाचे ज्ञान असावे अपेक्षा ठेवण्यापेक्षा अमेरिकेत बंदूक बाळगण्याचा कायदा बदलावा यासाठी प्रयत्न करायला हवे. कारण भौगोलिक ज्ञानाच बघायचे असेल तर सामान्य भारतीय माणसापुढे एक फ्रेंच आणि एक अमेरिकन उभा केला तर त्या दोघांनाही गोरे नाहीतर फिरंगी हे एकच विशेषण लागू होते. आपल्या पैकी किती लोकांना सुन्नी, शिया, बोहरी, बहाई, सुफी अशा सगळ्या प्रकारच्या मुस्लिम पंथांची माहिती असते? किती जणांना ज्युईश लोकांचे अंतर्गत पंथ, जसे की हेसिडिक आणि झियोनिस्ट यातला फरक समजतो? कॅथलिक, प्रोटेस्टंट, अँग्लिकन, मेथाडिस्ट, मॉर्मन असे ख्रिश्चन धर्माचे विभाग माहिती असतात?
एवढेच काय, कर्नाटक, आंध्र, केरळ, तामिळनाडू या सगळ्या राज्यातून आलेल्या लोकांना मराठी लोक "मद्रासी" या एका विशेषणाने निर्लज्जपणे संबोधतात. तसेच मणिपूर, मिझोराम, आसाममधून येणाऱ्यांना नेपाळी नाहीतर चिनी करून टाकतात. फरक एवढाच की ज्या लोकांना यांचा "त्यांच्या राज्यातील नोकऱ्या" चोरल्याबद्दल राग येतो, त्यांच्या हातात भारतीय सरकारनी कायदेशीर बंदुकी दिलेल्या नसतात.
आणि याही पुढे जाऊन, जर जीव गमावलेला माणूस मुस्लिम असेल तर या हल्ल्याचे समर्थन करता येते का? भारतीय वंशाच्या हिंदू लोकांना या घटना घाबरवून टाकतात आणि अस्थिर करतात कारण गोळ्या झाडायची आधी कुणी त्यांचा पासपोर्ट बघायला किंवा धर्म विचारायला येत नाही. त्यांची पहिली ओळख म्हणजे बांगलादेशी, पाकिस्तानी आणि मध्य पूर्वेतील लोकांशी साधर्म्य असणारा त्यांचा रंग.
ट्रम्पच्या आधीचे ओबामा सरकारदेखील इमिग्रेशनबद्दल अतिशय कडक होते. ९/११ नंतर अमेरिकेने त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी "व्हिसा मँटिस" हा सिक्युरिटी चेक सुरु केला होता. "स्टेम"(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, मॅथेमॅटिक्स) या क्षेत्रात काम करणाऱ्या कित्येक शास्त्रद्यांना या पॉलिसीचे फटके बसले आहेत. पण सुरक्षेसाठी काही निष्पाप लोकांचे थोडे नुकसान झाले तरी बेहत्तर पण आतंकवादी अमेरिकेत येऊ नयेत हाच त्यामागचा हेतू होता. असे असतानादेखील ओबामा सरकारने मध्य पूर्वेत आणि मुस्लिम देशांशी संबंध चांगले ठेवायचे आणि इस्लामोफोबिया दूर करण्याचे सतत प्रयत्न केले.
पण उघडपणे मुस्लिमांविरुद्ध आणि परदेशातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांबद्दल इतक्या त्वेषाने बोलणारा ट्रम्प हा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे. जरी "हिंदूंवर" त्यांची मेहेरनजर असली, तरी अशी धर्मीक असहिष्णुता, हिंदू आणि मुसलमान यांच्यातील फरक बघून दाखवली जाणार नाही हे ही एक सत्य आहे. ब्रेक्झिटच्या मतदानाच्यावेळी सुद्धा भारतीय लोकांनी इतर (मुस्लिम) लोकांचे ब्रिटनमध्ये स्थलांतर थांबवायच्या बाजूने मतदान केले होते. तसेच अमेरिकेतील श्रीमंत भारतीयांनी ट्रम्पसाठी प्रचार आणि मतदान केले. पण जेव्हा धार्मिक ध्रुवीकरण करून एखादा नेता निवडून येतो, तेव्हा त्यांनी मतदानाच्या काळात टाकलेली एक ठिणगी पुढे कधी आणि किती अक्राळविक्राळ रूप धारण करेल याचा अंदाज त्या नेत्यालादेखील नसतो.
जागतिकीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण हे एकत्र यशस्वी होऊ शकेल असे जग आता कुठेच राहिले नाही. आपल्या सगळ्यांचेच हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे एखाद्या जमातीविरुद्ध केलेल्या नकारात्मक प्रचाराचे पडसाद सगळ्यांवरच पडण्याची भीती आहे. आणि म्हणून निदान आत्मसंरक्षणासाठी तरी हे ध्रुवीकरण थांबवायला हवे. प्रचारातही आणि सोशल मीडियावरही.
लेखाचा विषय (किंवा छुपा
लेखाचा विषय (किंवा छुपा हेतूदेखील) भारत आणि त्यातील (सध्याचे) राजकारण नाहीये. हा केवळ गन कंट्रोल आणि धार्मिक ध्रुवीकरण या बद्दल लिहिला होता. पण पुन्हा पुन्हा काही प्रतिसादांची गाडी भारतावर घसरते आहे. असे पॅरलल मी कुठेही तयार केले नसताना, ते वाचताना तयार होते आहे, तेदेखील लेखातील आशयाच्या विरोधकांकडून, हे इंटरेस्टिंग आहे.
सई.
सई.
