पण स्वामी समर्थांच्या गुरुचरित्रातच लिहिले आहे कि जो लाल वस्त्र घालून जेवेल तो चांडाळ होईल. >>> हा संदर्भ वाचला नाहिये अजून. पण नक्कीच या वाक्याचा असा सरधोपट अर्थ नसावा. जसं "स्त्री हे नरकाचे द्वार" हे वचन मधल्या काळात समाजाने आपल्या सोयीच्या अर्थाने घेतले जेणेकरुन पुरुषप्रधान संस्कृतीला बळकटी येऊन स्त्रीला अजून हीन मानले जावे. खरंतर परस्त्री हे नरकाचे द्वार आहे असा त्याचा अर्थ आहे. तेच वाक्य परपुरुष हे नरकाचे द्वार आहे अशा अर्थानेही जरुर घेतले जावे.
नेहमीच्या पूजेला तर लाल, केशरी, जांभळा, किरमिजी, पिवळा अशा सर्व रंगांचे कद वापरतातच की. ती तर अघोरी विद्या नसते.
मीही बर्याच लोकांकडून ऐकलंय की काळं चालत नाही त्यांच्याकडे. पण तू जस्ट एक अभ्यास म्हणून आठवून बघ की आता माहिती होईपर्यंत तू काळं वापरत होतीस मग काळं घात्लं की काही अप्रिय घडलं आहे का? एखाद दुसरा अपवाद वगळता असं काही कधीच घडलं नसेल तर तुम्हाला काळे कपडे घालायला हरकत नसावी. अर्थात तुझे स्वतःचे मत काय आहे त्याप्रमाणेच कर
मला वाटतं केरळी की तेलुगु लोक धार्मिक कार्यासाठी किंवा तिर्थक्षेत्रांच्या जागी काळी लुंगी/कपडे वापरतात.
हो, आमच्याकडे पण "काळं" घातलेलं आमच्या देवीला चालत नाही, असं सासरी म्हणतात. पण देवी नक्की कुठली आणि तिचे नाव काय हेच माहित नाहिये. त्यामुळे मी आणि सतिश काळे कपडे वापरतोच. (ऑफिसमधे रोज रोज पांढरी पँट घालून गेलं तर जितेंद्र वाटणार नाही का?? ) अजून तरी काही अप्रिय घडलं नाही. आणि घडलं असेल त्या दिवशी काळेच कपडे घातले होते असं काही नाही!!! हां, आता काळे कपडे घालून जास्त उकडतं म्हणून असा नियम काढला असेल तर माहित नाही!!
लाल हा उलट पवित्र रंग मानलेला आहे, पूजेला लाल सोवळं, लाल साडी, लाल फूल चालतं.
> पण देवी नक्की कुठली आणि तिचे नाव काय हेच माहित नाहिये
नंदिनी, तु एका अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहेस. देव्या (खरेतर या मुळच्या यक्षिणी, योगिनी, मातृका आणि डाकिणी) या खुप आधीपासुन छोट्या-छोट्या गोष्टींवर राज्य करताहेत (उदा. शितला हीचे साम्राज्य रोगांवर). या पश्चिमेकडच्या pagan gods प्रमाणे होत्या. नंतर brahminical tradition मध्ये बसविण्याकरता बरेच बदल झाले. अनेक देव्यांच्या जोड्या (नवर्यांशी) घालून देऊन त्यांचे महत्व कमी केल्या गेले. अशा देव्या साधारणपणे नेहमीच चांगल्या, तर एकएकट्या असलेल्या (उदा. काली) या प्रसन्न झाल्या तर ठीक, नाहीतर ...
त्या अनेक योगिनींना एकाच देवीचे रुप म्हणुन पुढे करायचे सुद्धा प्रयत्न झाले. आजकाल तर त्या सगळ्यांची नावे देखिल लोकांना माहित नसतात. दिवोदासाकडुन काशी परत काबीज करण्याकरता शिवाने सर्वात प्रथम योगिनींनाच तिथे पाठविले.
बहुतेकांच्या देव्या या जुन्यापैकी कोणी असणार, पण कालपरत्वे सर्वच बदलते.
हिन्दु धर्मामधे गुरु करणे किन्वा गुरुमन्त्र घेणे ही प्रथा चालत आली आहे.माणसाच्या जीवना मधे आजच्या काळात हे गुरु कसे मार्ग दर्श् क ठरु शकतात्?जर गुरु केला नाही तर काय काय अड्चणी येउ शकतात?
Submitted by dilipnilekar on 30 August, 2010 - 12:31
आता गौरी माहेरवाशिणी म्हणून येतील. त्यांना सोन्याच्या, चांदिच्या, मोत्याच्या, खोट्या, फुलांच्या दागिन्यांनी सजवलं जाईल. जरुर सजवा, पण जेव्हा तिला परत सासरी पाठवायला निघाल तेव्हा आवर्जून फुलांचे दागिने सोडून इतर दागिने उतरवून ठेवा (खोटे असले तरिही). कारण ती दक्षकन्या म्हणून असो किंवा हिमवानपर्वताची कन्या म्हणून असो, ती राजकन्या होती त्यामुळे माहेरी आल्यावर तिला सजवणे ठीक आहे. परंतु तिची पाठवणी करताना हे विसरु नका की ती परमशिवाची पत्नी आहे जो रानावनात रहातो, अंगाला राख फासतो. त्याची पत्नी कधीच दागिने घालून मिरवणार नाही, तिला ते आवडणार नाही. तिने पतीचा अपमान झाला म्हणून यज्ञात उडी घेतली होती. ती परमशिवाची पत्नी म्हणून परत जाईल तेव्हा तिच्या पतीचा आदर म्हणून तिला वाटल्यास फक्त फुलांचे दागिने घालून पाठवणी करा.
Submitted by अश्विनी के on 13 September, 2010 - 04:50
अश्वे, सासरी गौरी बसतात. मला तुला विचारायच आहे की,
१) गौरी ह्या माहेर्वाशिणी असतात, मग त्यांना वर्षभर देव्हार्यात ठेवुन पुजा करायची का? आमच्या देव्हार्यात वर्षभर मुखवटे असतात.
२) आपण जो नैवेद्य दाखवतो तो ताटात वाढतो व ताम्हणात पुरणाचे दिवे करुन आरती करतो. माझ्या सासरी जेवणाच्या ताटात मधे पुरणाचे दिवे करतात व संपुर्ण ताट ओवाळतात आरती करताना (अन्न ओवाळु नये अस आईने शिकवल होत).
३)सवाष्ण म्हणजे देवीचे रुप तिला जेवण खाउ घातल्याशिवाय घरातल्या लोकांनी जेवु नये असा माहेरी नियम पण साबा प्रत्येक वर्षी नैवेद्य आरती झाली की साबु व मुलांना (दीर) जेवण वाढतात, सवाष्णीसाठी संकल्प सुद्धा सोडत नाहीत. सवाष्ण नंतर जेवते. अस का? आणि हे बरोबर आहे का?
Submitted by शुभांगी. on 13 September, 2010 - 06:46
गुब्बे, मी काही यातली फारशी माहितगार नाही गं. तरिही---
१) गौरी ह्या माहेर्वाशिणी असतात, मग त्यांना वर्षभर देव्हार्यात ठेवुन पुजा करायची का? आमच्या देव्हार्यात वर्षभर मुखवटे असतात. >>>> ते पुजेत नसतील कदाचित. ते गणपतीमधे गौरी आणण्यापुरते /पुजण्यापुरते वापरत असतील. विसर्जनाच्या वेळेस जरा हलवून ठेवतो आपण मुर्तीला.
एरव्ही आपल्या देव्हार्यात अन्नपुर्णा (पार्वतीच) असते पुजेला.
२) आपण जो नैवेद्य दाखवतो तो ताटात वाढतो व ताम्हणात पुरणाचे दिवे करुन आरती करतो. माझ्या सासरी जेवणाच्या ताटात मधे पुरणाचे दिवे करतात व संपुर्ण ताट ओवाळतात आरती करताना (अन्न ओवाळु नये अस आईने शिकवल होत). >>>> जेवणासकट ओवळणे याबद्दल माहित नाही.
३)सवाष्ण म्हणजे देवीचे रुप तिला जेवण खाउ घातल्याशिवाय घरातल्या लोकांनी जेवु नये असा माहेरी नियम पण साबा प्रत्येक वर्षी नैवेद्य आरती झाली की साबु व मुलांना (दीर) जेवण वाढतात, सवाष्णीसाठी संकल्प सुद्धा सोडत नाहीत. सवाष्ण नंतर जेवते. अस का? आणि हे बरोबर आहे का? >>>
अगं साबुंना भूक धरवत नसेल वयापरत्वे. दीरांचाही तसाच काही प्रॉब्लेम असेल तर काहीच हरकत नाही जेवायला वाढायला. लहान मुलांना, आजार्यांना, गरोदर स्त्रियांना व वृद्धांना नैवेद्यासाठी जेवायला वाढायचे ताटकळत ठेवू नये. एवढंच नव्हे तर हट्ट्याकट्ट्यांनाही जर अज्जिबात नैवेद्य अर्पण करेपर्यंत भूक धरवली नाही तर वाढावे. अंतरात्मा तळतळत ठेवला तर तो नैवेद्य देवाला पोहोचणार नाही तुझ्या सा.बा. नैवेद्य आरती झाल्यावरच वाढतात ना? सवाष्ण उशिरा येते का? (माझं वैयक्तिक मत : रोज चार ठाव अन्न मिळणार्या सवाष्णी जेवायला घालण्यापेक्षा त्या दिवशी एखाद्या अशा स्त्रीला जेवायला बोलवावं/साडी चोळी द्यावी की जिला त्या वस्त्राची खूप गरज आहे व असं व्यवस्थित जेवण फारच क्वचित मिळतं )
Submitted by अश्विनी के on 13 September, 2010 - 06:56
अश्वे, गौरींचे मुखवटे रोजच पुजेत असतात. साबा त्यांना महालक्षुम्या म्हणतात. अन्नपुर्णा आहेच देव्हार्यात.
नाही ग, सगळे हट्टेकट्टे आहेत. लग्न झाल्यापासुन बघतेय मी (१० वर्षे झाली आता).
Submitted by शुभांगी. on 13 September, 2010 - 07:05
मी शुक्रवारी सवाष्ण बोलावते तेव्हा बांधकामावर काम करणार्या स्त्रीला मुलांसकट बोलावते. पण साबांना पटत नाही ते मग त्या मी नसताना परत सगळा स्वयंपाक करतात व दुसरी ब्राम्हण सवाष्ण घालतात जेवायला.
Submitted by शुभांगी. on 13 September, 2010 - 07:07
मी शुक्रवारी सवाष्ण बोलावते तेव्हा बांधकामावर काम करणार्या स्त्रीला मुलांसकट बोलावते. पण साबांना पटत नाही ते मग त्या मी नसताना परत सगळा स्वयंपाक करतात व दुसरी ब्राम्हण सवाष्ण घालतात जेवायला. >>> जाऊदे. तू घालतेस ना जेवायला !
Submitted by अश्विनी के on 13 September, 2010 - 07:10
मला पहिल्यापासुनच काहीतरी चुकतय अस वाटायच पण काही विचारल की आमच्याकडे असच असत हे ऐकवल जायच.
अजुनही साबा 'आपले गौरी गणपती, आपली सवाष्ण, आपला सत्यनारायण' अस कधीच म्हणत नाहीत. सगळे सणवार माझ्या घरी होतात पण ह्या बोलताना माझी सवाष्ण घालायची रीहिली बै, माझा सत्यनारायण घातला नाही अजुन अस म्हणतात
Submitted by शुभांगी. on 13 September, 2010 - 07:20
एका घरी रोज सकाळी पुजा केली जायची. त्यात दुधाचा नैवेद्य असायचा. त्यांच्याकडे एक मांजर होती. तीला नंतर जरी त्या दुधातला वाटा मिळणार असला तरी ते पुजे दरम््यान सतत लुडबुड करायचे. म्हणुन पुजा सुरु करण्या आधी ते मांजराला बांधुन ठेवीत. मग त्यांना मुलगा झाला. तो पहिल््यापासुन हेच पाही की मांजर बांधायचे आणि मग पुजा करायची. तेंव्हा असलेली दुसरी मांजर तो पुजे आधी बांधुन ठेवी. त्याच्या मुलाने पण तेच पाहिले. नंतर ती मांजर मेली. पण पुजा तर यथासांग व्हायलाच हवी. मग पुजे आधी शेजार््यांकडचे मांजर आणल्या जायचे, खंब्याला बांधले जायचे आणि मगच पुजा केल्या जायची.
आता पितृपक्ष चालू आहे. गेलेल्या माणसांची आठवण म्हणून त्या तिथीला ब्राम्हणाला बोलावून दुध - केळ - दक्षणा / नैवेद्य करुन छतावर ठेवणे / गायीला नैवेद्य देणे / ब्राम्हणाला जेवायला बोलावणे असे करण्याची पद्धत पुर्वीपासुन आहे.
त्यांचे स्मरण तर आपल्याला कायमच असते परंतू त्या तिथीला मी वृद्धाश्रमाला वाफेच मशीन (वृद्धाश्रमाची आवश्यकता लक्षात घेवून) दिल. पण काहीच मत अस पडल की तू हे केलस ते चांगल आहे परंतु वरील पैकी एक देखिल करायला पाहीजे.
मला काय करु समजत नाहीये. जर तसे करणे आवश्यक असेल तर ते सर्वपित्री अमावस्येस केल्यास चालेल का? किंवा कसे ?
