फुकट मिळाला तरी राहुल रॉय चा चित्रपट पाहायचा म्हणजे जरा घाबरतच होतो, पण मधे मधे तो वाघ होतो कळाल्यावर म्हंटले जरा सुसह्य असेल तेवढे शॉट्स तरी. पण माणसाचा पौर्णिमेच्या रात्री वाघ होतो आणि दुसर्या दिवशी सकाळी परत माणूस हा यातील सर्वात अचाट आणि अतर्क्य भाग नाही. माणसासारखी माणसे काही प्रसंगात कसे वागतात ते त्यापेक्षा अतर्क्य आहे.
हे दोन शॉट बघा:
आपल्या डॉ मुलीच्या हातून बरा झाल्याचे सांगणारा पेशंट घरी येऊन बसलाय आणि मारक्या बकरीच्या नज़रेने इकडेतिकडे बघतोय (राहुल रॉय कडे बघून मारक्या म्हशीच्या म्हणता येत नाही). मुलगी तर एका होनहार-छाप संगीतकाराच्या प्रेमात आहे. पण हा पेशंट तिला सांगतो की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी उद्या परत येतो तोपर्यंत मला सांग. लगेच आई तिला सांगते की त्या फालतू संगीतकार वगैरेचा नाद सोड आणि याच्याशी लग्न कर. याचे कर्तृत्व काय? तर ऊंचे खानदान का है आणि शिकार जबरी करतो. एवढ्या दोन जमेच्या बाजू असल्यावर २४ तासांत उत्तर द्यायलाच पाहिजे ना?
दुसरा प्रसंग: राहुल रॉय आणि पूजा भट हनिमून साठी एका हॉटेलात उतरतात. मग नेमकी ती पूरणमासी की रात असल्याने रात्री राहुल रॉय स्वत:च्याच गळ्यावरून हात फिरवत काहीतरी त्रास होत असल्याचे दाखवत रूम बाहेर पडतो. "घुटन सी हो रही है" आणि बायको त्याला जाउ देते. नंतर तो वाघ बनून एका तरूणीला मारतो आणि सकाळी त्याच हॉटेल मधेच पडलेला जागा होतो. त्याला कोणीही तोपर्यंत बघत नाही. मग ही इकडेतिकडे शोधत असताना तो परत येतो. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री काही तरी त्रास होत असल्याचे सांगून गायब झालेला नवरा सकाळी परत आल्यावर तिला राग बिग काही येत नाही. कारण त्याला "घुटन सी" होत होती! (मात्र पहिल्या रात्री राहुल रॉय बाहेरच राहिल्यामुळे शेवटी कोण मरणार आणि कोणाच्या गळ्यात पूजा भट पडणार ते इथेच कळते).
पूजा भट च्या चेहर्यावर कसलेच भाव फारसे येत नाहीत. एकदा तो होनहार प्रियकर अविनाश वाधवान येऊन तिला विचारतो की ती (आता राहुल रॉय बरोबर) आनंदी आहेस का दु:खी, तर ती रडतरडत याला आनंदी म्हणून सांगते, वर म्हणते चेहर्यावर जाउ नको. बहुधा पुढचा डॉयलॉग "चेहर्यावर जाऊ नको, आपल्या दोघांनाही acting करता येत नाही" हा एडिटिंग मधे कापला असावा
आत्तापर्यंत आपण नाग, भूत वगैरे बघितले. येथे नुसता शेर च नाही तर शेर चे भूत आहे. हा शेर लोकांना मारतो, पण लपूनछपून. पुन्हा खात नाहीच. का तर म्हणे फार वर्षांपूर्वी एक शेर व शेरनी एकत्र असताना एका शिकार्याने त्यांच्यापैकी एकाला मारले. म्हणून दर पौर्णिमेला त्या वाघाचे भूत त्या जंगलात फिरते व जर कोणी माणूस दिसला तर त्याला मारते. आणि जर कोणी त्या वाघाला मारले तर मारणाराच दर पौर्णिमेला वाघ होतो व इतरांना मारतो. त्यामुळे चांगले आदिवसी जंगलात जाउ नको सांगत असताना राहुल रॉय साहेब जातात व वाघ होऊन बसतात.