हे सगळे होण्यासाठी कारणीभुत नुसते राजकारणी लोक हा एकमेव घटक नाही. सामाजिक विषमता आर्थिक विषमता असे कित्येक घटक जोडीस येतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्म आणि त्यातील प्रक्षोभित उजवी बाजूंकडे ओढले जाणारे तरुण. कुठलाही धर्म असो. त्यात एक्स्ट्रिम विंग कडे झुकलेले किंबहूना त्यांना विविध कारणे दाखवून इतर धर्मातील रुढी-परंपरेची भिती दाखवुन ओढून घेतलेले विविध वयोगटातील लोक हे असे वागतात. आपण या सगळ्याकडे "शिक्षण" मिळत नाही असा एक मुद्दा काढून इतर सगळ्या मुद्द्यांवरची जवाबदारी त्या "शिक्षण मुद्यावर" ढकलून देतो. परंतू असे हल्लेखोर , आतंकवादी, नक्षलवादी यांचे शिक्षण बघितले तर बर्याचदा तोंडात बोट जातात. "केमिकल इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रोफेसर, डॉक्टरेट," असे अतिउच्चशिक्षित लोकांनी या राईट विंग जॉईन केल्या आहे. त्यामुळे शिक्षण हा मुद्दा येत्या काही दिवसात बाद होईल अशी भिती आहे.
बेकार बसलेल्या लोकांना विविध आमिषे दाखवून स्वतःचे निषेधात्मक काम करून घेण्यासाठी वापरून घेतले जाते. असे काम करून घेण्यासाठी त्यांना पैसे, सुविधा इ. बरोबर धर्म, राष्ट्रवाद, उच्चवर्णिय असे भावनिक मुद्द्यांचा मारा केला जातो. असे मुद्दे बेरोजगार तरुण लवकर कॅच करतात.
उदा. एकाला "हा बघ अमुक तमुक वाईट धंदा करतोय त्याच्याबरोबर फिरू नकोस" असे सांगितले तर तो दुर्लक्ष करेल. पण तुम्ही जर असे म्हणालात " हा बघ, अमुक तमुक प्राण्याला खातो त्याच्या बरोबर फिरू नकोस" तर तो त्या व्यक्तीपासून लांब होईल.
नेमका हाच फरक राईट विंगवाल्यांनी अगदी अचूक ताडला आहे. कुणाला काय सांगायचे, कसे ट्रेन करायचे, त्याचे मन आपल्या बाजूने कुठल्या मुद्द्यावर वळवायचे, एकदम परफेक्ट जमू लागले आहे.
७२ हुरांशी लग्न करण्याकरीता मला मरायची गरज काय? मला जिवंतपणी एका बायको बरोबर सुखात संसार करता येईल. -
समोरचा कुठलाही प्राणी का खाईना माझ्या घरात येऊन तर खात नाही ना, माझे तर त्याने काही बिघडवले नाही मी का कुणाच्या नुसत्या सांगण्यावरुन इतरांशी शत्रुत्व घेऊ ?
असे प्रक्टिकली प्रश्न लोकांच्या मनात यायला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा खरा काय तो बदल होईल. पण दुर्दैवाने इतका सारासार विचार करणार्यांना स्युडो, देशद्रोही, विचारजंत, इ. बर्याच संबोधन दिले जातात. समोरचा तुम्हाला प्रॅक्टिकली विचार करायला सांगतोय तर तो तुमचा शत्रू झाला , देशद्रोही झाला, धर्मातून हद्दपार झाला. इतकी वाईट विचारसरणी लोकांची झाली आहे.
माझी नोकरी इतर धर्मिय, प्रदेशातून आलेल्या व्यक्तीमुळे जात आहे/गेली आहे. असा विचार करण्यापेक्षा "सरकार नोकर्यांची संख्या २ वरुन ५ का वाढवू शकत नाही" असा विचार मात्र कुठल्याही देशाचा नागरीक करत नाही. कारण तिथले सरकार, राजकारणी लोक असा प्रचार करतात आणि लोकांचा जो असंतोष आहे तो अशा मुद्द्याकडे वळवतात. हे राजकारणी स्वतः देशात नविन नोकर्या निर्माण करंण्यात निष्क्रिय होतात. आणि खापर बाहेरुन आलेल्या लोकांवर फोडतात. तो मुद्दा भावनिक असल्याने लोकांना तेच बरोबर वाटू लागते. सरकारच्या निष्क्रियतेकडे दुर्लक्ष करण्यात येते.
खरतर भ्रष्टाचार, लेटलतिफ, उदसीनता असे बरेच वाईट संगती राजकारणी लोकांना लागल्या आहे. त्याकडे जनतेचे लक्ष जात नाही. कारण ते राजकारणी सुध्दा जनतेमधुनच आलेले असतात. त्यांच्यासारख्याच सवयी असतात.
"अमुक तमुक अधिकारी लाच खातो" हे कळल्यावर जनता असंतोषीत होऊन त्या अधिकार्याला जाब विचारायला नाही जात परंतू "अमुक तमुक या प्राण्याचे मांस खातो." हे कळल्यावर मात्र जनता असंतोषीत होऊन त्या व्यक्तीला नुसता जाब नाही तर मारहाण सुध्दा करते. काही माथेफिरू तर गोळ्या सुध्दा झाडतात. आपल्या भारतात तर विरोधकांना "पाकिस्तानात जा" असे नुसते धमकवले जाते पण अमेरिकेत तर " तुझ्या देशात जा" असे म्हणत गोळ्या सुध्दा चालवल्या जातात.
-
मुळात लोकांकडे इतकी हिंमत इतकी मानसिक पाठबळ मिळते कुठून ? अर्थात सत्ताधारी, उच्चपदांवर बसलेल्या लोकांकडून. जेव्हा अश्या उन्मादाला उच्चपदावरील व्यक्ती, संस्था, संघटना इथून पाठबळ मिळते तेव्हा उन्मादधारी लोक निर्धास्त होतात, त्यांच्या मनातून पोलिस, कायदा इ. नैतिकतेला त्यागले जाते. साधा ऑफिस मधे एकाला पिडत असताना बॉस ने नुसते दुर्लक्ष केले तरी ऑफिसमधे कर्मचारी अजुन जास्त पिडायला सुरुवात करतात इथे तर सरळ सरळ बॉसच "पिडा, त्रास द्या," इ. जाहीर ऑर्डरी देत आहे.
