१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
अंदाज करूया कोण असेल.....
अंदाज करूया कोण असेल.....
कोण, कोण असेल? कुणाचा अंदाज
कोण, कोण असेल? कुणाचा अंदाज करायचाय?
माबोच्या अनेक 'क्रिएटिव्ह'
माबोच्या अनेक 'क्रिएटिव्ह' लोकांची नावे डोळ्यासमोर येताहेत
मना काय बी टोटल लागना.
मना काय बी टोटल लागना.:अओ:
पुर्वि इथे कुणी रामदेव बाबाची
पुर्वि इथे कुणी रामदेव बाबाची भक्तिन होती का?
अमानवीय धागे, श्राद्धाचे
अमानवीय धागे, श्राद्धाचे जेवण, भूतांची चित्रे....घ्या आता!
सुरू नाही कि बंद नाही, अमर...
लोकहो, मयेकरांना धन्यवाद !
लोकहो,
मयेकरांना धन्यवाद ! त्यांनी जे केलं तेच वीणाताईंच्या विपूच्या प्रचिवर केल्यावर हे मिळालं : http://memini.co/memini/zainab-sahar-geeti-rona-shafia/
तिथे हे प्रचि दिसतंय :
सारी मयेकरांची किमया (की माया?) !
आ.न.,
-गा.पै.
हे काय , माझी हमशक्ल ?
हे काय , माझी हमशक्ल ?
जुडवा बहन कुंभ के मेले मे
जुडवा बहन
कुंभ के मेले मे बिछडी हुई.
अलोन चित्रपट बघा आता
बिपाशाचा
विषयावर लक्ष द्यायचं सोडून
विषयावर लक्ष द्यायचं सोडून माझ्या दिसण्यावर का बरं लक्ष देताहेत लोक ?
कोकणस्थ यांना अनुमोदन.
जगात सात लोक एकमेकांसारखे दिसतात. त्यातले दोन एगदी एकमेकांसारखे असतात. त्यांच्या आवडीनिवडी, वेषभूषा, केशभूषा, आवाज, कलाप्राविण्य हे अगदी सेमच असतं.
अय्यो! याला म्हणतात साधी
अय्यो! याला म्हणतात साधी रहाणी, उच्च विचार!
जगात सात लोक एकमेकांसारखे
जगात सात लोक एकमेकांसारखे दिसतात. त्यातले दोन एगदी एकमेकांसारखे असतात >>
हो हो मी रामदेवबाबांसारखे बघितले
रामदेव बाबा की जय
मला हे ड्युआयडी वगैरे अजिबात
मला हे ड्युआयडी वगैरे अजिबात आवडत नाही. इथे चाललेल्या चर्चेचा मी कडक शब्दात निषेध करत आहे. ते कोण मयेकर की काय ते, त्यांनी फोटोशॉप वापरून माझे फोटो त्या पोर्टल वर कशावरून डकवले नसतील ? असो.
हा काही माझा विषय नाही. शिवाय मी जिवंत असल्याचे अनेक पुरावे आहेत.
वीणा, या दुष्ट लोकांना तुझ्या
वीणा, या दुष्ट लोकांना तुझ्या जिवंतपणाचा पुरावा देऊनच टाक कसा!
घ्या! मला एक गाणे आठवतेय. जे
घ्या!
मला एक गाणे आठवतेय. जे या प्रसन्गाला/ बाफाला येकदम फिट्ट आहे.
देख तेरे सन्सारकी हालत क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान!
(No subject)
त्यांनी फोटोशॉप वापरून माझे
त्यांनी फोटोशॉप वापरून माझे फोटो त्या पोर्टल वर कशावरून डकवले नसतील ? >.>
अहो ते "भक्त" नाही आहेत
कसलेला डुआय कोणाचा असेल
कसलेला डुआय

कोणाचा असेल त्याचा अंदाज लावता येतोय की सहज
(मला कुणीही विपू, पिंग, ईमेल, मेसेज, ईमेल करून 'कोण' ते विचारू नका. तुमचा तुम्ही अंदाज लावा)
कोकणस्थ माझ्या पोस्ट ज्या
कोकणस्थ
माझ्या पोस्ट ज्या अर्थी सुसम्गत येताहेत त्या अर्थी मी जिवंत नाही का ? वाचल्याशिवाय का कुणी असं उत्तर देऊ शकतं ?
अगं जिवंत म्हणजे खरा खुरा
अगं जिवंत म्हणजे खरा खुरा आयडी असल्याचा पुरावा हे लोक मागत आहेत. त्या अर्थाने जिवंत म्हणतोय.
मी जिवंत नाही का ?
मी जिवंत नाही का ? वाचल्याशिवाय का कुणी असं उत्तर देऊ शकतं ? >>
प्लँचेट नावाचा प्रकार ठाउक आहे का हो?
पॅन कार्ड असेल तर टाक बरं
पॅन कार्ड असेल तर टाक बरं
गुगल वर तुमचे अनेक फोटो दिसत
गुगल वर तुमचे अनेक फोटो दिसत आहेत, ते तर मयेकरानी फोटोशॉप केलेले नाहीत ना? इतकी हौस मयेकराना नाही, तुम्ही जिवंत आहात पण फोटो मयत व्यक्तीचा वापरत आहात.
आता आणखी ५०० प्रतिसाद "ओळखा
आता आणखी ५०० प्रतिसाद "ओळखा पाहू" रंगणार की काय
लोकांकडे मी पहील्यापासून
लोकांकडे मी पहील्यापासून दुर्लक्षच करत आलेत. पहील्यापासून त्यांचा मुड टिंगल टवाळीचा होता. मी आवाहन करून पाहीलं सभ्यतेन वागण्याचं.. पण कुणी मनावर घेतलं नाही म्हटल्यावर मी बाजूला झाले तर आता माझ्या दिसण्यावर गेलेत ते ?
काय आणि का उत्तर द्यायचं त्यांना ? तू एकमेव व्यक्ती आहेस माझ्या माहीतीत इथे, जो समंजस आहे.
पण मी म्हणतो इथे मायबोलीवर
पण मी म्हणतो इथे मायबोलीवर कोणीतरी प्लँचेट केले असणार. तरच हे शक्य आहे.
प्लॅन्चेट द्वारे आलेला प्रकार उत्तर सुध्दा देते.
डीविनिता अहो एकसारखे दिसणारे
डीविनिता
अहो एकसारखे दिसणारे लोक असतात की. तुम्ही सीता और गीता नाही का पाहीला ?
त्यांना त्यांचे डुआयडी देखील
त्यांना त्यांचे डुआयडी देखील माहीतीत नाही
काय आणि का उत्तर द्यायचं
काय आणि का उत्तर द्यायचं त्यांना ?>>>
त्यांची तोंड बंद करायला तरी उत्तर दे. पुरावा दे तू खरी खुरी व्यक्ती असल्याचा. पॅन कार्ड दे किंवा काहीही. ती वर रिया आहे ना, तिला तुझा फोन नंबर दे. म्हणजे ती फोन करुन खात्री करेल.
तू एकमेव व्यक्ती आहेस माझ्या माहीतीत इथे, जो समंजस आहे.>>
हे वाचून इथले ९९% लोक बेशुद्ध पडणार हे नक्की
अगं बाई, तुम्ही भूताचा संशय
अगं बाई, तुम्ही भूताचा संशय घेताय ?
देव तुमचं कल्याण करो.
Pages