रीतीरीवाज

Submitted by admin on 12 January, 2009 - 23:47

धार्मिक रीतीरीवांजाबद्दलचं हितगुज

या अगोदरचं हितगुज इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासुनच करते पण जर पारंपारिक कशी करतात ते कळल तर बर म्हणुन विचारल.. धन्यवाद वीरा...

डी सखी, रागावला नसाल अशी आशा आहे. मनापासुन पुजा केली की कोणतेही रितिरीवाज पाळायची गरज नसते असे या ब्राह्मणाला शिकवण्यात आले असल्याने तसे लिहिले.

हो सखी. रितीरिवाज हे कालानुरुप / व्यक्तीनुरुप / स्थळानुरुप नेहमीच बदलत आले आहेत. फक्त एकच गोष्ट कॉमन राहिली आहे ती म्हणजे भाव. होतं काय, की रितीरिवाजांच्या बंधनात अडकून कित्येक ठिकाणी भाव हरवून जातो आणि नुस्ते नियम उरतात. वेदांमधल्या प्रोव्हिजन्स आणि आता अंमलात आणल्या जाणार्‍या रिती ह्यात देखिल खूप अंतर आहे. मध्यंतरीच्या काळात व्यक्तींनी आपल्या स्वार्थासाठीही ह्या प्रोव्हिजन्स वळवून स्वतःला पाहिजे तशा केल्या.

एखादी रीत (?) चुकली तरी त्यात घाबरुन जायचे नसते कारण भितीपोटी केलेली कुठलीही पूजा परमेश्वराला पोहोचेल काय? आपल्या अडिअडचणी त्याला माहितच असतात, आपल्या लिमिटेशन्सही त्याला माहित असतात. जर का आपण श्रद्धावान असू तर आपण हे मनाशी ठाम धरले पाहिजे की मी कुठल्याही अवस्थेत त्याचे स्मरण केले तरी त्या क्षणीच तो माझ्याजवळ असणारच आहे.

समजा आपल्याला गुरुचरित्र वाचायचेय मनापासून, पण आपण आजारी आहोत त्यामुळे आपण बसू शकत नाही. तर बिन्धास्त आडव्याने वाचा ना ! त्याला माहित आहे आपली परिस्थिती. उलट त्याला कौतुक वाटेल की याही अवस्थेत आपण त्याला विसरलो नाही. मग इथे गुरुचरित्र सोवळ्याने वाचायचे वगैरे नियम आड येतात कुठे? हे ग्रंथ जेव्हा लिहिले गेले त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे ते नियम पाळणे शक्य होते पण आताचा धावपळीच्या जिवनात ते शक्य नाही. मग निव्वळ यामुळे आपण 'त्या'च्यापासून दूर रहायचे का? अज्जिबात नाही. उलट कलियुगाच्या पुढच्या पुढच्या काळात जिथे सगळंच जगणं कठीण होत चाललंय तिथे 'त्या'ने आपल्यावरच्या प्रेमामुळे हे नियम नक्कीच शिथिल करुन दिले असणार.

गपे !

मी सगळे प्रतिसाद वाचले. अश्विनी के.ला १००% अनुमोदन. त्यांच वाचन भरपुर दिसतय. नुसतं वाचनंच
नाही तर चिन्तन, मननही केलेल दिसतय.कारण खूप विचार करून सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत.

देवाची भक्ती प्रेमापोटी करावी भितीपोटी नाही हे पण १००% बरोबर.

ग्रहणाचा विषय संपलेला आहे. पण नामस्मरण करणं हे कांही गैर नाही. त्याला शस्त्राचा आधार आहे.
कुणितरी नामस्मरणाबद्दल लिहिलं आहे ते खरं आहे. ग्रहण कुणि पहाव,पहाव का नाही हा ज्याचा त्याचा
प्रश्न आहे. जुन्या गोष्टी कुणाला आवडत नसतील तर त्यानी किंवा कुणिही ग्रहण पाहून जरूर आनन्द
लुटावा. पण ग्रहण जर दोनदोन तीन तीन तासाचे असेल तर तेवढा वेळ तर कुणि सुर्याकडे डोळे लावून
बसणार नाही ना?

