ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

मला वाटते इथेच पटवर्धन दाम्पत्याविषयी खोटी माहिती मुद्दाम कुणी तरी लिहिली होती.

मला वाटते इथेच पटवर्धन दाम्पत्याविषयी खोटी माहिती मुद्दाम कुणी तरी लिहिली होती. >>>> ती इमेज सचिन पगारेंच्या 'पुरग्रस्तांना मदत' तत्सम नाव असलेल्या धाग्यावर होती.

अमर ९९ ही जी माहिती डकवली आहे ती स्वतःची आहे का ? पोस्ट ज्याची कुणाची आहे त्याचे नाव इथे टाका.
पटवर्धन दंपतीची पोस्ट फेसबुकवर फिरतेय. त्यात त्यांनी स्वतःहून वापरलेले शब्द आहेत ते.
(माझ्याकडे आत्ता नाही. शोधायची म्हटले तर वेळ लागेल. पण देता येईल. पगारेंचा धागा उडाला नसता तर लगेच समजले असते)
या पोस्टवरून दिलेली माहिती खरी कि खोटी हे कसे ठरवणार ?
एक तर अमर ९९ या आयडीचा पताठिकाणा नाही. पोस्ट कुणाची ते ठाऊक नाही.
अमक्याने तमक्याला विचारले टाईप चालू आहे,
फोटोंचा तर पत्ताच नाही.

पोस्ट ज्याची कुणाची आहे त्याचे नाव इथे टाका. >>> मेसेजच्या वर सारंग दर्शने हे नाव दिसतंय.

फोटोंचा तर पत्ताच नाही. >>> हो ना.

पटवर्धन दंपतीची पोस्ट फेसबुकवर फिरतेय. त्यात त्यांनी स्वतःहून वापरलेले शब्द आहेत ते. >>> फॉरवर्ड केलेली असेल ना? स्वतः त्यांनी तशी जाहिरात कुठे पब्लिश केल्याचे आढळले असेल तर द्या इथे.

सारंग दर्शनेंच्या timeline वर बघितली ही वरची पोस्ट. फोटोही आहेत. १.२ k लोकांनी शेअरही केली आहे. हे खरं असेल तर आधीचा बदनामी असणारा फॉरवर्डेड फोटो शहानिशा न करता केवळ ब्राह्मणद्वेषाने तयार केलेला व पुढे पाठवला असावा का?

माझा तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असणारा मित्र श्रीनिवास हेमाडे >> तत्वज्ञानावर यांचं लोकसत्ताला सदर यायचं मागच्या वर्षी

अश्विनी, मी पहिली फक्त ब्राम्हण कुटुंबीय वाली पोस्ट इथे माबोवरच पाहिली होती. निर्भीड आणि काय काय पत्रकार असल्याचा आव आणलेल्या व्यक्तीनेच इथे दिली होती.. हल्ली कुठला आयडी आहे हे फक्त बघितले की तो काय प्रकारचे लिहिणार हे कळते.

सोशल मीडियाचे हे एक भयावह रूप आहे. सो मि बंद करा म्हणायचे ठरवले तर कित्येकांना मदत होतेय त्याची।तीही बंद व्हायची भीती.

माणसाने फक्त तारतम्य बाळगून स्वतःच लावलेले शोध स्वतःच्या व इतरांच्या भल्यासाठी वापरले तर पूर्ण मानवजात शांततेत जीवन जगेल. पण हेच नकोय कित्येकांना.

दर्शणेंच्या टाइम लाईनवर फोटोही आहेत.

त्या वॉलवरचे फोटोज पाहीले. ते कुणाचे आहेत हे समजत नाहीत. कोणत्या इमारतीचे आहेत हे समजत नाही.
त्या वॉलवर भीमा कोरेगावच्या वेळी प्रपोगंडा राबवणा-या स्मिता गायकवाडचे आगमन झाले त्यावरून कोणता कंपू आहे हे समजले थोडेफार.

माझ्या मते या पोस्टवरून आणि संबंधित फोटोंवरून दावा खरा आहे हे समजत नाही. जी इमेज व्हायरल झालेली आहे ती खोटी आहे हे सिद्ध व्हायला हवे. कदाचित या पोस्टमधले सारंग दर्शने यांचे दावे खरेही असू शकतात. आणि पटवर्धन दांपत्याला उशिरा समजलेले शहाणपण सुद्धा असू शकते.

