paryaavaran

आयपीएलच्या निमित्तानं पाणी प्रश्नाबद्दल थोडंसं..

Submitted by नानबा on 11 April, 2016 - 04:44

राज्यात तीव्र दुष्काळ असताना आयपीएल सारख्या स्पर्धांवर पाणी वाया घालवण्यावरून हायकोर्टानी कान उघडणी केल्यावर काही क्रिकेटरसिकांची टोकाची मतं ऐकू आली. क्रिकेटवरच बंदी का? हा मुद्दा आला. ह्याआधी होळीच्या दरम्यान असाच प्रश्न ऐकू आलेला.
लोकांमधे असलेलं कन्फ्युजन, ह्या वर्षीचा दुष्काळ, होळी आणि आयपीएलचे सामने ह्यावरून मला कळलेल्या काही गोष्टी लिहाव्या, असं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच.
पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी फक्त २.५% पाणी वापरण्यासारखं आहे आणि त्यातलंही माणसाला उपलब्ध पाणी अजून कमी आहे हे लक्षात ठेवूया.

पहिल्यांदा पाण्याचे उपलब्ध स्त्रोत कुठले ते पाहूया.

Subscribe to RSS - paryaavaran