"ही सुशिक्षित स्त्रियांची चर्चा वाटत नाही. " घरात फक्त एक स्त्री सुशिक्षित असून चालत नाही. आज अजूनही
कित्येक घरांत मागची पिढी आहे जिच्यावर खोलवर धार्मिक संस्कार रूजलेले आहेत. स्त्रीला सर्वाना
धरून चालावे लागते. तिला कितीही वाटलं तरी ती सगळ्या चालीरिती एकदम बंद करू शकत नाही.
आणि तसे करताना तिला पडलेले प्रश्न तिने विचारले तर त्याचा अर्थ ती सुशिक्षित नाही असा त्याचा अर्थ
होत नाही.तर ती पूर्वीच्या स्त्रियाप्रमाणे सगळ्या गोष्टीला मान डोलवणारी नाही तर ती डोळसपणे विचार
करणारी आहे.

प्रत्येकजण वेगळ्या वातवरणात वाढलेला असतो. प्रत्येकाचे संस्कार वेगळे असतात. काहीजण धर्माच्या
बाबतीत हळवे असतात. नन्दिनीच्या भावना दुखावल्या गेल्या ते मला पटलं नाही. प्रतिसाद देताना दुसर्‍यांच्या
भावना न दुखावता आपले मत मांड्ण्याची काळजी घ्यावी. कुणांची खिल्लीउडवू नये अस मला वाटतं. कारण
आमच्यासारखे नवे लोक गोंधळून जातात. माफ करा कुणाला दुखवण्याचा माझा हेतु नाही.

आता माझा प्रश्न. माणूस मेल्यानंतर जास्तीत जास्त तीन वर्षानंतर दुसरा जन्म घेतो. त्याला गती
मिळालेली असते. मग आपण वर्षानुवर्ष त्याचे श्राध्द, पक्ष का करत रहातो? कुणाला माहित असेल
तर याचं उत्तर द्याल का?

सुरेखा, भावना दुखवु नयेत हे खरे आहे. पण सर्वच भावना जपल्या पाहिजेत का? कधिकधि शॉक ट्रीटमेंट विरुद्ध पॉईंट ऑफ विव्ह दाखवायला मदत करु शकते.

आता तीन वर्षांच्या आत होणार्‍या पुनर्जन्माचेच पहा. तुम्हाला याची कल्पना आहे का की फक्त ~१५% (किंवा त्याही पेक्षा थोड्या कमीच) लोकांचाच पुनर्जन्म होतो?

अगं सिंडी त्या शिवाय मग पुर्वजन्मीचे पुण्य आणि पाप अस सोयीस्कर एक्सप्लनेशन कस देता येइल मग ? Happy

१. एकतर तो विधी करा. (मला वाटते सर्वपित्री अमावस्येला केला तर चालेल).
किंवा
२. तो विधी करु नका पण त्याबद्दल विचारही करु नका. (तुम्ही एक चांगले काम केले आहे त्याबद्दल समाधान माना.)

मानस ला अनुमोदन. उगाच मनात रुखरुख लागून रहाणार असेल तर त्यापेक्षा साधेपणाने हा विधी केलेला बरा. आजकाल ज्ञानप्रबोधिनीच्या महिला घरी येऊन श्राद्धाचा साधा विधी सांगतात, शिवय दक्षिणाही घेत नाहीत. संस्थेसाठी देणगी घेतात.

"मनापासुन पुजा केली की कोणतेही रितिरीवाज पाळायची गरज नसते असे या ब्राह्मणाला शिकवण्यात आले असल्याने तसे लिहिले."

तसे तर 'मनापासून' देवाचे स्मरण होत असल्यास, कुठल्याच कर्मकांडाची गरज नाही. कर्मकांडे करण्याच्या निमित्ताने वेळ वेगळा काढून देवाच्या स्मरणाची सवय करावी हा हेतू आहे. होता होता मनापासून स्मरण होते असे म्हणतात.

देवावर विश्वास असो वा नसो, जर काही करायचे असेल तर ते शक्यतो योग्य पद्धतीने करावे असेहि काही जुन्या काळच्या लोकांना वाटते. मग ते धार्मिक काम असो वा भिंतीला रंग लावणे असो. कुणास ठाउक, म्हणतात त्याप्रमाणे खरेच देव असेल नि त्याचे कार्य अगदी बरोब्बर केले, तर आपल्यालाहि अनुभूति येईल! चांगले असते म्हणे. कुठलेहि काम चांगले झाले की बरे वाटते. नाहीतर आहेच नेहेमीचे जगणे.

