८ डिसेम्बर २०२५ ला इराणच्या IRGC फोर्सेसनी UAE च्या दिब्बा बंदराजवळून निघालेले MT Valiant Roar ताब्यात घेतले. या जहाजावर बेकायदेशीररीत्या डिझेल वाहतूक करण्याचा आरोप लावला होता. त्यावरील १६ भारतीय कर्मचाऱ्यांना अटक करून बंदर अब्बास येथील तुरुंगात ठेवले गेले. भारतीय वकिलातीच्या मदतीस ८ खलाशांची सुटका करण्यात आली. परंतु अजूनही ८ भारतीय इराणमधील तुरुंगात आहेत. मोदींनी आम्ही इस्राएलबरोबर आहोत हा इशारा या पार्शवभूमीवर विचारात घेतला पाहिजे.
ब्रिटानिकाच्या म्हणण्यानुसार साधारण २००० वर्षांपूर्वी काही ज्यू वाहत कोकण किनाऱ्याला लागले. ही जमात स्वतःला इस्राएलचे पुत्र (बेने इस्राएली) म्हणवून घेते. अलिबाग, चौल, रेवदंडा वगैरे भागात यांची वस्ती होती. आणि शनिवारी सुट्टी तसेच कोशर आहार घेणे वगैरे धार्मिक व्यवहार सोडल्यास ही जमात पूर्णपणे भारतीय झाली होती. इस्राएलच्या निर्मितीनंतर यातले बरेचसे ज्यू
इस्राएलला स्थलांतरित झाले.
मुळात या युद्धमागचं कारण 'इराण हा देश अण्वस्त्रसज्ज बनू नये' हे ' हे तकलादू आहे. ज्या दिवशी अणुबॉम्बची पहिली यशस्वी चाचणी झाली आणि हिरोशिमा, नागासाकीमध्ये प्रचंड नरसंहार केला गेला त्यादिवशी जग एका पॉईंट ऑफ नो रिटर्नवर पोहोचले. प्रत्येक देशाला संदेश मिळाला की अणुबॉम्ब हा तुमचा शेवटचा बचाव आणि शेवटचं शस्त्र आहे. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धातल्या मित्र देशांनी अणुचाचण्या केल्या, अण्वस्त्रं बनवली. त्यामागोमाग चीनसारख्या महत्वाकांक्षी व आश्चर्यकारकरित्या भारतासारख्या अहिंसेचा गजर करणाऱ्या देशानेही अण्वस्त्रसज्जतेचा मार्ग चोखाळला.