छ्ताचे invention अनेक हजार वर्षांपुर्वीचे. त्याआधी लोक कुठे ठेवत दक्षिणा कुणास ठाऊक? सध्या ठेवतो ती दक्षिणा (भारत सरकारचे पैसे) ६३ वर्षांपुर्वी नव्हते. त्याआधी लोक काय करत? तुम्ही केलेली गोष्ट जास्त योग्य आहे. तेथील वृद्धांना रोज मदत होईल. एक दिवस आठवण करून काय फायदा?
सुनीता तू केलेस ते छान आहे. मी ही काहीच कर्मकांड करत नाही. त्यांना बॅड कर्मा फारसे नसल्याने ते आता
एक छान गुट्गुटीत मूल म्हणून जगात कुठेतरी जन्मले असतील असे मनाशी धरते. मी ही त्यांच्या छोट्या शाळेत घसरगुंडी घेण्यासाठी पैसे दिले होते. यावर्षी ड्रायवर च्या मुलीचे फंक्षन आहे त्याला दिले. व घरी मला सर्वार्थाने सपोर्ट करणार्या मावशींच्या मुलीचे लग्न ठरले आहे त्यात मदत करणार.
अवडंबर न माजविता आपल्याला जे पट्ते तेच करावे. तू ज्यांच्या साठी करतेस त्यांना नक्कीच समजले असते. बाकी कोणाचा काय संबंध आपल्या भावनांशी. त्यात असले काही कर्मकांड करत बसले तर
घरातील छोटी मुले बावचळतात व बावरी होतात. ही एक हळवी बाजू आहे.
Submitted by अश्विनीमामी on 1 October, 2010 - 10:32
एक लक्षात ठेवा की हे जे काही आपण करतो ते आपल्या समाधानासाठी करतो. जर तुम्ही वरील विधी पैकी एक केला नाहीत आणि त्याची रुखरुख लागुन राहिली तर उगाच तुमचेच मनःस्वास्थ्य हरवेल. म्हणुन
१. एकतर तो विधी करा. (मला वाटते सर्वपित्री अमावस्येला केला तर चालेल).
किंवा
२. तो विधी करु नका पण त्याबद्दल विचारही करु नका. (तुम्ही एक चांगले काम केले आहे त्याबद्दल समाधान माना.)
> घरातील छोटी मुले बावचळतात व बावरी होतात. ही एक हळवी बाजू आहे. ??>> अगदी नकळत्या वयाची लहान मुले असे श्राद्धाचे वगैरे विधी बघून प्रशन विचारतात, ते सांगताना आपल्याला अवघड जाते ते बघून मुले नर्वस होतात. आपल्याला पटणार नाही कदाचित.
Submitted by अश्विनीमामी on 1 October, 2010 - 21:54
अस्चिंग, मामी, मनस्मि१८
मार्गदर्शना बद्दल धन्यवाद.
मला कर्मकांडात फारसा विश्वास नाही.
एक छान गुट्गुटीत मूल म्हणून जगात कुठेतरी जन्मले असतील असे मनाशी धरते. मामी, मी सुद्धा असेच समजते मुलींना देखिल तसेच सांगितले आहे. पण शेजारी पाजारी मुद्दाम (तिथी विषयी) आठवण करून देत असतात (की जी आपण कधीच विसरलेलो नसतो.) काय केले काय नाही यात त्यांना फार रस असतो. आपली मते त्यांना पटत नाहीत व त्याविषयी बोलत असताना भावना अनावर होतात.
मी जे केले ते का व कशाकरता केले हे मुलींना सांगितले. त्यांना देखिल पटले. परंतु त्या दिवशी रात्री तिघी रडत होतो.
पण स्वामी समर्थांच्या
पण स्वामी समर्थांच्या गुरुचरित्रातच लिहिले आहे कि जो लाल वस्त्र घालून जेवेल तो चांडाळ होईल. >>> हा संदर्भ वाचला नाहिये अजून. पण नक्कीच या वाक्याचा असा सरधोपट अर्थ नसावा. जसं "स्त्री हे नरकाचे द्वार" हे वचन मधल्या काळात समाजाने आपल्या सोयीच्या अर्थाने घेतले जेणेकरुन पुरुषप्रधान संस्कृतीला बळकटी येऊन स्त्रीला अजून हीन मानले जावे. खरंतर परस्त्री हे नरकाचे द्वार आहे असा त्याचा अर्थ आहे. तेच वाक्य परपुरुष हे नरकाचे द्वार आहे अशा अर्थानेही जरुर घेतले जावे.
नेहमीच्या पूजेला तर लाल, केशरी, जांभळा, किरमिजी, पिवळा अशा सर्व रंगांचे कद वापरतातच की. ती तर अघोरी विद्या नसते.
