भारत-जर्मनी राजनयिक संबंधांची 70 वर्षे
Submitted by पराग१२२६३ on 1 July, 2021 - 01:40
भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनयिक संबंधांना नुकतीच 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने परस्परांमधील मैत्रीपूर्ण संबंधांची आठवण म्हणून 10 जून 2021 रोजी दोन्ही देशांनी प्रत्येकी एका विशेष स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण केले. या निमित्ताने दोन्ही देश संयुक्तपणे 2021-22 मध्ये विविध कार्यक्रमांचेही आयोजन करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये उच्च दर्जाचे संबंध प्रस्थापित झालेले असून भारतात नुकत्याच आलेल्या ‘कोविड-19’च्या दुसऱ्या लाटेच्या काळात बर्लिनने भारताला भरीव मदत केली आहे.
विषय: