मेहफिलीत सुरांच्या, सूर चोरिले मी
येत नव्हते गाता, तरी छेडिले मी
ऎदीत त्या सुरांचा ठेक्यात घात केला
स्वप्नातल्या कलेचा गर्भात पात झाला
स्वप्नात देखीले मज , सुरांशी खेळताना
सत्यात झुंजलो मी, सुरांना चोरताना
कंठात माल भरला, तरी ना ताल धरला
मालकंस छेडता , कंठाशी प्राण आला
रदीफ काफिल्याने भलेही धुंद झालो
मेहफिलीत सुरांच्या पुन्हा पुन्हा नहालो
जखम त्या ज्वराची जरी खोल आहे
अजूनही गळ्याला सुरांची ओढ आहे
उगाच लट्टू होते
कधीही खुट्ट होते
कधी मिठी ती घट्ट
कधी तो लडिवाळ हट्ट
कधी खमंग वास
कधी कधी तो त्रास
हवाहवासा श्वास
ऐसा कैसा हा सहवास
आधी होते फक्त दोन
आता दोनाचे चार
अजुनी चार येता
कसे सोसू ते प्रहार
पगार फार थोडा
दहा तारखेलाच घोडा
लगाम होई जेव्हा लाल
कसे सोसू मी ते हाल?
हाती धरावा ग्रंथ
करावे काम संथ
करू नये कधी रवंथ
सांगुनी गेले संत
ऐकून ज्ञान सारे ,
फुलले पुन्हा पिसारे ,
पुन्हा तसाच शिमगा ,
पुन्हा जुने धुमारे ....
काळाच्या प्रवाहात अनेक साम्राज्ये उभी राहिली…
काही वैभवाच्या शिखरावर पोहोचली…
आणि काही काळाच्या वाळूत गडप झाली.
पण एक साम्राज्य होते —
ज्याला पराभव माहीत नव्हता.
शतकानुशतके…
पिढ्यानपिढ्या…
जगाने त्या साम्राज्याकडे आश्चर्याने पाहिले होते.
ते होते आर्यवर्त साम्राज्य.
एक असे राज्य जिथे न्याय हा कायद्यापेक्षा मोठा होता,
जिथे प्रत्येक नागरिक समान मानला जात होता,
आणि जिथे विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञान यांची सीमा पृथ्वीपुरती उरली नव्हती.
मौनातून बोलणारा एक असामान्य कलावंत !
“परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला” हे नाट्यगीत निव्वळ एक गीत म्हणून न उरता, मराठी रंगभूमीच्या इतिहासात एका खोल, अस्वस्थ आणि विचारप्रवर्तक अनुभवाच्या रूपात ठामपणे पाय रोवून उभे आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार वीर वामनराव जोशी यांनी १९२७ साली लिहिलेल्या रणदुंदुभि या नाटकातील हे नाट्यगीत. त्या काळातील समाजमन, पारतंत्र्याची वेदना आणि मानवी विवशतेची जाणीव, असहाय्यतेची भावना अतिशय तीव्रपणे व्यक्त करणारे, मराठी नाट्यसंगीताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेले हे अजरामर गाणे.
रविवार, ११ मे २०२५ ला कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात सादर झालेला ‘भूमिका’ नाटकाचा प्रयोग शुभारंभाचा होता की पुण्यातला पहिला होता की आणखी काही हे ठाऊक नसले तरी, या प्रयोगाची जाहिरात बघताक्षणी, ‘मना’ने बुद्धीशी मसलत न करता हे अनुभवण्याचा निर्णय परस्पर घेतला होता हे पक्के आठवतेय. चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर, क्षितिज पटवर्धन या प्रलोभनांपेक्षा सगळ्यात मोठे आकर्षण होते नाटकाचा आशय-विषय.
संगीत देवबाभळी - एक दृकश्राव्य अनुभव
पडदा उघडतो तो डाव्याबाजुला दोन खणी घर दिसतं. चूल आहे, चार डबे असतील. फडताळ आहे. त्यावर कटीवर कर आणि विटेवर उभी विठ्ठलाची मूर्ती आहे. नुसती मूर्तीच आहे, त्याला हार फुलं सजावट काही नाही. तिथेच एक पोटुशी बाई लवंडली आहे, आणि गाणं म्हणत्येय. पहाटेची वेळ वाटावी असं अंधार आणि गाण्याची चाल आणि एकुणच रागरंग बघुन - ऐकून वाटतंय.
नाटक हा मराठी माणसाचा आवडीचा विषय. त्यामुळे ५ डायमेन्शन्स संस्थेतर्फे आयोजित लॉस एंजेलिस नाट्यमहोत्सवाबद्दल कळल्यावर त्याला हजेरी लावायची हे आम्ही निश्चित केलं. या नाट्यमहोत्सवामधे 'अधांतर' हे दोन अंकी नाटक, आणि दोन एकांकिका असणार होत्या.
पत्रापत्री
—------
नावाप्रमाणे ही पत्रापत्रीच आहे, म्हणजे माधवराव आणि तात्यासाहेब ह्या दोन साठीतील (अंदाजे) निवृत्त मित्रांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे आणि त्या पत्रांतून उलगडत गेलेल्या घटना, माणसं, कुटुंब, कुटुंबीय आणि पर्यायाने सामाजिक परिस्थितीचा, सामाजिक मनस्वास्थ्याचा आरसा!