ही घोळक्याची मानसिकता आहे. घोळक्याला फक्त भावनिक मुद्दा द्या, थोडेसे उच्चपदावरून पाठबळ द्या. मग बघा त्यांचा उन्माद. मग तो घोळका कशाचा ही असो. मुस्लिम, हिंदु, ख्रिस्चन इ. कुठल्याही धर्माचा असो अथवा अमेरिकन, भारतीय, जर्मनी अशा कुठल्या राष्ट्रवादाचा असो.
अशांना पाठबळ देणारी यंत्रणा बंद झाली पाहिजे. तरच हे सगळे थांबेल.
मुळात लोकांकडे इतकी हिंमत
मुळात लोकांकडे इतकी हिंमत इतकी मानसिक पाठबळ मिळते कुठून ? ..........................मुस्लिम, हिंदु, ख्रिस्चन इ. कुठल्याही धर्माचा असो अथवा अमेरिकन, भारतीय, जर्मनी अशा कुठल्या राष्ट्रवादाचा असो.
सगळे पटले.
लेखाचा विषय (किंवा छुपा
लेखाचा विषय (किंवा छुपा हेतूदेखील) भारत आणि त्यातील (सध्याचे) राजकारण नाहीये. हा केवळ गन कंट्रोल आणि धार्मिक ध्रुवीकरण या बद्दल लिहिला होता. पण पुन्हा पुन्हा काही प्रतिसादांची गाडी भारतावर घसरते आहे. असे पॅरलल मी कुठेही तयार केले नसताना, ते वाचताना तयार होते आहे, तेदेखील लेखातील आशयाच्या विरोधकांकडून, हे इंटरेस्टिंग आहे. >>>>>>>>>>> ++१
अमेरिकेत भारतीय मारले गेले आणि तिथल्या इतर भारतीयांनी काळजी व्यक्त केली तर ठराविक लोक "बरी खोड मोडली" अशा टाइप च्या प्रतिक्रिया का देत आहेत हे कळण्याच्या पलिकडे आहे!! (उदा नानाकळा यांची मागच्या पानावरची प्रतिक्रिया) इथेच नाही तर माबो वर बर्याच ठिकाणी ही विकृत वृत्ती दिसून येते आहे, विशेषतः ट्रम्प निवडून आल्यापासून. "आम्हाला मोदी झेलायला लागतात आता बरं झालं तुम्हालाही ट्रम्प मिळाला" आमचं वाईट झालं आता इतरांचं ही होऊ दे! ही काय भानगड आहे? एखाद्याचं/ एखाद्या समूहाचं वाईट व्हावं अशी जाहीर निगेटिविटी कशामुळे ? हे कुणी सांगितले तर बरे होईल!
नानाकळा तुम्हीच सुरुवात केलीत तर उत्तम!!!
मी काय बोललो त्याची जबाबदारी
मी काय बोललो त्याची जबाबदारी माझी, तुम्ही काय समजलात त्याची जबाबदारी माझी नाही.
थोड्या वेळाने सविस्तर उत्तर देतो, पण बराचसा भाग आधीच दिपस्त यांच्या प्रतिसादात आलेला आहे.
>>पण तो मुसलमान नव्हता..<<
>>पण तो मुसलमान नव्हता..<<
पण तो मुसल्मान असता तरी त्याला मारण्याचा अधिकार कोणाला नाहि...
एनीवे, अमेरिकेत गन ओनर्शीप हा क्लिष्ट विषय आहे. गन लॉबी कंट्रोल करणार्या एनारेची अशी धारणा आहे कि - दि ओन्लि थिंग दॅट कॅन स्टॉप ए बॅड मॅन विथ ए गन, इज ए गुड मॅन विथ ए गन...
दिपस्त यांचा प्रतिसाद बराचसा
दिपस्त यांचा प्रतिसाद बराचसा पटला, आवडला.
दीपस्त यांनी लिहिलेल्या
दीपस्त यांनी लिहिलेल्या प्रतिसादाला अनुमोदन.
शशी थरूर सुद्धा त्यांच्या भाषणात हेच म्हणतायत.
कुठल्याही देशात/राज्यात इमिग्रेशन होते तेव्हा ती दोन्ही पक्षांची गरज म्हणूनच होते. इमिग्रेशनची लिंक देशभक्ती (किंवा तिचा अभाव) लावणे किंवा आत्ताच्या परिस्थितून शाडेनफ्रॉईड अनुभवणे हा या लेखाचा हेतू मुळीच नाहीये. कारण मला "राष्ट्र" वगैरे कल्पना फारश्या पटत नाहीत. आपण जसे कुणाच्या पोटी जन्माला येऊ हे आपण ठरवू शकत नाही तसेच कुठल्या देशात जन्माला येऊ हेदेखील नाही. त्यामुळे जिथे आपण आनंदी राहू शकतो तिथे राहावे. त्याला कुठलेच एक्सप्लेनेशन नसावे.
आणि अगदी या केस मध्ये बोलायचे झाले तर भारतीय इमिग्रण्टस "चीप लेबर" वगैरे नाहीत. सगळेच भारतीय लोक स्किल्ड असतात आणि त्यांचे जॉब्स असे उचलून अमेरिकन लोकांना देता येतील का हेदेखील शंकास्पद आहे. बेकारी असणे हे एक सत्य आहे आणि काम करण्यासाठी योग्य माणूस मिळणे हे दुसरे सत्य आहे. एक आहे म्हणून दुसरे होईलच असे नाही (हा माझा भारतातातला पर्सनल अनुभव आहे). कित्येक वेळा शेकडो लोकांचे इंटरव्ह्यू घेऊनदेखील योग्य माणूस मिळत नाही. त्यामुळे "आमचे जॉब्स घेतात" ही अगदीच बाळबोध तक्रार आहे.
भारतीय इमिग्रण्टस "चीप लेबर"
भारतीय इमिग्रण्टस "चीप लेबर" वगैरे नाहीत. सगळेच भारतीय लोक स्किल्ड असतात आणि त्यांचे जॉब्स असे उचलून अमेरिकन लोकांना देता येतील का हेदेखील शंकास्पद आहे. बेकारी असणे हे एक सत्य आहे आणि काम करण्यासाठी योग्य माणूस मिळणे हे दुसरे सत्य आहे. एक आहे म्हणून दुसरे होईलच असे नाही (हा माझा भारतातातला पर्सनल अनुभव आहे). कित्येक वेळा शेकडो लोकांचे इंटरव्ह्यू घेऊनदेखील योग्य माणूस मिळत नाही. त्यामुळे "आमचे जॉब्स घेतात" ही अगदीच बाळबोध तक्रार आहे.
