आठवणीतला रेडिओ...

Submitted by दुसरबीडकर on 4 May, 2014 - 07:46

''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट
असलेल कव्हर,स्पिकरच्या ठिकाणी जाळीदार नक्षी.चार
बँन्ड असलेला..अर्थात माझ लहाणपणीच हेच खेळणं
आणि साथिदार होता.
त्यावेळी प्रामुख्याने जळगाव,पुणे,औरंगाबाद-परभणी(तेव्हा ते
एकत्रित होतं),रेडिओ सिलोन,आल इंडिया रेडिऒ,जबलपुर,इं
दौर,विविध भारती ही आकाशवाणी केन्द्रे वडील प्रामुख्याने
ऎकायचे व नंतर मलाही तोच छंद जडला. सकाळी सहाला सुरु
झालेला रेडिओ अकरापर्यन्त सुरु असायचा.नंतर प्रक्षेपण
बंद व्हायच.जेव्हा टुण्ण्ण असा आवाज सुरु नी रेडिओ बंद..
साडेबराला पुन्हा ऎकदा याच ट्युनर फिरायच..
सकाळच्या काही कार्यक्रमात एक नाटिका असायची.नवरा-
बायको व नवर्याचा मित्र
मधुभाऊजी.दहा मिनिटाची मिश्किल नाटिका अन शेवटी सुंदर
संदेश..संस्काराच्या बाळकडुची जणू सुरुवातच
होती ती माझ्यावरच्या..!! निवेदकांचे/निवेदिकांचे आवाज तर
इतके नसानसात भिनलेय की आजही ''अब आप देवकीनंदन
पांडे से समाचार सुनिये'', ''बहनो और भाईयो..'' वाला अमिन
सयानी, विविध भारतीच्या दुपारच्या 'सखी सहेली'
कार्यक्रमातली कमल शर्मा यांच नाव दिसल की त्यांचे
आवाज कानावर तरळून जातात. आज रेडिओ कालबाह्य
झाला.माझ्याही घरात नाही,पण रेडिओच्या ह्या आवाजांनी जे
गारूड मनावर चढलय ना..बस्स...मरते दम तक उतरेगा नही..!!
दुपारी साडेबाराला 'आपली आवड'
असायचा.त्या निवेदिकेची स्पेसिफिक स्टाईल
असायची की,''आता ऎकुया ***चित्रपटातल
गित,ज्याला संगितबद्ध केलय **** ह्यांनी आणि स्वर
आहेत ****ह्यांचे..आणि ह्या गिताला आवड कळवणारे
श्रोते आहे जयभवानी श्रोता संघ** ** गाववरून,शामराव,
विठ्ठल,अमुकअमुक तमुक तमुक..''पण हेही ऎकायला इतक
छान वाटायच की नुसत्या ह्या परिचयावरून मी परफेक्ट गित
ओळखायचो.काही श्रोत्यांची नावे मी सगळ्या स्टेशनवर
ऎकायचो..अगदी दुरवरच्या भरतपुर स्टेशनवरही..फार कौतुक
वाटायच त्यांच्या रसिकतेच.जी जुन्यातली जुनी गाणी,रामदास
कामत,बालगंधर्व,पं.अभिषेकी इत्यादींची नाट्यगिते,लोकसं
गितातील शाहिर साबळे,शाहिर उमप
ह्यांची खड्या आवाजातली 'टिमक्याची चोळी बाई','फु बाई
फु' सारखी गिते,सुगम संगित,भावगिते
माझ्या ओठावर,र्हद्यात स्थान मिळवून बसली आहेत,याच
सारं श्रेय त्या रेडिओलाच...!!सक
ाळचा मुलांसाठी असणारा 'किलबिल',संध्याकाळी पाचला सुरु
होणारा 'युववाणी','लोकजागर' त्यानंतर
लागणारा लोकसंगिताचा शाहिर
***आणि सहकार्यांच्या आवाजातला कार्यक्रम..कितिक
नावे घ्यावी?कितिक आठवावे??त्यावेळ
ी मनोरंजनाची दुसरी साधने नव्हती त्यामुळे
या रेडिओशी इतक जवळच नातं निर्माण झाल होत..!!पण
