जल-प्राणी उदयास आले होते. जार्वार पर्वतावरच्या त्या हिरव्या मातीने त्यांना जन्म दिला असावा. तळ्यात चुकून पडून मरण पावलेले ते प्राणी असावेत आणि नंतर जलजीवा बनले असावेत. किंवा त्यांची कुणी शिकार केली असेल आणि ते तडपून मरण पावले असावेत. पाण्यात पडले असावेत. जल प्राणी म्हणजे ते टणक बर्फाने बनलेले होते. ते जंगलातल्या अंधूक अंधारात पांढरे दिसत होते. जसा किसलेला बफ जमा करून त्याचा प्राणी बनवला तर तो जसा दिसेल तसेच हे दिसत होते. अतिशय भयानक. त्यांचे अणकुचीदार गोठलेले दात, पायाची नखे हे सर्व भकोल्हे, लांडगे, रानमांजरी गुरगुर करू लागले. मागच्या बाजूने अंगभर ज्वाळांनी भरलेले अग्नी-दानव उभे होते.
ती सांज.... अजूनही ती सांज .... तिच्यातला प्रत्येक क्षण, आठवतो!.... अगदी जश्याचा तसा.....
ऑफिसमध्ये होते मी.. खूप उदास... एक मिटिंग संपवून माझ्या जागी परतत होते... गंपू बाबाच्या देवळावरचा केशरी झेंडा, सायंकाळचा गारवा, घरट्यात परतणारे पक्षी, शांत क्षितीज, ... ह्यातलं काहीच मनात उतरत नव्हतं.....
पार खचत चालले होते, आई बाबा माझा लग्न ठरवणार होते....... त्यांना मी आजवर दुखावलं नव्हतं... पुढेही दुखावणार नव्हते.... त्यांना वाईट वाटेल असं काहीही करणार नव्हते.......... माझ्या आत आत पोकळी वाढत होती... माझेच विचार मला बोचत होते!
शून्य.
मनुताई , वय वर्ष दहा. आज चक्क पेपर वाचत आहेत. आई सकाळ्च्या गडबडीत. आजी आजुबाजुला हळुहळू काहीबाही करतेय.
"आई , कोटि म्हणजे किती शून्य?"
" "
"आईईईइ... कोटि म्हणजे किती शून्य?"
"मनु आत्ता मला काही विचारु नकोस"
"आज्ज्जी..कोटि म्हणजे किती शून्य?"
"थाम्ब बर बयो...एकम, दहम,शतम, सहस्त्र ....सात. कोटी कुठे आठवले तुला आज?"
"अग कुठला तरी घोटळा झालाय म्हणे.. आता सहा हजार कोटि म्हणजे किती शुन्य?"
"मने बास झाल आता. अभ्यासला बस बघू."
"....सुधा ए सुधा, नाश्ता दे, अगं, आणि किती वेळा सांगायचं की जरासं लवकर उठत जा, बघ रोजची धावपळ आजही होतेय, मला आठ वाजता घराबाहेर पडायला हवं असतं, रोज अर्धा तास उशिराने निघतो"
"अहो आले हो, डबा भरत होत्ये तुमचा आणि मनिष चा, त्याला कॉलेज ला आज लवकर जायचय म्हणे, campus interview आहे त्याचा ...... रागिणी, अगं आटोपलास का? ये तू ही, बस पाहू नाश्ता करायला, दादा आणि बाबांसोबत....."
"सुधा, अगं आधी मला दे वाढून, केलंस काय आज नाश्त्यासाठी ?"
"पोहे केलेत गरमा -गरम, पोरही आलेत पहा, या रे वाढते, छान ओलं खोबरं आणि कोथिंबीर आहे सोबतीला... घ्या बरं सारे...."
