डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. अरुण गद्रे
गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा
आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com
डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)
"गर्भसंस्कार"
Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 September, 2015 - 10:39
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकाच आईच्या उदरातली ही एकाच
एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात >> बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे अजून काहीच घटक नसतात का? बाळे जन्माला आल्या आल्या त्यांची तोंडी परीक्षा घेउन बुद्धिमत्ता मोजली जाते का?
ह्या लेखातले बरेच मुद्दे विचार करण्याजोगे आणि खरे आहेत. गर्भसंस्कारांच्या नावाखाली काहीच्या बाही गोष्टी करून पालकांचा फायदा घेण्याचे प्रकार होऊ नयेत व त्याविषयी जनजागृती आवश्यक आहे. पण "मी डॉक्टर आहे आणि मी हे लिहित आहे, त्यामुळे तुम्ही हे स्वीकारलेच पाहिजे" असा काहीसा लेखाचा सूर (वरच्यासारख्या वाक्यांवरून) वाटला आणि म्हणूनच तो मूळ उद्देशाला छेद देणारासुद्धा वाटला. मृण्मयी ह्यांनी लिहीले आहेच.
>>>> गर्भावरही संस्कार करता
>>>> गर्भावरही संस्कार करता येतात, गर्भावरच संस्कार केल्याने आपले मूल बुद्धिमान, सुसंस्कारी होऊ शकते....हा वादाचा मुद्दा आहे. <<<<<
वरील वाक्यातील "गर्भावर(च)" यातील च आम्ही कुणीच वापरीत नाही आहोत. हा च कुठुन आला बरे भरत?
आमचे असे कुठेही म्हणणे नाही की केवळ गर्भावर संस्कार होतात व जन्मल्यावर होत नाहीत. पण जन्मल्यावर होणार्या संस्काराची पूर्वपिठीका/पाया या स्वरुपात अन जन्मल्यानंतर घ्यावयाच्या संस्कारांबद्दलची ग्रहणशक्ति असे दोनही गर्भावस्थेत जागृत करता येऊ शकते, किमान त्यास चालना देता येते.
मूळ लेखात दोन मुद्दे आहेत
१) गर्भसंस्कार हे थोतांड आहे
२) या थोतांडाद्वारे पैसे उकळणारी दुकाने थाटली गेली आहेत.
पैकी दुसर्या मुद्यातील अर्ध्या भागाशी मी सहमत आहे की होय, या गर्भसंस्काराच्या नावाखाली अवाच्च्यासवा फिया आकारणारे आहेत.
पण पहिला मुद्दा व दुसर्या मुद्द्यातील अर्धाभाग, गर्भितार्थ एकच की गर्भसंस्कार हे तद्दन व्यावसायिक गल्लेभरु थोतांड आहे, तर या मुद्यास मी विरोध करतोय. गर्भसंस्कार म्हणजे थोतांड आहे हा मुद्दा मला मान्य नाही.
गर्भावरच म्हणजे फक्त गर्भावर
गर्भावरच म्हणजे फक्त गर्भावर नाही. डायरेक्ट गर्भात असल्यापासून या अर्थाने.
कॉपरमाईन | 1 October, 2015 -
कॉपरमाईन | 1 October, 2015 - 01:51
सुन्ता हा प्रकार शास्त्रसिद्ध - म्हणजे सुन्ता केल्याने भविष्यात होणारे फायदे - आहे का केवळ अंधश्रद्धा आहे हे कोणी सांगू शकेल काय?
तसेच सुन्ता करणारे हे प्रशिक्षीत पेडीअॅक्ट्रीक असतात का हकीम?
>>
याच्यावर उत्तर अपेक्षित आहे.
तसेच सुन्ता करणारे हे
तसेच सुन्ता करणारे हे प्रशिक्षीत पेडीअॅक्ट्रीक असतात का हकीम?>>> माझ्या माहितीप्रमाणे लहान मुलांच्या मुत्रमार्गात काही अडथळे आल्यास ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जन्स सुंता करतात. हिंदू मुलांची सुंता ह्या कारणासाठी केलेली ऐकली आहे. मुसलमानांमध्ये सरसकट सगळ्या मुलांची का करतात ते माहित नाही.
शिकवणी लावून लगेच कोणी पहिला
शिकवणी लावून लगेच कोणी पहिला येत नाही पण आधी जी पातळी असते त्या पेक्षा ती उंचावू शकतेच ना!
त्यामुळे गर्भसंस्कार केले की त्यामुळे लगेच नोबेल पारितोषिके मिळाली पाहिजेत असा सूर लावला जाय्तोय तो अगदीच खटकतो.
भारतामधून नोबेल पारितोषके मिळवणारी माणसे निघत नाहीत याचे प्रमुख कारणच मुळी आपल्यातील संशोधक वृत्तीचा अभाव हे आहे. ( पांशा ऑन - आपल्याला एक समाज म्हणून परंपरागत माहित असले तरी धान्यात कडुलिंबाची पाने ठेवायला / जखमेवर हळद दडपायला देखिल पैसे मोजायला लागायची पाळी आपल्यावर आली होती.
पांशा ऑफ) उद्या गर्भ संस्कारावर बाहेरच्या देशात नवीन पद्धतीच्या मानकांमधे बसवून दाखवणारे संशोधन होऊन अॅलोपथीला मान्य झाले तरच भारतातले सुशिक्षित त्यास लगेच मान्य करतील. ते ही ठीकच आहे. पण करा संशोधन दाखवा त्यातला फोलपणा. खरेतर भारतात व्ह्यायला हवे ह्यावर संशोधन कारण ही संकल्पना त्यांच्याकरता नवीन आहे. पण भारतात तर जाऊ देत पण इतर देशांमधे देखिल गर्भसंस्कर म्हणजे थोतांड आहे असे शास्त्रशुद्ध दृष्ट्या सिद्ध झालेले आहे का? नाहीये.
तसेच (असतीलच तर) त्याचे तोटे काय आहेत ते ही अजून स्पष्ट व्हायचे आहे वरच्या लेखात देखिल 'तोटे आहेत' असे म्हणून त्याबाबत जे उदाहरण दिले आहे की ते काही तर्काला धरून नाही.
हर्पेन मुळ लेखातच झालेले
हर्पेन मुळ लेखातच झालेले संशोधन पुराणकालीन दाखला देवुन नाकारले आहेतच.
वाग्भटांच्या नंतर आयुर्वेदात संशोधनच झाले नाहीये का या विषयावर ???
<<<खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास.>>>
इथे मी परत लिहिणार नव्हते पण
इथे मी परत लिहिणार नव्हते पण वरची चर्चा वाचुन लिहितेय. त्या लेखात आणि खालच्या प्रतिक्रियांमध्ये अतिरंजित वाक्ये आहेत.
उदाहरण द्यायचे झाले तर हे -
>>या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिक>>>>
हे मंत्र म्हणा आणि मग तुमचं मुल आइन्स्टाइन होईल असं कोणी म्हटलं जरी तरीही ते कोणाला पटेल का?
What needs to be proven?
What needs to be proven? Garbhasanskar works or that it doesn't work. u claim something without substantial proof, data, etc and ask the other person to spend hus time, money etc in proving your claim wrong? It is not established fact for someone to take up a mission of disproving it. Those claiming will have to prove themselves and answer such opposing views too.
स्पार्टा, सुंता या विषयासाठी
स्पार्टा, सुंता या विषयासाठी वेगळा धागा काढल्यास उत्तम! बाकी सुंता याविषयात आपल्याला व इतर बाळांना रस असल्याचे पाहुन आनंद झाला.
>>>> हे मंत्र म्हणा आणि मग
>>>> हे मंत्र म्हणा आणि मग तुमचं मुल आइन्स्टाइन होईल असं कोणी म्हटलं जरी तरीही ते कोणाला पटेल का? <<<
मी_अमि, अचूक मुद्दा...
अन मुळात असे दावे कोणी कोठे केलेत हे या लेखकद्वयींनी दाखवुन दिले आहे का?
माझ्या तरी पहाण्यात असे दावे कधी आलेले नाहीत. अन कोणी करीत असतिल, तर तो नालायक अपवाद ठरावा हे नक्कीच.
पण त्या अपवादामुळे वा नित्याचेच होते आहे अशा अर्थाच्या /शब्दातिल वरील वर्णनामुळे, मूळ उद्देश वाचकाचा बुद्धिभेद करणे, तो लपुन रहात नाही, नक्कीच, असो.
भरतराव, सॉरी तुमची पोस्ट
भरतराव, सॉरी तुमची पोस्ट उशीरा बघितली....
तुमच्या विन्ग्रजीतल्या मजकुरात एक बाब अतिशय ठळकपणे अध्याहृत/गृहित धरल्यासारखी वाटते ति ही की, "गर्भसंस्कार होतात" असा दावा करणारे, त्यांच्या वैयक्तिक अधिकारात/अक्कलेत/वैयक्तिकरित्या मांडलेल्या ग्रुहितकाप्रमाणे करीत आहेत.... अन इथेच तुमच्या बाकी युक्तिवादाची चूक होते की मग संशोधनाची जबाबदारी कुणाची?
पूर्वापार चालत आलेले ज्ञान/समज/जाणिव/अक्कल्/समज-गैरसमज कोणि वापरीत असेल, तर ते सत्य/असत्य ठरविण्याची जबाबदारी निव्वळ त्या एका व्यक्तिची रहात नसून सर्व समाजाची होते. इथे लोकशाहीत, सरकार नावाची चीज असते असे मानावे लागते, जिने या बाबतीत रस्ते/पाणी/वीज/शिक्षण या मूलभूत सेवांबरोबरच "संशोधन" व ते देखिल देशान्तर्गत संस्कृतीमधे जपलेल्या ज्ञानावर अधिकचे संशोधन करण्यास उत्तेजन देणे अपेक्षित आहे. न की आचरटासारखे वा झुंडशाहीने एखाददुसर्या वैद्याला धरुन मानगुट पकडून (कोर्टात खेचण्याची धमकीही अध्यार्हुत) दाखव सिद्ध करुन अशी आव्हाने देत बसणे (जशी ती ज्योतिष व्यक्तिंना दिली जातात).
गर्भसंस्कार होतो, हे विधान माझे नसुन त्यास परंपरा आहे
परंपरागत ज्ञानानुसार गर्भसंस्कार होतो मान्य गृहितक आहे, जे की खोटे ठरवायचे असले, तर त्यावर संशोधन न करताच वा पाश्चिमात्य राष्ट्रात त्यावर संशोधन झाले नाही म्हणुन, वा निव्वळ अॅलोपॅथी असले मानित नाही म्हणून, र्निव्वळ अतार्किक युक्तिवादांवर सर्रास निखालस खोटे ठरवायला जाणे हे आधुनिक सुशिक्षिताम्चा वैचारिक दहशतवाद या सदरात मोडेल हे विसरु नका.
खोटे ठरवायचे असले तरी त्यावर
खोटे ठरवायचे असले तरी त्यावर संशोधन न करताच खोटे ठरवायला जाणे हे आधुनिक सुशिक्षिताम्चा वैचारिक दहशतवाद या सदरात मोडेल हे विसरु नका.>>
अनुमोदन.
भरत मयेकर, >> What needs to
भरत मयेकर,
>> What needs to be proven? Garbhasanskar works or that it doesn't work.
शतकानुशतके गर्भसंस्कार होत आलेत. अगोदरपासून अस्तित्वात असलेलं काहीही ज्ञान विचारात न घेता काय सिद्ध करायचंय म्हणून भिंग घेऊन बसायचं?
आ.न.,
-गा.पै.
विठ्ठ्ल, उठसूठ कोणालाही
विठ्ठ्ल,
उठसूठ कोणालाही कोणताही आयडी समजण्याच्या आजारातून लवकर बरे व्हाल एवढी तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना.
भाकड गोष्टिंचे स्ंशोधन करुन
भाकड गोष्टिंचे स्ंशोधन करुन काय उपयोग?
संशोधन न करताच गोष्टींना भाकड
संशोधन न करताच गोष्टींना भाकड ठरवायचं हा भेकडपणा आहे.
पुराणातिल कुठल्या गोष्टिंच
पुराणातिल कुठल्या गोष्टिंच संशोधन झालय?
एगजॅक्टली
एगजॅक्टली
पुराणाबद्दलही माझे तेच मत आहे
पुराणाबद्दलही माझे तेच मत आहे हर्पेन :):-)
आता गर्भसंस्कारावरचे संशोधन कसे करायचे? गरोदर बाई पोटातले बाळ ते बुवा मंत्र म्हणताय गर्भावर काय परिणाम होतो ते कसे समजणार?
मंत्र म्हणजे शब्दाचे बुडबुडे त्याच्या सामर्थ्याने साधा पापड फुटू शकत नाही तर गर्भातील मुलावर काय कपाळ परिणाम होणार.