आजच्या वाहिन्यांच जाळं,त्यावरचे
कार्यक्रम ,जाहिराती बघितल्या की वाटतं
हा 'सखा',किती तरी सुसंस्कारीत नी चांगला होता..!!
विविध भारतीने तर इतक्या काही सुंदर
गोष्टी श्रोत्यांना समर्पित केल्या की,अस वाटत
की 'खरा रसिकांचा जन्म विविध भारती साठीच' अस
क्षणभर वाटून जातं..!विविध भारतीवरील भुले बिसरे
गित,जयमाला,हवाम
हल,सखी सहेली,फौजी भाईयो की पसंद,पिटारा,उजाले
उनकी यादो के..काय काय नी कितिक नावे घ्यावी??कितीतरी
आनंदाच्या गोष्टी नकळत मन जमा करीत होते. सकाळी सुरु
झालेला रेडिओ विविधभारतीच्या रात्रीच्या 'जयहिंद'ने बंद
व्हायचा..!!
दुपारच्या वेळी आवडीची गाणी सुरु झाली की मी आवाज
वाढवून द्यायचो,बाहेर लिंबाच्या सावलीत खाटेवर पडून
रेडिओ कुशीत घेवून स्वर्गसुख घेण्याचा आनंद कदाचित
आजच्या पिढिला घेता येणार नाही.
आजही मला आठवते,दिवाळीच्य
ा नरकचतुर्दशीला सकाळी नरकासुराच्या वधाच किर्तन
सकाळी साडेचारला असायच..त्यावेळी आई
इतक्या सकाळी अंघोळ घालून ते किर्तन
ऎकायला लावायची.हा कैक वर्ष माझ्या घरातला प्रघात
होता दर दिवाळीचा..!! दिवसभर खरखर
असणार्या रेडिओचा जशा चांदण्या उगवायला सुरुवात
व्हायची तसतसा आवाज सुस्पष्ट होत जायचा.वडिलांच्य
ा बाजेखालचा रेडिओ सुंदर गाणी गात रहायचा व
मला कधी झोप यायची कळायचही नाही..कधीकधी तर
रात्रभर तो सुरुच असायचा.बाबा त्यावेळी किराणामालात
ऎकवेळ गोडेतेल विसरायचे पण रेडिओचे सेल कधी विसरले
नाहीत.रेडिओने लावलेली गितांची गोडी आजही कायम
आहे,खंत फक्त हिच की वाढलेली गोडी,बघायला रेडिओ
जवळ नाही.. !!
आज मोबाईल,पिसी,लॅपटॅापमध्ये
हजारो नवी जुनी गाणी आहेत,ऎकायला सुश्राव्य हेडफोन्स
आहेत,कुठेही खरखर नाही,व्यत्यय नाही पण
जी गोडी रेडिओच्या आवाजात
होती,ज्या गाण्यासाठी आतुरतेने वाट
बघितली जायची ती ओढ नाहिये.हा खर्या अर्थान खुप
काही दौलत बहाल करुन,बाजुला झालेला,विस्मरणात
गेलेला फार जवळचा मित्र आहे.किती जनांना याची आठवण
येत असेल,किती जनांना काहितरी मागे सुटल्याची जाणिव होत
असेल माहित नाही..पण
आजही ऎकटा असलो की ह्याच्या आठवणी मनात
दाटतात..एका हळव्या कप्प्याच झाकण परत उघडल्या जातं
अन ह्याच्या युगात मी परत ओढल्या जातो..नकळत...मन
ातल्या मनात..!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात असलात तर ९२.७ एफ एम ला जुनी गाणी लाग्तात बाकी मराठी व हिंदी प्रक्षेपण चालू असतेच. ए एम वर. इतरही एफ एम् चॅनेल्स आहेत. टाटा स्काय वर अ‍ॅक्टिव म्युझिक मध्ये सर्व नवी जुनी गानी, भक्ती संगीत, शास्त्रीय संगीत अवेलेबल आहे.

सोनीचा क्लॉक रेडीओ फ्लिप्कार्ट वर उपलब्ध आहे.

