आज पुन्हा पत्र लिहायला घेतोय , काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहावयास घेतले होते , आई विषयी ते पूर्ण झाले , तसं त्या पत्रात अजून बर्याच गोष्टी मांडायच्या होत्या पण त्या राहून गेल्या , असो ,
आज जे पत्र लिहिणार आहे , ते देखील एका खास व्यक्तीला अनुसरून आहे , जिच्या कडून मी जीवनाच्या , जीवना बद्दलच्या अनेक गोष्टी शिकलोय , अजूनही शिकतोय , कधी सहवासात तिच्या , तर कधी दूर राहून ....
प्रिय ..........
पत्र लिहिण्यास कारण असे काहीच नाही ............बस्स मनात आलं आणि लिहावयास घेतले ,
सुरवात करण्याआधी .....तुझ्या चरणी वंदन करतो , तुझे शुभाशीर्वाद तर हवेच आहे आणि सोबत ही नेहमी ....आणि ती नेहमीच राहील अशी एक आशा आहे आणि त्यास बरोबर त्या ईश्वरास प्रार्थना हि .
कुणाच्या आयुष्यात कुणी येण , हे आधीच ठरलेले असत , आणि त्या नुसार एका प्रसंगी , एका ठराविक वेळी ज्याची त्याची भेट ज्याला त्याला त्या क्षणी घडते , आपण तो एक सोनेरी क्षण म्हणू शकतो आपल्या आयुष्यातला .
पुढे त्या व्यक्तीसोबत आपल्या जीवनाचे धागे नकळत गुंतले जातात, ' ते कळतही नाही ,
विविधरुपी रंग छटा चहूकडे पसरू लागतात , उमटू लागतात ,वातावरणात चैतन्याचे नवे वारे वाहू लागतात . आणि आपण मनसोक्त त्यात वाहून घेतो स्वतःला .
माझ्या आयुष्यात तुझं भेटणं , तुझं येण हि देखील एक ठरलेली बाब होती . पण ते म्हणतात ना ,
भगवान के घर देर हे अंधेर नही, तशी तू फारच उशिरा माझ्या आयुष्यात आलीस. पण तू आलीस हेच खूप महत्वाच ...माझ्यासाठी .
माझ्यासाठी हि तो एक सोनेरी क्षणच होता अस समज..
सुरवातीचे भेटीचे कोणतेही क्षण हे खूप उत्साही नि भरल्या आनंदाचे असतात.
जे कायम स्वरूपी आपल्या स्मृती मंडळात दडून राहतात . ते पुसता येण कदापि शक्य नसत . तेच क्षण त्या स्मृती आपल्याला पुढे काही वेळा आपल्या जीवनाचे मार्गदर्शक ठरतात वा आपली पाउल वाट बनतात.
सुरवातीचे क्षण च इतके मोहक असतात कि त्याच भारवलेल्या स्थितीत आपण वाहत असतो.
भेटी गाठी - बोलन चालन सतत चालूच असत ,आणि त्यातच आपण किती खुश असतो , वातावरनच किती उत्साही नि चैतन्यमय असत सगळ . भरभरून प्रेमाचा गंध हि कसा हवेत गारव्या सकट दरवळत असतो .
पण म्हणतात ना , क्षण तेच राहत नाही , वेळ बदलते नि त्यास बरोबर आहे ती स्थिती हि बदलत राहते .आणि त्यास बरोबर दरवळणारा तो प्रेमगंध हि काहीवेळा त्या क्षणा सोबत हळूच कुठे नाहीसा होवून जातो कुणास ठाऊक.....
आपल्या ह्या मना सारखा अजब रसायन शोधूनही कुठेच सापडणार नाही , सगळ काही घडत बिघडत ते त्याच्यामुळेच कारण तो त्या सगळ्यात एकटवलेला नि एकरूप झालेला असतो. त्याचाच हाती सर्व सत्ता ...
आयुष्याच्या एका वळणावर ,आपली भेट झाली आणि त्या भेटीच कधी कस नात्यात रुपांतर झालं ते कळलंच नाही. क्षण हि कसे कधी वारया वेगात पुढे निघून जातात ते कळत नाही.
बघता बघता वर्ष उलटलं ,पण अजून तरी प्रेमाचा गंध तसाच शाबूत होता , दरवळत होता मुक्तपणे हास्याचे अनेक रंगरूप छटा घेऊन ,
पण अस तरी किती काल चालणार ?, ते क्षण तरी किती काल टिकणार ,
शेवटी सुख दुखाची परिभाषा म्हणजेच जीवन . त्यातही दुखाचा भार हा अधिक ,
आणि हे सर्व घडवणार आपलं मन .........
वेळ बदलली आणि परिस्थिती ने हि कसून परीक्षा घेण्यास सुरवात केली , एक पेपर संपतो ना संपतो तर पुढचा पेपर हाती , काय कराव ........
प्रेम हि अशी गोष्ट आहे जी हास्याच्या अनेक लहरी तरंगा सोबत जीवनाच्या अनेक अतिशय संवेदनशील अन महत्वाच्या रंगीत चित्राच खरखुर दर्शन घडवते.
जे स्वप्नात देखील घडत नाही ते प्रत्यक्षात घडत जात. त्याचाच कधी अचंबा वाटतो.....
क्रमश :
मनातलं काही ..
संकेत य पाटेकर