मुळातच मूळच्या त्या इमेज मधे ही
सुशिक्षित अथवा ब्राह्मण कुटुंब असा उल्लेख असल्याचे स्मरते. फक्त ब्राह्मण कुटुंब असा उल्लेख नव्हता असे माझ्या आठवणीवरून सांगता येइल.

आता तो धागाच नसताना या धाग्यावर ते देण्याचे प्रयोजनही समजले नाही. त्याच वेळी त्या धाग्यावर दिले असते तर बरे झाले असते.
मला तरी फारसे यावर बोलणे योग्य वाटत नाही. खालच्या लिंकवर राजेश कुलकर्णी नावाचे गृहस्थ जे म्हणत आहेत त्याच्याशी अंशतः सहमत आहे.

https://www.facebook.com/photo.php?fbid=2089346157835988&set=gm.25975464...

पाकिस्तानी अधिका-यावर विश्वास ठेवणारे आपल्या भारतीय त्यातून महाराष्ट्राच्या अधिका-यावर विश्वास ठेवणार का ?
महाराष्ट्र राज्याच्या अधिका-याचे धक्कादायक वक्तव्य
https://www.thodkyaat.com/state-govt-officer-big-reveal-on-almatti-dam/?...

हो… अगोदरच विसर्ग केला असता तर होत्याच नव्हतं झालं नसतं’; अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

विजापूर | होय… अलमट्टीतून विसर्ग करायला जरासा उशीर झाला. अगोदरच जर विसर्ग केला असता तर अशी परिस्थिती उद्भवली नसती… अशी धक्कादायक कबुली राज्य शासनाकडून कर्नाटकात अलमट्टीच्या निरीक्षणासाठी गेलेले अधिकारी श्रीपाद मलघम यांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनेने दिलं आहे.

श्रीपाद मलघम हे राज्य शासनाच्या सिंचन विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. गेले काही दिवस ते अलमट्टीत तळ ठोकून आहेत. अलमट्टीतून पाण्याचा किती विसर्ग केला जातोय, याची माहिती ते राज्य शासनाला देत आहेत.

मलघम यांनी केलेल्या धक्कादायक खुलाशाने फडणवीस सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात विसंवाद असल्याचं स्पष्ट होत आहे. तर आम्ही पहिल्यापासून सहकार्य करत आहोत, असं अलमट्टी प्रशासनाने म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच कर्नाटक सरकारला सांगून विसर्ग वाढवला असता तर लाखो लोकांच्या डोक्यावरचं उडालेलं छप्पर आणि आयुष्याची झालेली राखरांगोळी… हे सगळं काही वाचलं असतं, अशा भावना आता लोक व्यक्त करत आहेत.

आता तो धागाच नसताना या धाग्यावर ते देण्याचे प्रयोजनही समजले नाही. त्याच वेळी त्या धाग्यावर दिले असते तर बरे झाले असते. >>>> बरं झालं त्यांनी इथे दिले ते. दुसरी बाजू कळली. तो धागा बंद झाल्यामुळे तिथे कसे लिहिणार ते?

दुसरी बाजू तुम्हाला पटली असेल तर अभिनंदन. मला तरी नाही पटली.
पण पहिली बाजूही सिद्ध झालेली नव्हती.

त्या पोस्टच्या बाबतीत मी राजेश कुलकर्णी यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. जातीचा काय संबंध ?
एका सर्वसमावेशक ग्रुपवर (कारण एकच राजकारण) ही पोस्ट आहे. कदाचित सेटींग्जमुळे दिसत नसावे.

68426991_2089346161169321_3176526347191189504_n (1).jpg

दुसरी बाजू तुम्हाला पटली असेल तर अभिनंदन >>> मी पटली म्हटलं नाहिये. कळली (समोर आली) म्हटलंय जशी आधीच्या त्या इमेजमध्ये पहिली बाजू कळली होती.

नक्की विषय काय आहे धाग्याचा? >>> दुसरा धागा बंद झाल्याने व त्यावरील माहितीच्या contradictory माहिती कुणालातरी उपलब्ध झाल्याने तो विषय इथे घुसला.