आता अविनाश वाधवान आणि पूजा भट ला एकत्र आणायचे म्हणजे राहुल रॉय ला मारले पाहिजे (आणि ते नाही केले तर वाधवान साहेब जबरी पीळ गज़ला गात बसतील). पण ते कसे करणार? पोलीस तर विश्वास ठेवत नाहीत. ज्याच्यावर आरोप आहे तो काहीच दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मेला हे डॉक्टरांनी जाहीर केलेले असताना पुन्हा उठून बसला, व जेव्हा वाघाच्या हल्ल्याच्या खुणा असलेले खून होतात तेव्हा तो नेमका गायब असतो या गोष्टींची संगती वगैरे लावायच्या भानगडीत पोलिस पडत नाहीत. एकतर अवतार गिल पाहुणा कलाकार असल्याने तो काय काय करणार? पण निदान जरा काही दिवस नजरकैदेत राहुल रॉय ला ठेउन बघू. किंवा निदान झू मधल्या पिंजर्यात ठेउन बघू, झालाच वाघ तर तिकडे वापरता येईल असा व्यावहारिक दृष्टिकोन ही कोणी दाखवत नाही.
पण इंग्रजांनी उगाच आपल्यावर राज्य नाही केले! त्या जंगलात आलेल्या एका ब्रिटिश फॉरेस्ट ऑफिसर ने एक जुने बाड लिहून ठेवलेले असते. त्यात याला मारायचा मार्ग लिहीलेला असतो. मग अविनाश वाधवान चा इंडियाना जोन्स होतो आणि एका गुहेतील देवळात पौर्णिमेच्या चंद्राचा लेसर पेक्षाही पॉवरफुल 'किरण' ज्या खंजीरावर पडतो तो खंजीर घेऊन बर्याच फाइटिंग नंतर शेवटी राहुल रॉय ला मारतो.
यानंतर केवळ "पूर्णवेळ माणूसच राहतो" एवढे क्वालिफिकेशन वाधवान ला पुरेसे असायला हवे. पण तोपर्यंत त्याच्या गाण्यांच्या कॅसेट्स वगैरे निघालेल्या असतात, म्हणजे तो ही प्रश्न सुटला.
अशा चित्रपटांमधे सहसा नायक दिवसा एकदम 'गरीब बिचारा' असतो व कधीतरी एकदम सिरीयल किलर, मास्क, शहेनशाह, वाघाचे भूत वगैरे होतो. उलट येथे राहुल रॉय माणूस असताना एवढी कृत्ये करतो की त्याने वाघ होऊन वेगळे काय केले असा प्रश्न पडतो. त्यात तो काली करतूते करतो म्हणून काय पिक्चरभर काळा ड्रेस घालूनच फिरलं पाहिजे काय? मूळ वाघाच्या हल्ल्यातून मेला हे डॉक्टर सांगत असताना भिंतीतून आलेल्या एका किरणामुळे तो परत जिवंत होतो (त्यानंतर पण पूर्ण बरा व्हायला पूजा भट ला त्याला आठ पंधरा दिवस स्वत:च्या हाताने सूप वगैरे भरवायला लागते). मग मात्र गोळी (लॉंग शॉट मधे वरच्या खिशाला व क्लोजप मधे पोटाला) लागली तरी एक मिनीटात ती जखम भरून काढू शकतो. म्हणजे गोळीमुळे फक्त त्याचा खिसा गायब होतो. वाघाचेही आपण वाघ आहोत की भूत हे नक्की ठरत नाही, कारण कधी सामान्य वाघांप्रमाणे रस्त्यावरून चालावे लागते तर कधी तो पूजा भट ला स्वप्न पाडून बाजूच्या भिंतीतून रक्त सोडू शकतो, बंगल्यात असताना आलेल्या पोलिसाच्या बंद कारमधेच एकदम जाऊ शकतो.
पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का?
म्हणजे गोळीमुळे फक्त त्याचा
म्हणजे गोळीमुळे फक्त त्याचा खिसा गायब होतो. >> अरे अवघड आहे रे हे.. हसुन हसुन बेजार झाले
पूजा भट ने कधीतरी '...धनी
पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का?>> हाइट झाली हे तर... कहर आहे कहर.
(No subject)
(No subject)
धनी मातुर माझा देवा वाघावानी
धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे >>>>>
बाप्रे बाप्रे... हसून हसून वाट लागली. अशक्य आहेस रे, फा!!!
अशक्य हसतीये मी..मस्त
अशक्य हसतीये मी..मस्त
हाहाहाहा !!!! नेह्मीप्रमाणेच
हाहाहाहा !!!!

नेह्मीप्रमाणेच सिक्सर आहेत फारेन्डा !!
चेहर्यावर जाऊ नको >>>>>>
वास्तविक पाहता राहुल रॉयचा कायापालट होउन झुरळ किन्वा फार फार तर शेळी होते इतपतच मी पचवू शकतो !!
