नोटबंदीचे सु-परीणाम भाग २

Submitted by मिलिंद जाधव on 15 July, 2017 - 04:52

पुर्वी " नोटबंदीचे सु-परीणाम " असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.

नोटबंदी हा आजच्या सरकारने घेतलेला महत्वाचा व धाडसी निर्णय होता. सरकारचे प्रमुख ह्या नात्यांने पंतप्रधान यांना हा निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला. नोटबंदीचा पर्याय हा सरकारच्या अर्थ विभागाच्या यंत्रणेने दिलेला असावा व त्याचे बरे वाईट परीणाम काय होतील ह्याची माहिती सध्याच्या सरकारला दिलेली असेलच. स्वतःच्या ( पर्यायाने भाजपाच्या ) राजकीय कारकिर्दीला क्षणात नष्ट करु शकेल असा निर्णय घेणे सोप्पे नसावे. ज्या सरकारी यंत्रणेने नोटबंदीचा पर्याय सुचवलेला त्यांनी नोटबंदीचा आवाका, त्यामुळे होऊ शकणार्या समस्यां व त्यावरचे उपाय ह्यावर ईतका सखोल विचार केलेला नव्हता हे नोटबंदीच्या नंतरच्या काळात समोर आल होत.

नोटबंदी मुळे जनतेला त्रास झाला, १०० लोक मरण पावली, आणी नोटबंदी ही विरोधी पक्षाच्या मते आताच्या सरकारच्या अपयशातील अजुन एक प्रकरण ठरली .

आता भाजपाला झोडपायला नोटबंदीचा उच्चार पुरेसा आहे अस वाटत असतानाच नविन माहीती समोर आलेली आहे. ही माहिती मटाच्या बातमीत दिलेली आहे. अर्थात आताच्या सरकारच्या चांगल्या कामावर आलेल्या सर्व बातम्या बिनबुडाच्या खोट्या असतात हे सर्व स्विकारुनच ही बातमी ईथे दिलेली आहे.

कॅशलेस व्यवहार ८०० अब्जांवर!
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/cashless-t...

नोटाबंदीनंतर सर्वसामान्य जनतेला बँकांबाहेर मोठमोठ्या रांगा लावण्याची वेळ आली खरी...पण आता आठ महिन्यानंतर या निर्णयाचे फायदेही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. काळ्या पैशावर नियंत्रण येण्याखेरीज ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाणही वाढले आहे. नोव्हेंबर ते जून या कालावधीत देशातील कॅशलेस व्यवहार अंदाजे ८०० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

एका अहवालानुसार नोटाबंदीचा निर्णय घेतला नसता, तर ८०० अब्ज रुपयांचे कॅशलेस व्यवहार होण्यासाठी २०२० पर्यंत वाट पाहावी लागली असती. कॅशलेस व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचा सर्वाधिक फायदा केंद्र सरकारला झाला असून, सर्वच व्यवहारांवर नजर ठेवणे सोपे झाले आहे. शिवाय काळ्या पैशाच्या निर्मितीला लगाम घालणेही शक्य झाले आहे.

Group content visibility: 
Use group defaults

कसला बुंद आणि कसला हौद? नोटबंदीमागील उद्देश व त्यानंतर वाढलेले करसंकलन व करदाते हे पाहून लोकांनी हौद भरभरून मोदींना मते दिली. पण काही लोकांचे डोळे अजून उघडलेले नाहीत.

आता करसंकलनावरून व करदात्यांच्या संख्येवरून गुर्हाळ सुरू करा...चला..

मैं भी चौकीदार

त्यांच्या म्होरक्याने चौकीदारची पदवी निकालाच्याच दिवशी 4 वाजता बाजूला केली, हे अजून त्याच रोलात आहेत

तिरंगा वाहिनी बंद करताना स्टाफ ला सहा महिन्याचा पगारच दिला नाही !! वर श्रीमती सिब्बल महिला स्टाफला कुत्तीया बीच्च वैगेरे नावाने बोलवत असे !!
<<
अन हे सगळे मा. युनिस साहेब बाजूला ढिगार्‍यावर बसून पहात होते, म्हणून पुराव्यासकट इथे लिहित आहेत.