देवावर विश्वास आहे असे नेहेमीच सांगावे. म्हणजे हातून वाईट गोष्ट घडल्यास देवाला दोष देऊन मोकळे होता येते. खरेच देव असेल नि तो वर्णन केल्याप्रमाणे 'रजनी (यन्ना रास्कला फेम)' एव्हढा ग्रेट असेल तर क्षमा करेलच. देव नसेल तर काय फरक पडतो?

या विचारसरणीला एक नाव आहे, काय ते विसरलो.

Happy Light 1

अस्चिग १५% लोकांचाच पुनर्जन्म होतो मग बाकीच्यांचे काय होते?
कृपया मला जरा याबद्दल जास्त माहित असेल तर संगाल का?
कारण गीतेत पुनर्जन्माबद्दल लिहिले आहे. हिन्दु धर्मात पुनर्जन्म
मानतात पण १५% लोकांचाच पुनर्जन्म होतो हे मला माहित नव्हतं.
मी डॉ.वर्तकांचे पुनर्जन्मावरचे पुस्तक वाचले पण त्यातहि असा कुठे
उल्लेख नाही. पुनर्जन्माचे त्यानी बरेच पुरावे दिले आहेत. माझा प्रश्न त्यामुळे
अनुत्तरित रहातो." त्यांचा जन्म जर कुठेतरी होतोच तर वर्षानुवर्ष श्राध्द
का करावं?"

सुरेखा, मला माफ कराल अशी आशा आहे, कारण वर उल्लेख केलेल्या धडक तंत्राचा वापर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. कधिकधि समोरच्या व्यक्तिला आपले म्हणणे पटवायला त्याची मदत होते तर कधिकधि प्रयोग उलटतो.

जगातील ~१५% लोक हिंदु आहेत. केवळ त्यांचाच पुनर्जन्मावर विश्वास आहे. Dr. Christian Vartak किंवा श्री. कृष्ण खान यांना याबद्दल विचारले तर ते ही खुळचट कल्पना आहे असे म्हणतील. ते म्हणतात म्हणुन ही कल्पना चुकीची ठरत नाही. पण इथे माझा येवढेच दाखवायचा उद्देश आहे की अशा अलौकीक मुद्द्यांबद्दल जे मार्गदर्शन मिळेल ते मार्गदर्शन देऊ पाहणार्‍याच्या भुमिकेवर अवलंबुन असेल. त्यापेक्षा उत्तम म्हणजे ईकडचे तिकडचे चौफेर वाचावे, ऐकावे, त्यातले बहुतांश सोडुन द्यावे, स्वतः सखोल विचार करावा व मग ठरवावे.

तुम्हाला ३ वर्षे कर्मकांडं करायची आहेत? करा. ३० वर्षे? करा. नाही करायची? नका करु. तो देव काही तुम्हाला जाब विचारणार नाही. पुर्वजही विचारणार नाहीत. देव पुर्वजांनाही दोषी ठरवणार नाही. तुमच्या आसपासच्या लोकांबद्दल मात्र मी खात्रीलायक रीत्या काही सांगु शकत नाही. पण मला विचाराल तर लोकांचे काय करावे या इतका गौण प्रश्न दुसरा नाही. काहिही केले तरी तुम्हाला दोषी ठरवणारे जरूर सापडतील.

अस्चिग, सुंदर पोस्ट Happy
मला तुझं अजून एका गोष्टीसाठी कौतुक वाटतं ती म्हणजे तू कधीही तुझा मुद्दा मांडण्याच्या नादात दुसर्‍यांना, विचारांनी तुच्छ / अडाणी / निर्बुद्ध मानत नाहीस, त्यांच्या विचारांचा मान राखूनच स्वतःचे मत ठामपणे मांडतोस.

सुरेखा, जे बुद्धीला पटेल व त्याचबरोबर स्वतःच्या भावनांचीही योग्य ती परिपुर्ती होईल असंच करावं.