धन्यवाद अश्विनीजी..अभिप्रायासाठी...!! हि तर सगळी साधने आहेच हो..पण जे नातं त्या रेडिओसोबत जुळलेल होत त्याची सर मात्र येत नाहिये..

छान आठवणी. लहानपणी मराठीमध्ये आकशवाणी पुणे आणि सांगली केंद्र तसेच विविधभारती,सिलोन वगैरे ऐकायला मिळाले. सकाळी ०७.०५ वाजता 'आकाशवाणी पुणे भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहेत' तसेच त्यापूर्वी संस्कृतमध्ये बलदेवानंद सागर (इयम आकाशवाणी), निवेदकांत बंडा जोशी वगैरे आठवतात तसेच 'मानवी उत्क्रांती' खास रेडीओ जाहिराती (झुळझुळ वाणी, खेळवा पाणी- फिलोनेक्स वगैरे) असे कार्यक्रम असायचे. आता गावाकडे गेलो तरी रेडीओ ऐकायला मिळत नाही शहरे तर सोडूनच द्या.

अगदी खरय विशालजी..जुन्या आठवणी निघाल्यात..संस्कृत बातम्या,इयम आकाशवाणी,भालचंद जोशीं, बलदेवानंद सागर ही नाव विसरलोच होतो मी..फिनोलेक्स पाईपची जाहिरात जणू आजच ऎकतोय असं वाटतय..आपल्यामुळे परत त्या विश्वात पोहोचलो..मनापासून आभार..

जुन्या रेडिओच्या गोडव्याला तांत्रिक कारणही होते ।शंभर हर्टझच्या खालच्या कंपनलहरी प्रक्षेपित केल्या जात होत्या ,एम पध्दत वापरायचे आणि रेडिओतही(काही) या कंपनसंख्येला अनुरूप लंबगोल स्पिकर्स होते .आता एफ एम पध्दतीत या कंपनलहरी गाळूनच टाकतात .

जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
झुमरीतलय्या नावाचं ठिकाण भारतात आहे याचा शोध रेडीयोमुळे लागला. पण भारतात ते नेमकं कुठे आहे ते अजूनही कळलेलं नाही.
हिमेश रेशमियाचा रेडियो नावाचा चित्रपट आला होता म्हणे. पण रेडियोचे सेल(Cell) जितके दिवस चालतात तितके दिवससुद्धा तो चित्रपट चालला नाही म्हणे.

आठवणारी जाहिरात -

रामय्याचा मित्र - कसला विचार करतोयस रामय्या?

रामय्या - घराला आणि गोठयाला कुठले पत्रे वापरावे तेच कळत नाही.

रामय्याचा मित्र - अरे, चारमिनार अस्बेस्टोस सिमेंटचे पत्रे विकत घेऊन ये.
माझ्या आजोबांनी घराला बसवलेले सिमेंटचे पत्रे अजूनही शाबूत आहेत.

रामय्याचा मित्र - अरे खरच की. मी चार मिनार सिमेंटचे पत्रे विकत घेऊन येतो.

निवेदक -
चारमिनारचे पत्रे टिकाऊपणा आणि उत्तम दर्जासाठी प्रसिद्ध आहेत.
घर, शाळा आणि गोदामासाठी चारमिनारचे पत्रे वापरा
प्रत्येक शहरात चारमिनारचे विक्रेते आहेत.
चारमिनार. भारतातील सर्वाधिक विक्री असलेले अस्बेस्टोस सिमेंट उत्पादन.

Srd प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार..तेही कारणअसेलच,वाद नाही..पण मनोरंजनाची दुसरी साधने नसल्यामुळे हा ऎवढा जिवाभावाचा झाला होता की..काहीवेळा खरखर आवाजातही गोडी वाटायची..

हाहाहा..बोबडे बोल साहेब..हिमेश केशमियाँ ची कुठे बरोबरी होणार ...रेडिओचे सेल जास्त दिवस जातील हे खरच..तुम्ही सांगितलेली जाहिरात आठवली...बघा बरे ...मन कस जुन्या दिवसात भरकटलेय..खुप खुप आभार प्रतिसादासाठी ..!

