भारतात कोविडच्या लसीला होणारी दिरंगाई.

Submitted by बाख on 28 April, 2021 - 08:38

जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.

तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.

भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.

."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.

....

Group content visibility: 
Use group defaults

भरतनी सांगितलं तस बीएमसीच्या हँडलला फॉलो केलं. त्यांचं 7.55 वाजता ट्विट आलं की 18 ते 44 साठी लसीकरण 8 वाजता सुरू होईल .
8 वाजता साईट ओपन केली तर अक्षरशः 5 मिनिटात सगळे सेंटर booked दाखवत होते .
लेटेस्ट ट्विट vaccination full झाले अस आलेय. आजही मिळाली नाही अपॉइंटमेंट Sad

मोदीजी सगळ्यांना लस देणार आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका. हा!..मोदींजींच्या जागी मी असतो तर घाबरायला पाहिजे होतं तुम्ही. Happy

glad someone is taking numbers seriously! >> अनुमोदन. १४० कोटी लोकांना.. आणि हे दरवर्षी. जा रे बाबा करोना. जा लवकर निघून.

भारत त्याच्या लोकसंख्येच्या ५ टक्के लोकांना पण लस देवू शकणार नाही.
लायकी नसलेले प्रशासन, अडाणी लोक सत्तेवर आणि मूर्ख जनता असेच भारताचे वर्णन करता येईल
एक वेळ पाकिस्तान लसीकरण त्यांच्या देशात पूर्ण करेल पण भारताला फक्त पाच टक्के लोकांना पण लस देता येणार नाही.

सिरम आणि भारत बायोटेक यांची एकत्रित क्षमता दिवसाला २८ लाख डोस तयार करायची आहे.

भारत बायोटेकने मिळालेल्या ऑर्डरच्या तुलनेत फार कमी डोसेस निर्माण केलेत.

फायझरने भारत सरकारला लशींच्या वापरासाठी जानेवारी - फेब्रुवारीत अर्ज दिला. त्यावर उत्तर आलेले नाही.

BREAKING: U.S. backs Covid vaccine intellectual property waivers to expand access to shots worldwide.

स्टोरेज -80 सेलशिअसला, डायल्युट करायच्या आधी 2 आठवडे पर्यंत -25 ला आणि डायल्यूट केल्यावर 2 डिग्रीला पाच दिवसापर्यंत. अशी गाईडलाईन आठवते. शहरात मोठ्या हॉस्पिटल/ मास लसीकरण केंद्रात शक्य व्हावे.

पिंचिमध्ये 7.30 ला ओपन होतात स्लॉट. 7.25 पासून सारखं रिफ्रेश केलं तरी फुल्ल असाच मेसेज येतो, डोळ्यादेखत सगळी सेंटर फुल्ल होतात Happy काल तीन वेळा 'कन्फर्म' बटन क्लिक करून सुध्दा स्लॉट फुल्ल असा मेसेज आलाय.

लंपन, नव्या उघडलेल्या स्लॉट्स वर लक्ष ठेवा.यमुना नगर प्रसूतिगृह निगडी, इंगवले शाळा पिंपळे निलख वगैरे.
काल आम्ही सकाळी 9 ला 2 स्लॉट मिळवले.
कोविन वर असल्यास दर 15 मिनिटाने स्वतःच लॉगिन परत करायचे.
रोज 1-2 नवी केंद्र येत आहेत पिं ची मनपा मध्ये.त्यामुळे या आठवड्यात नक्की मिळेल.
लासुरणे चा 1 स्पॉट ही भुताटकी किंवा सॉफ्टवेअर बग असावा अशी मला शंका आहे.तो कायम रिकामा दिसतो आणि बुक करायला गेल्यावर फुल दिसतो.
गेले 4 दिवस आम्ही इतके वेळा स्लॉट बघत होतो की आता आयुष्यात रिक्तता आली आहे.पहाटे 3 ला पाणी प्यायला जो उठेल तो पण स्लॉट तपासूनच झोपायचा.
ती एक महिन्याने परत भरेल.

लस भारतात सर्वांना मिळेल आणि भारत corona मुक्त होईल ही स्वप्न बघणं सोडून ध्या.भारताची ती क्षमता नाही.
नैसर्गिक पण corona व्हायरस निष्क्रिय होईल तेव्हाच भारत corona मुक्त होईल.