.....आताच्या आता डाऊनलोड करून
:-D.....आताच्या आता डाऊनलोड करून बघावासा वाटतोय....
आज परत वाचलं आणि परत तितकीच
आज परत वाचलं आणि परत तितकीच हसले
<<आणि ते नाही केले तर वाधवान
<<आणि ते नाही केले तर वाधवान साहेब जबरी पीळ गज़ला गात बसतील>> हहपुवा..
नेहमी चॅनल बदलले जायचे.. आता नक्कीच पहाणार
त्यामुळे चांगले आदिवसी जंगलात
त्यामुळे चांगले आदिवसी जंगलात जाउ नको सांगत असताना राहुल रॉय साहेब जातात व वाघ होऊन बसतात.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पुन्हा
पुन्हा
आधी वाचले होते भारी आहे.
आधी वाचले होते
भारी आहे.
यात बाबा कदम यांच्या या
यात बाबा कदम यांच्या या विषयावरच्या कादंबरीची आठवण झाली. फरक इतकाच की कादंबरीत वाघाने हल्ला केला असे भासवुन खुन होत असतात. शेवटी खुनी कोण ते समजते.
यानंतर केवळ "पूर्णवेळ माणूसच
यानंतर केवळ "पूर्णवेळ माणूसच राहतो" एवढे क्वालिफिकेशन वाधवान ला पुरेसे असायला हवे..
परत एकदा वाचुन
परत एकदा वाचुन

यात बाबा कदम यांच्या या
यात बाबा कदम यांच्या या विषयावरच्या कादंबरीची आठवण झाली. फरक इतकाच की कादंबरीत वाघाने हल्ला केला असे भासवुन खुन होत असतात. शेवटी खुनी कोण ते समजते.>>> नाव काय त्या कादंबरीच?
मस्त आहे हे!
आशिकी बघून आल्यानंतर राहुल रॉय आवडायचा मला
“ चेहर्यावर जाऊ नको,”, “ धनी
“ चेहर्यावर जाऊ नको,”, “ धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे” -
क्या बात हैं फा 
बादवे, कोणी भेडिया बघितला का
बादवे, कोणी भेडिया बघितला का?
Twighlight बघताना बरं कोणी
Twighlight बघताना बरं कोणी नावं ठेवत नाही. वा रे वा !
आपलं ते कार्ट आणि त्यांचा तो बाब्या 
मस्त लिहिलं आहे.
पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का? >>>> This was hilarious
: हाहा:
अशक्य विनोदी लिहिलंय फारएंड!!
फार सुंदर लिहितोस..अगदी स्ट्रेस बस्टर !
पूजा भट ने कधीतरी '...धनी
पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का? >> खत्तरन्नाक! ह्याचा उगम ह्या धाग्यात आहे हे माहीत नव्हतं. जेम!
वाघाचाच (वाघ = शार्दुल) विषय आहे, तर त्याच्या चालीत (शार्दुलविक्रीडितात) ही कथा सांगता येईल -
एकश्लोकी जुनून
आदौ राहुल शुश्रुषार्थ गमनम्, पूजाविवाहोत्सुकम् |
हित्वा तम् अविनाश वाधवमयम् संगीतकारं प्रियम् ||
पूजा-राहुल-'चंद्ररात्र'गमनम्, कण्ठोद्भवम् दाहनम् |
भूत्वा शार्दुल-कामिनी-प्रहणनम् प्रातः पुनर्मानवम् ||
आंग्लं पत्रपठाविनाशसहितं कोलाहलं मृत्युदम् |
पश्येदं कथितम् जुनून-चरितम् 'हर्पा'-मुखे कौतुकम् ||
भारी आहे हे .. चेहऱ्यावर जाऊ
भारी आहे हे .. चेहऱ्यावर जाऊ नको
हपा : _/\_ हे कहर जमले आहे.
हपा : _/\_
हे कहर जमले आहे.
पुन्हा धन्यवाद लोकहो.
हपा आईशप्पत एकदम महान जमले
हपा आईशप्पत एकदम महान जमले आहे दंडवत घ्यावा _/\_
काय टॅलंट, ह पा !!!
काय टॅलंट, ह पा !!!
किती हुशार लोक आहेत इथे!!!!
बादवे, कोणी भेडिया बघितला का?
बादवे, कोणी भेडिया बघितला का?
>>येस ... इट्स गुड... वन टाईम watch
आज परत वाचलं हे
आज परत वाचलं हे
ह.पा., जबरदस्त!
हे प्रतिसाद पाहून आता हपांची
हे प्रतिसाद पाहून आता हपांची पोस्ट वाचली...
हपा _/\_
Pages