अंबाजोगाई

अंबाजोगाईच्या दासूच्या आभाळभर कविता...

Submitted by Prasad Chikshe on 29 July, 2020 - 04:49

अंबाजोगाईच्या दासूच्या आभाळभर कविता...
dasoo.jpg
अंबाजोगाई म्हणजे थोडं इरसाल गाव. इथली लोकं वेगळ्याच तंद्रीत असतात. प्रत्येकात एक वेगळाच आत्मविश्वास असतो. जगातील प्रत्येक विचारधारेचे पाईक आपल्याला हमखास अंबाजोगाईत पाहायला मिळतात. इथे एकाहून एक माणसे घडली. जीवनाच्या विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी अशी प्रचंड उंचीची माणसे म्हणजे अंबाजोगाईकर.

विषय: 

१३ वर्षांच्या मीराताई अडीच महिन्याच्या बाळाच्या आई झाल्या.

Submitted by Prasad Chikshe on 8 June, 2012 - 03:58

अंबाजोगाईतील गणेशोत्सव, त्यात प्रबोधिनीचा सहभाग जोरदार असायचा.शिस्तबद्ध मिरवणूक, सतत काही नवीन हे आता नित्याचे झाले आहे. मोठेमोठे ढोल कमरेला बांधून कित्येक तास वाजवायचे यासाठी बरीच शाररिक क्षमता लागते. ढोलाला ताशा व झांजा यांची साथ असते. या सर्वांचा समन्वय साधून विविध रचना असतात. अशा अंबाजोगाईतील प्रबोधिनीचा वाद्य गट १६ रचना वाजवतो. दरवर्षी एखाद्या रचनेची निर्मिती होते. अतिशय जोश पूर्ण व वीररसपूर्ण असे हे वादन असते. समन्वय न बिघडू देता आपल्या संपूर्ण ताकदीने प्रत्येक जण वाजवत असतो त्याच प्रमाणे एकमेकांना प्रेरणा देत असतो.फक्त जोरात वाजवणे हा वाद्य गटाचा खरा हेतू नाही.

गुलमोहर: 

“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......”

Submitted by Prasad Chikshe on 7 May, 2012 - 03:59

विश्वनाथ शंकर सरवदे, मुक्काम पोस्ट आपेगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड.
शंकर सरवदे शेळ्या मेंढ्या राखायचे. थोडी जमीन ती पण कोरडवाहू. पांढऱ्या मातीने लिंपलेल्या दोन कुढाच्या खोल्या. विश्वनाथ ऊर्फ तात्या त्यांचा धाकला मुलगा.
ज्योतिबांचा "विद्ये विना मति गेली l मति विना नीती गेली ll नीती विना गति गेलीl गति विना वित्त गेले ll वित्ता विना क्षुद्र खचले l इतके अनर्थ एक अविद्येने केले ll हा विचार गावागावात पोहोंचला. त्यामुळे गावागावात शाळा निघाल्या. गावातील पोर शाळेत जाऊ लागले व शिकू लागले.

गुलमोहर: 

AC मध्ये बसून PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी

Submitted by Prasad Chikshe on 24 April, 2012 - 12:55

माझे पहिले लेखण

बीड जिल्ह्या सारख्या अविकसित भागात राहून ही तशा पाहता सर्व चांगल्या सुविधा मला माझ्या आई मुळे लहान पणापासून मिळालेल्या. पाहिजे ते सगळ सगळ मिळाल. त्यामुळे काही नसल्यानी काही सोडावं लागत. असतं त्यात भागवावं लागतं. नसण्याचा स्वीकार करत आपल्या जगण्याचा विजय करण्यासाठी भर तारुण्यातील जीवन काळ्या मातीत मळण्यात व उन्हात तळण्यात घालवण्याची वेळ माझ्या वर कधीच आली नव्हती.
लातूरच्या भूकंपाच्या पुनर्वसनाच्या कामात सहभागी होताना निसर्गाच्या कोपामुळे उद्वस्थ झालेले मनुष्यजीवन जवळून पाहता आले.

गावातले लोक कष्टकरी प्रेमानी सर्वाना आपलेसे करी.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - अंबाजोगाई