विद्यमान केंद्र सरकारं हे असून नसल्या सारखे आहे.
एक त्यांना काही कळत नाही . अडाणी तर आहेतच .पण स्वतः खूप हुशार असण्याचा त्यांचा मोठा भ्रम आहे.जगातील झाडून सर्व मीडिया नी मोदी हा कसा मूर्ख आहे ह्याचे रसभरीत वर्णन केलेलेच आहे..
मुंबई महानगर पालिका किती उत्तम काम करत आहे ह्याचं दखल सर्वोच्च न्यायालय नी सुद्धा घेतली आहे.
महाराष्ट्रात नी covid काळात किती उत्तम काम केले आहे हे मूर्ख भक्त सोडून सर्वांना माहीत आहे.
उत्तम प्रदेशात योगी च्या लीला भक्तांना कधीच दिसत नाहीत.
Bjp शासित सर्व राज्यात खोटे रिपोर्ट,खोटी आकडेवारी,मृत्यू झालेल्या लोकांचे खोटे आकडे सर्रास दिले जात आहेत.हे जगातील सर्व लोकांच्या लक्षात आले.पण मूर्ख भक्तांच्या डोक्यात काही शिरत नाही

पहिल्या डोस घेताना ऑनलाइन बूकिन्ग केले नसल्यास आणी registration पण केले नसल्यास. दुसरा डोस साठी बूकिन्ग कसे करायचे. असे करता येते का?

नैसर्गिक पण corona व्हायरस निष्क्रिय होईल तेव्हाच भारत corona मुक्त होईल.>> स्वीडनला असं करणं शक्य झालंय ना? जाअप्रटा.

अनु धन्यवाद बघतो. लासुरणे ला काल पण एक स्लॉट होता पण इंदापूर मध्ये असल्याने नाही ट्राय केला. नवी ठिकाणं बघतो आज 7.30 ला.

लस वगैरे घेण्याच्या भानगडीत कशाला पडता. सरळ गायत्री मंत्र म्हणा कोरोना कुठल्या कुठे पळून जाईल. हे मी नाही म्हणत आहे. हे ५ ट्रेलियॉन इकॉनॉमी कडे वाटचाल करणाऱ्या देशाचे विज्ञान मंत्रालय म्हणत आहे. लस बनवणारे घाबरून विदेशात पळून जातात, देशात कुंभमेळे भरवण्यात येतात, लस पुरवठयाचे शून्य नियोजन असून पण लस उत्सव साजरा करा असे देशनायक सांगतात, आणि ह्या सगळ्यावर कहर म्हणुन आता साक्षात विज्ञान मंत्रालय मंत्र- तंत्रावर गुंतवणुक करते.
आता आपल्या देशाने खऱ्या अर्थाने विज्ञानाची सोडून हजारो वर्षे जुन्या आपल्या धर्माची कास धरली आहे.

https://www.tv9marathi.com/national/science-ministry-funds-trial-on-effect-of-gayatri-mantra-in-treating-covid-19-coronavirus-451537.html

एक बाबा व्हिडिओ पाहिला त्यात तो सांगत होता लिंबूच्या रसाचे तीन तीन थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडा. झालेला कोरोना बरा होईल.

कोविड लस घेण्यासाठी लोक दाही दिशा फिरत आहेत. आज एक मित्र पुण्यातून फलटण तर एक जण पुण्यातून चक्क औरंगाबाद ला जाऊन लस घेऊन आलेत.
एकंदरीत सगळं अवघड च आहे या लसी चं
त्यात आता covaxin च पाहिजे म्हणून हटून बसलेले अनेक ओळखिचे लोक आहेत.
देवा आता तूच पळव या कोरोना ला. हे असं लोक लसीसाठी रोज प्रवास करत सुटले तर काय लॉकडाऊन आणि कसली जिल्हाबंदी

जोवर लशींचा पुरवठा वाढत नाही तोवर काही होणार नाही. जूनपर्यंत हे असंच चालणार आहे.
सरकारने हे स्पष्टपणे सांगायला हवं नाहीतर लशींसाठी दंगे होतील.

Pages