>> हे या केस मध्ये बोलायचं असं लिहून तुम्ही लिहिलंय. पण या केसशी बोलायचं तर सगळेच भारतीय वगैरे लिहिल्याने ते ह्या केसशी वाटत नाही. म्हणून हे मेजर जनरलायझेशन झालंय. आणि हल्लेखोर माणसाने हल्ला करण्यापूर्वी हा खरंच माझा जॉब घेतोय का? ह्याची शहानिशा करणे हे अगदीच हास्यास्पद झालं ना?
तुम्ही बाहेरचे लोक आलात. आमचा जॉब गेला. यात कॉजल रिलेशन आहे का नाही हे कुणी बघत नाही.
जॉब चीप लेबर अमेरिकेत आल्याने गेला का चीप लेबर दुसरीकडे मिळतं म्हणून आउटसोर्स झाला? का ऑटोमेशन मुळे गेला? काही का असेना जॉब गेला. तो एक कुणी मसीहा परत आणणारे. कसा आणणारे? तर तो इनक्रेडीबली ग्रेट आहे म्हणून आणणारे. बास्स. बाकी टी व्यक्ती इमिग्रट आहे का सिटीझन आहे? बाय बर्थ सिटीझन आहे का नॅचरलाईज्ड आहे. हु केअर्स. रंग वेगळा आहे. धर्म मग तो ज्यू असेल का हिंदू असेल का मुस्लिम. वेगळा आहे.
आणि ही सेकड अमेडमेंट बंदूक त्याची या जन्मात कोणी काढून घेऊ शकत नाही. राज म्हणतायत तसं याने बंदूक काढली की आपण पण काढायची. ठो ... मग माझा पण ठो. दुर्दैवाने खोक्यांच्या राशीत पडायला हा हिंदी पिक्चर नाही. पण हाच उपाय मला आता दिसतो.
हे मी लिहीन असं मला जन्मात वाटलं न्हवत. दुर्दैव.
@ अमितव
@ अमितव
>>>आणि हल्लेखोर माणसाने हल्ला करण्यापूर्वी हा खरंच माझा जॉब घेतोय का? ह्याची शहानिशा करणे हे अगदीच हास्यास्पद झालं ना?
ते हास्यास्पद आहे म्हणूनच असे जनरल ध्रुवीकरण करणे धोक्याचे आहे असे माझे म्हणणे आहे. मी वर लिहिलंय ते सगळं भारतात बसून (माझा काहीही संबंध नसताना), बातम्या वाचून केलेले विचार आहेत. शेवटी दीपस्त म्हणतात तसे सगळे मॉब सायकोलॉजीवर येते. आणि त्याला आपला काही इलाज नाही.
>>>आणि ही सेकड अमेडमेंट बंदूक त्याची या जन्मात कोणी काढून घेऊ शकत नाही. राज म्हणतायत तसं याने बंदूक काढली की आपण पण काढायची.
मी व्हीप नावाची मालिका बघायचे/बघते. त्यात गन लॉबी निवडणुकांना कशी मदत करते याचे एक विनोदी चित्रण होते. जुलिया लुई ड्रायफसनी फार छान काम केले आहे. पण विनोदांनी घेतले असले तरी सगळीकडे निवडणुकांना कुठल्यातरी अशा एका लॉबीकडून फन्डिंग मिळते. जे रेसमधल्या सगळ्या पार्ट्यांना मिळते. त्यामुळे डेमोक्रॅटिक असो व रिपब्लिकन, दोघांनीही गन लॉबीचे पैसे घेतलेले असतात. त्यामुळे त्यांच्याविरोधी जाण्याचे पॉलिटिकल विलच नसते.
"लोकांना काय वाटते" हा मुद्दा फारसा ग्राह्य नाही. आधी राजकारण्यांना ते करायची इच्छा असली पाहिजे. या अनुशंघाने बर्नी सँडर्सचा क्लीन कॅम्पेन फन्डिंग उपक्रम फार चांगला होता.
>>> जागतिकीकरण आणि धार्मिक
>>> जागतिकीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण हे एकत्र यशस्वी होऊ शकेल असे जग आता कुठेच राहिले नाही. <<<<
मला शंका आहे या विधानातील गर्भितार्थाबाबत. किंबहुना, सगळे जग, आपापल्या या वा त्या अस्मिता/संस्कृती यांचे ध्रुविकरणात कायमच राहिल्या आहेत, व जगाच्या अंतापर्यंत राहतील, मग ते धृविकरण धर्माधारीत असेल, वा भाषिक असेल, वा वांशिक असेल व तत्सम काहीही. पण आयडेन्टीटी मिळविण्याची व मिळालेली आयडेन्टी टिकवुन धरण्याची मानवी आंतरिक ओढ धृविकरणापासुन कुणालाही रोखू शकणार नाही. याशिवाय, "आक्रमकांनी" त्यांची रुढी/परंपरा/नियम लादण्यापासुन स्वतःला वाचविण्यासाठीदेखिल हे धृविकरण होतच रहाणार. याचेशी "जागतिकीकरणाचा(?)" काहीही संबंध येणार नाही. उलट जागतिकीकरणात, धृविकरणाचे कोष अधिकच बळकट केले जातिल, असे माझे मत. जे तसे करणार नाहीत, ते माया संस्कृती/रेड इंडियन्स प्रमाणे "नष्ट" होतिल.
>>>>> आपल्या सगळ्यांचेच हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. <<<< हा अजुन एक गैरसमज.
हितसंबंध जरुर गुंतले आहेत, पण ते फक्त "व्यापारी" हितसंबंध जास्त गुंतलेले आहेत, व जोवर व्यापार हा व्यापाराच्या नियमानुसार होतोय, तोवर कसल्याही धृविकरणाची गरज रहात नाही, वा असलेल्या धृविकरणाचा अडथळा होत नाही.
