मुलाचा अभ्यास कसा घ्यावा

Submitted by राज1 on 24 July, 2014 - 04:05

माझा मुलगा 2ND STANDARD (७ वर्षे) आहे.
घरी अभ्यास घ्यायला लागल्या वर T.V. वर किंवा खेळण्यातील गाड्या खेळत बसतो. आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तोंडी उत्तरे पटकन देतो. कधी मारल्यावर ५ किंवा १० मिनटे अभ्यास करतो. नेहमी मारून अभ्यास करून घेणे हि बरोबर नाही. शाळेतील HOME WORK हि नेहमी अपूर्ण आसतो.
त्याचे बोलणे हि थोडे बोबडे आहे. व तोंडात बोटे घालण्याची सवय आहे. या बद्दल कृपया सल्ला द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निपा तुमच्या लेकाचे आणि तुमचे अभिनंदन.
तुमच्या या प्रवासाबद्दल नक्की लिहा. होमस्कुलिंग वरून शाळेत कधी शिफ्ट झालात, त्यात काही अडचणी आल्या का हे ही लिहा. ( मला आठवतेय त्याप्रमाणे तुम्ही होम स्कुलिंग केले होते ना मुलाचे?)

माझी मुलगी आता 10 वर्षाची आहे, तिला सायन्स अँड इंग्लिश आवडते, पण गणित फार आवडत नाही.

गेले दोन वर्षे घरातूनच शाळा सुरू आहे, त्यामुळे की काय माहित नाही पण ती अभ्यासलाच नवे तर सगळ्याच गोष्टींची टाळाटाळ करते, सकाळी तिला जर उठवले नाही तर दहा -साडे दहा पर्यंत लोळत पडते, परत दात घास ग, दूध पी ग करत मागे लागावे लागते. कशीबशी शाळेला बसते, त्यातही लिहून न घेणे, वह्या पूर्ण न करणे, शाळा सुरू असताना दुसऱ्या टॅब मध्ये इतर फालतू काहीतरी सर्च करत राहणे असे उदयोग करते.

ऑनलाइन शाळेचे दुष्परिणाम आहेत हे. शाळा घरूनच असल्याने बहुतांशी मुलं सुट्ट्या चालू असल्याप्रमाणे वागत आहेत. शक्यतो घरातल्या सगळ्यांचे कामाच्या दिवसांचे एक फिक्स वेळापत्रक असणे, मोठया माणसांनी पण सुट्ट्या असल्याप्रमाणे न वागणे, मुलांना घरी असल्याने खूप रिकामा वेळ मिळतोय तो जाण्यासाठी त्यांना बिझी ठेवणे इ गोष्टी त्यातल्या त्यात उपयोगी ठरतात. हे आमच्या घराच्या अनुभवावरून सांगतेय.

माझा मुलगा ऑनलाइन शाळा सुरू असताना एक शब्द लिहीत नाही. नुसता स्क्रीन कडे बघून ऐकत रहातो किंवा back ground ला गाणी लावून ऐकत बसतो किंवा बऱ्याचदा बॅकग्राऊंड मध्ये discord car चॅटिंग करतो. 13 वर्षाचा आहे तो. होमवर्क असतोच. तो मात्र शक्यतो पूर्ण करतो. कधी कधी शॉर्ट कट करतो ( म्हणजे १५ पैकी don- चार प्रश्न सोडवून सबमिट करतो. त्याला माहिती आहे की हे तपासले जाणार नाही).
आम्हाला आधी त्रास झाला त्याला असे वागताना बघून. मग आठवलं, शाळा असायची तेंव्हा ही तो वर्गात गप्पा मारतो, लिहीत नाही, वह्या पूर्ण नसतात या तक्रारी होत्याच शिक्षकांच्या. फक्त ते आमच्या नजरेआड व्हायचे.

आम्ही केलेले उपाय - तो शाळेत असताना आम्ही टाईम पास करत नाही. कितीही रिकामा वेळ असला तरी. त्याच्या कॉम्प्युटर वर नॉर्टन ३६० आहे. School time मध्ये कोणत्याही इतर वेबसाईट चालत नाहीत. दिवसातल्या इतर वेळी करण्यासाठी त्याला छोटे छोटे टास्क द्यायचा प्रयत्न करतो. तो बिझी असेल तर फोन वर reals बघणे, YouTube videos बघणे करत नाही. व्हिडिओ गेम खेळायला रोज वेळ देतो अर्धा एक तास ऑनलाइन मित्रांबरोबर. आठवड्यातून b१-२ वेळा त्यांचे फन झूम calls असतात. थोडा फरक पडतो या सगळ्यांमुळे.

हो हे सगळी मुलं करत आहेत.टीचर दुसऱ्या मुलांना प्रश्न विचारत असताना दुसऱ्या बाजूला गुगल गेम्स खेळणे, गाणी ऐकणे वगैरे.
मोठी मुलं लेक्चर गुगल मीट वर चालू असेल तर समांतर झूम मीटिंग काढून गॉसिपिंग चाट करत असतात.(हे सर्व प्रत्यक्ष बघून माहीत आहे.)आई बाबा घरात असल्यास त्यांनी वर्गात काय चालू आहे, आपल्याला कोणी ओरडलं हे ऐकू नये म्हणून इयरफोन्स लावणे इत्यादी.आणि ही त्यातल्या त्यात सभ्य मुलं करत असलेले उद्योग. अजून कौशल्य असलेले महारथी तर विचारायलाच नको Happy
त्यामुळं आता सर्वाना आपल्या सद्सद्विवेक बुद्धी वर सोडून असं करण्याचे फायदे तोटे समजावून शांत राहणे इतकंच होतं.

फक्त त्यांचे एकंदर मल्टी टास्क करून त्याने आपला फायदा होईल ही श्रध्दा बाळगणे, एकाच वेळी इतक्या गोष्टी करणे की शेवटी आपण काय करतो हे स्वतःलाच थांबून आठवावे लागणे हे सर्व पाहून मला या चिमुकल्यांमध्ये भावी सॉफ्टवेअर डेव्हलपर्स दिसतात(पदर नाकाला लावून गहिवरुन हुंदका)

अल्पना , अनु ,सुह्रुद --- पदर नाकाला लावून गहिवरुन हुन्दका .
घरी रोजच्या रोज वाद होतात हल्ली . गेल्या वर्श्री निदान अभ्यास नाही केला तर चित्रकला , हस्तकला काहीतरी करत होता , हल्ली तर ते ही पूर्ण करत नाही . स्वतःहून अभ्यासाला बसला तर थोड्या वेळाने गेम वगैरे काहीतरी चालू होतं .
आता टीनेजर होतोय त्यामुळे टॅन्ट्रम्स फार वाढलेत . दंडेलशाही वापरता येत नाही .
समजावून समजावून किती समजावणार असं झालयं .
मुलांची २ वर्ष वाया गेल्यासारखी वाटतायेत .

ती अगदी आमचे पेशन्स चेक करते, अगदी दहा वेळा सांगाव्या लागतात गोष्टी, दोन वर्षपूर्वी पर्यंत लेक कशाला तरी घाबरून( शिक्षक, कमी मार्क्स, नाचक्की) तरी वेळेत अभ्यास करायची, अक्षर छान काढायचइ, हिरीरीने इतर सर्व गोष्टी करायची पण आता कीती चिअर अप केले तरी ते तेवढ्या पुरतेच होते.
बोलून, समजावून , ओरडून, कधीतरी फटका देऊनही काही उपयोग नाही, उलट आता वाद घालते सतत.
काहीही खाऊ द्या, सतत किरकिर असते. एक पोळी खायला 1 तास लावते. कोणताही पदार्थ केला तरी नाराजीच.
मस्त वेळापत्रक करते, सगळे छान लिहून काढते, पन कधीच पाळत नाही. अभ्यासाची नाहीच पण हल्ली गोष्टीचीही पुस्तके वाचत नाही. व्यायाम नको, अभ्यास नको, खाऊ नको, अंघोळ नको. असे सगळे चालू असते.

आमच्या घरी याचंच जरा सौम्य व्हर्जन चालू आहे. वय आठ चालू, दुसरीत आहे. इअर फोन मी देत नाही. मोठा स्पीकर मोबाईलशी जोडून देते. मी किचनमध्ये असले तरी साधारण काय शिकवतायत ते समजतं. होमवर्क मी घेते. फोटो येतात गृपवर.

पण सकाळी उठणं, दात घासणं, व्यायाम, आंघोळ-वेणी-आवरून घेणं, ब्रेकफास्ट वेळेवर करणं म्हणजे रणांगण. आता सोमवारी पाठवणार आहे शाळेत, बघू. म्हणजे तिची आणि आमची इच्छा आहे. शाळा १५ डिसेंबर ला सुरू झाली. हिला खूप सर्दी खोकला होता म्हणून पाठवलं नाही. आता ओमिक्रॉन पार्श्र्वभूमीवर काय होईल माहिती नाही.

मला वाटलं माझ्याच घरात आहे कथा , माझाही मुलगा सहावीत आहे पण सिरियसनेस नाही अजीबात घाबरत तर अजीबात नाही,उलट उत्तर देणं सुरू आहे काय करावं आपणं पालक म्हणून कमी पडतोय असं वाटायला लागलंय

आता मी नवीन पर्याय शोधला आहे. एका कोर्सला मी रजिस्टर केलं आहे. फोनवर असाईनमेंट्स यायला सुरुवात झाली आहे.‌तू तुझा अभ्यास कर, शेजारी बसून मी माझ्या असाईनमेंट्स करते ही मात्रा लागू पडते आहे. उलट, "आई, आज दोन पेजेस तरी पूर्ण करायचीच. त्याशिवाय मोबाईल नाही. आणि मी पण बसते आणि होमवर्क पूर्ण करते. मग दोघी मिळून गप्पा मारू (किंवा इतर काही) " असं झालंय Proud

एक प्रश्न - ओनलाईन शिक्षणात अभ्यास - नंतर स्वत: करायचा देतात का? (पूर्वीचा गृहपाठ/होमवर्क ) त्यात किती वेळ जातो?

आमच्याकडे धाकटा 2 वर्षाचा, पूर्ण वेळ नोकरी, 3 वयस्कर लोक, नवरा यांनी मला ग्रासून टाकले आहे.
तिला पुरेसा वेळ देता येत नाही याचे गिल्ट तर आहेच पण हुशार मुलगी वाया चालली आहे, हे पण येते आहे.
युट्युब वर इतके फडतूस व्हिडीओ बघते आणि त्याची बोलण्याची नक्कल घरी करते, ओह बॉय, जीजस, इतर टिपिकल शब्द ऐकले की आज्जी आबा यांना किल्ली बसते हे तिला कळलंय आता ती अजूनच जास्त करते.
बाबा ज्यावेळा घरून काम करतो तेंव्हा माझ्यासोबत अभ्यास कर, हे म्हणतो पण ती एक ओळ सुद्धा सलग लिहीत नाही, त्यामुळे नवऱ्याचेही काम होत नाही.
हॅरी पॉटर चे पहिली दोन पुस्तके तिला मागच्या वर्षी दिली होती, ती अगणित वेला वाचून झाली पण त्याचे सार लक्षात घेत नाही. फक्त भाषा लक्षात येते.
अभ्यास झाला का असे विचारले तर चक्क थापा मारते, वही चेक केली की अर्धवट असते, काही झालेलं असते, कधी काहीच झालेले नसते.

Srd - अभ्यास खरेतर 30 ते 40 मिनिटे इतकाच असतो पण ती त्याला बसायलाच 2 तास लावते मग सुरू करते. आणि तोवर, जेवायची, खेळायची, झोपायची वेळ होते मग परत सगळे बंद.

माझ्या मुलीला असतो होमवर्क. शिवाय शाळेत शिकवलेल्या फळ्यावर लिहिलेल्या कामाचं क्लासवर्क असतं लिहायला. सगळ्या विषयांचं असतं. लिहायला पुरेशी मुदत असते.

आमच्या मुलांच्या आता ऑफलाईन शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे या सगळ्यातून सुटल्यासारखं वाटत आहे.

जेव्हा ऑनलाइन शाळा होती तेव्हा मोठा मुलगा बऱ्यापैकी सिन्सिअरली करायचा. लॅपटॉपवर बघून होमवर्क करतानाही त्याची मजल फार फार तर गूगल कॅलेंडरवर काही तरी टास्क वगैरे टाकून ठेवणं एवढीच होती. पण त्याच्या वर्गातली मुलंपण हे एकीकडे हँगआऊटवर एकमेकांशी गप्पा मारणं वगैरे करायची असं तो सांगायचा. टीचर रागावल्या होत्या.

धाकटा ( इयत्ता तिसरी) मात्र महाउद्योगी. शिकवण्याकडे फारसं लक्ष नाहीच, उलट माझं लक्ष नसेल तेव्हा यूट्यूबवर काही तरी व्हिडिओ उघडणं, इअरफोन्स नसतील तर म्यूटवर ते बघणं, इअरफोन्स असतील तर काय मज्जाच..एकदोनदा त्याने अमेझॉनची साईट उघडून कुठलंसं खेळणं शोधलं होतं! व्याप झाला होता आम्हाला. कधी एकदा ऑफलाईन शाळा सुरू होते असं झालं होतं. आता निदान शाळेत जरा तरी काही डोक्यात शिरत असेल असं वाटतं.

निपा, तुमचे आणि तुमच्या मुलाचे अभिनंदन! तुमच्या या प्रवासाबद्दल वाचायला आवडेल. मुलाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

गेली दोन वर्षे कोविडमुळे सगळेच विस्कळीत झाले आहे , थोडे मार्गी लागत आहे असे वाटत असताना पुन्हा व्हायरसचा नवा अवतार-अजून एक लाट हे असे किती काळ असणार आहे माहित नाही. या सगळ्याचा मुलांवरही ताण येतच असणार ना? त्या ताणापासून दूर जाण्यासाठीची पळवाट म्हणून टिवी, इंटरनेट अशा सहज उपलब्ध गोष्टींत रमणे वाढते. मुलं आव आणतात पण आतुन ती देखील घाबरलेली आहेत. शाळा जरी ऑनलाईन सुरु असल्या तरी हे ऑनलाईन शिकायचे-शिकवायचे तंत्र सर्वांनाच जमेल असे नाही. बहुतेक शिक्षकांसाठीही हा प्रकार नवा आहे, नोकरी करायची तर नाईलाजाने जमवून घेणे असे त्यांचेही झाले आहेच. अशा परीस्थितीत ऑनलाईन शिकताना कंटाळा येवून मुलांचे काहीतरी उद्योग चालतात. त्यात ज्या उपकरणाच्या मदतीने शिकणे सुरु आहे तिथेच एका क्लिकवर मनोरंजनही आहे, मोह झाला नाही तरच नवल. ऑनलाईन शिकताना इतर कुठे भरकटायचा मोह होवू नये म्हणून त्यांच्याशी बोलून, त्यांना विश्वासात घेवून वेबसाईट ब्लॉकर लावायचे. आपण हे का करणार आहोत हे स्पष्ट सांगायचे. त्याच बरोबर जालावर भटकणे, टिव्ही बघणे, मित्रांशी गप्पा-झूम कॉल यासाठी वेगळा वेळ ठरवून द्यायचा. प्रत्यक्ष शाळेत होणार्‍या मित्रांशी गप्पा, मधल्या सुट्टीत खेळणे, एकत्र डबा खात गॉसिपिंग, नुसताच एकमेकांचा सहवास वगैरे या लहान मुलांसाठी फार महत्वाचे असलेले सगळे अचानक संपून गेलेय. हेही एक प्रकारचे गमावणेच आहे आणि मुलांसाठी ते दु:खद आहे. मुलांकडून अभ्यासाची अपेक्षा करताना त्यांनी जे गमावले आहे ते समजून घेवून त्याबद्दल त्यांना बोलते केल्यास , सहानुभुती व्यक्त केल्यास फरक पडतो. आपण सगळेच कठीण परीस्थितीत आहोत, तुम्ही लकी आहात, ऑनलाईन का होईना तुम्हाला शिकता येत आहे. कितीतरी मुलांना ही देखील संधी नाही, ती मागे पडत आहेत असे सांगून समजूत काढायची. अभ्यास महत्वाचा आहेच पण आईबाबा आपल्या टीममधे आहेत हा विश्वास अधिक महत्वाचा. तो असेल तर बाकी सगळे आपोआप सोपे होते.

हो नक्कीच.
तसं मजेशीर आहे. मुलं कॉल्स, मीटिंग मध्ये प्रोफेशनल झाल्याने छान पण वाटतं.

आता 1 ली ते 8 वी ऑफलाईन शाळा बंद आहेत(आजपासून आमची चालू होणार होती.)
9 वी ते 12 वी च्या चालू आहेत.

निवांत पाटील, तुम्ही मुलाच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल लिहिणार होतात ती पोस्ट कुठे लिहिली आहे का? असेल तर लिंक देता का?
आणि नसेल तर प्लीज लिहिता का?

निवांत पाटील, तुम्ही मुलाच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल लिहिणार होतात ती पोस्ट कुठे लिहिली आहे का? असेल तर लिंक देता का?
आणि नसेल तर प्लीज लिहिता का?

निवांत पाटील, तुम्ही मुलाच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल लिहिणार होतात ती पोस्ट कुठे लिहिली आहे का? >>>

हे लिहायचे राहून गेलेय. वेगवेगळ्या धाग्यावर जेवढे प्रतिसाद आहेत तेवढेच लिहले गेलेय माझ्याकडून.

आता लेटेस्ट अपडेट लिहतो. माझ्या मते ७ वी होईपर्यंत शाळेच्या अभ्यासाचा काही लोड घेतला नाही तरी चालतो.

३० पर्यंत पाढे पाठ करून घेणे, बेरीज , वजाबाकी , गुणाकार , भागाकार , % , ऍव्हरेज काढणे इतके गणिती कंसेप्ट. भूमिती मधील प्रमेय , त्यामागील संकल्पना आणि त्याचे उपयोग. सायन्स मधील संकल्पना, त्यांचे व्यावहारिक जीवनात होणारे उपयोग. सगळ्या भाषांसाठी शब्द संग्रह वाढवणे, व्याकरण, योग्य आणि अर्थपूर्ण वाक्ये तयार करता येणे, त्यातून प्रत्येक गोष्ट / घटना / आपले विचार आपल्या शब्दात मांडता येणे. सोशल सायन्स चा का अभ्यास करावा , हे समजून त्यातले कन्सेप्ट समजून घेणे, भूगोलाचा शास्त्र समजून अभ्यास करणे, इत्यादी गोष्टी जमल्या कि बाकी सगळे जमते.

माझ्या मित्राची नात ५ वी ला आहे, तिच्या साठी काही तरी प्लॅन लिहून दिला आहे, तो इथे पोस्ट करतोय. तो फुल्प्रोफ आहे असा कोणताही दावा नाहीय, पण गेले ३-४ महिने त्या प्रमाणे एक्सिक्युशन सुरु आहे. शाळा बंद आहे, फक्त परीक्षा देण्यासाठी शाळेत जाते.

ganit_mak.jpeg
गणित

science_mak.jpeg
सायन्स

bhasha_mak.jpeg
भाषा

हे मुलांसाठी लिहलेले नाही, पालकांसाठी / शिक्षकांसाठी लिहले आहे, हे स्पेसिफिकली त्या मुलीसाठी लिहले आहे, प्रत्येक विध्यार्थी हा युनिक असतो, फक्त एक गाईड लाईन म्हणून याकडे बघा, आणि हस्ताक्षर म्हणून बघू नका Wink

आता ८, ९ आणि १० लिहिण्याआधी , ११ वी आणि १२ वी चे लिहतो. जर तुम्ही जेईई / नीट चा प्लॅन करत असाल तर ते २ वर्षे सर्वसाधारण मुलाला ( ज्याला क्लास च्या average मार्क्स असतात त्याला) १०००० च्या आसपास रँक काढायची असेल तर कमीत कमी ८ तास रोज ( अल्मोस्ट ७०० दिवस ). ज्याचे ग्रास्पिंग चांगले आहे त्याला एवढा रँक काढायला कमी वेळ अभ्यास करायला लागेल किंवा याच वेळात त्याची रँक ३००० च्या आसपास येईल. अगोदर फक्त जिनिअस असलेले लोक चांगला रँक काढत होते पण हल्ली सातत्य टिकवून , हार्ड वर्क करणारे पण चांगला रँक काढतात ( अगदी "हुशार" समजल्या जाणाऱ्या मुलांपेक्षा.)

तर ११ - १२ ला एवढा वेळ अभ्यासाला द्यायचा असेल तर त्याची मानसिक आणि शारीरिक तयारी ९-१० ला करावी असं मला वाटत. हळू हळू एका ठिकाणी बसणे. अभ्यासात सातत्य ठेवणे, मोबाईल / टीव्ही पासून अलिप्त राहण्याची सवय करणे. एवढे जरी ९-१० ला वळण लागले तरी, पुषकळ झाले. ९-१० वित्त ११-१२ च्या अभ्यासाला बसवायची काही एक गरज नाहीय, ( टॉप १०० मध्ये यायचे असेल तर गोष्ट वेगळी, पण हि मुलेच त्यासाठी तयारी करत असतात , यांचे आईवडील यांच्या मानगुटीवर बसून अभ्यास करून घेत नाहीत).

९ वी पर्यंत सहामाही पर्यंत चा अभ्यास वार्षिक परीक्षेला नसतो, त्यामुळे मुलांना ठराविक अभ्यास , ठराविक प्रश्न एवढा सुटसुटीत कारभार असतो. १० वी च्या बोर्ड परीक्षेला सगळा वर्षाचा अभ्यास असतो. पण जेईई आणि नीट ला ११ वी आणि १२ वी सगळा अभ्यास असतो, अल्मोस्ट ९० धडे. ठराविक प्रश्न आणि ठराविक उत्तरे असा प्रकार नसतो. त्यामुळे हा चेंज लक्षात आला नाही तर अगदी चांगलं ग्रास्पिंग असलेल्या मुलांचं बरंच नुकसान होतं. इतकं ते पाठ करून / लक्षात ठेवू शकत नाहीत त्यामुळे , 'जे शिकतो त्याचा वापर कसा करायचा' याचा विचार करायची पद्धत अगोदर पासून डेव्हलप व्हायला हवी. ( यावर मी अगदी ४-५ तास बोलू शकतो Happy )

बाकी क्लास लावण्याबद्दल माझे मत काही फार पॉसिटीव्ह नाही आहे, ते एक ऍडऑन म्हणून ठीक आहे. क्लास चा उपयोग स्किल डेव्हलोपमेंट , प्रॅक्टिस , शंका समाधान म्हणून होत असेल तर ठीक, क्लास लावला तरी स्वतःला अभ्यास हा करावाच लागतो.

शाळा / क्लास ची फी भरणारे पालक हे आता कस्टमर आहेत, त्यामुळे त्यांना दुखवायला कोणी जात नाही. शेवटचा रिजल्ट लागल्यावर सगळे एकजात मुलांवर ब्लेम टाकून मोकळे होतात, चूक पालकांची असते. तुम्हाला मुलांचे करिअर चान्गले करायचे असेल तर त्याच्या अडचणी समजून घ्या , त्यांचे निराकरण करा, त्यांना मदत करा, त्यांचे खरे हेलपिंग हॅन्ड व्हा. ( अवांतर होईल , तरी एक उदाहरण देतो, शाळेत / क्लास मध्ये शिकवलेले समजत नाही, हि मुलाची चूक नसते, हा सिस्टीम चा दोष असतो, ज्यात पालक पण आला, बाकी सगळ्यांना समजतं आणि तुला समजत नाही असा दोष मुलांना दिला तर ते परत कोणताही प्रॉब्लेम सांगायला तुमच्या कडे येणार नाहीत. )

सगळ्यात महत्वाचे म्हणजे यासाठी त्याला अगोदर पासून व्यायामाची आवड लावणे / चांगल्या हेल्थ हॅबिट्स लावणे पण महत्वाचे आहे. व्यायाम फिजिकल फिटनेस साठी आणि चांगला आहार एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी. मानसिक आधार , काही झाले तरी आम्ही आहोत तुझ्यासोबत, यासाठी.

सगळे करण्याआधी चांगले आयुष्य जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्या त्यांना समजावून सांगा. अभ्यास , करिअर , चांगला जॉब या आयुष्यातल्याच एक छोटा भाग आहेत. आयुष्य मजेत जगता येत, अभ्यास करण्यात आनंद असतो, ( नसेल तर मारून मुटकून करून कोणी लै भारी काही तरी केलं असेल, असं मला तरी नाही वाटत.) भाषा , गणित , शास्त्र ,कला, सामाजिक शास्त्रे, यातील जे आवडेल त्यात त्याला भरपूर अभ्यास करू द्या.

कितीतरी हुशार मुले सगळे करिअर चांगले करतात पण एका चांगल्या टीम ला लीड करायचे राहूदे , त्याचा भाग पण होऊ शकत नाहीत , मग तेथे आतापर्यंत केलेला अभ्यास काही कामाला येत नाही. २०१७ ला नीट मध्ये टॉपर ( ऑल इंडिया रँक १ ) आलेला नवदीप सिंग, आय आय टी ग्रॅजुएट आय आय एम पोस्ट ग्रॅज्युएट आणि मॅकॅन्झी मध्ये काम करणारा सौरभ कुमार ( अशी कितीतरी उदाहरणे आहेत ) यांनी या वर्षात आत्महत्या केलेल्या आहेत, या गोष्टींचे बाळकडू हे शालेय शिक्षणातून द्यायला हवे, तेथे ते मिळत नसेल तर घरातून द्यायला हवे.

( पोस्ट लैच अस्ताव्यस्त झाली आहे, भावना पोहचवून घ्या )

अजून एक म्हणजे, आपली शाळा संपून किती वर्षे झालीत, आपण काय करत होतो ? किती अभ्यास करत होतो? आपले पालक काय करत होते? आपल्याकडे काय रिसोर्स होते? आपल्याला आपल्या पालकांनी नेमके काय शिकवले कि त्यातून आपण जसे आहोत तसे घडलो? भले आपल्या पालकांची पद्धत वेगळी असेल Wink . आता सुद्धा काहीही बदलले नाहीय, फक्त रिसोर्सेस सगळीकडे उपलब्ध झाली आहेत, माणसे तीच आहेत , मानसिकता तीच आहे, स्पर्धा तीच आहे, ( याला जीवघेणी पण म्हणवत नाही ), जेवढी लोकसंख्या वाढली , तेवढ्या संधी पण वाढल्या आहेत, करिअर करायची क्षेत्रे पण भरपूर वाढली आहेत. सो , ओव्हरऑल असा काही प्रचन्ड फरक पडला नाहीय, आणि पुढे पडणार पण नाहीय, ( तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही शिक्षण क्षेत्रातल्या जाहिरातींना खूप सिरियस घेत आहेत, त्या अगदी इन्शुरन्स च्या जाहिरातीसारख्या बनवल्या आहेत).

किती जणांना २० वर्षांपूर्वी माहित होतं कि २० वर्षानंतर मी सध्या आहे या लेव्हल ला असणार आहे ( करिअर ,आर्थिक , सामाजिक इत्यादी)...... सो पोरांना मस्त मजा करू द्यात ज्या आपण भरपूर केल्या आहेत, Happy

Pages