संशोधन न करताच गोष्टींना भाकड
संशोधन न करताच गोष्टींना भाकड ठरवायचं हा भेकडपणा आहे>>>>>+१
संशोधन व्हायला हवे.भुतकाळात ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यामागचे गर्भसंस्कार काय होते ते शोधायला
पाहिजे म्हणजे भविष्यात तसे महामानव जन्माला घालायला बरे त्याच प्रमाणे हिटलर सारखे ज्या व्यक्ती होऊन
गेल्या त्यामागचे गर्भसंस्कार पण काय होते ते शोधायला पाहिजे म्हणजे भविष्यातिल युद्ध टाळता येतिल.
सचिन पगारे, >> मंत्र म्हणजे
सचिन पगारे,
>> मंत्र म्हणजे शब्दाचे बुडबुडे त्याच्या सामर्थ्याने साधा पापड फुटू शकत नाही तर गर्भातील मुलावर काय
>> कपाळ परिणाम होणार.
मोठ्ठा आवाज काढल्यावर तान्हं बाळ का दचकतं? जर विपरीत आवाजाने अर्भक व्यथित होतं तर सुयोग्य आवाजाने आनंदित का होणार नाही? तुमच्या आकलनाची पातळी पाहता तुम्हाला हे कळणं अवघड आहे. तरीपण सांगतोय.
आ.न.,
-गा.पै.
मंत्रासारखी निरर्थक गोष्ट
मंत्रासारखी निरर्थक गोष्ट सुयोग्य कशी?
>>>> संशोधन न करताच गोष्टींना
>>>> संशोधन न करताच गोष्टींना भाकड ठरवायचं हा भेकडपणा आहे. <<<<< कसले भन्नाट शब्द मांडलेस.... व्वा.
जौद्याहो गामा.... अहो, ज्यांना भकारी शब्द कळतात, त्यांना खरे तर ते शब्दही वापरुन वापरुन इतके मन्त्रवत ताकदीचे बनले आहेत हे समजायला हवे, पण ते ही समजत नाही वा समजुन घ्यायचेच नसते, तिथे "मन्त्र" काय समजणार?
असो.
पण गम्मत अशी की, भकारी शब्दांना समोरच्याला उचकविण्याचा, समोरच्याला राग यायला लावण्याचा विशिष्ट परिणाम साधायलाही मन्त्रवत ताकद आलेली असते.
भकारी शब्द नि मंत्र दोन्हिही
भकारी शब्द नि मंत्र दोन्हिही सेम आहेत शब्दाचे बुडबूडे.निरर्थक....
जुन्या काळातील लेखकांनी
जुन्या काळातील लेखकांनी लिहलेल्या चमत्क्रुतिजन्य कल्पनाविलासि सामान्य कथांचे घोंगडे जे सर्वसामान्य माणुस लपेटुन बसला आहे ते फेकल्याशिवाय ह्या गर्भसंस्कार,भविष्य सारख्या निरर्थक गोष्टिंना मरण नाही.
हे गर्भसंस्कारावरचं एक गुगल
हे गर्भसंस्कारावरचं एक गुगल बुक मिळालं.
पान ३३ : पुंसवन संस्कार :व्यासस्मृति में कहा गया हैकि गर्भाधान से तीसरे महीने में पुंसवन संस्कार किया जाता है| इस संस्कार से गर्भ में आया हुआ जीव पुरुष बनता है| जिस कर्म से गर्भस्थ जीव पुरुष बनता है वही पुंसवन संस्कार है| आयुर्वेद के अनुसार यह संस्कार दुसरे माह में करने की मान्यता अधिक है|
पुढे सुश्रुत संहितेचा उल्लेख आहे. विधी कसा करावा तेही सविस्तर सांगितले आहे.
बरं मग? -गा.पै.
बरं मग?
-गा.पै.
कॉमा, माझ्यासाठी केलेल्या
कॉमा, माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद. बाकी स्पार्टा आपल्याला माहित आहे हे त्यांना कळले (म्हणजे स्पार्टांना) तर त्यांनाही बरे वाटेल.
पुंसवन संस्कार से गर्भ मे आया
पुंसवन संस्कार से गर्भ मे आया हुआ जीव पुरुष बनता है.
यात काही चूक...काही अशास्त्रीय नाही वाटत गामा?
आणि तान्हे बाळ आवाजाने दचकणे मान्य आहे.
गर्भ कसा दचकतो हे आम्हा पामरास कळू द्या.
यावर संशोधन झाले नसल्यास अमान्य करा...किंवा संशोधन करुन सिद्ध करा. आम्हीही मानू...फॉलोही करू.
Pages