मीही बर्याच लोकांकडून ऐकलंय की काळं चालत नाही त्यांच्याकडे. पण तू जस्ट एक अभ्यास म्हणून आठवून बघ की आता माहिती होईपर्यंत तू काळं वापरत होतीस मग काळं घात्लं की काही अप्रिय घडलं आहे का? एखाद दुसरा अपवाद वगळता असं काही कधीच घडलं नसेल तर तुम्हाला काळे कपडे घालायला हरकत नसावी. अर्थात तुझे स्वतःचे मत काय आहे त्याप्रमाणेच कर
मला वाटतं केरळी की तेलुगु लोक धार्मिक कार्यासाठी किंवा तिर्थक्षेत्रांच्या जागी काळी लुंगी/कपडे वापरतात.
हो, आमच्याकडे पण "काळं"
हो, आमच्याकडे पण "काळं" घातलेलं आमच्या देवीला चालत नाही, असं सासरी म्हणतात. पण देवी नक्की कुठली आणि तिचे नाव काय हेच माहित नाहिये.
त्यामुळे मी आणि सतिश काळे कपडे वापरतोच. (ऑफिसमधे रोज रोज पांढरी पँट घालून गेलं तर जितेंद्र वाटणार नाही का?? ) अजून तरी काही अप्रिय घडलं नाही. आणि घडलं असेल त्या दिवशी काळेच कपडे घातले होते असं काही नाही!!! हां, आता काळे कपडे घालून जास्त उकडतं म्हणून असा नियम काढला असेल तर माहित नाही!!
लाल हा उलट पवित्र रंग मानलेला आहे, पूजेला लाल सोवळं, लाल साडी, लाल फूल चालतं.
> पण देवी नक्की कुठली आणि
> पण देवी नक्की कुठली आणि तिचे नाव काय हेच माहित नाहिये
नंदिनी, तु एका अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहेस. देव्या (खरेतर या मुळच्या यक्षिणी, योगिनी, मातृका आणि डाकिणी) या खुप आधीपासुन छोट्या-छोट्या गोष्टींवर राज्य करताहेत (उदा. शितला हीचे साम्राज्य रोगांवर). या पश्चिमेकडच्या pagan gods प्रमाणे होत्या. नंतर brahminical tradition मध्ये बसविण्याकरता बरेच बदल झाले. अनेक देव्यांच्या जोड्या (नवर्यांशी) घालून देऊन त्यांचे महत्व कमी केल्या गेले. अशा देव्या साधारणपणे नेहमीच चांगल्या, तर एकएकट्या असलेल्या (उदा. काली) या प्रसन्न झाल्या तर ठीक, नाहीतर ...
त्या अनेक योगिनींना एकाच देवीचे रुप म्हणुन पुढे करायचे सुद्धा प्रयत्न झाले. आजकाल तर त्या सगळ्यांची नावे देखिल लोकांना माहित नसतात. दिवोदासाकडुन काशी परत काबीज करण्याकरता शिवाने सर्वात प्रथम योगिनींनाच तिथे पाठविले.
बहुतेकांच्या देव्या या जुन्यापैकी कोणी असणार, पण कालपरत्वे सर्वच बदलते.
अर्थातच लाल/काळे कपडे घालायला काहीच हरकत नसते.
पण स्वामी समर्थांच्या
पण स्वामी समर्थांच्या गुरुचरित्रातच लिहिले आहे कि जो लाल वस्त्र घालून जेवेल तो चांडाळ होईल
<<<
हिन्दु धर्मामधे गुरु करणे
हिन्दु धर्मामधे गुरु करणे किन्वा गुरुमन्त्र घेणे ही प्रथा चालत आली आहे.माणसाच्या जीवना मधे आजच्या काळात हे गुरु कसे मार्ग दर्श् क ठरु शकतात्?जर गुरु केला नाही तर काय काय अड्चणी येउ शकतात?
आता गौरी माहेरवाशिणी म्हणून
आता गौरी माहेरवाशिणी म्हणून येतील. त्यांना सोन्याच्या, चांदिच्या, मोत्याच्या, खोट्या, फुलांच्या दागिन्यांनी सजवलं जाईल. जरुर सजवा, पण जेव्हा तिला परत सासरी पाठवायला निघाल तेव्हा आवर्जून फुलांचे दागिने सोडून इतर दागिने उतरवून ठेवा (खोटे असले तरिही). कारण ती दक्षकन्या म्हणून असो किंवा हिमवानपर्वताची कन्या म्हणून असो, ती राजकन्या होती त्यामुळे माहेरी आल्यावर तिला सजवणे ठीक आहे. परंतु तिची पाठवणी करताना हे विसरु नका की ती परमशिवाची पत्नी आहे जो रानावनात रहातो, अंगाला राख फासतो. त्याची पत्नी कधीच दागिने घालून मिरवणार नाही, तिला ते आवडणार नाही. तिने पतीचा अपमान झाला म्हणून यज्ञात उडी घेतली होती. ती परमशिवाची पत्नी म्हणून परत जाईल तेव्हा तिच्या पतीचा आदर म्हणून तिला वाटल्यास फक्त फुलांचे दागिने घालून पाठवणी करा.