आणि अशोक कुमार व हेमामालिनी चव्हाण? हे तर मला सेलिब्रिटीजच वाटत असत. प्रत्येक आपली आवड मध्ये त्यांचे नाव असे.

हाहाहा..गामा पैलवानजी...शोध घेतलाच तुम्ही झुमरीतलैय्याचा तर..त्या अनुषंगाने का होईना इथवर आलात..मनापासून आभार..!!

निशिगंध84,

वसतिगृहात रेडियो माझाही सोबती होता. माझा आवडता कार्यक्रम बेला के फूल होता. रात्रौ ११०० ते ११३० चाले. मजा यायची. सकाळी भक्तीसंगीत बरे वाटे.

जुन्या आठवणी जाग्या केल्यात. धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद. खरंच रडिओने नुसतेच मनोरंजन केले नाही तर आमच्या ज्ञानात भर देखिल घातली. आमची विचार्सरणी सम्रुद्ध केली. तसेच शुद्ध उच्चारण आणि व्याकरण यान्चा देखिल अभ्यास घेतला. आजचे जोकी आणि आकाशवाणी उद्घोषक याला अपवाद आहेत. त्यांना त्यान्ची मात्रुभाषा तरी नीट येते की नाही हे देव जाणे .
काही जॉकी तर 'सकाळ' आणि टाईम्स वाचुन दाखवतात आणि लेटेस्ट अप्डेट म्हणुन मिरवतात. तसे पुर्वी आकाश वाणीवर नव्हते.
रात्रीचे नभोनाट्य, संगीत सभा उच्च दर्जाच्या होत्या. फक्त अपवाद होता तो आणिबाणी च्या काळात ! तेव्हा आ.वाणी ही केवळ सरकारी कारयक्रम पत्रिका होती.
तरीही म्र्ढेकरांचे ' बदकांचे गुपित" किवा व्यंकटेश माडगुळकरांचे ' वाटसरु" ३५ वर्षानंतरही स्मरते यातच त्याची यशस्विता आहे. पन्ना लाल घोष यान्ची बासरी ही फक्त आकाशवाणीच देउ शकते. व्ही जी जोग आणि बिस्मला याण्ची जुगल्बंदी कोण विसरेल. नरहर कुरुंदकरांची व्याखाने कोण विसरेल किवा गंगाध र गाडगीळ यांचे बजेट वरिल विश्लेषण कोण विसरेल. रोज रात्री ९ वा खास इंग्लिश मधे ' धिस इस ज्योतिक रत्न्म गीव्हिंग यु द न्युज " हा रुबाब कोण विसरेल.

आकाशवाणीने जीवन सम्रुध्द केले. हे मान्य करावेच लागेल.

गामा पैलवानजी,सुनिल जोग जी..आपल्या आठवणींना उजाळा मिळाला..जुन्या दिवसात जायला मिळाल..ह्याचा खुप आनंद आहे. या लेखाच सार्थक झाल्यासारख वाटत..
जोगसाहेबांनी तर अधिक विस्तृत माहिती पुरवली..काही स्मरतात ,काही माझ्याही जन्माअगोदरच्या घटना आहे..पण वाचून खुप छानवाटल...
पुनश्च दोघांनाही ___/!\___

टेकाडे भाऊजींना विसरलात?
खरं तर मी तुमच्या खुप पुढच्या पिढिची..
पण रेडिओ आमच्याही घरात जीव कि प्राण होता.
अनेक वेळा रेडिओशी जुळलेल्या होत्या.
माझे बाबा ८ कि ८.१८ ला बातम्या सुरु व्हायच्या आधी जे टु टु वाजतं ते ऐकुन कामावर जायला निघायचे. Happy

पियू...

खरं तर खुप काही विसरलय अस वाटतयं..इतके सुंदर सुंदर प्रतिसाद आले,इतक्या गोष्टी पुन्हा स्मरल्या..अस वाटतं की हाच एक प्रदिर्घ लेख होवू द्यावा..!!
'सुंदर प्रतिक्रिया ...आभार...!