गाथा गारुड
ठसे नितळ शब्दांचे
मनावर अलगद
त्याचे गारुड आगळे
आत आत सावळत
इंद्रायणी डोहावाणी
शब्द गंभीर सखोल
लाटा हलके उठत
नाम बोलत विठ्ठल
पिंपुरणी रुखातळी
गार साऊली संतत
ओढ वाटते जीवाला
सुख ह्रदी सामावत
भाव शब्दींचा ह्रदयी
क्षणी जरा उतरत
विटेवरी जो ठाकला
बाहू येई पसरीत....
ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- अध्याय १ ते ९ परिचय..
यातले पहिले तीन अध्याय दहा वर्षांपूर्वी मायबोलीवर प्रकाशित केले होते. आता पुन्हा सुरूवात करून नवव्या अध्यायापर्यंत आले आहे.
स्व-आकलनार्थ योग्य मार्गदर्शनाखाली केलेला हा प्राथमिक अभ्यास , या नोट्स कदाचित कुणाला उपयोगी पडतील एवढाच हेतू.
भावार्थदीपिकेच्या या अर्ध्या प्रवासानंतर मी अवकाश घेणार आहे.नववा अध्याय हा मध्यशिखर मानला जातो.
श्रीकृष्णार्पणमस्तु!
-भारती..
अध्याय पहिला
https://www.maayboli.com/node/38112
अध्याय दुसरा
श्रेष्ठ रामभक्त श्री लक्ष्मणजी
जनक वचन पूर्ति राघवे शिरोधार्या
सहज वनी निघाले सोडूनी ती अयोध्या
प्रभु तरी मज तुम्ही बंधू सौमित्र बोले
विचरत तुज पाठी काननी सौख्य झाले
रमत न मन भक्ता भोग भिंगुळवाणे
चरण तरी प्रभूचे योगचि मुख्य होणे
समजुत बहु काढी राघवे लक्ष्मणाची
वचन मज निभाया कानने एकलाचि
दृढतर वचनांनी बंधू नाकारिले ते
तुज सह तरी येणे हेचि कर्तव्य साचे
विरघळत प्रभूचे चित्त या भक्त योगे
सहचर सुख मोठे काननी राघवाते
विपरित जरी काही येत दृष्टीपुढे ते
कर तरी पुढती ये घेतसे वार मोठे
समजा.
- हे शक्य नाही, याला काय आधार, हे अशास्त्रीय आहे वगैरे सगळे बाजूला ठेवून -
समजा की पुनर्जन्म आहे. ऐच्छिक आहे. पुनर्जन्म घ्यायचा की नाही हे ऐच्छिक आहे आणि घ्यायचा असल्यास पुढचा जन्म कुठल्या जागी, कुठल्या घरात घ्यायचा हे तुम्हाला ठरवता येईल.
तर तुम्ही पुनर्जन्म घ्याल का? नसल्यास का नाही?
घ्यायचा असल्यास तुम्हाला कुठे म्हणजे कुठल्या देशात, राज्यात, शहरात, गावात घ्यायला आवडेल? कुठल्या प्रकारच्या घरात घ्यायला आवडेल? स्त्री जन्म घ्यायला आवडेल की पुरुष जन्म?
या जन्मी अशी काही चूक केली किंवा काही राहून गेले, जे पुढल्या जन्मी दुरुस्त करायला आवडेल?
श्री नृसिंह स्तवन
अतिऊग्ररुपे झणी स्तंभ फोडी
अचाटे अफाटे नखी दैत्य फाडी
महा गुर्गुरे तो ध्वनि गर्जताहे
नभी लख्लखाटे मही कापताहे
कडाडे धडाडे जणू वज्र ताडे
अकस्मात स्तंभातूनि येत कोडे
मुखा शार्दूलाचे रुपे उग्र साजे
स्वये धावते भक्त प्रल्हाद काजे
राम आत्माराम
उपवास पूर्ण । असो साधे अन्न ।
राम नामाविण । निरर्थक ।।
राहो गिरी, धामी । महाली आश्रमी ।
राम ते सप्रेमी । तरी सौख्य ।।
असो उपकारी । नेमस्त संसारी ।
रामाविण फेरी । चुकेचिना ।।
थोर नित्य कर्म । बहु दान धर्म ।
रामचि सुवर्म । तयामाजि ।।
रामनाम मुखी । जगी दोष देखी ।
रोगी सर्वार्थेसी । पथ्यहीन ।।
चित्ती राम जाण । तेणे समाधान ।
व्यर्थचि साधन । तयाविण ।।
राम आत्माराम । निश्चये स्वधर्म ।
प्रचिती सप्रेम । सद्गुरु योगे ।।
50 फर्स्ट डेट्स - एका वेगळ्या दृष्टिकोनातून !
उन्हाळा आला आहे आणि कॉवीड च्या दोन वर्षानंतर वाट बघून आलेला हा उन्हाळा एन्जॉय करायला आपण सर्व उत्सुक आहोतच...
समर( उन्हाळा) मध्ये काय प्लॅन करताय.. कुठे फिरताय हे डिस्कस करायला हा धागा...
झाला तर फायदाच होईल इतरांना जेंव्हा आपण आपले प्लॅन सांगू...
माझ्यापासून सुरुवात करतो- पहिल्या प्रतिसादात...
विषयांतर करू नये कृपया- तसे प्रतिसाद आपोआप उडतीलच...
श्री तुकाराम महाराजांचे उपदेशपर अभंग.
फळ देठीहूनि झडे | मग मागुतें न जोडे ||१||
म्हणउनि तातडी खोटी | कारण उचिताचें पोटीं ||२||
पुढें चढें हात | त्याग मागिला उचित ||३||
तुका म्हणे रणीं | नये पाहों परतोनि ||४||
.............................................................................
कपिवर बलशाली मारुती ब्रह्मचारी
रघुविर स्मरताची घेत राही भरारी
स्मरण तरी जयाचे सोडवी सर्वदुःखा
भय तरी बहु ज्याचे कंपविते कृतांता
लखलख तरी रोमी उज्वले सर्वकाळी
झडकरि रवीलाही फेकिले अंतराळी
कनक किरिटधारी पुच्छ ते मुर्डियेले
तळपत अति कांती अग्निने वेढलेले
कठिण तनु जयाची वज्र का लाजविते
विहरत गगनासी सूक्ष्मता लोपविते
अतुल अति बळी हा मारुती निर्विकारी
दहन सकळ लंका रावणा होत भारी
मरुतसुत मनाने रामपायी स्थिरावे
जपत तरि मुखाने नाम ते सर्वभावे
..............................................