बप्पाशेठ्च्या किराणा मालाच्या डिल्वरीचा टरक आला तसा तो उठला, हातातलं बिडिचं थोटुक फेकलं,फाट्क्या चपला परत पायात अडकवल्या,डुईवरची टोपी पुर्व पश्चिम केली. लगालगा फुढं हून त्यानं टरकाचं टोपाण उगडलं. गव्हा ज्वारिच्या गोण्पाटाच्या ह्या एवढाल्यापोत्यांच्या थप्प्या बघून्,त्यानं मनातल्या मनात एकांदी शिवि हासडली.मग गुमानं एकेक पोतं उचलून शेठ्च्या गोदामात रचलं.
बगता बगता संद्याकाळ झाली.आज पग्गाराचा टायम हुता.सगळी मंडळी घाम पुसत भितिला टेकून हुबी.कवा शेठ येतो आनी कवा पैसं मिळत्यात? आसं झाल्यालं..
ठिकाण ऑफिस मार्च १९८५ -मला आठवतेय सोमवार होता. नवीन आठवड्याची सुरवात,थोड्या तापलेल्या वातावरणातच झाली. कारण दोन दिवसात अर्ज मागवून,सर्व पदवीधर स्टाफ करिता परीक्षा घेवून, बढतीची संधी देण्याचे ऑफिसने नक्की केल्याची सूचना लेखी आली होती. आमचा खडूस साहेब स्वतः बाहेर येवून,त्यांनी मला केबिन मध्ये बोलावले. आणि"हे पहा, धारवाडकर तुम्ही बी.कॉम.आहात मला तुमचा अर्ज पाहिजे". मला आता सरावाने माहित झाले होते कि, बोलताना हा साहेब अहो,जाहो करू लागला कि समजायचे कि ते एच.ओ.च्या वतीने बोलत आहे. मला काय,नोकरी महत्वाची म्हणून "हो"म्हणालो.अर्ज तिथेच भरून दिला.अर्ज घेत साहेब प्रसन्न चेहऱ्याने धन्यवाद!
दुस-या दिवसापासून राहुल्या आणि सम्या एकमेकांना पाठीमागे शिव्या द्यायला लागले. कुणालाच कळत नव्हतं की हा ग्रुप असा का वागतोय, कालपरवापर्यंत गळ्यात गळे घालून फिरणारे आज एकदम एकमेकांचं तोंडही बघायला तयार नाहीयेत... हे काय गौडबंगाल आहे? पण असं चाललं होतं खरं! आता सम्या आणि सुहास, राहुल्या आणि नेहा अन बाकीची मुलं असे सरळसरळ तीन ग्रुप पडले होते.
.. पण रोज रात्री सम्या, राहुल्या आणि मंडळी भेटतच होती आणि आज काय काय घडलं त्याचे अपडेट्स घेत होती आणि दुस-या दिवशीचे प्लॅन्स ठरवत होती.
गोष्ट आहे बरीच जुनी.त्यातली माणसं आता कुठे आहेत्,काय करतात ठावूक नाही. जेव्हा जवळ होती तेव्हा अन दूर गेली तेंव्हाही,फोन ही नव्हते,फेसबुक कशाला इंटरनेटही नसावंच कदाचित. पण सगळीजणं प्रत्येक धाग्यावर बरोबर असायची.शिव्याही नव्हत्या अन नव्हती वाहवाही...तरीही सगळे एकअमेकांच्या कंपूत असायचे!..पाट्लांच्या मुलीच्या याद्याला पाठकांच्या बापूना बोलावलं जायचं,कुलकर्ण्यांच्या आजोबांच्या बरोबरीनं मह्मद चाचा पान तंबाखूच्या चंच्या सोडायचे...लोकांना तेन्व्हा मंदीर बाबरी काही माहित नव्ह्तं,टी.व्ही.आल्यावर पुढे कळालं !!!
या कथेत मी हल्लीच्या तरुणांच्या प्रेमातली एक छटा दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे, ही कथा 'श्री व सौ' च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. मी इथे माझ्या ब्लोगची लिंक देत आहे.
http://skhadilk.blogspot.com/
भाग दोन
ठिकाण - माझेच घर वेळ - शनिवार मध्यरात्र महिना ( थंडीचा) - ऑक्टोबर १९८३