लेखन स्पर्धा २ - माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन
आपण देवाकडे सतत काहीना काही मागत असतो. बऱ्याचदा जे हवं ते मिळतंही आणि मिळत नाहीही, कधी कधी उशिरा मिळतं. कदाचित म्हणूनच भगवानके घर देर है अंधेर नही म्हण आली असेल. बरेच दिवस झाले सुट्टी नाही कुठे फिरणं नाही फक्त काम काम काम! एका पॉईंटला कंटाळा आला होता पण पर्याय नसल्याने करत होतो. असं वाटत होतं की काहीतरी व्हावं आणि जगच बंद पडावं, म्हणजे सुट्टी मिळेल. देव सगळ्या मागण्यांची एन्ट्री करून घेत असेल बहुदा आणि मग सगळ्यांच्या मागण्या कॅण्डीक्रश च्या गेम प्रमाणे सेट करत असेल.