चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ असामी,
तीन भाउ एकाच वेळ निरुपा रॉयला डायरेक्ट रक्त देतात...
>>
हेच उदाहरण कशाला, तिला चमत्काराने डोळे येतात हे उदाहरण सुद्धा घेऊ शकता...
ते आणखी अतर्क्य आहे.
मुद्दा इतिहासाचा आहे, तो व्हाट्सअप पोस्टमध्ये कितपत खरा असू शकतो आणि चित्रपटांमध्ये कितपत खरा असू शकतो...
त्यात मी जे उदाहरण दिले आहे त्याचे उत्तर शोधून बघा. ते विषयाला धरून असलेले उदाहरण टाळून पुढे जाऊ नका.

.

इन फॅक्ट तुझ्याच आधीच्या मुद्द्याला पुष्टी दिलेली होती.
>>>>>
ती माझ्या मुद्द्याला पुष्टी नव्हती. म्हणजे तुम्हाला माझा मुद्दा कळला नव्हता असे झाले.
तुम्ही चित्रपटांवर विश्वास ठेवणे आणि व्हाट्सअप पोस्टवर विश्वास ठेवणे हे एकाच तागडीत बसवले. पण माझ्यामते चित्रपटांमधील इतिहासावर कोणी विश्वास ठेवत असेल तर ते तुलनेत ठीक आहे. कारण त्यात कोणाचा बदनामीकारक खोटा इतिहास असेल तर संबंधित आवाज उठवून त्यावर बंदी आणू शकतात जे व्हॉट्सॲप पोस्टबाबत शक्य नाही.

.

@ केशवकूल,
अजुन ३०० वर्षांनी भविष्यात असे बायोपिक बनेल सुद्धा आणि लोक म्हणतील असा होता होय शाखा.
>>>>>>>>>
जर चित्रपटांवर सेन्सॉर बोर्ड कोर्ट कायदा तेव्हा सुद्धा अस्तित्वात असेल तर माझे वंशज असा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीत. त्या विरोधात आवाज उठवतील.
पण व्हॉट्सॲप फॉरवर्ड वर तेव्हाही सेन्सॉर नसेल तर त्याचे तेव्हाही काही करू शकणार नाही.

अधिक माहितीसाठी दोघांनी हे वाचा.

"पेटीशन" (Petition) का अर्थ है याचिका या अर्जी। यह एक औपचारिक अनुरोध है जो सरकार, किसी सार्वजनिक संस्था या अदालत से किसी चीज़ को बदलने या किसी कार्रवाई करने के लिए किया जाता है.

सांभार , संभाजी एकत्र आल्यावर दामले मास्तरांकडे ट्रिगर वाजला असणार.

छावा यायच्या आधी या गोष्टीतला संभाजी हा शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ असे. छावा आल्यावर तो मुलगा झाला.

कौशलजी vs कौशल
जियो हॉटस्टार

_____________
चांगला वाटला.
आईवडिलांची केमिस्ट्री एकमेकांशी जुळत नसते, सतत कुरबूर वाद होत असतात म्हणून मुलगा चिडून सल्ला देतो की आमच्या जनरेशन सारखे वागा आणि पटत नसेल तर वेगळे व्हा.
त्याच वेळी मुलगा ज्या मुलीच्या प्रेमात पडतो तिचे आई-वडील आधीच वेगळे झाले असल्याने तिला एकत्र कुटुंब हवे असते.
पण त्याचवेळी इकडे याच्या आईवडिलांनी याचा सल्ला सिरियसली घेऊन घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला असतो. आणि ते या निर्णयात खुश सुद्धा असतात.
पण आता हा मुलगा आपले लग्न वाचवायला आई वडिलांचे लग्न वाचवायची धडपड करू लागतो.
पुढे काय ते अर्थातच प्रेडिक्टेबल आहे पण मनोरंजनमूल्य पाहता हलका फुलका आहे. कलाकार चांगले असल्याने अभिनय सुसह्य आहे.

आता काय करायला पाहिजे की इतीहासाची सर्व टेक्स्ट रद्दीत टाकून फक्त सिनेमे अभ्यासक्रमात लावावेत. अनारकली मुघले आझाम जोधा अकबर पासुन उरी सॅम बहाद्दूर पर्यंत अनेक सिनेमे आहेत.

छावा मधे काही गोष्टी राहून गेल्या आहेत.

१. नायक खलनायकाच्या अड्ड्यात जाऊन डायलॉग मारून येतो. (विश्वनाथ, कालीचरण, जंजीर )
२. कथा महाराष्ट्रातच घडते. काश्मीर, शिमला, स्वित्झर्लंड इथे गाणी असायला हवी होती.
३. आदिवासी पाड्यावरचं एक रंगेबिरंगी पोषाखातले गाणे जिथे नायक - नायिका खुर्चीत बसून बघत आहेत.
४. एक गाणं गणपती विसर्जनाचं किंवा दहीहंडीचं हवंच.
५. औरंगजेब डाकू असतो हे दाखवायला हवं होतं.

असे काही भाग टाकायचे राहून गेल्याने पिक्चरच्या फ्लो मधे छोटे छोटे तुकडे वास्तवाला धरून येतात त्यामुळे मधेच दाताखाली खडा यावा असं होतंय.

मुद्दा इतिहासाचा आहे, तो व्हाट्सअप पोस्टमध्ये कितपत खरा असू शकतो आणि चित्रपटांमध्ये कितपत खरा असू शकतो... >> सेंसॉर बोर्ड सत्यशोधन मंडळ आहे असा तुझा दावा असेल तर तुझ्याशी बोलण्यात हशिल नाही एव्हढेच खरे.

एक प्रामाणिक प्रश्न : असे 'ऐतिहासिक' सिनेमे पाहून आपले कुतुहल जागे झाले व आपण इतिहासाची पुस्तके मिळवून वाचली आणी मग आपल्या लक्षात आले की सगळेच ब्लॅक अँड व्हाईट नव्हते, आपण ज्यांना पूजनीय समजत होतो त्यांचेही पाय मातीचेच होते व ज्यांचा तिरस्कार करत होतो त्यांच्यातही काही सद्गुण होते, तर मग आपली मते बदलण्याचा प्रांजळपणा आहे ?

सर्वसाधारणपणे बहुतांश जनता अतिरंजित दाखवले तरी त्यातला अतिरंजितपणा वगळता इतिहास खरा असेल असे मानतात.

>>>मानत असतील बुवा. पण मला तर छावा इतका अतिरंजित वाटला की जर एका मला अज्ञात असलेल्या ऐतिहासिक पात्राबद्दल असला सिनेमा पाहिला असता तर चाराण्याचा इतिहास घेऊन बाराण्याचा शिनुमा बनवलाय असे मत पडले असते. उदाहरणार्थ - ३०० हा सिनेमा. सिनेमा मनोरंजक आहे पण त्यातली गोष्ट संपूर्ण बनावट असणार असेच माझे मत हा सिनेमा पाहिल्यावर झालेले.

मी बाहुबली पाहिला नाहीए. उडतानाची दृष्ये पाहून मला क्राउचिंग टायगर हिडन ड्रॅगन आठवला. तोही मला पाहायला लागलेला. आणि तोही हिंदीत डब केलेला. त्यातल्या टपोरी संवादांमुळे हा ऑस्कर विजेता सिनेमा आहे की मिथुनपट असं वाटू लागलेलं .
(आता लगेच त्या सिनेमातले असे सीन चालतात तर या का नाही, असा प्रश्न येईल. बाहुबली आणि क्राउचिंग हे काल्पनिक व्यक्तिरेखांवरचे चित्रपट आहेत आणि छावा नाही , या वरही काही आचरट प्रतिवाद होईलच.)

बरं असा - उडण्याबिडण्याचा अचाटपणा न करता संभाजीराजांचा पराक्रम, धाडस, इ. पोचवता आले नसते का?

उडण्याबिडण्याचा अचाटपणा न करता संभाजीराजांचा पराक्रम, धाडस, इ. पोचवता आले नसते का?>>>

कैक काळापासून मी हेच विचारतोय तर सांगण्यात आले आहे की हे जर नसेल तर सिनेमा हिट होणार नाही, मनोरंजक होणार नाही, इतिहास लोकांपर्यंत पोचणार नाही, डॉक्युमेंटरी सारखा नीरस होईल

त्यामुळे लोकांच्या तेही अमराठी लोकांच्या मनोरंजनासाठी बाजीराव ते बाजीप्रभू आणि तानाजी ते संभाजी राजे या सगळ्यांना अचाट साहस दृष्ये करणे सक्तीचे आहे

नाहीतर त्यांचा इतिहास या लोकांना कळणारच नाही

म्हणजे प्रेक्षकांचं बौद्धिक वय आपण ठरवून टाकलंय. अतिरंजित गोष्टी नसल्या तर ते सिनेमा पाहायला येणार नाहीत. तसंच प्रेक्षकांचं मानसिक वय काळाबरोबर कमी कमी होत चाललंय असंही असावं.

मुळात हा सगळाच इतिहास आचरट गोष्टी न करताही भरपूर नाट्यमय आहे.
मराठीत उगाच या सगळ्या कालखंडावर अनेक नाटके आली का? नाटकांत तर अशी दृश्ये दाखवण्यावर तंत्राच्या मर्यादा असत.

तुम्ही ते प्रभास आणि कृती सॅननचे रामायण पाहिले नाही की काय ?? इतका वाह्यात आणि भयंकर संवाद असलेला सिनेमाच नसेल. बंबैय्या टपोरी बोलणारा हनुमान, सतत उंची व जाडी कमी जास्त होणारा रावण, हनुमानापेक्षा जास्त उडणारा राम, पुष्पकाच्या नावाखाली वटवाघूळ (how to train your पुष्पक? ), पंजाबी बोलणारा लक्ष्मण आणि उर्दू बोलणारे ऋषीमुनी, प्लॅनेट ऑफ द एप्सची कॉपी पेस्टेड वानरसेना- असं अवाक करून सोडणारं पॅकेज आहे. सगळंच बिघडवून टाकणं खरेतर कठीण असते. कारण चुकून का होईना एखादी गोष्ट चांगली होऊन जाते पण नाही, या टीमला ते लीलया जमले आहे.

माधव, फिदीमोदन. Proud

>>नाटकांत तर अशी दृश्ये दाखवण्यावर तंत्राच्या मर्यादा असत.<<
त्याची तूट ऐतिहासीक घटनांची तोडफोड, नाटकांची रंजकता वाढवण्याकरता, आर्टिस्टिक लिबर्टिच्या नांवाखाली भरुन घेतली (गेली) जाते. बरीच उदाहरणं आहेत...

सेंसॉर बोर्ड सत्यशोधन मंडळ आहे असा तुझा दावा असेल तर....
>>>>>

बिलकुल असा दावा नाही..
पण कोणी सत्यशोधन केले आणि त्यांना पटवले तर त्यावर ऍक्शन घेऊन ते ठराविक सीन चित्रपटातून उडवून लावणारे, किंवा चित्रपटच प्रदर्शित होऊ न देणारे मंडळ तर आहे.
व्हाट्सअपपोस्ट मागे ते सुद्धा कोणी नसते.

अस्मिता
प्रभास आणि कृती सॅनन त्यांच्यावर FIR झाला नाही का?
लिंक द्या. किंवा निदान नाव तरी सांगा.
तुम्ही वस्त्रहरण नाटक बघितले आहे कां?
किंवां "ओसाडवाडीचे देव" पुस्तक तरी वाचले आहे का?
"राम जन्माची ब्येस्ट स्टोरी"नावाची कथा वाचली नाही का?

<त्याची तूट ऐतिहासीक घटनांची तोडफोड, नाटकांची रंजकता वाढवण्याकरता, आर्टिस्टिक लिबर्टिच्या नांवाखाली भरुन घेतली> चित्रपटांत यातलं काहीच होत नाही ना?

तांत्रिक मर्यादा म्हणजे स्टेजवर लढाया त्या प्रमाणात दाखवता येत नाहीत , इ.

वस्त्रहरण (मच्छिंद्र कांबळी यांचे ?) बहुतेक लहानपणी पाहिले आहे. 'ओसाडवाडीचे देव' ची पारायणं केली आहेत. चिं वि जोशींची जबरदस्त चाहती आहे. पण ते निदान एंगेजिंग, धमाल आणि आपापल्या कलाकृतीशी प्रामाणिक होते. 'राम जन्माची बेस्ट स्टोरी' मात्र माहिती नाही.

वर वर्णिलेल्या चित्रपटाचे नाव 'आदिपुरुष' होते. गदारोळ तर आपल्याकडे नेहमीच होतो, झालाही असेल. मी फक्त नावं ठेवता यावीत म्हणून नेटफ्लिक्सवर घरीच पाहिला.

>>चित्रपटांत यातलं काहीच होत नाही ना?<<
होतं ना. पण हल्ली तर नविन फॅड आलेलं आहे. आम्हाला एखादं दृष्य आवडलं नाहि, जे इतिहासाला धरुन अस्लं तरीहि, तर ते दृष्य चित्रपटातुन हटवण्याची मागणी करु शकतो. सेंसॉर बोर्ड हि त्यावर नमतं घेते. महादेवनचा "फुले" चित्रपट हे त्याचं ताजं उदाहरण.. खरं तर हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे...

आपण मुद्द्यापासून भरकटतोय. इथे मुद्दा वेगळा आहे. चित्रपट रंजक करण्यासाठी त्यात अशा अतिरंजित गोष्टी दाखवायची आवश्यकता आहे का?
स्पेसिफिकली ती लढायांची दृश्ये.