परंतु ज्याक्षणी "या हितसंबंधात" एका अंगास, दुसर्यांच्या संस्कृतीवर/अस्मितेवरच नव्हे, तर अस्तित्वासही धोका निर्माण करण्याची क्षमता प्राप्त होते, त्याक्षणी साहजिक प्रतिसादात्मक क्रिया म्हणून दुसरीकडचे धृविकरण अटळ असते, व त्याचे बरेवाईट परिणामही अटळ असतातच. प्रतिसादात्मक तरी का होईना, दुसरीकडून धृविकरण झालेच नाही, तर तो समाज "अस्तित्व/आयडेन्टीटी/ओळख" गमावुन बसतो याचे कैक दाखले इतिहासातुन घेता येतिल.
वरील मते माझी आहेत, होप सो, की या पोस्टी उडविल्या जाणार नाहीत.
@ लिंबू
@ लिंबू
तुम्ही जे वर्षानुवर्षे घडत येतंय हे म्हणताय ते बरोबर आहे. जिथे जिथे बाहेरून आलेल्या व्यक्ती स्थायिक झालेल्या आहेत, तिथे तिथे त्यांच्याबद्दल संतापही व्यक्त झालेला आहे. पण अशा संतापाला राजकारण्यांनी उघडपणे एक्स्प्लॉईट करणे हे बेजबाबदार आहे. जर असा संताप व्यक्त होत असेल तर कायदे कडक करून थांबवला पाहिजे.
सेकण्ड जनरेशन भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत.
कित्येक ब्रिटिश पासपोर्ट होल्डर्स हे भारतीय किंवा आशियायी वंशाचे त्यामुळे तसे दिसणारे आहेत.
कित्येक ठिकाणी भारतीय लोकांनी पाश्चात्य लोकांशी लग्न केलेली आहेत. त्यांची मुलेदेखील त्या त्या देशांचे नागरिक आहेत.
ट्रम्पनी ज्या ७ देशांच्या नागरिकांना मज्जाव केला आहे, त्या देशांचे कित्येक लोक आधीच अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांच्या मुलांना उघडपणे हिजाब घालायला किंवा त्यांचा धर्म पाळायला भीती वाटेल असे वातावरण झाले तर हा अमेरिकन नागरिकांवर अन्याय नाही का?
"धर्म" आणि "नागरिकत्व" याची जर गल्लत व्हायला लागली तर असे होणे कितपत योग्य आहे?
आणि तुम्ही म्हणता तशी आयडेंटिटी जपण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. मग शिखांनी पगडी घालायचे बंद करावे किंवा मुस्लिमांनी हिजाब घालू नये असे कायदेदेखील काही देशात आहेत. आणि तसे कायदे करून काही विशेष साध्य होत नाही हेदेखील सिद्ध झालेले आहे. शेवटी आपली ओळख आणि आपला धर्म हा माणसाला प्रिय असणारच. पण जेव्हा इतक्या पंथांचे आणि देशांचे लोक एखाद्या देशांत आपले नशीब घडवायला येतात, तेव्हा त्या देशातील नेतृत्वाने तरी सर्वसमावेशक असावे (किंवा तसे भासवावे).
जिथे जिथे बाहेरून आलेल्या
जिथे जिथे बाहेरून आलेल्या व्यक्ती स्थायिक झालेल्या आहेत, तिथे तिथे त्यांच्याबद्दल संतापही व्यक्त झालेला आहे. पण अशा संतापाला राजकारण्यांनी उघडपणे एक्स्प्लॉईट करणे हे बेजबाबदार आहे. जर असा संताप व्यक्त होत असेल तर कायदे कडक करून थांबवला पाहिजे.>> Bull's eye. महाराष्ट्र म्हणा किंवा अमेरिका म्हणा, majority of employers will seek employees who can offer best skills at lowest price. हा बर्यापैकी मनुष्यस्वभाव आहे. याला किती आणि कसं कंट्रोल करणार!!
दुर्दैवाने, गोबेल्स तंत्र वापरून वापरून या वास्तवाचा खूप विपर्यास करून दाखवला जातो. 'त्यांनी आमचे जॉब घेतले' म्हणून. तेच शेवटी खरं वाटायला लागतं आणि स्वतःचा शिक्षणाने, मेहनतीने विकास करायचं सोडून काही लोक द्वेष करण्यातच 'बिझी' होतात.
शिवसेना पक्षप्रमुख उदोजी
शिवसेना पक्षप्रमुख उदोजी ठाकरेंनी म्हणे, सामना दैनिकातून अमेरीकेच्या राष्ट्रप्रमुख डॉनाल्ड ट्रंप यांना 'इशारा' दिलाय, की भारतीयांवर होणारे हल्ले थांबवा नाहीतर गाठ शिवसेनेच्या वाघाशी आहे.
(No subject)
आपण जसे कुणाच्या पोटी जन्माला
आपण जसे कुणाच्या पोटी जन्माला येऊ हे आपण ठरवू शकत नाही तसेच कुठल्या देशात जन्माला येऊ हेदेखील नाही. त्यामुळे जिथे आपण आनंदी राहू शकतो तिथे राहावे. त्याला कुठलेच एक्सप्लेनेशन नसावे.
मला असेच वाटले.
पण मागून लोक म्हणायला लागले की तुम्ही भारतात शिकला, वाढला नि तुम्हाला भारताचे ऋण फेडायला पाहिजे, म्हणून मी बरेचदा प्रयत्न केले भारतात नोकरी शोधण्याची. पण नंतर असे लक्षात आले की भारतात एक अब्ज लोक आहेत, नि माझ्याहून जास्त हुषार, जास्त अनुभवी, जास्त कर्तबगार असे कोट्यवधी लोक भारतात आहेत, तर भारताला माझी गरज नाही, नि मलाहि इथेच बरे वाटते. म्हणून मी इथेच राहिलो.
