रे मना....

Submitted by मनी मानसी.... on 24 January, 2015 - 06:20

कधी कधी काहीच सुचेनासं होतं हल्ली.…
भावनांचा कल्लोळ अन
शब्दांची घुसमट असह्य होते...
खोटया संवेदनांच्या लख्ख प्रकाशाने
होरपळणाऱ्या मनाला संवेदनाहीन अंधाराची ओढ लागते....
मग वाटतं बंद करून टाकावीत मनाची दारं,
अगदी कायमचीच...
श्वासही थांबवावा...
कोंडलेल्या भावना आणि गुदमरलेले शब्द
मोकळे तरी होतील...
कायमचे. ....
मग अगदी सोपं होईल
रित्या मनाची तिरडी बांधणं....
अगदीच सोपं.....

-- मानसी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users