समजा, कुणीतरी सांगितलं की श्राद्ध नाही केलं तर गेलेली व्यक्ती लटकत राहील, मोक्ष मिळणार नाही तर ते झुट आहे. कारण श्राद्ध हे खरंतर गेलेल्या व्यक्तीच्या त्या दिवसाच्या स्मरणार्थ असतं आणि ती व्यक्ती हयात असताना जर त्या व्यक्तीची प्रेमाने सेवा केली असेल तर तेच त्या व्यक्तीसाठी जास्त मोलाचं असतं. जाणार्‍या व्यक्तीची पुढची गती जी काही असेल ती त्याच्या त्याच्या कर्मांनीच ठरते. समजा एखादी अतिशय सदाचारी व्यक्ती गेली आणि तिच्या पिंडाला कुणी वाईट माणसाने लाथ मारली तरी त्या गेलेल्या व्यक्तीचा पुढचा प्रवास हा खंडीत किंवा वाईट होणार नाहिये. पण अशा चांगल्या व्यक्तीचा अपमान केल्याची नोंद मात्र त्या वाईट माणसाच्या खात्यात नक्की होईल.

तसेच एखाद्या जन्मभर दुष्कृत्य केलेल्या व्यक्तीच्या नावे कितीही दानधर्म त्याच्या मरणोत्तर केला गेला तरी तो त्याच्या अकाऊंटला जमा होणार नाही. तो ज्याने दान केले त्याच्याच अकाऊंटला जमा होणार.

तर, वर्षानुवर्षे श्राद्ध केलं नाही तरी मला वाटतं काय बिघडणार? गेलेल्या व्यक्तीचं जे काही व्हायचं ते झालेलंच असणार. त्याचं काय होणार ते आपण घातलेलं श्राद्ध नाही, तर त्याचं कर्म ठरवणार. त्यादिवसाच्या स्मरणार्थ पाहिजे तर तेच पैसे जर पटत असेल तर/ मनाला खात रहाणार नसेल तर दान करुन टाकावेत.

तसंच पितृपक्षाच्या बाबतीत...

गणपती म्हणजेच विघ्नहर्ता येऊन गेल्यानंतर हा पक्ष सुरु होतो आणि अशुभनाशिनी नवरात्र (अश्विन नवरात्र) म्हणजेच कालीचा /पार्वतीचा/गणेशाच्या आईचा उत्सव सुरु होताना संपतो. पितर म्हणजे आपले पुर्वज. या पक्षात प्रवेश करताना आपण विघ्नहर्त्याच्या सहाय्याने जी ऑलरेडी आहेत ती विघ्न निवारणाच्या तयारीत असतो आणि या पक्षात आपण पितरांचे श्राद्ध म्हणजे काकबली देऊन त्यांचे स्मरण करतो.

अ‍ॅक्च्युअली हे काकबली म्हणजे 'क'काराने निर्माण होणारी सर्वप्रश्नचिन्हे, आपल्या पुर्वजांनी ज्या चुका केल्या त्या कशा टाळायच्या ते त्यांच्या आयुष्याचा आढावा घेऊन, आपल्या आयुष्यात ती कशी निर्माण होणार नाहीत्/कशी कमितकमी निर्माण होतील याचा अटोकाट प्रयास करणे. पण आपण हे न करता नुसतं त्या कावळ्यांनाच आपले आजोबा, पणजोबा वगैरे मानून खा खा खायला घालतो. पुन्हा इथे तुम्ही म्हणता तसे, जर पुर्नर्जन्म झाला असेल तर त्या कावळ्याच्या शरिरात पितरांचे आत्मे सामुहिकरित्या, तात्पुरते कसे काय येतील?

हा पितृपक्ष असे स्मरण करुन पार पडला की मग विघ्नहर्त्याची आई (काली) आणि आजी (महाकाली) आपले कार्य सुरु करतात अश्विन शुद्ध प्रतिपदेला. इथेही चक्क नवरात्राचा पहिला दिवस हा मातामही श्राद्ध म्हणून पाळला जातो. आईची आई ती मातामही. तिचा गौरव असणारे श्राद्ध ह्या पवित्र उत्सवात कसे काय हा प्रश्नही आपल्या मनात येत नाही. इथे, सगळ्यात श्रेष्ठ मातामही म्हणजे आपल्या आईची (आल्हादिनीची) आई (दुर्गा/महिषासुरमर्दिनी) हीच. तिच्या स्मरणानेच ह्या अशुभनाशनाच्या उत्सवाची सुरुवात होते.