आणि अगदी या केस मध्ये बोलायचे झाले तर भारतीय इमिग्रण्टस "चीप लेबर" वगैरे नाहीत. सगळेच भारतीय लोक स्किल्ड असतात आणि त्यांचे जॉब्स असे उचलून अमेरिकन लोकांना देता येतील का हेदेखील शंकास्पद आहे
हे मात्र वेगळ्या कारणासाठी खरे आहे, आज भारतीय जे करताहेत ते आमच्यासारखे कित्येक लोक अमेरिकेत बसून१९७० च्या आधीपासून करत होते. तेंव्हा अमेरिकन लोकाम्कडे "स्किल्ल्स"नक्कीच आहेत. फक्त आमच्यापैकी काही प्रगति करून पुढे पोचले ज्यांच्या नोकर्या भारतीयांना देणे ही कल्पनाच कुणाला मान्य झाली नाही.
जे प्रगति न करता तसेच राहिले ते इतके महाग की त्यामानाने भारतीय चीप नसून परवडण्याजोगे, फायदा वाढवण्यास उपयोगी आहेत. भारतीयांच्या स्किल्स बद्दल तर शंकाच नाही. अहो कुठल्याहि धंद्यात जर कामाची क्वालिटी कमी झाली तर त्या धंद्याचे दिवाळे निघायला वेळ लागत नाही. १०० वर्षे धंदा करणार्या कंपन्यांना ते माहित आहे, म्हणूनच ते जास्त करून भारतीयांना घेतात. तसेहि कित्येक ठिकाणी आधी भारतीय घेऊन मग त्यांना काढून टाकल्याचे प्रसंग अनेक झाले. तेंव्हा जे भारतीय इथे आहेत ते नि:संशय जागतिक किर्तीचे काम करतात. नि त्यातहि ते परवडण्याजोगे. म्हणून. इथे भारतीय घेतात.
भारतीयांवर राग काढणारे अत्यंत मूर्ख, भित्रुड, अविचारी, काहीहि कळत नसलेले लोक आहेत, कारण ना त्यांना धंद्यातले काही कळत ना मालकांशी बोलून असे का असे विचारण्याची हिंमत नि अक्कल नाही!
कालचा प्रतिसाद दिसत नाही.
कालचा प्रतिसाद दिसत नाही. इथेच दिला होता की नाही लक्षात नाही.
पण अशा संतापाला राजकारण्यांनी
पण अशा संतापाला राजकारण्यांनी उघडपणे एक्स्प्लॉईट करणे हे बेजबाबदार आहे. जर असा संताप व्यक्त होत असेल तर कायदे कडक करून थांबवला पाहिजे.
या देशात काळ्यांविरुद्ध, बाहेरच्या लोकांबद्दल, इतर धर्मीयांबद्दल नेहेमीच द्वेष आहे. फक्त मधल्या काळात काही शहाणे लोक सत्तेत आले, म्हणून बरेच कायदे करून जे गोरे ख्रिश्चन नाहीत त्यांना देखील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नोकर्या द्याव्यात, त्यांना मुकाट्याने जगू द्यावे असे बरेच कायदे झाले. तसे शहाणे लोक आता फारसे उरलेच नाहीत.
दुर्दैवाने आजची परिस्थिती बदललेली दिसते आहे. खुद्द राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीसाठी उभा राहिलेला माणूस म्हणतो की मी डेमोक्रॅट लोकांच्या तोंडावर ठोसे मारीन, नि मा़झ्या सभेत जे निदर्शने करतात त्यांना बाहेर काढायचे ते स्ट्रेचरवर घालूनच, नि असा माणूस निवडून येतो, बॅननसारख्या माणसाला सल्लागार मानतो, देशाच्या एफ बी आय, सी आय ए, यांच्या बद्दल अद्वा तद्वा विधाने करतो, तेंव्हा सामान्य अशिक्षित माणूस असा बंदूक घेऊन लोकांना मारायला लागला यात आश्चर्य काय?
जेंव्हा कायदा काही करून थांबवेल तेंव्हाच हे थांबेल. पण इथे तर नि:शस्त्र निरपराध लोकांना पोलीसच गोळ्या घालून ठार मारतात नि फ्लॉरिडा मधे स्टँड युवर ग्राऊंड खाली खुशाल गोळ्या घालून कुणा काळ्याला मारतात नि तो माणूस निर्दोष सुटतो तिथे यांच्या द्वेषाबद्दल शंका का यावी?
जोपर्यंत आपण अश्या अशिक्षित लोकांशी कधी संबंधच येत नाही तोपर्यंत आपल्याला वाटते इथले लोक चांगले. असे काही नाही. आपण जपूनच रहायला पाहिजे.
दुर्दैवाने आजची परिस्थिती
दुर्दैवाने आजची परिस्थिती बदललेली दिसते आहे. खुद्द राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीसाठी उभा राहिलेला माणूस म्हणतो की मी डेमोक्रॅट लोकांच्या तोंडावर ठोसे मारीन, नि मा़झ्या सभेत जे निदर्शने करतात त्यांना बाहेर काढायचे ते स्ट्रेचरवर घालूनच, नि असा माणूस निवडून येतो, बॅननसारख्या माणसाला सल्लागार मानतो, देशाच्या एफ बी आय, सी आय ए, यांच्या बद्दल अद्वा तद्वा विधाने करतो, तेंव्हा सामान्य अशिक्षित माणूस असा बंदूक घेऊन लोकांना मारायला लागला यात आश्चर्य काय? <<
अगदी. जेव्हा उच्चपदावर बसलेल्या मनुष्याची कृत्ये जर हिंसक आणि कायदे न मानणारी असतील तर त्याला अनुकरण करणारे / सपोर्ट करणारी लोक तशीच वागतात. एक प्रकारचा संदेश त्यांच्यामार्फत समर्थकांमधे जातो.
लेख आणि चर्चा दोन्ही वाचली.
लेख आणि चर्चा दोन्ही वाचली.
अमित, मुद्दे पटले आणि अनुमोदन. असं काही लिहायची वेळ येइल असं वाटलं नव्हतं.