चित्रपट रंजक करण्यासाठी त्यात अशा अतिरंजित गोष्टी दाखवायची आवश्यकता आहे का?>>> ते मला माहित नाही. पण अशा अतिरंजित गोष्टी दाखवायला काय हरकत आहे? चित्रपट केवळ मनोरंजनासाठी असतात. ज्यांना नाही पटत त्यांनी भा इ सं मंडळात जाऊन बखरी वाचाव्यात. वाहत्या गंगेत हात धुवून करोडोंचा गल्ला कमावला ना?

अतिरंजित गोष्टी दाखवल्या नाहीत तर प्रेक्षक येणार नाहीत , असं म्हणणं आहे.

तसंच हे चित्रपट पाहून (च) आम्हांला इतिहास कळतो असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे तुमचा केवळ मनोरंजनाचा मुद्दा त्यांच्याकडून बाद.

माझे काही तसे म्हणणे नाही, अतिरंजित असल्याने प्रेक्षक येतात आणि त्याचा side effect होऊन त्यांना इतिहास समजतो. असे म्हणणे म्हणजे विज्ञान कथा वाचून विज्ञान समजते असे म्हणण्यासारखे आहे. प्रेक्षकाना सगळ काही आधीच माहीत आहे. म्हणजे छत्रपती संभाजी राजे हे केवळ निमित्त मात्र, खरा इतिहास म्हणजे @#$% औरंग्या किती नीच होता हे त्यांना आधीच माहित असते. WHU वरून. त्यामुळे नवा इतिहास काय शिकायचा?

अतिरंजित गोष्टी दाखवल्या नाहीत तर प्रेक्षक येणार नाहीत , असं म्हणणं आहे. >> तस नसावे. सिनेमा डॉक्यूमेंटरीसारखा असेल किंवा अ‍ॅक्शनपेक्षा (अ‍ॅक्शन म्हणजे हाणामारी अशा अर्थाने नाहितर काहीतरी नाट्यमय होत असणे) संवादावर भर असलेला किंवा प्लॉट वर केंद्रित असेल तर तितकेच लोक येतील का हा प्रश्न आहे. ह्यातल्या प्रत्येक ग्रूपचा एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग असतो नि दुर्दैवाने मसाला भागाचा अधिक आहे. विशेषतः ऐतिहासिक कॅरॅक्टर्सबाबत हे अधिक खरे आहे कारण बहुतेक वेळा ते लढायांशी निगडीत असतात. शिंडलर्स लिस्ट 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' चे उदाहरण बघितले तर ती लढाई अधिक वास्तववादी आहे पण बघणारे ती अधिक एंजॉय (रुढार्थाने नाही ) करतात कि ३०० सारखी हे बघितल्यावर अशा अचाट अतर्क्य लढाया का असतात ह्याचे उत्तर स्पष्ट होत जाते.

पण कोणी सत्यशोधन केले . >> किती सिनेमांमागे हे होते ? किती ऐतिहासिक सिनेमांबाबत हे होते ? ऑब्जेक्शन बहुतांशी भावना दुखावण्याला असतात.

अतिरंजित दृश्य नसतील तर चित्रपट चालणार नाही का?

याचे उत्तर आहे का नाही चालणार?
चित्रपट चांगला आणि दमदार असेल तर बिलकुल चालेल. किंबहुना जास्त चालेल. कारण दर्जेदार चित्रपट बघायला सर्वांनाच आवडतात. आणि ते पुन्हा पुन्हा बघितले जातात. त्यांनाच रिपीट व्हॅल्यू असते.

पण इथे "चित्रपट तसाच चांगला आणि दमदार असेल तर" हे महत्वाचे.
तसा तो नसेल तर नाही चालणार. एव्हरेज असल्यास साफ आपटेल.

पण अतिरंजित दृश्य असतील तर चित्रपटातील ईतर उणिवा झाकल्या जाऊन एव्हरेज पिक्चर सुद्धा चालतो.

म्हणून चित्रपटात अतिरंजित दृश्ये दाखवली जातात. त्यांची तशी मार्केटिंग केली जाते. कारण निर्मात्यांसाठी हा व्यवसाय आहे.

आता आपल्याला लाख वाटले की चित्रपट असा असा हवा, तसा हवा, तरी आपण त्यासाठी आपल्या खिशातील पैसे खर्च करणार नाही. मग जो ते करत आहे त्याला आपण नावे का ठेवायची?

जिथे महापुरुषांची बदनामी होतेय, अगदीच थिल्लरपणा दाखवला जात आहे, युवा पिढी आणि समाज बिघडत आहे तिथे निषेध करा असे धोरण मी माझ्यापुरते ठरवले आहे आणि पाळतो.

Pages