कि...र्र...र्र...तन
Submitted by शाबुत on 11 April, 2014 - 07:56
एका किर्तनात एक बाबा सांगत होता की
जग हे असेच आहे....
... ते बदलायला निघालेले कितीतरी बदलेले,
(..कारण ते मुळ प्रवाहात सामिल झाले.)
... कारण बोलणे सोपे - करणे अवघड! हे त्यांनाही माहिती आहे,
.... तरीही ते बोलत आहेत, अगदी वेगवेगळ्या पध्दतीने,
.... त्यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी
.... त्यावर लोक विश्वास ठेवतात, कारण ते माना हलवतात,
(...आता माना हलविणारे रोजाने मिळतात.)
.... कारण ते भ्रमात जगतात, नाईलाजाने जगतात,
(...काहींना फक्त जिवंत राहायचं आहे... तेही दुसर्याच्या जिवावर.)
.... खरे तर जिवनाची तत्वे आम्हालाच ठाऊक आहेत,
.... असे ते म्हणतात!
शब्दखुणा: