मनावर गारुड केलेली अनेक हिंदी गाणी आहेत जी अत्यंत आनंदाच्या अथवा एकांतात आठवतात आणि आपल्याला हवा तो दिलासा देतात. सध्याच्या काळात कितीही सुपरहिट संगीतमय अथवा अगदी अर्थाच्या दृष्टीनेही उत्तम गाणी कानावर पडत असली/भावत असली तरी जुन्या गाण्यांच्या ठेक्यात मान हलवताना आपली जी समाधी लागते ती फ़ार आनंददायी असते.
आज पुन्हा पत्र लिहायला घेतोय , काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहावयास घेतले होते , आई विषयी ते पूर्ण झाले , तसं त्या पत्रात अजून बर्याच गोष्टी मांडायच्या होत्या पण त्या राहून गेल्या , असो ,
आज जे पत्र लिहिणार आहे , ते देखील एका खास व्यक्तीला अनुसरून आहे , जिच्या कडून मी जीवनाच्या , जीवना बद्दलच्या अनेक गोष्टी शिकलोय , अजूनही शिकतोय , कधी सहवासात तिच्या , तर कधी दूर राहून ....
प्रिय ..........
पत्र लिहिण्यास कारण असे काहीच नाही ............बस्स मनात आलं आणि लिहावयास घेतले ,