तशी ती मुळची गावची.....लग्न झाल्यावर १०-१२ वर्षे गावी राहिलेली..... खटल्याचा संसार करून खूप राबुन तिने संसाराचे १०-१२ वर्षे कसेतरी ढकलले. तिच्या बोलण्यातून नेहमीच कळून यायचे कि सासरी खूप जाच झाला....कधी कधी भाकरी बरोबर खायला भाजी देखील राहायची नाही....सर्व पुरुष आणि छोटी मंडळी जेवायची आणि मग शेवटी बायकांच्या पंगती....उरलेले जेवण त्यांच्या वाटेला.... आणि जर भाजी उरली नसली तर पाण्यात चटणी टाकून ती भाकरी बरोबर खायची
"मी" माझ्यातली..
सहजच फोन केला माझ्या सेमिनारला गेलेल्या मैत्रिणीला
म्हटलं बाई, कशी आहेस..
खाणं, पिणं, रहाण्याची व्यवस्था कशी आहे..बरी आहे..?
ती उत्तरली, झकास, अगदी उत्तम
हाॅटेल मस्तच आणि रुम मधे सोबतीला कोणी नाही, हे तर अति उत्तम...
नाहीतर बिन ओळखीच्या, जराशा ओळखीच्या कुणीतरी एकीने सोबतीला यावं..
आणि सोबत म्हणता म्हणता तिच्यासवे आणखीनंच एकटं व्हावं…
तशी काही वाईट नसते ती, चांगलीच असते..
पण आपली आपली नसल्याने तीही कानकोंडी होऊन बसते…
७५ वर्षाचा माणूस म्हंटल्यावर साधारणतः आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र उभे राहते हो ? ...
ज्याचे दोन्ही गुडघे झिजले आहेत आणि कंबर, पाठदुखी, मानदुखीमुळे जो दिवसाचा ८०% वेळ घरात आराम खुर्ची किंवा बिछान्यावर घालवत आहे.
कधी बाहेर काम पडलंच तर लगेच ड्रायव्हरला घेऊन चार-चाकी गाडी मध्ये फिरणारा,
स्वतःची सर्व वैयक्तिक कामे दुसऱ्यांच्या मदतीने करून घेणारा,
डायबिटिज, हायपरटेन्शन, आर्थराइटिस इ. रोगाने ग्रस्त आणि म्हणून मरणाची सतत चिंता करणारा,
संस्थळ मार्तंड उदंड जाहले
कानपिचक्यांचे पेव सुटले
कळप बनविती कूत्र्यावानी
समुद्रा जणू गटार चिकटले
मार्तंड उदंड जाहले , मार्तंड उदंड जाहले
स्वये विकृतीची खाण
लोका सांगे रामबाण
चेहरा सोज्वळ शालीन
मनःकणामध्ये घाण
गाभण्यापुरतेच वळू उरले
मार्तंड उदंड जाहले
मार्तंड गाती गुणगान
चेले होती बेभान
येता हटके लिखाण
मार्तंड माजवी तुफान
जणू स्वामित्वच विकत घेतले
मार्तंड उदंड जाहले
मार्तंड पिटतो हाकाट्या
धावत येति साऱ्या गोट्या
बाबांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने भामरागड़ येथील त्रिवेणी संगमाच्या ३ किलोमीटर अलीकडे, हेमलकसा गावी काही जमीन लोक बिरादरी प्रकल्पाच्या निर्मितीकरिता दिली. प्रकल्प निर्मितीच्या सुरुवातीला, दुर्दम्य जिद्दीच्या बाबांसोबत काही १५-२० लोकं १९७३ साली घनदाट अशा दंडकारण्यामध्ये आली. सुरुवातीला बाबांसह या सर्वांनी काही राहण्यायोग्य झोपड्या आणि शेतजमिनी तयार केल्या आणि लोक बिरादरीच्या कार्याचा आरंभ झाला. या कार्यकर्त्यांमधीलच एक नाव जे बिरादरीमधे आजही आपसुक तोंडावर येते ते म्हणजे आमचे "गोविंद काका". लोक बिरादरी प्रकल्पाचे सर्वात पहिले कार्यकर्ते म्हणून ते आजही बिरादरीत ओळखले जातात.
ओंजळीत शब्द मोजकेच माझ्या
झोळीत भावना कैक
शब्द कुठं अन कसं पेरू ?
याचीच पडलीय मला मेख II
शब्द तो परतुनी येता
भावना ती तीव्र होई
शब्द तो परतुनी येता
भावना ती तीव्र होई
उतरता दौतीतुनी तर
मन मात्र शांत होई
तृप्त होता मन माझे
शब्द होई नाहीसा
भावनांनी पुन्र्जन्मायचा
घेतला आहे वसा II
शब्द जोडे भावनेला
साद मन जे घालिती
सोडवी कोडे क्षणात
भावना ज्या मांडती
शब्द वाहे भावनांना
नित्य फिरुनी जन्मती
शब्द माझा सोबती , गड्या
भामरागड पुलावरून पाणी असतांना गावातील लोकांना घरी आश्रय द्यायचा असो किंवा रणरणत्या उन्हात तेंदूपत्ता तोडतांना होरपळून गेलेल्यांची तहान शमवायची असो……
कुणाचे दुःख कमी करायचे असो की कुणाचा आनंद द्विगुणित करायचा असो……
जन्म दाखला, बँक अकाउंट, मनी विथड्रॉव्हल, किराणा, बाजार करणे.. इत्यादी लोकांच्या कुठल्याही कामासाठी आपली दुचाकी घेऊन नेहमीच तयारीत असणारी ही व्यक्ती.
चांगल्या कामासाठी "नाही" हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..
ही गोष्ट १९७६ च्या आसपासची असेल. आनंद बुनियादी प्राथमिक शाळा, आनंदवन (वरोरा) येथील पहिली-दुसरीचे विद्यार्थी चार भिंतीच्या आतील पुस्तकी शिक्षणाला कंटाळून बाबांना आर्जवाने म्हणाले, “ बाबा, आम्हाला रोज श्रमदान करायचं आहे; कृपया आम्हाला मार्गदर्शन करा”. यावर बाबा म्हणाले, “ बघा मुलांनो, शिक्षण तर तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते पूर्ण करण्यावाचून तुम्हाला पर्यायच नाही. पण मी तुमचा श्रमदान करण्याचा उत्साह मोडू शकत नाही.” आणि असे म्हणून बाबांनी या विद्यार्थ्यांसाठी श्रमदानाची व्यवस्था केली. खुश होऊन सर्व मुलांनी बाबांना बनविले त्यांचे “सेनापती” आणि स्वतः झाले त्यांची ‘वानर सेना’.
मागील कैक वर्षांपासून बिरादरी मध्ये, रोज भल्या पहाटे ३ वाजता एका घरी अलार्म वाजतो आणि एक ८० वर्षाचा तरुण इसम जागा होतो. [८० वर्षाचा तरुण का म्हंटलं हे नंतर आपणा सर्वांना कळेलच.] एवढ्या पहाटे घरातील कुणालाही त्रास न देता स्वतःची सर्व कामे स्वतःच करतो. शेवटी मात्र प्रेमाने तयार केलेल्या आपल्या पत्नीच्या हातचा चहा पिऊन सकाळी ६ वाजता संस्थेच्या कामासाठी सज्ज होतो. लोक बिरादरी मधील अवॉर्ड रूमच्या खालच्या वॉर्ड मध्ये, रेडीओवरच्या बातम्या-गाणी ऐकत रुग्णांच्या जखमा पुसण्यासाठी “गौज पिस” तयार करतांना ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच दिसणार.
दादरच्या रस्त्यावरून संध्याकाळनंतर मुंबईबाहेर जाणाऱ्या एसटीच्या लालपरी रातराण्या पाहिल्या की मला आजही, इतक्या वर्षांनंतरही गावाकडची आठवण येते, आणि मी उत्सुकतेने गाडीचा बोर्ड पाहू लागतो. कधीकधी तो वाचता येत नाही. मग गाडीच्या मागे नंबरखालची अक्षरे शोधतो, आणि देवरूख डेपोची गाडी दिसली की मनानेच गावाकडच्या आठवणींचा, भूतकाळाचा प्रवास सुरू होतो...
... आजही तसेच झाले. देवरूख डेपोची ‘मुंबई-देवळे मार्गे -पाली’ गाडी दिसली, आणि आठवणींचे सारे झरे जिवंत झाले.