निर्लज्जपणे कुणाबद्दलही खोटेनाटे गरळ ओकताना लाज कशी वाटत नाही हो साहेब तुम्हा आयटि सेल मधे फुकट काम करणार्‍यांना?
>>>>

https://thewire.in/media/tiranga-tv-kapil-sibal-barkha-dutt

मि. आरारानी हे वाचावे. तिरंगा टीव्ही व बरखा दत्त यांनी केलेले ट्विट्स मागल्या महिन्यात बरेच गाजले होते. वर उल्लेख केलेले आरोप खुद्द बरखा या तिरंगामध्ये असलेल्या मुख्य पत्रकाराने केलेले आहेत.

बाकी माबोवरील सदस्यांना त्यांच्या संतती नसण्या सारख्या वैयक्तिक बाबींवरून खिजवणाऱ्या या विद्याविभुषित मनुष्याकडून इतर सदस्यांवर बेछूट व बेलगाम आरोपांशिवाय काय अपेक्षा करणार!

confiscated without pay out

हे इंग्रजी आहे, कुणी हे मराठीत सांगेल का?

मला बाकीचे अर्थशास्त्र काय माहीत नाही. 2012 ते 17 आमचे पगार व्यवस्थित वाढले, पण 2018 पासून 2017 नन्तरची पगार स्लॅब वाढ अनिश्चित काळ पुढे ढकलली गेली.

आणि लोकांना पगारवाढ थांबवा , सबसिडी सोडा, कचरा उचलायला 10 पैसे अधिभार वाढवा, रेल्वे तिकीट केंसलेशनचे पैसे वाढवा , असे भिकार्डेपण करून ह्या सरकारच्या आमदारांनी स्वतःचा पगार मात्र 50 हजारवरून एकदम दीड लाख केला.

बाकी अर्थशास्त्राबद्दल माहीत नाही.

ह्यांच्या बाजपेयींनेही सर्वांची पेनशन बंद करून स्वतः मात्र थेरडेपण होईस्तोवर 90 की 92 वर्षे पेन्शन खाल्ली होती.

ह्या हिंदुत्ववाल्याचा 'त्याग' म्हणजे गममतच असते, सत्यवतीने स्वतः 3 पोरे काढायची अन भीष्मांला अक्कल शिकवायची , तू त्याग कर ,

ह्यांचे सगळे त्याग चौथ्या वरणाने करायचे असतात

बाकी माबोवरील सदस्यांना त्यांच्या संतती नसण्या सारख्या वैयक्तिक बाबींवरून खिजवणाऱ्या या विद्याविभुषित मनुष्याकडून इतर सदस्यांवर बेछूट व बेलगाम आरोपांशिवाय काय अपेक्षा करणार!
>> कोण आहे असा खालच्या पातळीवर जाणारा माणूस.

>> कोण आहे असा खालच्या पातळीवर जाणारा माणूस.

नवीन Submitted by चैतन्य रामसेवक on 4 August, 2019 - 06:30 >>>

आरारा

–-------------
Biggrin
वि.मु.बोलतील की. तुम्ही का नाचताय?

नवीन Submitted by भरत. on 3 August, 2019 - 23:27 >>>>

मुद्दे संपलेत वाटतं...

-------

ह्या हिंदुत्ववाल्याचा 'त्याग' म्हणजे गममतच असते, सत्यवतीने स्वतः 3 पोरे काढायची अन भीष्मांला अक्कल शिकवायची , तू त्याग कर ,

ह्यांचे सगळे त्याग चौथ्या वरणाने करायचे असतात

नवीन Submitted by BLACKCAT on 4 August, 2019 - 06:33>>>>>

महाभारत जसे व्यासांनी लिहिले तसेच्या तसे घडले असे तुमचे मत आहे काय? की फक्त तुमच्या सोयीच्या बाबी घडल्या असे तुमचे मत आहे?

नोटबंदी हा अत्यंत अविचाराने, घिसाडघाईने घेतलेला निर्णय होता... त्याच्यामुळे एक रुपयाचाही काळा पैसा बाहेर आला नाही. नोटबंदी मुळे फायदा झालाच असेल तर बँकेच्या लोकांना OT (ज्यांना मिळत असेल त्यांना) मिळण्यात झाला असेल आणि अत्यंत गर्भ श्रीमंतांना.

थोडा (म्हणजे १- २ %) जरी फायदा झाला असता तर नोव्हेंबर २०१७, नोव्हेंबर २०१८ ला (anniversary day) त्या यशाचा मोठा वाढदिवस साजरा केला असता. हजारो कोटी नुसत्या जाहिरातींवर खर्च करणार्‍यांनी याचा फार मोठा event केला असता. तसे काहीही झाले नाही. शांतपणे, चिडीचुप... पहिली, दुसरी anniversary आली आणि कुठल्याही वर्तमानपत्रात पानभर जाहिराती विना गेली. Sad अपयशाचा यापेक्षा अजुन कुठला सब्बळ पुरावा हवा?