त्यामुळे श्राद्ध हा कुठला अपवित्र किंवा नाही केलं तर आपल्या आयुष्यात काहितरी भयानक घडवेल असा विधी नाही. आपल्यातल्या सदाचारामुळे, सात्विकतेमुळे आपला ऑरा बलवान असेल तर तो भेदून कुणी निशाचर / आत्मा आपल्याला त्रास देऊ शकणार नाही.

अर्थात हे सर्व माझं मत मी मांडलंय. ते इतरांना मान्य असेल किंवा असावेच असे नाही. Happy

गुरुनानक एकदा गंगेत स्नानाला गेले होते तेव्हा पिंडदानाचा विधी सुरु होता. त्यानी अचानक भराभर पाणी एका दिशेला टाकायला सुरुवात केली..लोकानी विचारले "काय करतोयस?" ते म्हणाले "इथुन मी माझ्या शेताला पाणी देतोय". त्यावर लोक हसु लागले म्हणाले "मुर्खा..इथुन पाणी फेकुन तुझ्या शेतापर्यंत पोहोचणार आहे का?" ते म्हणाले "का नाही? जर तुम्ही इथे पिंडदान करुन ते स्वर्गात तुमच्या पितरांपर्यंत पोहोचते तर मी उडवलेले पाणी माझ्या शेतापर्यंत का पोहोचणार नाही?".

आपण रितीरिवाजानुसार जे काही विधी करतो ते "आपल्या समाधानासाठी" असतात. एकीकडे आपली आईवडील एकाकी असताना त्याना विचारायचे नाही किंवा त्याना वाईट वागणुक द्यायची आणि ते गेल्यावर त्यांच्या नावे मोठमोठ्या देणग्या द्यायच्या , दानधर्म करायचे. काय उपयोग होणार त्याचा? त्यापेक्षा ते जीवंत असताना त्याना आनंदी ठेवण्याचा, त्याना हवे ते देण्याचा प्रयत्न करावा.

मी आधी एकदा लिहिल्याप्रमाणे जर आपल्या मनाला एखादा विधी न केल्याने रुखरुख लागणार असेल तर तो विधी जरुर करावा. समजा तो केला नाही आणि घरी कोणी आजारी पडले, कुठे नुकसान झाले, काही वाईट घडले तर आपण उगाच बिचार्‍या ज्याच्या नावे तो करणार होतो त्याला दोष देणार त्यापेक्षा तो विधी केलेलाच बरा.

(हे माझे वैयक्तीक मत, कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व!)

कुठलेही विधी किंवा रिती आपल्या संसकृतीचा एक भाग म्हणूनच बघावेत. फार पुर्वी पोथ्या पुराणात लिहून ठेवलेली,कुठलेही विधी करण्यामागची कारणं आताच्या काळात कितपत तग धरतील ह्यात शंका आहेच. इथे विषय निघालाच आहे म्हणून थोडं पुनर्जन्माच्या "मानसिक गरजे" बद्दल लिहावसं वाटलं. "पुनर्जन्मं" च्या व्याख्येचा जन्मच माझ्या मते माणसाला काही न लागलेल्या हिशोबांमुळे झाला आहे. " Life could be very grateful to a human being and could also be extremely unfair to another " हे काही माणसाला झेपत नाही. एखादी व्यक्ती आयुष्यभर वाईट कामं करून सुद्धा जेव्हा फारसं काही भोगताना दिसत नाहीत तेव्हा "खात्यात लिहून ठेवलं जातय, पुढच्या जन्मी सगळं फेडावं लागेल" हे एकच उत्तर समाधानकारक वाटतं. ह्या उलट आयुष्यभर चांगली कामं करुन अशक्यप्राय त्रास भोगणारी माणसं दिसली की परत हिशोब नीट करायला पुनर्जन्म होणं अनिवार्य आहे.
तसं पाहायला गेलं तर एका दृष्टिनी हे समज मदतही करतात, भोगणार्‍याला आशा देतात आणि माजलेल्या ला भिती घालतात. थोडक्यात विश्वास (फक्त पुनर्जन्मच नाही तर इतर विधी वगैरेंवर) ठेवण्यात काही गैर नाही पण आहारी जाऊन जीवाला घोर लावून घेऊ नये असच मी म्हणेन.

कुठे शोधीसि रामेश्वर...अन् कुठे शोधीसि काशी,
र्‍हदयातील भगवन्त राहीला...र्‍हदयातुन उपाशी

शोधीशी मानवा राउळी मन्दीरी,
नान्द्तो देव हा आपुल्या अन्तरी...

विश्वाची उत्पत्ती ज्या पासुन झाहली आम्ही त्याला मानतो.

>>जगातील ~१५% लोक हिंदु आहेत. केवळ त्यांचाच पुनर्जन्मावर विश्वास आहे.<<<

चला एक आकडा मीळाला...म्हणजे जगात १५% लोक्स असे आहेत.
१) पुराण कथाना चीकटुन राहणारे
२) अन्धश्रधाळु
३) बळी च्या नावाखाली जिव घेणारे
४) भुतानवर विश्वास ठेवणारे
५) एकमेकाना खाली खेचणारे
६) नेहमि काल्पनिक विश्वात रमणारे....

कल्पनेत उड्णारा..............चातक

>>जगातील ~१५% लोक हिंदु आहेत. केवळ त्यांचाच पुनर्जन्मावर विश्वास आहे.<<<

चला एक आकडा मीळाला...म्हणजे जगात १५% लोक्स असे आहेत.
१) पुराण कथाना चीकटुन राहणारे
२) अन्धश्रधाळु
३) बळी च्या नावाखाली जिव घेणारे
४) भुतानवर विश्वास ठेवणारे
५) एकमेकाना खाली खेचणारे
६) नेहमि काल्पनिक विश्वात रमणारे....

कल्पनेत उड्णारा..............चातक

अस्चिग
मला आवडलं तुमचं धडक तंत्र. कधी तरी प्रयोग न उलटण्याची काळजी घेऊन (तुमच्यावर्)वापरता
येईल.आश्विनीने केलेल्या तुमच्या कौतुकाला अनुमोदन.
(मी एका गोष्टीचा येथे थोडक्यात उल्लेख करते.डॉ.वर्तक हे पुण्याचे. मेडिकल कॉलेज मध्ये शिकवायला
होते. त्यांचा पातंजलीवरचा खूप अभ्यास आहे. त्यांनी ध्यान धारणेने काही शोध लावले आहेत.ते जगातल्या
सर्व शस्त्रज्ञानी मान्य केले आहे. त्यांना अधुनिक काळातील ऋषि म्हट्ल जातं. ते हैदराबादला आले असता
आमच्या कॉलनीत आले दोन दिवस राहिले आमच्या घरीही येवून गेले.या थोर व्यक्तीचा आपल्या चर्चेत
पुन्हा उल्लेख नको.ही विनंती.)
केवळ त्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणून मी ते वाचले. माझ्या प्रश्नासाठी नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल
तरी ठीक नाही मिळालं तरी ठीक. कारण मी श्राध्द्पक्ष काही करत नाही. जे मला पटत नाही ते मी करत नाही.
मी सगळी चर्चा वाचली. मला यात सहभागी व्हायचं होतं म्हणून हा अधुनमधुन फणा काढणारा प्रश्न मी विचरला.
आश्विनीला मी १००% अनुमोदन दिलं ते माझे आणि त्यांचे विचार अगदी तंतोतंत जमले म्हणून.
मला हे कर्मकांड करणं अजिबात पटत नाही.कारण मला वाटतं हे सगळे लोक भीतीपोटी करतात.
कुणी " आपण ह्याला जन्मभर छळलं आहे. हा आता मेल्यावर मानगुटीवर बसेल".(काही जणांच्या बाबतीत)
ह्या भीतीपोटी,कोणी "आपल्या धर्मात हे सांगितलं आहे. त्याप्रमाणे नाही केलं तर संसारात अडचणी येतील"
या भीतीपोटी,कोणी कोणी "लोक काय म्हणतील?"ह्या भीतीपोटी,तर कोणी"खरंच आपण हे केलं नाही तर
काही बरंवाईट तर होणार नाही ना?" ह्या मनाच्या भीतीपोटी ही कर्मकांड करतात.ही भीती का? मनोज आणि
वैद्यबुवानी म्हट्ल्याप्रमाणे आपण जर काही वाईट केले नसेल तर ही भीती का? श्राध्द्पक्ष किंवा कुळधर्म
कुळाचार करायला माझा अजिबात विरोध नाही. पण भीतीपोटी नको तर श्रध्देने,मनापासून समजून उमजून करावे.वैद्यबुवा म्हणतात तसे त्याच्या आहारी जाऊ नये आणि जीवाला घोर लावून घेवू नये. कुणीतरी
काही भीती दाखवतो म्हणून किंवा लोक करतात म्हणून आपण करावे हे मला पटत नाही.
मी पण गौरीगणपती,नवरात्र,चैत्रगौर हे सगळं करते पण हौस म्हणून. पण मी नास्तिक नाही.
देवावर माझी नितांत श्रध्दा आहे. पण माझी परमेश्वराबद्दलची कल्पना वेगळी आहे. त्यासाठी कर्मकांड
करण्याची गरज मला वाटत नाही. फार जास्त लिहिलं आहे.काही गैर लिहिलं असल्यास माफ करणे.
अस्चिग, आश्विनी,मनोज(इंग्रजीतले नाव कळले नाही म्हणून वि.पू.त जाऊन पाहिले)वैद्यबुवा(आपले नाव
पहायचे आहे) माझ्या विचाराची माणसे इथे आहेत पाहून खूप आनंद झाला.खूप लांबत चालले आहे म्हणून
आवरते घेते आहे. ह्या निमित्तने आपले सर्वांची ओळख झाली.
आता फक्त एक ओळ. माझा "हे चित्र आणि ते चित्र" हा लेख वाचावा अशी विनंती आहे. आपले
त्या वरचे विचार मला वाचायला आवडेल. फक्त २५ ऑक्टोबरच्या बखरीत जावून पहावे लागेल.
सर्वांना खूप खूप धन्यवाद. (आश्विनिशी पुन्हा बोलायला खूप आवडेल).

