'इर्शाद'च्या निमित्ताने...
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मला आठवतं त्यानुसार शाळकरी वयात कधीतरी विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट या तिघांचा एकत्र काव्यवाचनाचा कार्यक्रम पाहिला होता. कवितेकडे, शब्दांकडे माझा ओढा होताच, पण कविता आपण वाचणं / गुणगुणणं आणि ती खुद्द कवीने त्याचं हृद्गत उलगडल्यासारखी समोर मांडणं यात किती जमीनअस्मानाचा फरक पडतो हे त्या दिवशी जाणवलं. त्या वयात खूप काही कळलं असेल असं नाही, पण हा अनुभव लक्षात राहिला.
विषय:
प्रकार:
शेअर करा