आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो बदलला ना बाप्पा!
ते भरत मयेकर का कोण ते नव्या फोटोचा उलगडा करणार का?

वीणा ताईंच्या विपूत गोड गोड लिहिणार्यांच्या संचात सामायिक काय आहे?

अहो हो ना इब्लिस.:अरेरे: ह्या ड्यु आहेत हेच कळले नाही ना. फार्र म्हणजे फार्रच वाट्रट आहेत या. पण हा आय डी नक्की बाई आहे की बुवा हे अ‍ॅडमीनच सान्गु शकतील.:फिदी:

प्रोफाईल मधे माझा फोटो का डकवला अशी हरकत घ्यायला मृत व्यक्ती येथे येणार नाही पण म्हणुन त्या व्यक्तीचा फोटो वापरण्याचे स्वातन्त्र्य तुम्हाला आहे का ? असे करणे कुठल्या नैतिकते मधे बसते ? घडलेली घटना कॅनडामधे प्रसिद्ध आहे.

असे उचलेगिरीचे कृत्य बेकायदेशीर आहे अथवा नाही हे मला माहित नाही पण नक्कीच निरोगी मानसिकतेचे लक्षण नाही Sad . प्रसिद्ध खेळाडू, कलाकार, अभिनेता, अभिनेत्री, राजकारणी यान्चे फोटो वापरणे समजू शकतो (पुन्हा योग्य आहे हे असे म्हणत नाही) पण घडलेली घटना अत्यन्त दुर्दैवी होती आणि मृत व्यक्ती सार्वजनिक क्षेत्रात वावरणारी नव्हती...

भरत मयेकर - शोधावद्दल धन्यवाद.

व्यवस्थापकांच्या विपूत माझी तक्रार मी आत्ता पाहिली बर्‍याच गोष्टीचा उलगडा झाला.

अरे देवा..किती जिवाला त्रास करुन घेतात लोक..

अहो काय चाललंय इथे ?
धक्काच बसलाय. माझा आधी समज झाला होता की ती न्यूजच फेक असावी किंवा मयेकरांनी फोटोशॉप वापरून ते पेज बनवलं असावं. दोन व्यक्ती अगदी हुबेहूब दिसतात यात आता काहीही नवं नाही. किती ताणायचं ते ? काही काही लोक तर जुनीच भांडणं लक्षात ठेवतात बै.. मग त्यांना नावडतीचं मीठ अळणीच दिसतं.

आपलं तर असं भांडण सुद्धा नाही. चला आता तरी विषयावर येउयात.

मला प्रश्न हा आहे कि भरत mayekarana हा फोटो कसा सापडला ... काही तरी गूढ नक्की आहे ....
इब्लीस - धन्यवाद ... सूर्य आणि जयद्रथ बद्धल ...

हा हा हा ... विपु वर कोकणस्थ यांचे संवाद पहिले ... बराच गंडवलं कि हो त्यांना ... पुरता मामा केला ... ते बिचारे खरच संपादन वगैरे कसे करायचे सांगत आहेत ...

कोकणस्थ
22 December, 2014 - 23:33
तुझा फोटो ताबडतोब काढून टाक इथून. सॉरी जरा आगाऊपणा करतो आहे पण लोक तिथे तुझ्या दिसण्यावरुन कमेंट करु लागलेत. आवडले नसल्यास क्षमस्व.

कोकणस्थ
22 December, 2014 - 07:07
चल मी निघालॉ घरी जायला.
तुझं फेसबुकच निस्तरलं की सांग

कोकणस्थ
22 December, 2014 - 01:42
Smiley

कोकणस्थ
22 December, 2014 - 00:50
अगं संपादन वर क्लिक करायचं.
मग खाली स्क्रोल कर. तिथे खाली तुला "व्यक्तिगत संपर्काची सोय हवी आहे" या वाक्याच्या डावीकडे एक चेकबॉक्स दिसेल. त्यावर क्लिक कर.
मग खाली Save बटन दिसेल त्यावर क्लिक कर.
म्हणजे माझ्या प्रोफाईलवर गेलीस की तुला "संपर्क" हे बटन दिसतंय ना, तसं इतरांना तुझ्या प्रोफाईलवर दिसू लागेल व तुला तिथून ईमेल पाठवता येईल.

मी इथे कुणाला जाहीर फेसबुक प्रोफाईलची लिंक देत नाही म्हणून हा आटापीटा हाहा

आता वर सांगितलंय ते कर लवकर.

कोकणस्थ
21 December, 2014 - 23:4

Rofl

सुरेख या स्त्री आहेत हे आत्ता त्यांची प्रोफाईल पाहील्यावर लक्षात आलं आणि आपली विचारपूस इतरांना दिसते हे पण. सुरेख ताई, काहीच कळेना हो तुमच्या प्रोफाईलवरून.

इब्लिस | 23 December, 2014 - 07:07
ते व्यवस्थापकांच्या विपूत अकरा वाजता लिहून तक्रार करणारे फोटोचा खुलासा वाचून नाकावर पडले का?
<<

खो खो सव्वा अकरा खो खो

-->

व्यवस्थापक चा विपु कसा बघायचा... लिंक देत का कोणी ...

तुझ्या पायरिशी कुणी सान थोर नाही
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे ..
तरी देवा सारा ना ह्यो भोग कशा पायी
हरवली वाट दिशा अंधारल्या धाई
वावाळूनी उधळतो जीव माया बापा
वणवा ह्यो उरी पेटला!!
खेळ मांडला
खेळ मांडला
खेळ मांडला ..

<< सुरेख | 23 December, 2014 - 22:43

मला नटरंग सिनेमातिल नटा ची शोकांकिता आठवली... >>

त्यापेक्षा जास्त समर्पक - पिंजरा चित्रपटातील मास्तर

चेतन सुभाष गुगळे | 23 December, 2014 - 22:34 नवीन
<< सुरेख | 23 December, 2014 - 22:43

मला नटरंग सिनेमातिल नटा ची शोकांकिता आठवली... >>

त्यापेक्षा जास्त समर्पक - पिंजरा चित्रपटातील मास्तर

---= +१

Lol

दहा दिशांनी , दहा मुखांनी. आज फोडिला टाहो,
आसवांत या भिजली गाथा, श्रोते एका हो

माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

गंगेवानी निर्मळ होता, असा एक गाव
सुखी समाधानी होता, रंक आणि राव
त्याची गुण गौरवान कीर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

छान गाणे आहे Wink

Pages