विठ्ठल विठ्ठल...
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
"एकलीच निगालिस व्हय माय? सोबती नाय काय कुनी तुज्या?", मी आजुबाजुला, पुढे मागे बघत म्हटल, नाही आलं कुणी, चालतं ना एकट आलं तर?
"व्हय व्हय चालतय की, तसला कायबी नेम नाय बग इट्टलाचा, या म्हनतो समद्यास्नी",
"कोन गाव म्हनायच ?", मी गोंधळले होते, आता नक्की काय सांगु या माउलीला, नुकतीच पुण्यात आले म्हणून सांगू, औरंगाबादची आहे म्हणून सांगू का दुबईहुन आले म्हणून सांगु? माझा गोंधळ निरखत समोरुन दुसरा आवाज आला ,"-हाऊ द्ये बाई, कुटं कुनाला कळतय कोन कुठला अन कशाला आलाय ते",. "समदे येकाच जागेला जायचे आखिरला"
इथे काही न बोलताच चालतंय बहुतेक सगळं!
विषय:
प्रकार:
शेअर करा