अश्वे, सासरी गौरी बसतात. मला
अश्वे, सासरी गौरी बसतात. मला तुला विचारायच आहे की,
१) गौरी ह्या माहेर्वाशिणी असतात, मग त्यांना वर्षभर देव्हार्यात ठेवुन पुजा करायची का? आमच्या देव्हार्यात वर्षभर मुखवटे असतात.
२) आपण जो नैवेद्य दाखवतो तो ताटात वाढतो व ताम्हणात पुरणाचे दिवे करुन आरती करतो. माझ्या सासरी जेवणाच्या ताटात मधे पुरणाचे दिवे करतात व संपुर्ण ताट ओवाळतात आरती करताना (अन्न ओवाळु नये अस आईने शिकवल होत).
३)सवाष्ण म्हणजे देवीचे रुप तिला जेवण खाउ घातल्याशिवाय घरातल्या लोकांनी जेवु नये असा माहेरी नियम पण साबा प्रत्येक वर्षी नैवेद्य आरती झाली की साबु व मुलांना (दीर) जेवण वाढतात, सवाष्णीसाठी संकल्प सुद्धा सोडत नाहीत. सवाष्ण नंतर जेवते. अस का? आणि हे बरोबर आहे का?
गुब्बे, मी काही यातली फारशी
गुब्बे, मी काही यातली फारशी माहितगार नाही गं. तरिही---
१) गौरी ह्या माहेर्वाशिणी असतात, मग त्यांना वर्षभर देव्हार्यात ठेवुन पुजा करायची का? आमच्या देव्हार्यात वर्षभर मुखवटे असतात. >>>> ते पुजेत नसतील कदाचित. ते गणपतीमधे गौरी आणण्यापुरते /पुजण्यापुरते वापरत असतील. विसर्जनाच्या वेळेस जरा हलवून ठेवतो आपण मुर्तीला.
एरव्ही आपल्या देव्हार्यात अन्नपुर्णा (पार्वतीच) असते पुजेला.
२) आपण जो नैवेद्य दाखवतो तो ताटात वाढतो व ताम्हणात पुरणाचे दिवे करुन आरती करतो. माझ्या सासरी जेवणाच्या ताटात मधे पुरणाचे दिवे करतात व संपुर्ण ताट ओवाळतात आरती करताना (अन्न ओवाळु नये अस आईने शिकवल होत). >>>> जेवणासकट ओवळणे याबद्दल माहित नाही.
३)सवाष्ण म्हणजे देवीचे रुप तिला जेवण खाउ घातल्याशिवाय घरातल्या लोकांनी जेवु नये असा माहेरी नियम पण साबा प्रत्येक वर्षी नैवेद्य आरती झाली की साबु व मुलांना (दीर) जेवण वाढतात, सवाष्णीसाठी संकल्प सुद्धा सोडत नाहीत. सवाष्ण नंतर जेवते. अस का? आणि हे बरोबर आहे का? >>>
तुझ्या सा.बा. नैवेद्य आरती झाल्यावरच वाढतात ना? सवाष्ण उशिरा येते का? (माझं वैयक्तिक मत : रोज चार ठाव अन्न मिळणार्या सवाष्णी जेवायला घालण्यापेक्षा त्या दिवशी एखाद्या अशा स्त्रीला जेवायला बोलवावं/साडी चोळी द्यावी की जिला त्या वस्त्राची खूप गरज आहे व असं व्यवस्थित जेवण फारच क्वचित मिळतं
)
अगं साबुंना भूक धरवत नसेल वयापरत्वे. दीरांचाही तसाच काही प्रॉब्लेम असेल तर काहीच हरकत नाही जेवायला वाढायला. लहान मुलांना, आजार्यांना, गरोदर स्त्रियांना व वृद्धांना नैवेद्यासाठी जेवायला वाढायचे ताटकळत ठेवू नये. एवढंच नव्हे तर हट्ट्याकट्ट्यांनाही जर अज्जिबात नैवेद्य अर्पण करेपर्यंत भूक धरवली नाही तर वाढावे. अंतरात्मा तळतळत ठेवला तर तो नैवेद्य देवाला पोहोचणार नाही
अश्वे, गौरींचे मुखवटे रोजच
अश्वे, गौरींचे मुखवटे रोजच पुजेत असतात. साबा त्यांना महालक्षुम्या म्हणतात. अन्नपुर्णा आहेच देव्हार्यात.
