one meal a day

Submitted by काउ on 17 February, 2015 - 09:01

दिवसातून फक्त एकदाच जेवण घेऊन रहाणे , हा प्रयोग कुणी केला आहे का ?

एकच वेळ जेवायचे असल्यास शाकाहारी पदार्थ वापरुन कोणत्या पद्धतीने जेवण करावे लागेल ?

http://www.finalcall.com/artman/publish/Health_amp_Fitness_11/article_89...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात दोन पिढ्यांपूर्वीच्या लोकांचा पिंड भेसळ नसलेले सकस अन्न आणि प्रदूषणमुक्त हवा यावर पोसला गेलाय हे आपण विसरता कामा नये.

मी अनेक लोकांना अनेक फूड प प्रॉडक्ट्स केवळ पीयर प्रेशर, ते पण वापरतात म्हणून आपण पण तेच वापरायला हवं - असं म्हणून वापरताना बघते.
माझ्या अनुभवातून आणि वाचनातुन माझं मत 'ह्याचा वापर तुम्हाला किती सूट होतोय त्याप्रमाणे करा, नाहीतर नकार द्या ' असंच आहे. कारण प्रत्येकाची शरीराची रीक्वायर्मेंट वेगळी असते. ही काही लोकांचं बघून कॉपी करण्याची, किंवा पीयर प्रेशर घेण्याची जागा नाही.
सिंपल लाईफस्टाईल, योग्य व्यायाम आणि साधा माफक आहार हे माझं लाइफसूत्र.
यु हॅव टु ट्रेन युवर बॉडी आणि माईंड.

<<<काऊ, माझा एक सल्ला. तुम्ही घरकाम करा. जसे की फरशी पुसणे, कपडे धुने, झाडलोट करणे, आवराआवव्र करणॅ.>>> अरे त्या काऊला रोजा करायचा आहे तुम्ही तर त्याची पार कामवाली बाई करुन टाकलीत. Proud

जवळपास एक क्विंटल क्षमतेची मोठी डेग (भांडे) ही मातीने तयार केलेल्या एका मोठ्या ओट्यात घट्ट बसविलेली असते. भांड्यात जवळपास चाळीस किलो मटन, सोबत काळी मिरची, इलायची, दालचिनी, शहाजिरा, इलायची, सुंठ, सोबत हरभरा डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, आवश्‍यकतेनुसार दही, तूप यांचे मिश्रण करून सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास भट्टीमध्ये शिजवायला ठेवले जाते. दर तासाला एका मोठ्या लाकडी घोट्याने भांड्यातील पदार्थ जोरात घोटावे लागते. सहा ते सात तासानंतर हा अत्यंत चवदार असा पदार्थ तयार होतो. प्लेटमध्ये हलीम समोर येताच तोंडाला पाणी सुटते. हलीम तयार करण्यासाठी जवळपास चोवीस तास झटावे लागते. याकारणास्तव कारागिरांची संख्याही प्रत्येक आचाऱ्याकडे जास्त असते..

.....

http://www.esakal.com/CricketCarnival/NewsDetails.aspx?NewsId=5332144743...

लोकं भेसळ करताहेय वाटलं वरती मुद्द्याची.

----
जीवनाविषयी चांगला अ‍ॅटीटूड मध्येच जगणं येत ना? मग त्यात आरोग्य पण असतच ना( जी चांगला अ‍ॅटीटूड ठेवणारी लोकं असाच विचार करतात ना?).

कारण चांगला अ‍ॅटीटूड मध्ये शरीर नीट ठेवून जगणं हे सुद्धा येतं हे दाखवणारी माणसं भेटलीत.

आणि शरीर आणि मनाची सांगड हि नेहमीच असते. त्यामुळे दु:खी ,त्रासलेलं मन रोगाला आमंत्रण आहेच.
-------------------------------------------------
शहरी आयुष्य हे चिंतेने पोखरलय म्हणून काळजी घ्याची लागतेय ज्यास्त.
अन्नातील भेसळ, प्रदूषण य्क्त हवा,सुखसोयींची रेलचेल असली तरी खर्चाला पैसा, व्यायाम नाही(साधं पायी चालणं नाही होते) मग काय होणार? त्यामुळे ज्यास्त कानी पडतं आजकाल. कधी कधी नकोसं होतं पण सत्य आहे.