मोदी सरकार आर्थिक तसेच अन्य आघाडींवर यशस्वी व्हावे असे मला मनोमन वाटते. पण त्यांच्याकडे काम करणार्‍या (ट्रम्पच्या भाषेत हुशार स्मार्ट) लोकांचा मोठाच तुटवडा आहे. जे काही आहेत ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आहेत.

मोदी सरकार आर्थिक तसेच अन्य आघाडींवर यशस्वी व्हावे असे मला मनोमन वाटते. पण त्यांच्याकडे काम करणार्‍या (ट्रम्पच्या भाषेत हुशार स्मार्ट) लोकांचा मोठाच तुटवडा आहे. जे काही आहेत ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आहेत >>>> हेच अपेक्षित आहे सर्वांना.

कसला बुंद आणि कसला हौद? नोटबंदीमागील उद्देश व त्यानंतर वाढलेले करसंकलन व करदाते हे पाहून लोकांनी हौद भरभरून मोदींना मते दिली......then why cess on petrol?

मोदीना मते, 500 सीटवर मोदी होते का?

लोकांनी कमळ चिन्हावर काँग्रेस रा वा चे लोक निवडून दिलेत

{नोटबंदीमागील उद्देश व त्यानंतर वाढलेले करसंकलन व करदाते हे पाहून लोकांनी हौद भरभरून मोदींना मते दिली. }
भाजपचे कॉंग्रेसीकरण धाग्यावर हेच आदरणीय व्यक्तिमत्व "भाजप बहुमतासाठी इतर पक्षांतील आयात लोकांना तिकिटं देतात," असं म्हणतंय.

If tax collection has increased why surcharge on high income ..why higher GST brackest are not being removed

पण ते इथे एखाद्याने विवारणपत्रा सारखी खाजगी माहिती देऊन सिद्ध अट्टहास का चाललाय हा माझा प्रश्न आहे.
आणि ती माहिती या ज्यांना हवी आहे ते आधी स्वतःच्या विवरण पत्रातील माहिती, शेअर्सच्या व म्युच्युअल फंडांच्या उलढालीची माहिती कुणाला देतील काय हा दुसरा प्रश्न.....

अहो, मी त्यांचे विवरणपत्रही जाहीर करेन, फक्त आधी येथील स्वतःस surgeon म्हणवणाऱ्या आणि micro surgery करण्याचा दावा करणाऱ्या, उठसुठ आयुर्वेदावर तोंडसुख घेणाऱ्या (तथाकथित) डॉक्टर महोदयांनी आपली medical ची डिग्री जाहीर करावी!!!

वि.मु. मी वि वरण पत्र मागितलेलं नाही. तुम्ही दुसर्‍या कोणामागे दडू नका. त्या दोन गोष्टींचा संबंध काय?
पहिल्यापासून सुरू करू.
{नोटाबंदी मधून 'काळा' पैसा बाहेर आला नाही असे म्हनानार्यांनी खालील बातम्या वाचून त्यात उल्लेख केलेल्या पैशाचा 'रंग' (काळा/पांढरा) कोणता हे सांगावे!
(आमचे एक नातेवाईक आणि त्यांची पत्नी एकाच कंपनीत काम करतात. त्यांच्या मालकाने नोटाबंदीच्या काळात त्याच्याकडील बेहिशेबी संपत्ती कचऱ्यात फेकून देण्याऐवजी आपल्या कामगारांमध्ये वाटली. ज्यामुळे आमच्या नातेवाईकांचे घराचे स्वप्न तरी पूर्ण झाले!)}

हा तुमचा प्रतिसाद. तुमच्या नातलगांच बॉस क्ष आणि त्याचे कामगार अ, ब, क.
क्ष ने आपली बेहिशोबी संपत्ती अ, ब, क ला दिली.
संपत्ती बेहिशोबी असल्याने क्ष आपल्या वा आपल्या कंपनीच्या रेकॉर्ड्समध्ये हे दाखवणार नाही.
अ, ब , क हे आपल्या आयकर परताव्यात ही रक्कम दाखवतील का? त्यांना अर्थातच नगद मिळाली आहे.
दाखवली असल्यास काय म्हणून?
रक्कम घर घ्यायला उपयोगी पडली म्हणजे लहानसहान नाही.

ती त्यांनी आपल्या बँक खात्यांत जमा केली असेल, तर त्यांना आयकर खात्याकडून नोटिस मिळायला हवी.

बँकेत जमा न करता घर खरेदी साठी ती नगद वापरली असेल, तर तो काळा पैसा काळाच राहिला. फक्त क्ष कडून अ, ब मार्फत ज्ञज्कडे गेला.

एक तर जुन्या नोटांतला काळा पैसा बँकांत जमा न होऊन रद्द व्हायला हवा किंवा त्यावर नियमाप्रमाणे कर भरला जायला हवा. यासाठीच नोटाबंदी दरम्यान गरीब कल्याण योजना आली होती.

या प्रकरणात काळा पैसा एकाकडून दुसर्‍याकडे गेला. कदाचित विनासायास पांढराही झाला.

याला तुम्ही नोटाबंदी चं यश म्हणताय.
मला तुमच्या नातलगांच्या विवरणपत्रात रस नाही. या वरच्या प्रश्नां ची उत्तरं शोधा.
अ, ब, क ला कोण त्याही कारणाशिवाय आणि जाहीर केल्याशिवा य मिळालेले पैसे हेसुद्धा बेहिशोबी मालमत्ताच ठरतात.

या प्रकरणात काळा पैसा एकाकडून दुसर्‍याकडे गेला. कदाचित विनासायास पांढराही झाला.+१११
>> विवरणपत्र ( IT Return) दाखल करणे कंपलसरी नाही अशी माझी माहिती आहे. शक्यतो जास्तीचा भरलेला कर परत मिळावा म्हणून विवरणपत्र सादर करतात.

विवरणपत्र ( IT Return) दाखल करणे कंपलसरी नाही अशी माझी माहिती आहे. >> अहो ते अ, ब , क हे पगारी नोकर आहेत हे लक्षात घ्या

फॉर्म नं १६ हा नोकरांना कंपलसरी असतो. रिटर्न नसावा. आणि काळा पैसा कोण कशाला दाखवेल. घर घेताना सेव्हिंग म्हणून दाखवला असेल.
महत्त्वाचे म्हणजे क्ष, अ,ब,क यांनी गुन्हा केला आहे.

घर घेताना सेव्हिंग म्हणून दाखवला असेल. >> असेल असेल. ते विमु का गप्प अहेत ते बघुन या जरा

नवीन Submitted by चिवट on 5 August, 2019 - 13:45 >>>

ते कलम ३७० च्या बातमीचे सेलिब्रेशन करत असतील.

मला 15 लाख आले की मी ते रिटर्न मध्ये दाखवणार .

नवीन Submitted by BLACKCAT on 5 August, 2019 - 14:52 >>

नक्की दाखवा.. १५ लाखान्साठी शुभेच्छा. फक्त ते घेताना रुमाल मोठा असु द्या. कुणितरी म्हटलच आहे. "जिसका जितना है आचल यहापर, उसको खैरात उतनी मिलेगी..."

ऑ ?

अन मग ते ऑन लाईन ट्रान्सफर , पे टी एम , चेक वगैरे विसरले का ?

मोदीना चेक छापताना 15 लाख आकड्यात लिहिता येतील , इतका चौकोन ठेवायला सांगा

ते विमु का गप्प अहेत ते बघुन या जरा.... गप्प नाही, तुमच्या प्रतिक्रियाच वाचतो आहे.

ते कलम ३७० च्या बातमीचे सेलिब्रेशन करत असतील... अगदी बरोबर!!!

आता मुद्द्याकडे. त्या आमच्या नातेवाईकांनी नेमके काय केले ते माहित नाही. पण त्यांनी घेतलेले घर हे उमरोळीला (विरारच्याही पुढे) आहे. आज २-२.५ वर्षानंतरही तेथे पक्का रस्ता नाही. यावरून ते घर फार काही महागडे असेल असे वाटत नाही. शिवाय त्यांनी काही प्रमाणात गृहकर्जही घेतले आहे बहुतेक. म्हणजेच मिळालेली रक्कम फारशी नसेल, त्यामुळे करमुक्त असेल.

दुसर्याकडून मिळालेली गिफ्ट रक्कम करपात्र असते,

आणि ज्याने ते घाऊक मध्ये वाटले , त्याने ते वाटले कारण तो इतकी रक्कम ब्यांकेत जमा करू शकत नव्हता

तो मालक बहुधा मोदी प्रेमी असावा, काळा पैसा जमावल्याचे प्रायश्चित म्हणून त्याने पैसे आपल्या स्टाफ मध्ये वाटले असतील

Pages