नाही ग, सगळे हट्टेकट्टे आहेत. लग्न झाल्यापासुन बघतेय मी (१० वर्षे झाली आता).
मी शुक्रवारी सवाष्ण बोलावते
मी शुक्रवारी सवाष्ण बोलावते तेव्हा बांधकामावर काम करणार्या स्त्रीला मुलांसकट बोलावते. पण साबांना पटत नाही ते मग त्या मी नसताना परत सगळा स्वयंपाक करतात व दुसरी ब्राम्हण सवाष्ण घालतात जेवायला.
गौरी आणि महालक्ष्मी हे
गौरी आणि महालक्ष्मी हे वेगवेगळं असावं बहुतेक. महालक्ष्मी ही गणेशाची आई नव्हे.
मी शुक्रवारी सवाष्ण बोलावते
मी शुक्रवारी सवाष्ण बोलावते तेव्हा बांधकामावर काम करणार्या स्त्रीला मुलांसकट बोलावते. पण साबांना पटत नाही ते मग त्या मी नसताना परत सगळा स्वयंपाक करतात व दुसरी ब्राम्हण सवाष्ण घालतात जेवायला. >>>
जाऊदे. तू घालतेस ना जेवायला ! 
ते आहे ग अश्वे, पण आता आपण
ते आहे ग अश्वे, पण आता आपण गणपती बरोबर बसवतो त्या गौरीच आणि त्यांना काही ठिकाणी महालक्ष्म्या पण म्हणतात साधारणतः विदर्भात. म्हणुन्च माझ कन्फुजन आहे.
या महालक्ष्म्यांची माहिती
या महालक्ष्म्यांची माहिती विदर्भातले माबोकरच नीट सांगू शकतील गं.
मला पहिल्यापासुनच काहीतरी
मला पहिल्यापासुनच काहीतरी चुकतय अस वाटायच पण काही विचारल की आमच्याकडे असच असत हे ऐकवल जायच.
अजुनही साबा 'आपले गौरी गणपती, आपली सवाष्ण, आपला सत्यनारायण' अस कधीच म्हणत नाहीत. सगळे सणवार माझ्या घरी होतात पण ह्या बोलताना माझी सवाष्ण घालायची रीहिली बै, माझा सत्यनारायण घातला नाही अजुन अस म्हणतात
http://www.reddit.com/r/funny
http://www.reddit.com/r/funny/comments/dd39n/bananas_and_monkeys/
माणसा, जरा परखड पण योग्य मत
माणसा, जरा परखड पण योग्य मत दिलस. पुजेचा वेळी मांजर बांधणाची कथा पण अशीच तर आहे ...
माणूस अश्चिग, कुठली मांजर
माणूस
अश्चिग, कुठली मांजर बांधण्याची गोष्ट?
एका घरी रोज सकाळी पुजा केली
एका घरी रोज सकाळी पुजा केली जायची. त्यात दुधाचा नैवेद्य असायचा. त्यांच्याकडे एक मांजर होती. तीला नंतर जरी त्या दुधातला वाटा मिळणार असला तरी ते पुजे दरम््यान सतत लुडबुड करायचे. म्हणुन पुजा सुरु करण्या आधी ते मांजराला बांधुन ठेवीत. मग त्यांना मुलगा झाला. तो पहिल््यापासुन हेच पाही की मांजर बांधायचे आणि मग पुजा करायची. तेंव्हा असलेली दुसरी मांजर तो पुजे आधी बांधुन ठेवी. त्याच्या मुलाने पण तेच पाहिले. नंतर ती मांजर मेली. पण पुजा तर यथासांग व्हायलाच हवी. मग पुजे आधी शेजार््यांकडचे मांजर आणल्या जायचे, खंब्याला बांधले जायचे आणि मगच पुजा केल्या जायची.
धन्यवाद अश्चिग
धन्यवाद अश्चिग
आता पितृपक्ष चालू आहे.
आता पितृपक्ष चालू आहे. गेलेल्या माणसांची आठवण म्हणून त्या तिथीला ब्राम्हणाला बोलावून दुध - केळ - दक्षणा / नैवेद्य करुन छतावर ठेवणे / गायीला नैवेद्य देणे / ब्राम्हणाला जेवायला बोलावणे असे करण्याची पद्धत पुर्वीपासुन आहे.
त्यांचे स्मरण तर आपल्याला कायमच असते परंतू त्या तिथीला मी वृद्धाश्रमाला वाफेच मशीन (वृद्धाश्रमाची आवश्यकता लक्षात घेवून) दिल. पण काहीच मत अस पडल की तू हे केलस ते चांगल आहे परंतु वरील पैकी एक देखिल करायला पाहीजे.