बाल कोट वर airstrike झाला होता असे स्टेटमेंट इम्रान खान नी आज दिले आहे .
आता बोला

Ashwini,

तो धागा उडवल्यामुळे मीही इथेच लिहिते आणि एकच पोस्ट लिहिणार आहे. तर त्या वादग्रस्त मूळ पोस्टचे लेखक नेहरुगोत्रीय चित्पावन ब्राम्हण पत्रकार आहेत. त्यांनी आधी पोस्ट टाकली, नंतर खरं काय ते कळल्यावर त्यांनी ती मागे घेतली. त्यालाही काही दिवस झाले. पण अर्थात काही लोक जुनीच पोस्ट इथेतिथे फॉरवर्ड करत बसले कारण एका पॉइंटला पोस्टचा मूळ सोर्स मागेच पडतो, व्हायरलचा अर्थच तो आहे.

जे झालं त्यात इतर कोणत्याच जातीधर्माचा दोष नाही किंवा कोणीही ब्राम्हणविरोधी propaganda वगैरे राबवत नाहीए. ज्यांच्या बाबतीत झालं ते मदतकार्यात प्रचंड व्यस्त आहेत , इतकंच महत्वाचं आणि चांगलं.
'गोत्रीय'साठी दिवे, बलून वगैरे कृपया घ्या.

मी पहिली फक्त ब्राम्हण कुटुंबीय वाली पोस्ट इथे माबोवरच पाहिली होती. निर्भीड आणि काय काय पत्रकार असल्याचा आव आणलेल्या व्यक्तीनेच इथे दिली होती.. हल्ली कुठला आयडी आहे हे फक्त बघितले की तो काय प्रकारचे लिहिणार हे कळते. >>>> आभार आपले. आयडी कुठला आहे हे पाहिले की तो काय लिहीणार हे कसे कळते याचे क्लासेस असतील तर कृपया कळवावे. मला आजही समजत नाही. आडनाव बघून कि काय ? सचिन पगारे आणि माझा काहीच संबंध नाही. तसेच निर्भीड वगैरे विशेषणे मी स्वतःसंबंधी वापरलेली नाहीत. तुम्हाला कुठून दिसली हे मला ठाऊक नाही.

मी ती पोस्ट इथे दिली तेव्हां ती खूपच व्हायरल झालेली होती. सर्वात आधी ज्यांनी ती फेसबुकवर दिली त्यांना तो व्हॉट्स अ‍ॅप मिळाला होता. ते गृहस्थ प्रतिष्ठीत (आडनाव पगारे नसल्याने) आहेत. सोशल मीडीयात त्यांना मानही आहे. ते खोटं लिहीणार नाहीत या समजुतीतून मी शेअर केली. अशी गृहीतकं अनेकदा असतातच. त्यामुळे खातरजमा केली नाही. ही माझी चूक झाली. ती पोस्ट चुकीची आहे का हे ही माहीत नाही आणि खोटी आहे का हे ही माहीत नाही. आत्ताच वरचा खुलास वाचला, तो खरा आहे हे गृहीत धरतो आणि पटवर्धन दांपत्याला झालेल्या त्रासात माझ्याकडून जी भर पडली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मूळ पोस्ट इथे देतो.

jagdish kabre.jpg

अवधूत परळकरांची वॉल द्दिसत नाही. काय कारण आहे माहीत नाही. पण हा खुलासा पुरेसा असावा.

करुनी चाचा नेहरूंची सदोदित नक्कल
येईल का कुणा त्यांच्यासारखी अक्कल?
नकलाकार असतो शेवटी अस्सल नाटक्या
थिटेपण लपवू शकतो का कुणी चेटक्या?JK
>>जगदीश काबरे यांच्या वॉलवरून

दंगलीच्या नियोजनाऐवढं आपत्ती नियोजन सोपं नसतं हे संघींना कळल्यामुळे कोल्हापुरात जामवबंदीचे आदेश! झाकली मूठ ठेवायचा सरकारी प्रयत्न!
>> विचारवंत म्हणवून घेणाऱ्या माणसाचे विचार!

Pages