-----------------------

काऊ. एकंदरीत तुम्हाला रोजा ठेवण्याची जास्त उत्सुकता आहे असे दिसत आहे.

रोजा ठेवायचा झाला आणि धार्मिक कारणानं ठेवायचा झाला तर संपूर्ण नियमांचे पालन करून मगच ठेवा. केवळ दिवसभर उपाशी राहणे म्हणजे रोजा ठेवणे नाही. त्याव्यतिरीक्त दिवसभर काय कराय्चे आणि काय नाही याचे काटेकोर नियम आहेत. (संपूर्ण रमझानभर हे नियम पाळावे लागतात, मग रोजा एक करा किंवा तीस) ठराविक प्रार्थना म्हणाव्या लागतात. काही गोष्टी करता येत नाहीत. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामधले असल्याने काही नियम वेगळे असतील (डॉक्टर मित्राला विचारून बघते, पण रोजा असताना त्यानं पेशंटची डीलीव्हरी केली की त्याचा रोजा मोडतो असं काहीसं तो एकदा म्हणाला होता) आसपास एखद्या मौलवींना विचारलं तर ते उत्तम मार्गदर्शन करू शकतील.

मला व्यक्तीश: रोजे ठेवायला आवडतं. पण महिनाभर ठेवणं अशक्य आहे. तरी किमान दोन ते तीन रोझे करतेच. तीसच्या तीस रोझे करनं अजिबात सोपं काम नाहीये. त्यात बहुतेक जणांना रोझा असूनदेखील नेहमीची कामं आरामात करताना पाहून आश्चर्य वाटतं.. रोज्यांसाठी तेवढा संकल्प आणि सिद्धी करावी लागते. ते नसलं तर काही अर्थ नाही.

तसेच, आपले हिंदू उपवास करतानादेखील मी निर्जळीच करते (म्हणून जास्त ऊपास करायच्या फंदात पडत नाही) उपासाच्या दिवशीचे ते तलकट तुपकट खाणं म्हणजे मला तरी तो मूर्खपणा वाटतो. वर्षातून आठदहाच उपास करते पण अगदी कडकडीत उपास.

http://m.food.ndtv.com/recipe-soya-haleem-271470

एकभुक्त चे आकर्षण आहे. पण ते अशक्य आहे. म्हणुन रोजा स्टाइल रात्री व पहाटे असे दोन वेळा खाणे हा ऑप्शन डोक्यात आहे.

दुपारी एखादे संत्रे मोसंबे चालु शकेल.. अर्थात इतर काळात.. रोजा काळात फक्त नियमानुसारच .

मी सकाळी ओपीडी बघतो व रात्री अ‍ॅडमिनिस्ट्रेशन.. स्वतः सर्जरी डिलिवरी करत नाही.

हा धागा फक्त रोजे ठेवायचे आहेत म्हणून आहे का? मला वाटल वजन वाढल आहे म्हणून एकभुक्ती रहायचा इथे निर्णय होत आहे Happy

जर फक्त रोजे ठेवाय पुरते महिनाभर एकभुक्ती रहायचे असेल तर हानीकारन असे काही नाही. मस्त निचरा होईल शरिराचा फक्त जास्त झिज टाळा. माझी आई गणपतीचे दहा दिवस आणि नवरात्रीचे नऊ दिवस चहा घेऊन उपवास करते. तिला चहा फार आवडतो. चहा पिला की तिची भुक जाते.

उतारवयात आपोआपच माणसाची भुक कमी होते. किंवा असेही म्हणाअ अन्नावरची वासना संपून जाते. मग फोर्स करुनच आपण खातो पितो. खुणी आग्रह केला तर खातो. पण माझ्या बघण्यात वृद्ध लोक अन्नापासून जरा तुटलेले असतात.

अजुनही सकस अन्न आणि मोकळी हवा आहे फक्त आपण आधुनिक गोष्टींछ्या बळी पडत चाललो आहे.

घरकाम कर. सगळ्या मशिनींना सुट्टी देऊन टाक. कामवाली असेल तर तिला पण रजा देऊन टाक. वाटण बिटण पाट्यावर करत जा. सारख उठ बस चढ उतर व्हायला हव घरची कामे करताना. आहार अगदी अल्प आणि तोही गावठी बाज असलेला हवा. रामप्रहरी उठून गार पाण्यानी स्नान करत जा पोअर उघडे होतात त्वचेचे. रोज सकळ संध्याकाळ चांदण्यात फिरायला जात जा. अधुनमधुन गड सर करत जा. बघ वजन उतरते की नाही.

रामप्रहरी उठून गार पाण्यानी स्नान करत जा पोअर उघडे होतात त्वचेचे. >>> गरम पाण्याने/वाफेने त्वचेचे पोअर्स उघडे होतात ना?

वाफ घेणे प्रत्येक सीझनमधे शक्य नसते. शिवाय सगळ्या शरिराला वाफ देता येईल का? नाही देता येणार. त्यासाठी आधुनिक उपकरणे हवी. घरच्या घरी फक्त चेहर्‍याला वाफ देता येईल. पण गरम गरम वाफ चेहर्‍याच्या नाजूक भागाला लागली तर त्याचे विपरित परिणाम सुद्धा होतात. म्हणून हा प्रयोग मी सुचवला नाही. पण गार पाण्याची स्नान केले की शरिर हलके होते. रक्ताभिसरण वाढते. त्वचेवर सुरकुत्या पडत नाही. पण एक अजून की शॅम्पू आणि साबण हेही त्वचेला हानीकारन आहे. थोडे लावावे. जर तुम्ही उटणे लावले तर उत्तम. प्राणायम कपालभाती केले केआजून फायदा.

शिवाय सगळ्या शरिराला वाफ देता येईल का? नाही देता येणार.>>>> म्हणूनच गरम पाण्याने अंघोळ. असो.

काउ. काय मजा बघताय? तुम्ही स्वतः डॉक्टर असून आम्हाला विचारताय Proud तुम्ही नक्की काय ठरवलं ते लिहा की. नुसतं वजन कमी करायचं असेल तर चा कापी बंद करा आणि खोबरं, तळकट बंद. पालेभाज्या भरपूर खाणे. इतर भाज्यांमध्ये कोबी, भेंडी सारख्या हाय फायबर भाज्या जास्त. एक घास भरपूर चावून खाणे, त्याने अन्नातले फायबर्स मोकळे होतात आणि आतड्याला झाडू सारखे साफ करत जातात. घरापासून दवाखाना २-४ किलोमिटरच्या अंतरावर असेल तर चालतच जाणे-येणे.

मायबोलीचं काय घेऊन बसलीस मंजू रोजची धुणी, भांडी, केर, फरशी, पाट्यावर वाटून, कुकरात न शिजवता स्वैपाक इत्यादी केल्यावर नोकरी धंदा हे प्रकरण पार्ट टाइमच होऊन जाईल.
मग येईल त्या फ्रस्ट्रेशनने आणि ताणाने वजन वाढेल अजून... Wink

दिवसेंदिवस रोजचा अर्धा वेळ रोजची धुणी, भांडी, केर, फरशी, पाट्यावर वाटून, कुकरात न शिजवता स्वैपाक यामधेच गेल्यावर फ्रस्ट्रेशन नाही येणार?
मला नक्की येईल.

बीच्या पोस्टमधलं एक वाक्य मी "आहार अगदी अल्प आणि तोही गावठी बाजल्यावर हवा" असे वाचले. म्हटलं मग शेकशेकोटी पण होउ द्यात. सगळंच कसं साग्रसंगीत!!!!! Lol

मी कुठे ऐकतेय? मी सल्ला विचारला तरी आहे का?
बी चे सल्ले ऐकू नयेत इतपत बुद्धी आहे मला.
ते सल्ले किती मूर्ख आहेत तेवढंच दाखवून दिलंय.

नीधप, मी तुला सल्ला देईल असे तुला वाटते का? कुणाला सल्ला द्यायचा.. नाही द्यायचा हे मला माहिती आहे. मी चुकुनही तसे करणार नाही की मी तुला सल्ला देईन. मी तुला इथे काहीही न म्ह्णता बोलता तू माझ्यावर उलटली आहेस जे की मला मुळीच आवडले नाही.

जी कामे मी वर सुचवली आहे ती काही रोज करायची कामे नाही. आम्ही रोज घर पुसत नाही. रोज पाट्यवर वाटत नाही. रोज घरी कुकर लागतेच असे नाही. कामांची यादी दिली म्हणून ती रोजची कामे झाली असे नाही. मी ह्या कामाकडे व्यायाम ह्या हेतूने पाहिले आहे. कामाचा कंटाळा येणे, थकवा येणे हे झालेच की.

Pages