एक इमिग्रंट म्हणून सांगायचं तर अगदी मनापासून खंत वाटली श्रीनिवास कोचीबोटला घटनेची. मी अमेरिकेत नवीन आलो त्यानंतर २ महिन्यातच ९/११ घडलं आणि त्यानंतर हे हेट क्राईम वगैरे एकायला आले पण फर काही वाटलं नाही कारण मी विचार केला आपण जाऊ परत निघून.
आता फास्ट फोर्वर्ड १६ वर्ष, जेव्हा इथे मी आता सेटल होऊ बघतोय तेव्हा ह्या घटना एकून खुपच इन्सिक्युअर वाटलं काही दिवस. इथे येऊन इतकी वर्ष राहून आपली ओळख काय तर ब्राऊन स्किन असलेला इमिग्रंट.
पण मग पुढे अजून काही दिसलं तर इथून मिळत असलेला सपोर्ट. इमिग्रेशन बॅनला झालेला कडक विरोध आणि पुढे वैयक्तिक आयुष्यात इथे असलेल्या मित्र मैत्रिणी, सहकर्मचारी, बॉस ह्यांच्या कडून मिळणारा सपोर्ट बघून समाधान सुद्धा वाटलं.
त्यामुळे ट्रंप आला म्हणून आता इथल्या इमिग्रंट्सचे हाल होतील असा जर कोणाचा समज असेल तर तो मुर्खपणा आहे. नवीन पॉलिसीज मुळे त्रास होईल पण असलेल्या सपोर्टमुळे काहीही फरक पडणार नाही. ट्रंप निवडून आला म्हणजे इतर लोकांनी माणुसकी विकून खालली असं नाहीये.
प्रतिसाद आता पाहिले.
प्रतिसाद आता पाहिले. अॅडमिनसाहेबांनी उडवले का प्रतिसाद?
माझा एकमेव प्रतिसाद उडाल्याचे दु:ख नाही. पण त्यात आक्षेपार्ह काय होते?
कोण काय प्रतिसाद देणार याचा अंदाज येतो एव्हढेच म्हटलेले. हे खटकते तर आयडी उडवा प्लीज
अरे पण अमेरिकेतला सध्याचा
अरे पण अमेरिकेतला सध्याचा अनएम्प्लॉयमेंट रेट कैक दशकांमधला लोएस्ट आहे. कॅपिटल मार्केट ऑल टाईम हाय आहे. कंपन्यांचे प्रॉफिट्स न भूतो न भविष्यति लेवल वर असतांना हा प्रोटेक्शनिस्ट बाबा 'अमेरिका फर्स्ट' म्हणत अमेरिकेच्या भांडवलशाही ईकॉनॉमीच्या जीवावरच ऊठला आहे. ईकॉनॉमी ऑलरेडी गोईंग ग्रेट असतांना पब्लिक ला खोटे नाटे सांगून हे महाशय म्हणत आहेत 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' ज्यामुळे आधीच वरचा मजला रिकामा असलेल्या लोकांच्या डोक्यात नसलेला द्वेष भरला जात आहे. अॅवरेज अमेरिकन एक मतदार म्हणून अतिशय (नाईव) निर्बुद्धं तरी आहेत (त्यापेक्षा भारतातले मतदार फार फार हुशार आहेत. ) किंवा ईथली ईलेक्टोरल सिस्टीम सॉलिड गंडलेली आहे.
अनुमोदन बुवा, पण शेकडो फॅमिलीज ऊध्वस्त करायला रस्त्यावरचा एकच माथेफिरू किंवां लाखो फॅमिलीज ऊद्ध्वस्त करणारा खुर्चीवरचा माथेफिरूंचा करविता ह्यांनी एकदा केलेला डॅमेज, काही जणांचा आफटर डॅमेज सपोर्ट मिळाला तरी ईर्रिवर्सिबल असतो ना? मला तर अफगाण,ईराक, सिरिया लिबिया वगैरे मधल्या नॉर्मल नागरिकांबद्दल एवढं वाईट वाटतं की आस्मानी आणि सुल्तानी आग ओकत असतांना त्यां बिचार्यांनी जावे तरी कुठे? विषय वेगळा असला तरी सगळं राजकारण कनेक्टेडच आहे.
हो हो. इरिवर्सिबल आहेच. त्या
हो हो. इरिवर्सिबल आहेच. त्या बद्दल काहीच म्हण्णं नाही आणि त्या बाबतीत कोणी काही करु शकेल असंही नाही. अमेरिकेत एक मोठा सेगमेंट आहे (नेहमीच होता) ज्याच्या डोक्यातून अमेरिकन आणि बाहेरचे असा भेद गेलेला नाहीये आणि दुर्दैवाने ह्यावेळेस इतर सेगमेंट्स तितकेसे बाहेर नाही पडले आणि ह्या म्र्र्जिन मुळे ट्रंप निवडून आला.
मी हे म्हणत होतो की इतर सेगमेंट्स कडून सपोर्ट आणि माणुसकी सुद्धा दाखवली जाते. हा सपोर्टच ह्या देशाची एकंदरित डेमोक्रसी विषयी मचुअरिटी दाखवतो.
अजून एक क्लॅरिफाय करावंसं
अजून एक क्लॅरिफाय करावंसं वाटतं ते म्हणजे मी जे माणूसकीचा उल्लेख करत आहे तो म्हणजे काही इतर अमेरिकेनांनी इमिग्रंट्सवर केलेले उपकार अशा अर्थानी नाही म्हणत आहे. एक मिनिटाकरता फक्त लिगली आलेल्या इमिग्रंट्स विषयी बोलायचं झालं (इल्लिगल इमिग्रंट्स ह्या विषयात इतरही मुद्दे येतात म्हणून तो आत्ता लिहित नाही) तर ते ह्या देशाच्या सरकारनी लावून दिलेल्या नियमांचं पालन करुन ह्या देशात (किंवा कुठल्याही देशात) येतात. ते इथे आल्यावर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सुद्धा ह्या देशाच्या सरकार वर असते आणि त्यांच्याशी गैरवर्तनाबाबत नियमांचं पालन हे इथल्या नागरिकांना "करावच" लागतं.