(पण माझा प्रश्न??????)

चातक
१५% लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. पण १,२,३,४,५,६, हे लोक जगात भरपुर आहेत.
त्यांचा आकडा माहित व्हायचाय अजून.

मोरया या शब्दाचा अर्थ शाब्दिक अथवा धार्मिकदृष्ट्या काहीही नाही. चिन्चवड्च्या मोरया गोसाव्याला मिळालेल्या वरामुळे गणपतीनन्तर त्याचे नाव घेण्याची प्रथा सुरू झाली. ती आज पर्यन्त. गणपतीबाप्पा मोरया...पुढ्ल्यावर्षी लवकर या.... यमक जुळ्ले.

मैत्रेयी तुझे म्हणणे एकदम बरोबर आहे. माणूस चन्द्रावर जाऊन आल्याला ४१ वर्षे झाली तरीही अजुन आपण ह्याच गोष्टी करतोय ही शरमेचीच बाब आहे. अशा लोकांना फटके नाहीत तर चांगले जोड्यानेच मारले पाहीजे.

Namskar,
Mi US madhye asate. Mala ithe satyanarayanachi pooja karayachi ahe. Mazyakade CD nahiye pan pustak aahe , tyatun wachun amhi gharicha karanar aahot pooja. Pan nantar uttar puja zalyawar sagali ful ani vidyachya panacha kai karayacha? Kunala savistar mahiti asel tar sangal ka please?
Ani keliche khamb kase milatil ithe?

मैत्री,

तुमच्या लोकल देसी स्टोअर असेल तिथे विचारुन पहा तिकडे केळीचे खांब कुठे मिळु शकतील ते कळेल..

विड्याची पाने आणि दक्षिणा गुरुजीना देतात पण तुम्ही दक्षिणा तुमच्या स्थानिक देवळाला देउ शकता. आणि विड्याची पाने हवे तर निर्माल्याबरोबर द्यावी.उत्तरपुजेनंतर निर्माल्य नदीत्/वाहत्या पाण्यात विसर्जन करावे पण अमेरिकेत असे आपण कुठेही टाकु शकत नाही. तुमचे स्थानिक महाराष्ट्र मंडळ असेल त्याना विचारुन पहा.(तिथे सार्वजनिक गणपती असतो तेव्हा त्याना निर्माल्य कुठे विसर्जीत करतात ते माहित असेल).

मी अमेरिकेत असताना निर्माल्य एका वेगळ्या स्वच्छ पिशवीत घेउन आपल्या रेग्युलर कचर्‍याच्या डब्यात टाकले आहे. टाकताना देवाची प्रार्थना करायची की "मला सगळे नीट करता आले नाही. मी यथाशक्ती यथामती केले आहे, काही चुकल्यास क्षमा कर".

Pages