कवी होणं खायचं काम नाही
Submitted by शांत प्राणी on 8 January, 2022 - 09:19
रवी व्हावं पण कवी होऊ नये म्हणतात.
रवी आनि कवी नेहमी जळत असतात. पण कवीला मन असतं. भावना असतात.
दोघेही स्वत: जळून दुसर्यांना प्रकाश देतात.
एक हार्डकोअर प्रकाश देतो तर दुसरा काव्यानंदाचा प्रकाश देतो.
मात्र कवीला काय काय सहन करावं लागतं याची वाचकांना कल्पना येणे शक्य नाही.
कवीचं मनच नाही तर पावलं सुद्धा नाजूक. नाजूकशा खड्यांनीही त्याला ठेस लागते तर मनाचं काय !
ती जर दोन तास दिसली नाही तर कवी कासावीस होतो.
विषय:
शब्दखुणा: