जरा मालवित उन
उन्हाचे मौन
येतसे सांज..!!
जराच सारुन मेघ
ओढली रेघ
...असा अंदाज..!!
संन्यस्त असावी वेळ
मंतरली ओळ
दिव्यशी काय़ा..!!
तिच्याच हाती शाल
रंग गुलाल
नभावार माया..!!
हा लिहिताना एकांत
होतसा शांत
तळ्यावर वारा
अन पाण्याचे अंग
आणते सोंग
’नको’ शहारा...!!
अशात व्हावे शुन्य
कळावे पुण्य
असेही घडते..!!
तरी असावा शाप
जुनेसे पाप
’धन्य’ सापडते..!!
तेच शोधते कूळ
साचते धूळ
उधळशी माती...!!
सावळी जाग
कुणाचा माग ?
बिलगशी भीती...!!
या समयी अंधारात
कळ्यांची वात
निरांजन ठेव...!!
भय-भरल्या अंगणात
खुळे फ़िरतात
फ़ुलांचे देव ...!!
सांजखुणांना गहिवर राधे विश्व जळाले त्यात
हळुच कोरडी हुरहुर तु गं सोडुनी दे पाण्यात...!!
कृष्ण पिउनी हलते झुलते यमुनेवर द्वारका
अमृतमय दुख:त बुडाला कलश मनासारखा...!!
पोरकी तीरावर बासरीतला सुर हरवली गुरे
निळी- सावळी धुळ उमटता बावरती वासरे...!!
बावर - बावर अंतरातुन नाद निळावत गेला
उर पेटल्या अंधाराचा असाच पांघर ओला...!!
उभ्या पुरातन ओलाव्या सांजखुणा गं राधे
स्मरणयुंगांत जगले-उरले प्रेम नसे गं साधे...!!
-एस. के. [ तुझी ही संध्याकाळ , तुझे आभाळ]
तु बहर ठेऊनी गेलीस
दिक्काल धुकाच्या वेळी..
अन उन साचले तेव्हा
ओघळल्या याही ओळी...!!!
कितिक सजल्या हाका
वेशीवर राघव गहिरा....
सुटल्या धुळीचा ओला
तुटतो मैथीली गजरा?
उघडेच ठेउनी दार
हे इथवर आले अंगण...
तु सारवलेली ओंजळ..
तिच्यात फ़ुलांचे पैंजण...!!
तंद्रित आरसा अजुनी
असेल पाहत तुजला
मळवट भरल्या केसांनी
असेल जरासा भिजला....!!!
भिजल्या पदराचा वारा
हा अजुन फ़िरतो आहे
तु ’वेड’च होतीस माझे
म्हणुनच घडते का हे ?
तु अबोल,मी अबोल,अबोल गीत आपले
तु केसातुन माळलेस, श्वासही फ़ुलातले
अनाम तु,अनाम मी, अनाम हाक येतसे
अशांत पैजणी मनास लागते अटळ पिसे
दुर तुझ्या माझ्याही, हलणा-या सावल्या
ओलकळ्या डोळ्यांशी फ़ुलणा-या ओवल्या
मी तुझ्यात तुटताना हा नभरंग सावळा
तुझ्या उरात तुटलेला सुर शोधतो गळा
तु अलगदही ठेवशील पाण्यावर चांदणे
त्यांनाही चालते का असे अमिट गोंदणे ?
कलंडत्या दिशेवरी, हे मेघ रेखती तुला
कुणी नभास लावला अबोल रंग आपुला ?
–एस. के.