हे सगळं जरी खरं असलं तरी वर कोणीतरी लिहिलं आहे तसं मॉब मेंटॅलिटी किंवा देशात वर्णभेदाचा पुरुस्कार करणारं वातावरण असेल तर आपोआप मग इतर लोकांवर (नागरिकांवर) वॉल्युंटेरेली (स्वखुषीनी) ह्या नेगेटिव सेंटिमेंटच्या विरोधात बोलणे, इमिग्रंट्सविषयी त्यांच्या हक्कांविषयी सपोर्ट दाखवणे ह्याची मदार येते. श्रीनिवास कोचीबोटला उदाहरणात इथलाच नागरिक मध्ये पडला आणि त्यानी मदत केली. कित्येकवेळा ट्रेन, बस मध्ये लोकं त्रास देतात ह्याचे विडियो येतात आणि त्यात कधी कधी कोणी काहीच म्हणत नसतं पण कधी कधी शेजारचे लोकं जोरदार विरोध करताना दिसतात. हा सपोर्ट टोटली वॉल्युंटेरी आहे पण मिळाला (आणि मिळतोय) तर फार उपयोगी असतो.
>>>त्यामुळे ट्रंप आला म्हणून
>>>त्यामुळे ट्रंप आला म्हणून आता इथल्या इमिग्रंट्सचे हाल होतील असा जर कोणाचा समज असेल तर तो मुर्खपणा आहे. नवीन पॉलिसीज मुळे त्रास होईल पण असलेल्या सपोर्टमुळे काहीही फरक पडणार नाही.
अर्थात. मला माहित नाही माझ्या लेखात असा कुठे समज होतोय का. तसं मला मुळीच म्हणायचं नाहीये. मीदेखील अमेरिकेत लीगल इमिग्रंट होते. आणि तेव्हा जरी ओबामा सरकार असले तरी मला व्हिसा मिळायला प्रचंड त्रास झाला होता. कारण माझा भारतीय पासपोर्ट आणि केमिकल इंजिनियरिंगची डिग्री. या दोन्ही मुळे मी व्हिसा मॅंटिस मध्ये जायचे. तेव्हा मला या सगळ्या "अनफेयरनेस" चा खूप त्रास व्हायचा. पण बुवांनी म्हंटल्याप्रमाणे, अमेरिकेतल्या लोकांनी हा राग आणि त्रास घालवायला खूप मदत केली. आणि आता मागे वळून बघताना ओबामांचे धोरण किती सुद्न्य होते हे लक्षात येते आहे. काही लोकांना त्रास झाला तरी चालेल पण व्हिसा देताना स्क्रुटिनी झालीच पाहिजे. पण उघडपणे मात्र कधीही असे ध्रुवीकरण झाले नाही. आणि शेवटी कुणाला देशात कधी द्यायचं हा त्या त्या सरकारचा निर्णय.
सई, तुला किंवा लेखाला
सई, तुला किंवा लेखाला उद्देशून नाही म्हणालो. आधी ते नानाकळा ह्यांनी लिहिलेल्या कॉमेंटला अनुसरुन होतं ते. सॉरी, आय शुडव बीन स्पेसिफिक.
मूळ मुद्दा दुसराच आहे ...
मूळ मुद्दा दुसराच आहे ... आपली मंडळी इथे इतकी झाली आहेत कि अमेरिकन लोकांना तेच बाहेरील असल्यासारखे वाटू लागले आहे ... खोटा वाटत असेल तर चिकागो, अटलांटा या सारख्या शहरांमध्ये एकदा चक्कर मारा ... काही भागात तर लुंगायनाचे कोंडाळे दिसेल जिथे लोक मस्तपणे चकाट्या पिटतात ते पण मोठ्या आवाजात आणि सौथ मधील भाषेत .. इथे new jersey बद्दल बोलणे टाळतो कारण लवकरच हा एक गुजरातचा भाग म्हणून घोषीत होणार आहे .. असो
तर शेवटी काय आहे कि आपण इथे घुसून त्यांच्या जमिनी विकत घेतो .. त्यांच्या चांगल्या नौकऱ्या घेतो ... जमल्यास मुलीपण आणि तरीही म्हणतो कि त्यांनी चिडू नये ... बस का ... अहो पुण्यात बिहारी दिसला तरी कशी वागणूक देता हे विसरला वाटतं ... तो तर आपल्याच देशातील आहे इथे तर आपण परके आहोत
आधी ते नानाकळा ह्यांनी
आधी ते नानाकळा ह्यांनी लिहिलेल्या कॉमेंटला अनुसरुन होतं ते. >>> ते नानाकळा इथे सविस्तर लिहितो असं म्हटले होते त्याबद्दल पण आलेच नाहीत की त्यानंतर !!
भुत्याभाउ, चिडू नये कारण ती
भुत्याभाउ, चिडू नये कारण ती अमेरिका आहे. फ्री वर्ल्ड आहे. सगळेच बाहेरचे. अमेरिकन ड्रीम साध्य करायला लोकं इथे येतात. अमेरिकेने भारतीय (तुमच्या आवडी प्रमाणे पुणेरी, बिहारी, (शिव/मन) सैनिकीकाय वाट्टेल ते घाला) कोत्या मनोवृत्तीने वागणे अभिप्रेत नाही. जो विकास कॅपिटलिस्ट मार्केट मध्ये अमेरिकेने केला तो ढीगभर टॅलेन्ट असून भारताला करता आला नाही याचं कारण फ्री मार्केट आणि ओपन कल्चर आहे.
आमच्या जमिनी, आमच्या मुली, आमच्या नोकऱ्या, तुम्ही परके म्हणणारे माथेफिरू असतील थोडे फार, अजून तरी ते सार्वत्रिक चित्र असं नाही. आणि न होवो.
अहो पुण्यात बिहारी दिसला तरी
अहो पुण्यात बिहारी दिसला तरी कशी वागणूक देता हे विसरला वाटतं>>>> तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे लोकं देत असतील वाईट वागणूक. आणि हो, ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे.
टोटल व्हॉट्सअॅपीयं लॉजिक आहे की तुमचं.
Pages