मला काय करु समजत नाहीये. जर तसे करणे आवश्यक असेल तर ते सर्वपित्री अमावस्येस केल्यास चालेल का? किंवा कसे ?
कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
छ्ताचे invention अनेक हजार
छ्ताचे invention अनेक हजार वर्षांपुर्वीचे. त्याआधी लोक कुठे ठेवत दक्षिणा कुणास ठाऊक? सध्या ठेवतो ती दक्षिणा (भारत सरकारचे पैसे) ६३ वर्षांपुर्वी नव्हते. त्याआधी लोक काय करत? तुम्ही केलेली गोष्ट जास्त योग्य आहे. तेथील वृद्धांना रोज मदत होईल. एक दिवस आठवण करून काय फायदा?
सुनीता तू केलेस ते छान आहे.
सुनीता तू केलेस ते छान आहे. मी ही काहीच कर्मकांड करत नाही. त्यांना बॅड कर्मा फारसे नसल्याने ते आता
एक छान गुट्गुटीत मूल म्हणून जगात कुठेतरी जन्मले असतील असे मनाशी धरते. मी ही त्यांच्या छोट्या शाळेत घसरगुंडी घेण्यासाठी पैसे दिले होते. यावर्षी ड्रायवर च्या मुलीचे फंक्षन आहे त्याला दिले. व घरी मला सर्वार्थाने सपोर्ट करणार्या मावशींच्या मुलीचे लग्न ठरले आहे त्यात मदत करणार.
अवडंबर न माजविता आपल्याला जे पट्ते तेच करावे. तू ज्यांच्या साठी करतेस त्यांना नक्कीच समजले असते. बाकी कोणाचा काय संबंध आपल्या भावनांशी. त्यात असले काही कर्मकांड करत बसले तर
घरातील छोटी मुले बावचळतात व बावरी होतात. ही एक हळवी बाजू आहे.
> घरातील छोटी मुले बावचळतात व
> घरातील छोटी मुले बावचळतात व बावरी होतात. ही एक हळवी बाजू आहे.
??
सुनिता, एक लक्षात ठेवा की हे
सुनिता,
एक लक्षात ठेवा की हे जे काही आपण करतो ते आपल्या समाधानासाठी करतो. जर तुम्ही वरील विधी पैकी एक केला नाहीत आणि त्याची रुखरुख लागुन राहिली तर उगाच तुमचेच मनःस्वास्थ्य हरवेल. म्हणुन
१. एकतर तो विधी करा. (मला वाटते सर्वपित्री अमावस्येला केला तर चालेल).
किंवा
२. तो विधी करु नका पण त्याबद्दल विचारही करु नका. (तुम्ही एक चांगले काम केले आहे त्याबद्दल समाधान माना.)
पितृपक्षात लग्नाची कामं करत
पितृपक्षात लग्नाची कामं करत नाहीत, असे का?
> घरातील छोटी मुले बावचळतात व
> घरातील छोटी मुले बावचळतात व बावरी होतात. ही एक हळवी बाजू आहे. ??>> अगदी नकळत्या वयाची लहान मुले असे श्राद्धाचे वगैरे विधी बघून प्रशन विचारतात, ते सांगताना आपल्याला अवघड जाते ते बघून मुले नर्वस होतात. आपल्याला पटणार नाही कदाचित.
अस्चिंग, मामी,
अस्चिंग, मामी, मनस्मि१८
मार्गदर्शना बद्दल धन्यवाद.
मला कर्मकांडात फारसा विश्वास नाही.
एक छान गुट्गुटीत मूल म्हणून जगात कुठेतरी जन्मले असतील असे मनाशी धरते. मामी, मी सुद्धा असेच समजते मुलींना देखिल तसेच सांगितले आहे. पण शेजारी पाजारी मुद्दाम (तिथी विषयी) आठवण करून देत असतात (की जी आपण कधीच विसरलेलो नसतो.) काय केले काय नाही यात त्यांना फार रस असतो. आपली मते त्यांना पटत नाहीत व त्याविषयी बोलत असताना भावना अनावर होतात.
मी जे केले ते का व कशाकरता केले हे मुलींना सांगितले. त्यांना देखिल पटले. परंतु त्या दिवशी रात्री तिघी रडत होतो.
मला कोणी "धनत्रयोदशी" आणि
मला कोणी "धनत्रयोदशी" आणि "लक्ष्मीपुजन" तसेच दिवाळीतल्या इतर दिवशी कशी पुजा करायची असते ते सांगणार का?
मनापासुन करायची
मनापासुन करायची
Pages